Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘बेमुदत बंद’चा इशारा

$
0
0

नागरी सहकारी बँकांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रिझर्व्ह बँकेकडून नागरी सहकारी बँकांना पुरेशी रोकड उपलब्ध करून न देण्यात आल्यास नागरी सहकारी बँका बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनतर्फे देण्यात आला. दरम्यान, नागरी सहकारी बँकांना सात दिवसांत रोकड मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

पुणे जिल्हा नागरी बँक असोसिएशनतर्फे आमदार अनिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, माजी खासदार गजानन बाबर, ‘मॅफकॅब’चे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, शहर व जिल्ह्यातील सहकारी बँकांचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, बँकांच्या विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आदी या मोर्चात सहभागी झाले होते. कौन्सिल हॉल येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यानंतर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सौरव राव यांना निवेदन दिले.

‘नोटाबंदीनंतर नागरी सहकारी बँकांना अत्यल्प रोकड दिली जात असल्याने ५० लाख ग्राहकांवर त्याचा परिणाम होत आहे. केंद्र सरकार सहकारी क्षेत्र मोडीत काढण्याच्या दिशेने जात आहे. लवकरात लवकर नागरी सहकारी बँकांना पुरेसा निधी न दिल्यास बँका बेमुदत बंद ठेवण्यात येतील,’ असे अनिल भोसले यांनी सांगितले.

‘नागरी बँकांना रिझर्व्ह बँकेनेच बँकिंग परवाना दिला आहे; मात्र रोकड उपलब्ध करून दिली जात नाही. त्याचा परिणाम खातेदारांवर होत असून, बँक व खातेदार यांचे संबंध बिघडत आहेत,’ असे अॅड. मोहिते यांनी सांगितले.

‘सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या माध्यमातून सहकार चळवळ मोडीत काढण्याचा चंग रिझर्व्ह बँकेने बांधला आहे. या राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांना मिळालेल्या पैशांचे वाटप केले का, हे जाहीर करावे. सहकारी बँका टिकून राहण्यासाठी पुढील २५ दिवसांत सर्व बँकांना खातेनिहाय प्रमाणात रोकड उपलब्ध करून द्यावी,’ असे मिलिंद काळे म्हणाले.

‘रिझर्व्ह बँकेने नागरी बँकांना सापत्न वागणूक देण्याचे थांबवून खातेदारांवरील अन्याय थांबवला नाही, तर रस्त्यावर उतरावे लागेल,’ असे बाबर यांनी सांगितले.

‘केंद्र आणि राज्य सरकार नागरी बँकांबद्दल संभ्रम निर्माण करत आहे. तळागाळात जनतेकडील पैसा नागरी बँकांच्या माध्यमातून व्यवहारात येतो. याची जाणीव रिझर्व्ह बँकेतील अधिकाऱ्यांना नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत रिझर्व्ह बँकेच्या या मनमानी कारभाराविरोधात संघर्षासाठी सर्व नागरी बँकांना एकत्रित लढा द्यावा लागेल,’ असे विद्याधर अनास्कर म्हणाले.

सात दिवसांत रोकड

‘नागरी सहकारी बँकांना पुढील सात दिवसांत खातेदारांच्या प्रमाणात रोकड उपलब्ध करून देण्यात येईल,’ यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी सौरव राव यांनी असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले.

.......................................................
अजूनही रांगा बँकेत मावेनात

रोकडीच्या टंचाईमुळे खातेदारांवर निराशेची वेळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महिन्याचा पहिला आठवडा सुरू होऊनही हातात पैसे न आल्याने सोमवारी बँकांमध्ये गर्दी झाली होती. काही बँकांमध्ये बऱ्यापैकी रोकड असली, तरी अनेक बँका आणि विशेषतः खासगी बँकांकडील रोकड संपल्याचे चित्र होते. दुसरीकडे, सुरू असलेल्या एटीएम केंद्रांबाहेर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

महिन्याचा पाचवा दिवस उलटून गेला, तरीही बँकांना पुरेशी रक्कम उपलब्ध न झाल्याने खातेदारांना आपला पगार किंवा पेन्शनमधील पुरेसे पैसे मिळू शकले नाहीत. त्यामुळे सोमवारी बँकांमध्ये मोठ्या रांगा लागल्या होत्या. रोख रकमेअभावी काही बँकांमध्ये सकाळपासूनच मोजकी रक्कम दिली जात होती. परंतु, दुपारीही रोकड न आल्याने बँकांना ‘रोकड संपली’ असे फलक लावावे लागले. त्यामुळे खातेदारांना निराश होऊन परतावे लागले. विशेषतः खासगी बँकांमध्ये हे चित्र दिसून आले.

ज्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये रोख रक्कम उपलब्ध होती, त्या बँकांत बचत खातेदारांना आठ ते दहा हजार, तर चालू खातेदारांना २०-२२ हजारांपर्यंतची रक्कम दिली गेली. ज्या बँकांकडे रोख रक्कम उपलब्ध नव्हती, अशा बँकांमध्ये दोन ते पाच हजारांदरम्यानची रक्कम दिली गेली.

एटीएम केंद्रांबाहेर दिवसभर रांगा

रोख रक्कम उपलब्ध असलेल्या बँकांमध्ये कामकाजाच्या वेळेत रांगा होत्या; मात्र ‘एटीएम’मधून पैसे काढण्याची मर्यादा अडीच हजारच असल्याने बँकाही एटीएम सुरू ठेवत होत्या. अर्थात मोजकीच एटीएम सुरू असली, तरी त्या ‘एटीएम’बाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. काही एटीएम केंद्रांबाहेर तर एक, दीड किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. रात्री उशिराही या रांगा कायम होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत बांधकाम; आठ जणांविरुद्ध गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अनधिकृत बांधकाम करणाऱ्या आठ जणांविरुद्ध पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) गुन्हे दाखल केले आहेत. या बांधकामांचे वास्तु​विशारद आणि आरसीसी कन्सल्टंट यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे.

रेखा चंदनशिवे आणि प्रशांत चंदनशिवे (रा. मांजरी बुद्रुक, हवेली), उल्हास दरवडे (रा. मांजरी बुद्रुक, हवेली), साईराज रायकर आणि पंढरीनाथ रायकर (रा. धायरी), माणिक मोहिते (रा. लोहगाव), संतोष ढगे (रा. नेरे, मुळशी), प्रवीण गायकवाड (रा. मारुंजी, मुळशी), उमरसिंग परदेशी (रा. खडकाळा, मावळ) प्रवीणा जैन आणि सोनल जैन (रा. देवघर, मावळ) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

धायरी येथील अनधिकृत बांधकामामधील फ्लॅटच्या विक्रीसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्याचे पत्रक छापण्यात आले होते. त्यावर वास्तुविशारद आणि आरसीसी कन्सल्टंट यांची नावे होती. त्यावरून वास्तुविशारद आर. जी. माळी आणि आरसीसी कन्सल्टंट विकास वाघमारे यांना नोटीस बजावण्यात आली​ होती. त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना सहआरोपी करण्यात आले असल्याचे ‘पीएमआरडीए’कडून सांगण्यात आले.

दरम्यान, प्राधिकरणाकडून आतापर्यंत सुमारे १७ हजार जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटिशीला उत्तर न देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी अनधिकृत बांधकामाबाबतची माहिती कळवण्याचे आवाहन ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देवबाभळी’ने कोरले विजेतेपदावर नाव

$
0
0

रंगसंगीत संगीत एकांकिका स्पर्धेत पुण्याच्या ‘विठूरंग’ला दुसरा क्रमांक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

थिएटर अॅकॅडमीतर्फे आयोजित रंगसंगीत संगीत एकांकिका स्पर्धेत नाशिकच्या ‘देवबाभळी’ या एकांकिकेने बाजी मारून स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. पुण्याच्या ‘संगीत विठूरंग’ या एकांकिकेने द्वितीय, तर नाशिकच्या संगीत फुगडी या एकांकिकेने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

रविवारी स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडली. राज्यभरातील केंद्रांमध्ये घेण्यात आलेल्या प्रथमिक फेऱ्यांतून सात संगीत एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये नाशिकच्या देवबाभळी या एकांकिकेने बाजी मारली. ‘संत तुकाराम महाराजांची सहचारिणी आवली त्यांच्यासाठी जेवण घेऊन जात असताना तिच्या पायात बाभळीचा काटा घुसतो. गरोदर असलेल्या आवलीच्या पायातील काटा साक्षात रखुमाई काढते. या सगळ्यासाठी आवली पांडुरंगाला दोष देते. रखुमाई मात्र तिची समजूत घालते,’ अशा कथेवर आधारलेली ही एकांकिका होती. शुभांगी सदावर्ते हिने आवलीची भूमिका साकारून आपल्या गोड गळ्याने सर्वांची मने जिंकली. तिला गायक अभिनेत्रीच्या प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या ‘संगीत विठूरंग’ या एकांकिकेमध्ये ‘कलाकाराचे दैवत म्हणजे त्याची कलाच,’ असा संदेश देण्यात आला. कलावंतांना समाजात दुय्यम ठरवले जाते; मात्र इतरांच्या आनंदासाठी ते कायम झटतात, याचा प्रत्यय या एकांकिकेतून आला. आशुतोष मुंगळे या कलाकाराने उत्कृष्ट गाण्यांचे आणि अभिनयाचे सादरीकरण केले. या नाटकात लिहिलेल्या संवादांना रसिकांनी भरभरून दाद दिली. अक्षय जोशी याने या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन केले होते.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण अभिनेता जितेंद्र जोशी व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माधुरी पुरंदरे, अतुल परचुरे, विजय केंकरे, ‘थिएटर अॅकॅडमी’चे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे, उपाध्यक्ष सागर अत्रे आदी उपस्थित होते. अभिनेत्री विभावरी देशपांडे, उदय लागू आणि श्रीराम पेंडसे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेचे यंदाचे सातवे वर्ष होते.

...............

गद्य विभागात ‘खटारा’ची बाजी

तीन डिसेंबर रोजी भरत नाट्य मंदिरात पार पडलेल्या रंगसंगीत स्पर्धेच्या गद्य विभागाच्या अंतिम फेरीत अहमदनगरच्या ‘खटारा’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. पुण्याच्या ‘दी क्युरियस केस ऑफ’ या एकांकिकेने द्वितीय, तर ‘बीएमसीसी, पुणे’च्या ‘बाई’ या एकांकिकेने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. मुंबईच्या ‘ओवी’ या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक/तांत्रिक एकांकिकाचा पुरस्कार देण्यात आला. नीलिमा कुलकर्णी, सुबोध राजगुरू व अनिरुद्ध खुटवड यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन गुन्हेगार वाढले

$
0
0

सर्वच गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग वाढला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुन्हेगारीतील अल्पवयीन मुलांची (विधीसंघर्षग्रस्त बाल) वाढ सातत्याने सुरूच असून, २०१४च्या तुलनेत गेल्या वर्षी अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील समावेश सुमारे सहा टक्क्यांनी वाढला आहे. खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, चोरी, खून, अपहरण, फसवणूक, दंगा, तसेच विनयभंग यांसारख्या सर्वच गंभीर गुन्ह्यांमध्ये ही वाढ दिसून येत आहे.

अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील वाढणारा वावर आणि सहभागाबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘क्राइम इन महाराष्ट्र’ या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात २०१४मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बालगुन्हेगारांनी केलेले गुन्हे ३०७ने अधिक आहेत. त्याच वेळी विशेष आणि स्थानिक कायद्याखाली दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांच्या गुन्ह्यांचे प्रमाण नऊ टक्क्यांनी घटले आहे.

बालगुन्हेगारी अनुक्रमे मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि नाशिक शहरात वाढली आहे. मुंबई रेल्वे, नांदेड, अमरावती ग्रामीण, पालघर, बुलढाणा आणि चंद्रपूर येथेही बालगुन्हेगारांविरुद्ध लक्षणीय गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी गेल्या वर्षी ताब्यात घेतलेल्या बालगुन्हेगारांच्या संख्येतही जवळपास दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा ही बालगुन्हेगारीला खतपाणी घालणारी मुख्य कारणे असल्याचे आढळले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये ४३६ अशिक्षित, प्राथमिक स्तरापर्यंतचे शिक्षण झालेले २५५९, आई-वडिलांसमवेत राहणारे ६२१८, पालकांसमवेत राहणारे ५८३ आणि कुटुंबहीन असलेले ५६९ बालगुन्हेगार असल्याचे आढळले आहेत. अत्यंत गरिबी असलेल्या गटातील बालगुन्हेगारीचे प्रमाण घटत असल्याचे आढळले आहे. २५ हजार ते ५० हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या गटातील बालगुन्हेगारी वाढते आहे.

बालगुन्हेगारांचे वय १८वरून १६ वर्षे करण्याबाबत सरकारी पातळीवर गांभीर्याने विचार करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गजा मारणेला पुण्यात आणण्यासाठीराजकीय नेतेमंडळींची धडपड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कुख्यात गुंड गजा मारणे याला कोल्हापूर तुरुंगातून पुण्यात आणण्यासाठी राजकीय स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. मारणेला पुण्यात आणण्यासाठी काही राजकीय नेतेमंडळींकडून तुरुंग महानिरीक्षक कार्यालयातील फोन खणखणू लागले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘त्या’ राजकीय नेत्यांना मारणेचे पुण्यातील तुरुंगामधील वास्तव्य फायद्याचे असल्याने हा घाट घातला जात आहे.

गुंड बाबा बोडके याच्यावरून नुकताच गदारोळ झाला आहे. मारणे याला पुण्यात आणण्यासाठी घाट घातला जात आहे. मारणे याची पत्नी कोथरूड येथील नगरसेविका आहे. त्याशिवाय तो एका बड्या राजकीय नेत्याचा लाडका ‘कार्यकर्ता’ आहे. मारणे हा येरवडा जेलमध्ये आल्यास त्याच्या साथीदारांकडून तो निरोपाकरवी अनेक झोपडपट्ट्यांमधील मतदान तो ‘फिरवू’ शकतो, अशी त्याची ख्याती आहे. त्याच्या पुण्यातील गुन्हेगारी साम्राज्यात आणि नेटवर्कमध्ये योग्य वेळी योग्य तो संदेश पाठवण्यासाठी त्याचे पुण्यात असणे आवश्यक मानले जात आहे.

मारणेला पुण्यात आणण्यासाठी एका बड्या राजकीय नेत्याकडून तुरुंगामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार फोन करण्यात आले होते. या नेत्याकडून मारणेला पुण्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच भोपाळ येथील तुरुंग संशयित दहशतवाद्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे तुरुंगामधील संघटित टोळ्यांबाबतचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. भोपाळ येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मारणेला पुण्यात आणणे धोकादायक असल्याने त्याला पुण्यात आणण्यात येणार नाही, अशी प्रतिक्रिया उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

मारणे आणि नीलेश घायवळ टोळीत भडका उडल्यानंतर खूनसत्र सुरू झाले होते. पुणे आणि ग्रामीण पोलिसांनी मारणेविरुद्ध ‘मोक्का’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याची रवानगी येरवडा तुरुंगात केली होती. तुरुंग प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून मारणेला कोल्हापूर तुरुंगामध्ये ठेवले आहे. त्याची टोळी वेगवेगळ्या जेलमध्ये विभागून ठेवण्यात आल्याने या गुन्हेगारांची तुरुंगामधील दादागिरीही आटोक्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे मेट्रोचे भूमिपूजन PM मोदींच्या हस्ते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो प्रकल्पावर बुधवारी केंद्र सरकारकडून अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी मेट्रोचा प्रस्ताव सादर होण्याचे संकेत मिळत असून, डिसेंबर अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचे भूमिपूजन केले जाणार आहे.

केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (पीआयबी) मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर नगरविकास आणि अर्थ मंत्रालयानेही मेट्रोच्या प्रस्तावाला ‘ग्रीन सिग्नल’ दिला होता. त्यामुळे, मेट्रोचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळसमोर केव्हाही दाखल होईल, अशी शक्यता होती. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेट्रोचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अर्थ मंत्रालयाच्या मान्यतेनंतर नगरविकास विभागाने मेट्रोचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला होता. त्यामुळे, मेट्रोचा प्रस्ताव बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर होईल, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली.

पंतप्रधान २४ डिसेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार असून, त्याचवेळी मेट्रोचे भूमिपूजन केले जाईल, असे भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश बीडकर यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकांची आचारसंहिता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यत आहे. तत्पूर्वी मेट्रोचे भूमिपूजन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेच्या ट्रॅकवर फसलेल्या मेट्रोला या निमित्ताने गती मिळण्याची चिन्हे आहेत.

एनजीटीसमोरही सुनावणी

पुणे मेट्रोच्या नदीपात्रालगतहून जाणाऱ्या मार्गावर आक्षेप घेत त्याविरोधात ‘राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणा’कडे याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरील, पुढील सुनावणी बुधवारी होणार असून, सर्व पुणेकरांचे त्याकडेही लक्ष लागले आहे. नदीपात्रातून जाणाऱ्या मेट्रो मार्गामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. त्या संदर्भातील जैवविविधता समितीचा अहवाल एनजीटीसमोर सादर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दादांच्या फोननंतर ‘पवनाथडी’ भोसरीत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
राजकीय डाव साधण्यासाठी पवनाथडी यात्रा कोठे भरणार यावरून गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, आगामी महापालिकेच्या निवडणुका आणि पक्षांतराच्या उड्या लक्षात घेता यंदाची पवनाथडी यात्रा भोसरीत आयोजित करण्याचा फोन थेट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (६ डिसेंबर) केल्यानंतर या विषयावर अखेर पडदा पडला.
सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान, पिंपरीतील एच. ए. कंपनीचे मैदान की भोसरी अशा गोंधळात अडकलेली पवनाथडी अखेर भोसरीकरांच्या पदरात पडली असून, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा गोफणे यांच्या मागणीला यश आले आहे. विशेष म्हणजे माजी आमदार विलास लांडे यांच्या कट्टरसमर्थक मानल्या जाणाऱ्या गोफणे यांनी पवनाथडी भोसरीत भरविण्यात लावलेला जोर सफल ठरल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती.
प्रशासनाने जागेचा विचार करता पवनाथडी गेल्यावर्षीप्रमाणे पिंपरीतील एच. ए. मैदानावर भरविण्याचे नियोजन केले होते. मात्र, पवनाथडी यात्रा सांगवीला व्हावी अशी मागणी महापौर शकुंतला धराडे यांची मागणी होती; तर महापालिका बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा गोफणे यांनी यात्रा भोसरी येथे भरावी, अशी मागणी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली होती. महिला बचतगटांच्या वस्तूंना आणि पदार्थांना थेट ग्राहक मिळावेत या उद्देशाने पवनाथडी यात्रेचे आयोजन केले आहे.
महापालिकेच्या निवडणुकांमध्ये पवनाथडी यात्रेचा फायदा करून घेण्याची नामी संधी हातातून जाऊ नये यासाठी पिंपरी, सांगवी आणि भोसरीमधील स्थानिक नेतृत्व धडपडत होते. मात्र, महापौर शकुंतला धराडे यांची मागणी नाकारून भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे गटाला राष्ट्रवादी काँग्रेसने एक प्रकारे शह देण्याचा प्रयत्न याद्वारे केल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे भाजपवासी झालेले अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतलेला ‘भोसरी २०२०’ हा कार्यक्रम अनेकांच्या डोळ्यात खुपला होता. त्यातच आता माजी आमदार लांडे यांच्या कट्टर समर्थक असणाऱ्या गोफणे यांच्या मागणीनंतर पवनाथडी भोसरीत होत असल्याने आगामी काळात या यात्रेत देखील राजकीय आखाडा पाहायला मिळू शकतो.
भोसरीत पहिल्यांदाच ही यात्रा होत असून, याचा फायदा लांडे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोण-कोण घेणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. पक्षांतराच्या उड्या आणि संभाव्य हालचाली लक्षात घेता थेट अजित पवार यांनी पवनाथडीच्या नियोजनात लक्ष घातले. त्यामुळे अशा यात्रांची अधिक गरज ही महिला बचतगटांपेक्षा राजकीय पुढाऱ्यांनाच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. निवडणुका आणि पवनाथडी याचा कोणताही संबंध नाही असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या राजकीय नेत्यांकडून खरेतर सुरू आहे. परंतु, दरवर्षी जानेवारी महिन्यात भरवली जाणारी ही यात्रा यंदा डिसेंबरमध्येच होत आहे.

स्टॉलसाठीच्या अर्जाला मुदतवाढ
पवनाथडीतील स्टॉलसाठी २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. या कालावधीमध्ये ४०० स्टॉलसाठी ६०० अर्ज आले होते. मात्र, महापालिकेच्या सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम यांच्या मागणीनुसार अर्ज स्वीकृतीसाठी आज, बुधवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटक न करण्यासाठी लाच घेताना सहायक फौजदाराला अटक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदाराला अटक न करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी अटक केली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष जगन्नाथ गायकवाड (वय ५२) असे अटक केलेल्या पोलिसाचे नाव आहे. तक्रारदार यांच्यावर शिवाजीनगर कोर्टात चेक बाउन्स झाल्याची केस सुरू असून, तक्रारदार कोर्टात हजर राहिले नाहीत. त्यामुळे कोर्टाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. त्या वॉरंटची बजावणी करण्याचे आदेश बिबवेवाडी पोलिसांना दिले होते. वॉरंटची बजावणी करण्यासाठी गायकवाड यांना पाठविण्यात आले होते.
वॉरंटनुसार तक्रारदार यांना अटक न करण्यासाठी गायकवाड यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी गायकवाड यांनी वॉरंटनुसार अटक न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती चार हजार रुपये घेण्याचे मान्य केले होते. बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या आवारात सोमवारी सापळा रचण्यात आला. गायकवाड यांना चार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास तत्काळ एसीबीकडे तक्रार करा, असे आवाहन पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहावीच्या अर्जांसाठी बोर्डाने मुदत वाढवली

$
0
0



पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून येत्या मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत मंडळाने वाढवून दिली आहे. त्यामुळे शाळांना विलंब शुल्कासह १३ डिसेंबरपर्यंत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे अर्ज भरता येतील. शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून दिल्यानंतर १३ डिसेंबरपर्यंत परीक्षा शुल्काचे चलन आणि विद्यार्थ्यांच्या याद्यांची छपाई करायची आहे. शाळांना विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना काही अडचण आल्यास मुख्याध्यापकांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, अशी माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सोमवारी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रिलायसन्स’ला काळ्या यादीत टाकणार का ?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे-बेंगळुरू महामार्गावर देहूरोड ते सातारा या दरम्यानच्या सहा पदरीकरणासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दिलेली मुदत आता संपली आहे. मात्र, अद्यापही या रस्त्याची अनेक कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे बोलल्याप्रमाणे ‘रिलायन्स इन्फ्रा’ला काळ्या यादीत टाकणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
महामार्ग व अन्य प्रकल्पांबाबत जिल्ह्यातील आमदार, पालकमंत्री आणि गडकरी यांची मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिल्ली येथे आढावा बैठक झाली होती. पुणे-सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टोलवसुली होते; मात्र या रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या ‘रिलायन्स इन्फ्रा’ कंपनीचे अधिकारी सहकार्य करत नाहीत. तसेच, या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे, अशी माहिती जिल्ह्यातील आमदारांनी गडकरी यांना दिली होती. त्यावेळी गडकरी यांनी देहूरोड ते सातारा या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ‘रिलायन्स’ला सहा महिन्यांची मुदत दिली होती. त्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास ‘रिलायन्स’ला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात गडकरी यांनी पुण्यात एक आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत रिलायन्स’ने मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत मागितली होती. मात्र, अद्यापही या रस्त्याचे काम अपूर्णच राहिले आहे.

पावणेचार वर्षांनंतरही कामे बाकी
पुणे-बेंगळुरू महामार्गावर सुरुवातीला देहूरोड ते सातारा दरम्यान चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतर काही वर्षांतच सहा पदरीकरणास मान्यता मिळाली. हे काम मार्च २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर आतापर्यंत पावणेचार वर्षे उटलून गेली आहेत. अद्यापही अनेक ठिकाणी कामे सुरूच आहे. मे महिन्यात या रस्त्याचे २० टक्के काम बाकी होते. त्यामध्ये १० किमी रस्त्याचे सहापदरीकरण आणि नसरापूर व वारजे येथील उड्डाणपुलाचे काम बाकी होते. तसेच, अनेक ठिकाणचे भुयारी मार्गही प्रलंबित होते. नसरापूर येथील उड्डाणपुलाचे काम काही प्रमाणात झाले होते. तर, वारजे येथील पुलाचे काम सुरू व्हायचे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एफआयरची’ प्रत पोलिसांच्या वेबसाइटवर

$
0
0

सुविधा सुरू करणारे पुणे राज्यातील दुसरे शहर

म. टा. प्रतिनिधी, पुणे
तक्रार केल्यानंतर ‘एफआयआर’ची (फस्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) प्रत मिळविण्यासाठी नागरिकांना आता पोलिस ठाण्यांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल होणाऱ्या गुन्ह्याचा ‘एफआयआर’ आता पुणे पोलिसांच्या वेबसाइटवर ऑनलाइन मिळणार आहे. ऑनलाइन ‘एफआयआर’ उपलब्ध करून देणारे पुणे हे राज्यातील दुसरे शहर ठरले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पुणे शहर पोलिसांनी ही सुविधा मंगळवारपासून सुरू केली आहे.

देशभरातील पोलिसांना त्यांच्या वेबसाइटवर ‘एफआयआर’ प्रसिद्ध करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने सप्टेंबर महिन्यात दिले होते. त्यानुसार महाराष्ट्रात पोलिस महासंचालकांनी नोव्हेंबर महिन्यात ही प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यातील पोलिस आयुक्तालये आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांना त्यांच्या वेबसाइटवर रोज होणाऱ्या गुन्ह्यांचे ‘एफआयआर’ प्रसिद्ध करावे लागणार आहेत. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉस्को), बलात्कार, विनयभंग आणि देशाच्या दृष्टीने संवेदनशील असणारे गुन्हे वगळता सर्व गुन्ह्यांचे ‘एफआयआर’ वेबसाइटवर टाकले जाणार आहेत. महाराष्ट्रात नागपूर शहराने ही सुविधा प्रथम सुरू केली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही सुविधा सुरू केली आहे. सोमवारी या प्रक्रियेची प्रायोगिक चाचणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी ही सुविधा सुरू करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी त्यांनी दिलेल्या तक्रारीची प्रत तत्काळ मिळणार आहे. पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एक फौजदार व कर्मचारी हे काम पाहणार आहेत. तर, आवश्यक तांत्रिक मदत एरोनुब कंपनी करणार आहे.

पोलिस उपायुक्त दीपक साकोरे म्हणाले, ‘शहरात रोज दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे एफआयआर वेबसाइटवर टाकले जाणार आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत एफआयआर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नेटवर्क प्रॉब्लेममुळे २४ तासांत एफआयआर टाकता आला नाही तर, तो किमान ७२ तासांच्या आत टाकणे बंधनकारक आहे. हा वेळ कमीत-कमी करण्याचा प्रयत्न राहणार आहे.’

असा पाहता येणार ‘एफआयआर’

पुणे पोलिसांच्या www.punepolice.gov.in या वेबसाइटवर जाऊन तेथे लिंकवर क्लिक करावे. त्या ठिकाणी प्रथम खबरी अहवालावर क्लिक केल्यानंतर ज्या गुन्ह्याचा एफआयआर पाहायचा आहे, त्याचा सीआर क्रमांक, फिर्यादी/आरोपीचे नाव, तसेच पोलिस ठाण्याचे नाव टाकून सर्च करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हेगारांवर मोक्काचा बडगा

$
0
0

राज्यात वर्षभरात ४६५ जणांवर कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) आणि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन डेन्जरस अॅक्टिव्हिटी (एमपीडीए) या कायद्याचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.

राज्यात २०१५मध्ये ७५ सराईत गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई करून त्यांना विविध तुरुंगात स्थानबद्ध केले आहे. तर, ४६५ जणांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. राज्यात सर्वांत जास्त कारवाई पुणे शहर व जिल्ह्यात करण्यात आली आहे.

राज्याच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा ‘महाराष्ट्रातील गुन्हेगारी २०१५’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सराईत गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पहिल्यांदाच एमपीडीएचा चांगल्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे. त्यामुळे २०१४च्या तुलनेत २०१५मध्ये कारवाई दुप्पट वाढली आहे. २०१४मध्ये फक्त ३८ सराईत गुन्हेगारांवर एमपीएडीची कारवाई करण्यात आली होती. गेल्या वर्षी ७५ सराईत गुन्हेगारांवर कारवाई करून त्यांना विविध तुरुंगांमध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे.

राज्यात सर्वाधिक एमपीडीएची कारवाई नागपूर शहरात करण्यात आली आहे. या ठिकाणी ३८ गुन्हेगारांवर कारवाई करून त्यांना तुरुंगात स्थानबद्ध केले आहे. त्याखालोखाल पुणे शहरात १२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, मुंबई शहर ६, सोलापूर शहर ६, ठाणे व औरंगाबाद शहर प्रत्येकी तीन गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे. सराईत गुन्हेगारांना चाप बसावा आणि त्यांचे कंबरडे मोडण्यासाठी एमपीडीएचा फायदा झाला आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर या कायद्याचा वचक निर्माण होऊ लागला आहे.

गुन्हेगारी टोळ्यांवर वचक

पुणे शहर व जिल्ह्यात मोक्काची कारवाई करून गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यात पोलिसांना यश आले आहे. राज्यात २०१५मध्ये ४६५ जणांवर मोक्काची कारवाई झाली आहे. त्यामध्ये पुणे शहर व जिल्ह्याचे प्रमाण निम्मे आहे. पुणे शहरात सर्वांत जास्त ११७ जणांवर मोक्काची कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरातील मुख्य गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख व त्यांचे साथीदार सध्या तुरुंगात आहेत. त्यानंतर पुणे ग्रामीणमध्ये ८४, नागपूर शहर ५२, व मुंबईत ४४ गुन्हेगारांना मोक्का लावण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीमध्ये होणार बाल वैज्ञानिक परिषद

$
0
0

विद्यार्थ्यांच्या ६५८ प्रकल्पांचे सादरीकरण

म. टा. प्रतिनिधी, बारामती
विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (व्हीआयआयटी) आणि नॅशनल चिल्ड्रेन्स सायन्स काँग्रेस यांच्या वतीने बारामतीमध्ये २४व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बाल वैज्ञानिक परिषदेचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांचे हस्ते, तसेच माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या परिषदेत ६५८ प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने नावीन संकल्पना वापरून दिव्यांगांचा सर्वांगिण विकास साध्य करणे, ही राष्ट्रीय बाल वैज्ञानिक परिषदेची मूळ संकल्पना आहे. त्यासाठी नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन, तसेच केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांचाही या परिषदेत सक्रीय सहभाग आहे, अशी माहिती या परिषदेचे मुख्य संयोजक विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅड. ए. व्ही. प्रभुणे, सचिव द. रा. उंडे, विश्वस्त सुनेत्रा पवार यांनी दिली.

देशातील विविध राज्यांतून विद्यार्थी, प्रशिक्षक व शिक्षक मिळून दीड हजार जणांचा सहभाग असेल. पाच दिवस ही परिषद चालणार असून आशिया खंडातील काही देशातील बालवैज्ञानिकही यात सहभागी होणार आहेत.

पालकांसाठी चर्चासत्र

पालक व मुलांसाठी बायो केमिस्ट्री, भौतिकशास्त्र, अवकाश संशोधन, तसेच तंत्रज्ञान या विषयात करिअर करण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याबाबत अच्युत गोडबोले, राजेंद्र कुंभार, अनन्या बनर्जी, रेखा प्रधान असे वैज्ञानिक २७ ते ३० डिसेंबर दरम्यान मार्गदर्शन करणार आहेत, असे आयोजकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दक्षता समितीची बैठकच नाही

$
0
0

येरवड्यात रेशनिंग दुकानदारांना धमकावण्याचा प्रकार

म. टा. प्रतिनिधी, येरवडा
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवून जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या दक्षता समितीची दरमहा बैठक घेण्याचे बंधन असताना परिमंडळ ई-विभागात गेले सात महिने ही बैठकच झाली नसल्याचे समोर आले आहे. समितीचे अध्यक्ष तथा आमदार आणि परिमंडळ अधिकारी बैठक घेत नसल्याने अशासकीय सदस्यांवर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे काही सदस्य पदाचा दुरुपयोग करून अन्न धान्य दुकानदारांना रेशनिंगचा माल पकडल्याचे सांगून धमकावून पैसे उकळण्याचे प्रकार घडत आहेत.

येरवड्यातील अन्नधान्य परिमंडळ ई विभाग कार्यालयातील दक्षता समितीच्या एका अशासकीय सदस्याने रेशनिंगचा माल पकडला असून सोडविण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदाराला धमकावून पन्नास हजाराची मागणी केली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने दुकानदाराने पोलिस ठाणे गाठून तक्रार केली आहे. याबाबत ‘मटा’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवून गैरप्रकारला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका, तालुका, जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर दक्षता समित्यांची स्थापना केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे शहरात ११ अन्नधान्य परिमंडळात स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापना केल्या आहेत. यामध्ये पाच स्थानिक नगरसेवकांची नियुक्ती करून त्यात दोन विरोधी पक्षाचे सदस्य, तसेच अशासकीय सदस्यांमध्ये ५० टक्के जागांवर महिलांची निवड बंधनकारक आहे. दर महिन्याला दक्षता समितीची एकदा बैठक घेणे बंधनकारक आहे.

अध्यक्षांना बैठक घेणे जमले नाही, तर परिमंडळ अधिकारी तथा सचिवांनी महिन्याच्या वीस तारखेच्या आत बैठक घेणे गरजचे आहे. या बैठकांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणेही बंधनकारक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १६ सप्टेंबर २०१५ रोजी स्थापान केलेल्या परिमंडळ ई विभागाच्या दक्षता समितीच्या वर्षभराच्या कालवधीत डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये पाच बैठका झाल्या. यात केवळ एका बैठकीला आमदार तथा अध्यक्ष हजर होते.

शहरातील सर्व अकरा अन्नधान्य परिमंडळ कार्यालयात दक्षता समितीची दरमहा बैठक झालीच पाहिजे. बैठका घेतल्या नाहीत, तर परिमंडळ अधिकारी जबाबदार राहील, असे अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार म्हणाले.

परिमंडळात सुरुवातीचे पाच महिने दक्षता समितीच्या बैठका झाल्या. त्यानंतर वैद्यकीय रजेवर गेल्याने प्रभारी अधिकाऱ्यांनी गेले सात महिने समितीची बैठक घेतली नाही. आगामी काळात नियमित बैठका घेतल्या जातील, असे परिमंडळ ई विभागाचे अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंड लोकल तीन स्टेशनविना?

$
0
0


पुणे : पुणे-दौंड लोकल सेवा सुरू करण्याबाबत खुटबाव, कडेठाण आणि मांजरी या स्टेशनवर प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे ही तीन स्टेशन वगळता लोकल सेवा सुरू करता येईल का, याची चाचपणी रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. या कामी काही संघटनांच्या प्रतिनिधींना या तीनही ठिकाणच्या प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी मध्यस्थी करण्यास सांगितल्याचे समजते आहे.
पुणे-दौंड मार्गावर २००६ साली सुरू केलेले विद्युतीकरणाचे काम सप्टेंबर २०१६ मध्ये पूर्ण झाले. या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्यापूर्वी एप्रिल महिन्यात या मार्गावर रेल्वेच्या पुणे विभागाने लोकलची तांत्रिक चाचणी घेतली. यामध्ये लोकलच्या सिग्नलपासून विद्युत पुरवठ्यापर्यंतच्या विविध गोष्टी तपासण्यात आल्या. सप्टेंबरमध्ये विद्युत इंजिनची यशस्वी चाचणी पार पडली. या कामाच्या पूर्णत्वासाठी, तसेच लोकल सुरू करण्याच्या मंजुरीसाठी रेल्वे प्रशासनाला रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यानुसार रेल्वे सुरक्षा आयुक्त सुशील चंद्रा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन दिवस विद्युतीकरणाच्या कामाची तपासणी केली. त्यांनीदेखील यास मान्यता दिली. त्यानंतर या मार्गावरून मालगाडी व एक्स्प्रेस गाड्या विद्युत इंजिनावर धावत आहेत. मात्र, लोकल सेवा सुरू करण्यासाठी सर्व पायाभूत सुविधांचा विकास करणे आवश्यक आहे. त्यामध्ये खुटबाव, कडेठाण आणि मांजरी या स्टेशनवर प्लॅटफॉर्म कमी उंचीचे असल्याने अडथळा येत आहे. परिणामी, तेथे प्लॅटफॉर्मची उभारणी होईपर्यंत या तिन्ही स्टेशनवर थांबा न देता लोकल सुरू करण्याची चाचपणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
मध्यस्थी होणार का?
यामध्ये काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मध्यस्थी करण्याची विनंती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केल्याचे समजते. या तिन्ही स्टेशनवरील प्रवाशांशी संवाद साधून, त्या स्टेशनचा विकास होईपर्यंत ते स्टेशन वगळून लोकल सेवा सुरू करण्यास त्यांच्याकडून ‘ना हरकत’ घ्यायची, त्याआधारावर रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करायचा, असे नियोजन आखण्यात आले होते. मात्र, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अद्याप त्यांना याबाबत होकार दिला नसल्याने ते काम रखडले आहे.
तेव्हा का नाही सुचले?
खुटबाव, कडेठाण आणि मांजरी या तिन्ही स्टेशनच्या आसपासच्या गावातील एकूण लोकसंख्या एक लाखाच्या पुढे आहे. येथील नागरिकांना रेल्वे हे प्रवासाचे सोयीस्कर माध्यम आहे. आता पॅसेंजर गाड्यांनीही हजारो प्रवासी येथून प्रवास करतात. त्यामुळे त्यांना वगळून लोकलसेवा सुरू करणे शक्य होणार नाही. रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलल्यास येत्या सहा, आठ महिन्यांत प्लॅटफॉर्म बांधून तयार होतील. वास्तविक, करोडो रुपये खर्च करून विद्युतीकरणाचे काम सुरू केले, तेव्हाच या ठिकाणी पायाभूत सुविधा विकसित करण्याचे शहाणपण रेल्वे प्रशासनाला सुचले नाही का, असा प्रश्न दौंड-पुणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विकास देशपांडे यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​राष्ट्रीयीकृत बँकांच्या ‘एटीएम’बाहेर रांगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बँकांबाहेरच्या रांगा कमी होऊन एटीएमबाहेर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. सकाळ असो वा रात्र कार्यरत असलेल्या एटीएमबाहेर किमान पन्नास ते दीडशे लोकांची रांग शहराच्या विविध भागांत दिसत आहे. कार्यान्वित एटीएमपैकी बहुतांश एटीएम राष्ट्रीयीकृत बँकांची असून खासगी बँकांच्या एटीएमला अजूनही टाळेच आहे. दुसरीकडे खासगी बँकांना अत्यल्प रोख रक्कम उपलब्ध होत असल्याचेही चित्र आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेकडून सर्वच बँकांना रोकड देताना रेशनिंग केले जात आहे. सर्वच बँकांना तोकडी रक्कम मिळत असल्याने बँकांनाही खातेदारांना रक्कम देताना रेशनिंग करावे लागत आहे. अनेक बँकांना अत्यल्प रक्कम मिळत असल्याने एटीएम बंदच ठेवावी लागत आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांना रिझर्व्ह बँकेकडून काहीशी अधिक रक्कम दिली जात आहे. त्यापेक्षा कमी रक्कम खासगी बँकांना तर सहकारी बँकांना अत्यल्प रक्कम देण्यात येत आहे.
शहरातील अनेक खासगी बँकांमध्ये खातेदारांना दोन ते पाच हजार रुपयेच दिले जात आहेत. तरीही दुपारीच या शाखा बंद कराव्या लागत आहेत. त्याचबरोबर खासगी बँकांची एटीएम अजून सुरू होऊ शकलेली नाहीत. दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कमी-अधिक रोकड उपलब्ध आहे. जिथे रक्कम उपलब्ध आहे, तिथे पाच ते दहा हजारांपर्यंत आणि जिथे कमी रोकड आहे, तिथे अडीच ते पाच हजार दिले जात आहेत. कमी रोकड असल्यास सर्वांनाच अडीच हजारापर्यंतची रक्कम काढता यावी, यासाठी ही रक्कम एटीएममध्ये टाकण्यात येत आहे.
शहरातील साधारण २०-२५ टक्के एटीएम सध्या कार्यरत आहेत. या सर्वच एटीएमबाहेर भल्या मोठ्या रांगा लागत आहेत. सुरू असलेल्या एटीएमची माहिती एकमेकांना दिली जात असल्याने रक्कम भरल्याच्या काही क्षणातच मोठी रांग लागत आहे. त्यातच खातेदार एकापेक्षा अधिक कार्डांचा वापर करत असल्याने एटीएममधील रक्कम लगेचच
संपत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​सोलर सिटी प्लॅनसाठी सल्लागार कंपनी नेमणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराचा ‘सोलर सिटी मास्टर प्लॅन’ तयार करण्यासाठी सल्लागार कंपनी नेमण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली असून यासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यात येणार आहे. अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या नियमानुसार हा मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे. याबरोबरच स्थायी समितीने बजेटमध्ये तरतुदीप्रमाणे पालिकेच्या मालकीच्या २६ इमारतींवर सौर पॅनेल बसविण्याचे टेंडर अंत‌िम मान्यतेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे.
अपारंपरिक ऊर्जा स्रोत वाढविण्यासाठी केंद्र सरकारने सौर शहरीकरण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या योजनेमध्ये पुणे महापालिकेची निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार राबविण्यात येणाऱ्‍या सोलर सिटीचा मास्टर प्लॅन तयार करणे, स्वतंत्र विभाग सुरू करून याबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र महापालिकेला ५० लाख रुपयांची मदत करणार आहे. याच्या पहिल्या टप्प्यात योजनेचा विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यासाठीचे टेंडर पालिकेने काढले आहे. यातील नियम, अटींवर निर्णय घेण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता मनीषा शेकटकर यांनी सांगितले.
सोलर सिटीचा विकास आराखडा तयार करून केंद्र शासनाला पाठविला जाणार आहे. त्यानंतरच महापालिकेला हा निधी मिळणार आहे. या कामामुळे शहराला सौर शहरीकरणाचा दर्जा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे शहराचा एकूण वीज वापर आणि सौर ऊर्जेद्वारे उपलब्ध होऊ शकणारी वीज याची सविस्तर माहिती सहज उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या बजेटमध्ये पालिकेच्या इमारतींवर सौर ऊर्जा पॅनेल लावण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी २६ इमारती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याचे टेंडरही अंतिम झाले असून लवकरच ते प्रसिद्ध केले जाणार असल्याचे शेकटकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशाताईंच्या बंगल्याचे वीजबिल वापराप्रमाणेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या लोणावळा येथील बंगल्याचे वीज बिल हे मीटरप्रमाणेच असल्याचा प्राथमिक निष्कर्ष ‘महावितरण’ने केलेल्या पाहणीतून निघाला आहे. तरीही, या बंगल्यातील वीज मीटरची तांत्रिक तपासणी करून अंतिम अहवाल तयार करण्यात येणार आहे.
दरम्यान, भोसले यांच्या बंगल्याचे वीजबिल मोठ्या प्रमाणात येत असल्याची तक्रार आमदार आशिष शेलार यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. बावनकुळे यांनी या तक्रारीच्या अनुषंगाने ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना भोसले यांच्या बंगल्याची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी लोणावळा येथे जाऊन भोसले यांच्या बंगल्याची पाहणी केली. या पाहणीत भोसले यांना देण्यात आलेले सरासरी वीजबिल हे तेथील वापराच्या आधारेचे दिले असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. लोणावळा येथील तुंगार्ली तलाव रोडवर भोसले यांचा बंगला आहे. भोसले यांना ६५ ते ८५ हजार रुपयांपर्यंत वीज बिल येत असल्याची तक्रार शेलार यांनी केल्यानंतर बावनकुळे यांनी ‘महावितरण’च्या पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता रामराव मुंढे यांना स्वतः या बंगल्याची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. भोसले कुटुंबीय फारसे या बंगल्यात राहत नसतानाही त्यांना मोठ्या प्रमाणात बिल येत असल्याची तक्रार शेलार यांची होती. बंगल्याच्या आवारात स्विमिंग टँकमधील पाणी फिल्टर केले जाते. तसेच, तेथील लॉन, बंगल्यातील एसी यामुळे बिल मोठ्या प्रमाणात येत आहे. या बंगल्याचा सरासरी वीज वापर हा तेराशे ते पंधराशे युनिटच्या दरम्यानचा आहे. ‘महावितरण’चे ​अधिकारी, टेस्टिंग टीम यांनी भोसले यांच्या बंगल्याची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पोलिस हवालदाराला लाच घेताना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे​
विनयभंगाची तक्रार दाखल न करता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जुन्नर येथील पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या प्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचप्रकरणी हवालदाराविरुद्ध तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज आला होता. या अर्जानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोटे यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. आपल्याविरुद्ध जाणीवपूर्वक लाचेची मागणी करण्यात येत असल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि पोटे यांच्याविरुद्ध केली.
लाचेच्या मागणीची पडताळणी करताना पोटे यांनी लाच रकमेविषयी तडजोड करत साडेतीन हजार रुपयांची अंतिम मागणी केली. त्यानुसार सापळा रचला गेला. पोटे यांनी पोलिस ठाण्याच्या आवारातच लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानुसार पोटे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.

लाचेच्या मागणीचा सपाटा
गेल्या काही महिन्यांत लाचप्रकरणी पुणे पोलिस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने कारवाईच्या तडाख्यात सापडले आहेत. येरवडा, बिबवेवाडी आणि हडपसर पोलिस ठाण्यात नुकतीच लाचप्रकरणी कारवाई झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे विभागात या वर्षी आतापर्यंत २७६ सापळे रचून त्या प्रकरणी कारवाई केली आहे. त्यामुळे पोलिसांवर सर्वाधिक कारवाई झाली आहे. यावर्षी ६० गुन्ह्यांमध्ये पोलिसांना कारवाईला सामोरे जावा लागले असून त्यांनी सर्वाधिक १४ लाख २४ हजार रुपयांची लाच स्वीकारली आहे. त्याखालोखाल महसूल विभागातील कर्मचारी-अधिकाऱ्यांविरुद्ध ४४ गुन्हे दाखल झाले आहेत. महसूल विभागाने तीन लाख ७९ हजार रुपयांची लाच स्वीकारली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुतात्म्याच्या पित्याची अनोखी देशभक्ती

$
0
0

दुसरा मुलगाही लष्करात धाडण्याचा सुभाष कोळी यांचा निर्धार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तरुणांनी लष्करी शिक्षण घेऊन मोठ्या संख्येने लष्करात दाखल होऊन देशाचा गौरव वाढवावा, असे आवाहन करून ‘मी माझ्या दुसऱ्या मुलालाही लष्करातच दाखल करणार,’ असा निर्धार शहीद नितीन कोळी यांचे वडील सुभाष कोळी यांनी व्यक्त करताच उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. एक मुलगा गमावलेला असतानाही दुसऱ्याला लष्करात घालू पाहणाऱ्या पित्याच्या प्रखर देशभक्तीचा प्रत्यय मंगळवारी आला.
प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. त्याचे स्मरण करण्यासाठी प्रतापगड उत्सव समितीतर्फे शनिवारवाड्याच्या प्रांगणात शिवप्रताप दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुभाष कोळी आणि त्यांच्या पत्नी यांना लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनायक पाटणकर यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्यभूषण वीर जिवा महाले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भाजपचे पूर्वांचलचे प्रभारी सुनील देवधर, अॅड. प्रशांत यादव, मिलिंद एकबोटे, व्याख्याते सौरभ करडे, अमेय संत, प्रतीक मोहिते, लोकेश कोंढरे आदी या वेळी उपस्थित होते. देवधर यांना हिंदुत्व शौर्य पुरस्कार आणि प्रशांत यादव यांना गोपीनाथ पंत बोकील अधिवक्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात नम्रता मुंदडा, सचिन उत्तेकर, नितीन शेटे यांच्या विद्यार्थ्यांनी साहसी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना थक्क केले. अशोक कामठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडा सादर करून वातावरण निर्मिती केली.
‘तरुणांनी देशसेवेसाठी लष्करात दाखल झाले पाहिजे. माझा मुलगा शरीराने जरी माझ्यापासून दुरावला असला, तरी तो मनाने आजही माझ्याजवळ आहे. त्यामुळेच मी माझ्या दुसऱ्या मुलालाही लष्करात घालण्याचा निर्धार केला आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करण्याचे भाग्य माझ्या मुलाला लाभले,’ असे कोळी यांनी सांगितले.
पाटणकर म्हणाले, की ‘देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा मिळते. सध्या दहशतवाद हे देशासमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे. अनेक जवानांनी त्यासाठी बलिदान दिले आहे. काश्मीरमध्ये सध्या शिवाजी महाराजांची नीती वापरून लष्करी ठाणी तयार करण्यात आली आहेत. भारतीय लष्कराने नुकतेच केलेले सर्जिकल स्ट्राइक महाराजांच्या गनिमी काव्याचेच द्योतक आहे. दहशतवाद ही मानसिकता आहे. ती मूळापासून उखडून काढून टाकणे, हीच शहिदांना सर्वांत मोठी आदरांजली ठरेल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images