Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अधिवेशनादरम्यान मोर्चाचा इशारा

$
0
0

पुणे : मराठा समाजाने केलेल्या विविध मागण्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मान्य कराव्यात, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती (मूक) मोर्चाच्या संयोजकांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला. दरम्यान, नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनावर १४ डिसेंबर रोजी मराठा बांधव मोर्चा काढणार आहेत.
सरकार आजही प्रश्न सोडवण्यात चालढकल करीत आहे. मराठा आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबविणे, विद्यार्थी, युवक आणि शेतकरी यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच, विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यात यावा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा, यासह विविध मागण्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्यात, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढील आठवड्यात सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये सर्व आमदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरावा, यासाठी प्रत्येक आमदाराकडे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. राज्यात विविध ठिकाणी मोर्चे निघत असतानाच समितीच्या वतीने एका अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळामध्ये माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, माजी न्यायमूर्ती म्हसे, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, जयसिंगराव पवार, राजेंद्र कोंढरे या सदस्यांचा समावेश होता. या समितीने २६ पानी अहवाल तयार करून सादर केला आहे, असे कुंजीर यांनी सांगितले.
अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर आंदोलनाला हिंसक वळण लागेल. त्यास सर्वस्वी सरकार जबाबदारी राहील, असा इशाराही कुंजीर यांनी या वेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळ रद्द करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला पुरंदरकरांचा विरोध आहे. येथील नागरिकांनी कधीही विमानतळाची मागणी केलेली नाही. केवळ कॉर्पोरेट्ससाठी हा घाट घातला जात आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असून, या विमानतळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी विमानतळविरोधी संघर्ष समर्थन संघटनेने केली आहे. यानंतरही विमानतळाचा आग्रह धरल्यास तीव्र लढा उभारण्याचा इशारा या वेळी संघटनेने दिला.

सासवड येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला विरोध करण्यासाठी विमानतळ विरोधी संघर्ष समर्थक संघटनेची स्थापना. नवसमाजवादी पर्याय, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सोशालिस्ट पार्टी ऑफ इंडिया, विमा कामगार संघटना, भारतीय महिला फेडरेशन, रिपब्लिकन भारत, जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय, राष्ट्र सेवा दल या संघटनांसह पुरंदरमधील शेतकऱ्यांचा संघटनेमध्ये समावेश आहे, असे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय झुरंगे, उपाध्यक्ष अमोल कामठे, बी. युवराज, लता भिसे, अॅड. संतोष म्हस्के, चंद्रकांत तिवारी, दत्ता पाकिरे आदी या वेळी उपस्थित होते. विमानतळाच्या सर्व्हेचे काम गेल्या चार दिवसांपासून ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. तरीही विश्वास पाटील सर्व्हे पूर्ण झाल्याचे सांगत आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले.

विमानतळासाठी सुरुवातीला बाराशे हेक्टर आणि नंतर चोविसशे हेक्टर जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रकल्पासाठी लागणारी जमीन कोणत्या गावातील घ्यायची, याबाबतही अनेकजा घूमजाव करण्यात आले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनींचा मोबदला कसा मिळणार, त्याच्या पुनर्वसनाचे काय, याबाबत शेतकऱ्यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत मुख्यमंत्री, विमानतळ विकास प्राधिकरण, जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही नेमकी माहिती दिली जात नाही. हे विमानतळ म्हणजे आम्हा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे साधन आहे. त्यामुळे आम्हाला विमानतळ नको या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, असे मत झुरंगे यांनी व्यक्त केले. ‘विकासाच्या नावाखाली पुरंदरमधील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले जाणार आहे. त्यांनी कष्ट करून जमीन कमाविली आहे. त्यांना विमानतळाच्या नावाखाली विस्थापित करू नका,’ असे भिसे म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरी अंघोळीची गोळी घ्यावी लागते : पाटील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पुण्यात ३२.५ टीएमसी पाणी असतानाही ‘अंघोळीची गोळी’ घ्यावी लागते. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर केला गेल्यास अडचणी येत नाहीत,’ असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

‘वनराई’ संस्थेतर्फे ‘जल नियोजन आणि व्यवस्थापन’ या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया, महापौर प्रशांत जगताप, हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, ‘वनराई’चे कार्यकारी संपादक अमित वाडेकर आदी उपस्थित होते.

‘सिक्कीममध्ये सुमारे ३७.७ टक्के जंगल आहे. त्यामुळे या राज्यात प्रदूषणाचे प्रमाण कमी आहे. या राज्यामध्ये रासायनिक खतांचा वापर केला जात नसल्याने शेती सेंद्रीय आहे. या राज्याला ‘सेंद्रीय राज्य’ असा दर्जा मिळाला आहे,’ असेही पाटील म्हणाले. ‘वनराई’ संस्थेची स्थापना झाल्यापासून या संस्थेशी संबंधित आहे. दिवंगत मोहन धारिया यांनी या संस्थेला उंची प्राप्त करून दिली. निसर्गाचा ऱ्हास रोखण्यासाठी जल आणि वनांचे रक्षण होणे आवश्यक आहे,’ असे त्यांनी सांगितले.

महापौर जगताप म्हणाले, ‘जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी ‘वनराई’ संस्थेसोबत काम करण्याची तयारी​ आहे. शहरातील मोकळ्या जागा आणि टेकड्यांवर वृक्षारोपण करण्यासाठी ‘वनराई’ची मदत घेतली जाईल.’

‘जंगल कमी होत असल्याने जागतिक तापमानवाढीची समस्या भेडसावू लागली आहे. ही समस्या रोखण्यासाठी वनक्षेत्रात वाढ झाली पाहिजे,’ असे डॉ. साबळे यांनी नमूद केले. रवींद्र धारिया यांनी प्रास्ताविक यांनी केले. प्रकाश जगताप यांनी सूत्रसंचालन, तर जयवंत देशमुख यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंपांवर वादविवाद, रांगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पेट्रोल पंपावर पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंद केल्याने शनिवारी दिवसभर वाहनधारकांना पंपावर कसरत करावी लागली. सुट्या पैशांचा तुटवडा, त्यामुळे नागरिक व पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये झालेले वाद, ‘डेबिट कार्ड स्वाइप’ करून पेमेंट करणाऱ्यांमुळे लागणारा वेळ, परिणामी वाहनांच्या लागलेल्या रांगा, अशी परिस्थिती पाहायला मिळाली.
दोन डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर जीवनावश्यक सोयी-सुविधांसाठीदेखील पाचशे नोटा स्वीकारण्यात येऊ नयेत, असा आदेश केंद्र सरकारने दिला. त्यानुसार शनिवारी पेट्रोल पंपावर शंभरच्या आतील जुन्या आणि पाचशे व दोन हजारच्या जुन्या नोटा स्वीरण्यात येत होत्या. मात्र, अद्यापही नागरिकांकडे सुट्या पैशांचा तुटवडा आहे. एटीएम किंवा बँकेमधून पैसे काढताना त्यांना दोन हजार रुपयांच्या नोटा दिल्या जात आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपावर बहुतांश नागरिक दोन हजार रुपयाच्या नोटा घेऊनच येत असल्याचे दिसून आले. सुरुवातीला पंपावरील कर्मचाऱ्यांनी दोन हजार रुपयाची नोट स्वीकारून नागरिकांना पेट्रोल दिले. मात्र, संख्या वाढू लागल्याने त्यांनाही सुटे पैसे देणे शक्य झाले नाही.
नोकरदारांची सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ आणि सायंकाळी ऑफिस सुटल्यानंतरच्या वेळेत पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पंपावरील कर्मचारी आणि नागरिक सुट्या पैशांसाठी अडून बसत होते. तर, ‘कार्ड पेमेंट’ करणाऱ्यांची संख्याही पुष्कळ होती. मात्र, त्यामुळे वाहनचालकांना पेट्रोल भरून पुढे जाण्यासाठी वेळ लागत होता. त्यामुळे वाहनांच्या रांगेत भर पडत होती. त्यामुळे नागरिकांचा संताप झाला. सुटे पैसे मिळावेत, म्हणून अनेक नागरिक ‘कार्ड पेमेंट’ करणे शक्य असतानाही मुद्दाम दोन हजार रुपयांची नोट देत होते, असा आरोप पंपावरील कर्मचाऱ्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​..असा लेखक होणे नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला केवळ गैरसमजापोटी राजीनामा देण्यास भाग पाडणे, याचा अर्थ आपली संस्कृती अपरिपक्व आहे; डॉ. आनंद यादव यांनी ग्रामीण साहित्याची चळवळ उभी करत समाजातील वास्तवावर बोट ठेवले. यादव यांच्या पश्चात दखल घ्यावी, असा ग्रामीण साहित्यिक उरलेला नाही, अशा शब्दांमध्ये डॉ. आनंद यादव यांना साहित्यिकांनी आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आनंद यादव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत मान्यवर साहित्यिकांनी यादव यांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ समीक्षक वि.भा. देशपांडे, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, न. म. जोशी, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, यादव यांच्या कन्या कीर्ती मुळीक, मुलगा आशुतोष यादव, मसापचे कार्यवाह वि. दा. पिंगळे, दीपक करंदीकर, प्रकाशक अरुण जाखडे या वेळी उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले, ‘यादव लोकशाही पद्धतीने संमेलनाचे अध्यक्ष झाले होते. काही संस्कृतीरक्षकांनी त्यांच्यावर दबाव निर्माण करून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले, याचा अर्थ ती संस्कृती अपरिपक्व होती. एका बाजूला दलित साहित्य चळवळ उभी राहात असताना त्या चळवळीच्या कार्याला धक्का लागू न देता यादव यांनी ग्रामीण साहित्याची चळवळ उभारली आणि तिला सक्षम केले. त्यांची प्रतिमा कोणत्याही संकुचित जातीयवादामध्ये अडकू शकत नव्हती. महाराष्ट्र दुभंगत असताना यादव यांनी अभिजन आणि बहुजनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.’
यादवांच्या आयुष्यात महाबळेश्वर संमेलनाच्या वेळी जी घटना घडली त्याचा त्यांच्यातील साहित्यिकावर आणि त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम झाला. त्यांच्या लेखनाचा दृष्टिकोन आणि त्याचे गांभीर्य कोणालाही कळले नाही, असे वि. भा. देशपांडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘भ्रष्टाचारी व्यवस्थेस जनताही जबाबदार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देशातील भ्रष्टाचारी लोकशाही व्यवस्थेला राजकारण्यांइतकीच जनताही जबाबदार असते. कारण जनतेने निवडून दिलेले लोकच लोकशाही व्यवस्थेचे भाग असतात. त्यामुळे लोकांनी अत्यंत जबाबदारीने मतदानाचा हक्क बजावावा’, असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शनिवारी केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट, सह्याद्री वाहिनी व माईर्स एमआयटीच्या सहकार्याने दिल्या जाणाऱ्या ‘आर्य चाणक्य महाराष्ट्र राज्य पुरस्कार’ प्रदान समारंभात नाईक निंबाळकर बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम (न्यायव्यवस्था), आमदार कपिल पाटील (लोकप्रतिनिधी), सनदी अधिकारी डॉ. नितीन करीर (प्रशासन), ज्येष्ठ संपादक देवकिसन सारडा (जनजागरण) व उद्योजक प्रमोद चौधरी (उद्योजकता) रांना हा पुरस्कार त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आंध्रप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष डॉ. कोडेला शिवप्रसाद राव, माईर्स एमआयटी संचालक प्रा. विश्वनाथ कराड, उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील आदी उपस्थित होते. नाईक निंबाळकर म्हणाले, ‘सर्वसामान्य लोकांच्या वेदना समजून घेणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी हवेत. श्रीमंत-गरीब यांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यांची मानसिकता समजून घेऊन लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हिताला प्राधान्य द्यायला हवे. आर्थिक विषमता, जातीयता, विचारभिन्नता असली, तरीही भारतीय लोकशाही अजूनही टिकून आहे. त्यामुळे विकासासाठी सुसंस्कृत, संवेदनशील व्यक्तींनी राजकारणात यायला पाहिजे.’
डॉ. राव म्हणाले, ‘भारतीय राज्यघटना सर्वांत श्रेष्ठ आहे. लोकशाही टिकवून ठेवण्याचे मोठे काम राज्यघटनेने केले आहे. निवडणुकीवेळी मतदारांना प्रलोभने दाखविली जातात. लोक त्याला बळी पडतात. परिणामी, विकासात अडथळे येतात. त्यामुळे राजकारणात चांगली माणसे आली पाहिजेत.’ अॅड. निकम, पाटील, करीर, चौधरी, सारडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. संजय उपाध्ये यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘नोटाबंदीनंतर बदलाची जाणीव’

$
0
0

म. टा प्रतिनिधी, पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली देश बदलण्याची घोषणा कधी अस्तित्वात येणार, असा प्रश्न नागरिकांना पडला होता. देशात हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यामुळे जनतेला देश बदलत असल्याची जाणीव झाली आहे, असे मत जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केले.
महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शिंदे यांच्या हस्ते अभिनेते अजिंक्य देव यांना महाराजा यशवंतराव होळकर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, सामाजिक कार्यकर्ते के. एल. खाडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणी, सचिव प्रकाश खाडे उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये संजय सोनवनीलिखित महाराजा यशवंतराव होळकर चरित्र या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रतिष्ठानतर्फे विविध मागण्यांचे निवेदन शिंदे यांना देण्यात आले.
शिंदे म्हणाले, ‘पंतप्रधान देश बदलण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसे निर्णयही घेत आहेत. मात्र, नागरिकांना आपला देश बदलतो आहे, चांगले दिवस येत आहेत, यावर विश्वासच बसत नव्हता. नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने लोकांना देश बदलाची जाणीव झाली. देशातील रुपयाचे मूल्य खाली आले आहे. एका डॉलरसाठी सत्तर रुपये मोजावे लागत आहे. याचाच अर्थ अमेरिकेपेक्षा आपण सत्तर पटीने मागे आहोत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.’
अहिल्यादेवी, मल्हारराव, यशवंतराव होळकर यांचे चरित्र समाजासमोर आणण्यासाठी प्रयत्न करू, वाफ गावातील यशवंतराव होळकर यांचे जन्मठिकाण राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा करू तसेच पुण्यात मल्हारराव होळकरांचे स्मारक करण्यासाठीही प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. खाडे व प्रा. नरके यांचीही या वेळी
भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​शरद जोशी यांच्या चरित्राचे आज प्रकाशन

$
0
0

पुणे : शेतकऱ्यांचे पंचप्राण, योद्धा शेतकरी शरद जोशी यांचे कार्य त्यांच्या चरित्रातून सर्वांसमोर येत आहे. भानू काळेलिखित ‘अंगारवाटा... शोध शरद जोशींचा’ या चरित्राचे प्रकाशन आज (सोमवारी) पुण्यात होणार आहे.
शरद जोशी यांच्या इच्छेनुसार त्यांच्या हयातीतच या चरित्रलेखनाचे काम सुरू झाले होते. जोशी यांनी ही जबाबदारी ‘अंतर्नाद’चे संपादक भानू काळे यांच्यावर सोपविली होती. शेतकरी संघटना न्यास आणि ऊर्मी प्रकाशन प्रकाशित या चरित्रात एकूण ५१२ पानांचा मजकूर व २४ पानी फोटोंचा समावेश आहे. पाचशे रुपये किमतीचे हे पुस्तक प्रकाशनानिमित्त खास सवलतीत उपलब्ध असेल.
सोमवारी सायंकाळी पाच वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते या चरित्राचे प्रकाशन होईल. ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. किसान समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी खासदार सरदार भूपिंदर सिंग मान, डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित राहतील, अशी माहिती चरित्र लेखन प्रकल्पाचे समन्वयक बद्रीनाथ देवकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारी कॉलेजमध्ये ‘ओबेसिटी क्लिनिक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
अवयवदानापाठोपाठ वाढत्या लठ्ठपणाच्या जनजागृतीसाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन लठ्ठपणा जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत राज्यातील १४ सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ‘ओबेसिटी क्लिनिक’ कार्यान्वित करण्यात येणार आहे.
‘राज्यात लठ्ठपणा वाढत आहे. लठ्ठपणाच्या आजारामुळे काही छुपे आजार पुढे येत आहे. त्यामुळे हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आजारामुळे गुंतागुंत वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जेटी फाउंडेशन आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने लठ्ठपणा जनजागृती अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व १४ सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ओबेसिटी क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. त्याचा नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होणार आहे. या अभियानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही हिरवा कंदील दाखविला आहे,’ अशी माहिती जेटी फाउंडेशनच्या प्रमुख ओबेसिटी सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांनी ‘मटा’ला दिली.
सरकारी मेडिकल कॉलेजच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटचे वजन, उंची तपासून ‘बीएमआय’ तपासला जाणार आहे. सरकारी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात बीएमआय डायलर मशीन देण्यात आले आहे. त्यामुळे पेशंटचा बीएमआय त्वरित कळण्यास मदत होणार आहे. ही माहिती ओबेसिटी क्लिनिकला पाटविली जाईल. त्यानंतर पेशंटला त्याचा आहार, व्यायाम यासंदर्भात मार्गदर्शन करण्यास मदत होईल, असेही डॉ. तोडकर यांनी सांगितले. या मोहिमेला इंडियन डाएटरी असोसिएशनची पुण्यासह मुंबई शाखा आणि अॅरो या संस्थांनी पाठिंबा दिला आहे.

राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाने लठ्ठपणा जनजागृती अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत ससून हॉस्पिटलमध्ये ओबेसिटी क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. लठ्ठपणामुळे रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, हाय कोलेस्टेरॉलसारखे आजार बळावतात. त्यांना वेळीच रोखणे गरजेचे आहे. त्याकरिता या क्लिनिकची मदत होणार आहे. लठ्ठपणासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्याशिवाय त्यांना संतुलित आहार आणि व्यायामाबाबत समपुदेशन केले जाणार आहे.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘प्रगत शिक्षणा’ची वाटचाल धीम्या गतीने

$
0
0



Harsh.Dudhe@timesgroup.com
..........
@HarshDudheMT

पुणे : देशाच्या शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्राला पहिल्या तीन क्रमांकामध्ये आणण्यासाठी राज्य सरकारने आखलेल्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमा’ची वाटचाल धीम्यागतीने होत आहे. शालेय विभागाच्या ऑक्टोबर महिन्याच्या अहवालानुसार राज्यात आतापर्यंत केवळ सरकारी २०.९३ टक्के प्राथमिक; तर १८.७४ टक्के उच्च प्राथमिक शाळा प्रगत झाल्या आहेत. या कार्यक्रमाकडे खासगी व अनुदानित शाळांनी पाठ फिरवल्याने त्यांची माहितीच विभागाकडे नसल्याचेच चित्र आहे.
देशाच्या शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्राला प्रथम तीन क्रमांकात आणणे आणि दहावीपर्यंतच्या मुलींच्या गळतीचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यत कमी करण्यासाठी राज्य सरकारने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आखला आहे. त्यासाठी ५० टक्के प्राथमिक शाळांना; तर उच्च प्राथमिक २५ टक्के शाळांना प्रगत करणे, माध्यमिक शाळांना २० टक्के प्रगत करणे, राज्यातील १० हजार शाळांना ‘अ’ श्रेणीत आणणे अशी काही मुख्य उद्दीष्ट ठरविण्यात आली. त्यानुसार निर्णय घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या ऑक्टोबर महिन्याच्या अहवालानुसार राज्यात आतापर्यंत सरकारी २०.९३ टक्के प्राथमिक शाळा; तर १८.७४ टक्के उच्च प्राथमिक शाळा प्रगत झाल्या. यामध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी प्राथमिक प्रगत शाळा नंदूरबार, सिंधुदुर्ग, नांदेड, गडचिरोली, नाशिक, मुंबई उपनगर, बृहन्मुंबई या जिल्ह्यात आहेत. तर १० टक्क्यांपेक्षा कमी उच्च प्राथमिक प्रगत शाळा उस्मानाबाद, औरंगाबाद, ठाणे, नंदुरबार, रत्नागिरी आणि बृहन्मुंबई जिल्ह्यात आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील दोन्ही स्तरावर शाळांची प्रगती अत्यल्प असून, या जिल्ह्यात कार्यक्रम धीम्यागतीने पुढे सरकरत असल्याचे चित्र आहे. एकंदरीत राज्याची अशी शैक्षणिक परिस्थिती असतानाच सोलापूर आणि भंडारा जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रगत प्राथमिक शाळा आहेत. गोंदिया, अहमदनगर, सोलापूर ५० टक्क्यांपेक्षा अधिक उच्च प्रगत प्राथमिक शाळा आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात शाळांमधील शैक्षणिक परिस्थिती सुधारत असल्याचे दिसून येते.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम हा राज्यातील सर्व शाळांना लागू असताना केवळ राज्यातील सरकारी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांचीच माहिती शालेय विभागाकडे आहे. खासगी आणि अनुदानित शाळांच्या प्रशासनाने या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची माहितीच विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शालेय विभागाकडून सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सर्व शाळांची माहिती वेळोवेळी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, शालेय विभागाला या कार्यक्रमांतर्गत एप्रिल अखेरपर्यंत ५० टक्के प्राथमिक शाळांना; तर उच्च प्राथमिक २५ टक्के शाळांना प्रगत करायचे आहेत. त्यामुळे शाळांना प्रगत करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांना पार पाडायची असून त्यावर त्यांचे ‘केआरए’ अवलंबून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसने ठोकरल्यानंतर दुचाकी पेटली

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पीएमपीएमएल बसची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकी फरफटत जाऊन पेटली. पिंपरी चौक ते रेल्वेस्टेशन रस्त्यावर थिसेनकृप कंपनीसमोर शनिवारी (३ डिसेंबर) सायंकाळी ही घटना घडली. याबाबत पोलिस नियंत्रणकक्ष आणि पिंपरी पोलिस ठाण्याला माहिती देण्याचा नागरिकांना प्रयत्न केला. परंतु, या दोन्ही ठिकाणी फोन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळ कुठे आहे हे समजत नसल्याने नागरिकांनी स्वतःच गर्दी आणि आगीवर नियंत्रण मिळविले.
पिंपरी चौकातून काळेवाडीकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसची धडक एका दुचाकी बसली. यामुळे दुचाकीस्वार काही अंतर फरफटत गेला. त्याचदरम्यान, पेट्रोल टाकी फुटली आणि फडका उडून दुचाकीसह बसच्या चाकाने पेट घेतला. सुदैवाने दुचाकीस्वार युवक अपघातानंतर तत्काळ बाजूला झाल्याने त्याला यात जास्त इजा झाली नाही. गर्दीच्या वेळेस पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. तसेच, बघ्यांची मोठी गर्दी देखील जमली होती. यातील काहीजण रस्त्यावरील माती आणि जवळील पाणी दुचाकी व बसच्या चाकावर टाकून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत होते.
या दरम्यान, गर्दीमधील एकाने पिंपरी पोलिस ठाण्यात संपर्क केला. तेव्हा तेथील महिला हवालदाराला ही कंपनी कोठे आहे हेच माहीत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मदतनीसला फोन दिला. त्याला देखील पिंपरी चौक ते पिंपरी रेल्वेस्टेशन हा रस्ता कुठे हे माहीत नव्हते. त्यामुळे त्या नागरिकाने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. तेथे देखील त्याला हाच अनुभव आला. फोन घेणाऱ्या कर्मचाऱ्याला या कंपनीचे नावच माहीत नव्हते. तसेच त्याला देखील हा रस्ता कोठे आहे याची कल्पना नव्हती. कंपनीचे नाव इंग्रजीत सांगा, स्पेलिंग सांगा असे सांगत वेळकाढूपणा झाला. त्यामुळे अखेर नागरिकांनीच माती आणि पाणी टाकत आग विझवली. तसेच बस बाजूला घेत रस्ता मोकळा करून घेतला. एकंदरीत या प्रकारामुळे क्वीक रिस्पॉन्सची वल्गना करणाऱ्या पोलिसांना प्रथम आपल्या पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येणाऱ्या परिसराची माहिती वरिष्ठांनी करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमपीचे यंदा सर्वाधिक नुकसान’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) गेल्या आठ वर्षांच्या कार्यकालात प्रवासी संख्या आणि उत्पन्नात यंदा सर्वाधिक घट झाली आहे. पीएमपीचे प्रति बस ३५० प्रवासी घटले असून, दैनंदिन उत्पन्नात ३६ लाख रुपयांची घट झाली आहे,’ असा दावा सजग नागरी मंचाने केला आहे. पीएमपीची परिस्थिती डबघाईला आली असल्याने तातडीने पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा, अशी मागणीही त्यांनी केली.
गेल्या वर्षी (२०१५) पीएमपीच्या ताफ्यात २०५५ गाड्या होत्या; त्यापैकी ५१९ बंद होत्या. त्यावे‍ळी दैनंदिन प्रवासी संख्या १२ लाख एक हजार होती. प्रति बस प्रवासी संख्या ८०७ होती आणि एकूण दैनंदिन उत्पन्न एक कोटी ६४ लाख होते. मात्र, चालू वर्षात पीएमपी प्रवासी संख्येबरोबरच उत्पन्नातही मोठी घट झाली आहे. पीएमपीच्या ताफ्यातील २०४५ बसपैकी ८२१ बस बंद आहेत. दैनंदिन प्रवासी संख्या १० लाख ६८ हजार आणि दैनंदिन प्रतिबस प्रवासी संख्या ७७९ आहे. तसेच, दैनंदिन उत्पन्न एक कोटी ४८ लाखापर्यंत खाली आले आहे, असे सजग नागरिक मंचाचे जुगल राठी आणि विवेक वेलणकर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून पीएमपीला अध्यक्ष नसल्याने पीएमपी प्रशासनात अराजकता माजली आहे. त्यामुळे पीएमपीचे मोठे नुकसान होत आहे. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पीएमपीच्या निष्क्रीय कारभारामुळे ६५ लाख नागरिकांचे हाल होत आहेत, असे ‘सजग’ने नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नकली पैसे देऊन दोन लाखांची फसवणूक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
शेतामध्ये नांगरत असताना सापडलेले सोने विकायचे असल्याचे सांगून सोन्याऐवजी कागदांचे बंडल देऊन त्रिकुटाने एका व्यावसायिकाची तब्बल दोन लाखांची फसवणूक केली. नुकताच सांगवीत येथे हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी गुड्डु प्रजापती (वय २५), राजुसिंग प्रजापती (५५) यांच्यासह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चंद्रकांत ढगे (३२, रा. केशवनगर, पिंपळे-सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढगे यांचे सांगवी येथे आयुर्वेद सेंटर आहे. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास आरोपी त्यांच्या दुकानात आले. आम्हाला रत्नागिरी येथे शेतामध्ये नांगरत असताना सापडले सोने विकायचे असल्याचे ढगे यांना सांगितले. तसेच, त्यांचा विश्वास संपादन केला. ढगे यांना बनावट सोने दाखवून त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले.
ढगे यांनी सोनाराकडून सोन्याची खात्री करून घेण्यासाठी आरोपींकडे सोन्याची मागणी केली. त्यावेळी आरोपी कागदांचा बंडल असलेला रुमाल देऊन पसार झाले. थोड्या वेळाने ढगे यांनी रुमाल उघडून पाहिला असता कागदांचा बंडल दिसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएमच्या शोधात रविवारची सुट्टी वाया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बँकांना सुट्टी असल्याने रविवारी पैशाच्या शोधात नागरिकांना एटीएमच्या शोधात फिरावे लागले. शहरातील फक्त दहा ते १५ टक्केच एटीएम सुरू होती. त्यामुळे अनेकांनी एटीएमबाहेर किमान तासभर रांगेत उभे राहून पैसे काढणे पसंत केले.
रविवारी साप्ताहिक सुट्टीमुळे बँका बंद होत्या. त्यामुळे पैशांची गरज असलेले नागरिक एटीएमवरच अवलंबून होते. शहरातील सुमारे ३० ते ४० टक्केच एटीएम सुरू झाली आहेत. मात्र, बँकांकडे रोख रकमेचा तुटवडा असल्याने रविवारी दुपारनंतर बहुतांश एटीएम बंदच होती. मोजक्याच एटीएममध्ये काही ठिकाणी दोन हजार, काही ठिकाणी शंभर तर काही ठिकाणी पाचशेच्या नोटा मिळत होत्या. सुरू असलेल्या एटीएमची माहिती एकमेकांना सोशल मीडियावरून, व्हॉट्सअॅपद्वारे दिली जात होती. मात्र, एटीएममध्ये सध्या जास्तीत जास्त अडीच हजार रुपयेच मिळू शकतात. त्यामुळे ज्यांना अधिक रक्कम हवी होती, अशा व्यक्ती दोन किंवा तीन कार्डांचाही वापर करत होते. परिणामी, एटीएमध्ये भरण्यात आलेली रोकड काही वेळातच संपून जात होती. अनेकांना रांगेत उभे राहिल्यानंतरही पैसे न घेताच निराश होत घरी परतावे लागत होते.
बँका बंद असल्याने एटीएमचे आउटसोर्सिंग केलेल्या एजन्सींकडे रोख रकमेची चणचण असल्याने बहुतांश एटीएमध्ये एकदाच रक्कम भरण्यात आली. त्यामुळे आता कॅशलेस पद्धतीने व्यवहार करणे किंवा सोमवारी बँका सुरू झाल्यावर बँकेतूनच पैसे काढणे असे पर्याय खातेदारांपुढे उरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातंगांचे प्रश्न सोडवू

$
0
0

‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारशी चर्चा केली जाईल. करंगळी धरून नव्हे; तर समाजाच्या हातात हात घालून प्रश्न मार्गी लावू,’ असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिले.
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शनिवारवाडा येथे मातंग समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पवार बोलत होते. सभेला माजी मंत्री शशिकांत शिंदे, महापौर प्रशांत जगताप, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे, प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे, शहराध्यक्ष सचिन जोगदंड, माधव गादेकर आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच आपण पवारांचे बोट धरून राजकारणात आलो, असे वक्तव्य केले होते. त्याचा संदर्भ घेऊन पवारांनी वरील वक्तव्य केले. ‘मातंग समाज हा निष्ठेने वागणारा समाज आहे. या समाजाने स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्ल्या. या समाजाने अनेकांना प्रेरणा आणि ताकद दिली. या समाजाच्या स्वतंत्र आराक्षणाच्या मागणीसाठी ताकद दिली जाईल,’ असेही पवार म्हणाले. ‘मी अनेक समाजांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्यापरीने प्रयत्न केले. कायम न्यायाच्या बाजूने उभा राहिलो. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देताना मोठा संघर्ष झाला. आपल्याला मूलभूत अधिकार देणाऱ्या डॉ. आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला देताना मला मोठी राजकीय किंमत चुकवावी लागणार होती. तरीही नामकरण करणारच, अशी भूमिका मी घेतली होती,’ अशी आठवणही पवारांनी करून दिली.
मातंग समाजाच्या आरक्षणाचे वर्गीकरण करून त्यांना स्वतंत्र आरक्षण​ दिले पाहिजे; तसेच संगमवाडी येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक उभारले जावे,’ अशा मागण्या कसबे, कांबळे आणि गादेकर यांनी केल्या.

‘सगळीच भाषणे खरी नसतात’
मोदी यांनी मांजरी येथील सभेत ‘पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो,’ असे वक्तव्य केले होते. तो संदर्भ घेऊन पवार म्हणाले, ‘कोणी काहीही म्हणो. सभेत भाषणे होत असतात. सभेतली सगळीच भाषणे खरी नसतात.’

सत्तेत नसूनही प्रश्न सोडवू’
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा उल्लेख करून पवार म्हणाले, ‘मातंग समाज म्हणजे ढोबळे असे मी समजत होतो. ढोबळे यांना तीन ते चार वेळा आमदारकी दिली. मातंग समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी त्यांना मंमिमंडळात घेतले. मात्र, हा गडी प्रश्न सोडवणारा नव्हता. आता सत्ता नसली, तरी सत्तेतील प्रमुखांबरोबर चर्चा करून प्रश्न सोडवला जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोटाबंदी समर्थन मोर्चाला प्रतिसाद

$
0
0

विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काळा पैसा, दहशतवाद आणि बनावट नोटांना आळा घालण्यासाठी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी शहरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वसामान्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोर्चात सहभागी झाले होते.
डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास मोर्चाचे निमंत्रक खासदार संजय काकडे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर आणि उषा काकडे यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर टिळक चौकातून एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर मोर्चा गेला. रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय संचालक परवेज ग्रँट, बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, भाजपाचे ज्येष्ठ नेते पाशा पटेल, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, प्रशांत बंब, विक्रम काकडे आदी या वेळी उपस्थित होते.
‘काही पक्षांचे राष्ट्रीय नेते नोटबंदीच्या निर्णयाचे समर्थन करीत असताना त्यांचेच राज्यातील नेते विरोधात भूमिका मांडत आहेत. सत्तेच्या माध्यमातून बेकायदा पैसे कमाविणारे प्रादेशिक पक्ष, राजकारणी आणि उद्योजकांना आता पारदर्शक व्यवहार करावे लागणार आहेत. त्यामुळेच नोटाबंदीच्या निर्णयाला ते विरोध करीत आहेत. या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत होणार असून, देशाला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार आहेत,’असे संजय काकडे म्हणाले. ‘नोटाबंदीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय स्वागतार्ह आहे,’असे ग्रँट म्हणाले. नोटाबंदीची घोषणा ही काळाची गरज होती. या निर्णयामुळे सामान्यांना स्वस्तात कर्जे मिळतील; तसेच काळ्या पैशावर नजर ठेवणे सोपे होईल,’ असे अनास्कर म्हणाले.
पंतप्रधानांनी देशहिताच्या भूमिकेतून नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. आपण सर्वांनी एक चळवळ म्हणून या अभियानात उतरले पाहिजे, असे शिरोळे म्हणाले. राजेंद्र शिळीमकर यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम काकडे यांनी आभार मानले.

काकडेंचे शक्तिप्रदर्शन की मोर्चा?

संजय काकडे यांच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या या मोर्चाकडे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या एका गटाने पाठ फिरविल्याचे दिसून आले. खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे आणि काही नगरसेवक वगळता संघटनेतील प्रमुख पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले नव्हते. गेल्या काही काळापासून भाजपमध्ये नव्या गटांची जुळणी होत आहे. तसेच काकडे यांच्या पुढाकाराने झालेल्या पक्षप्रवेशावरूनही वाद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर निघालेल्या मोर्चाच्या निमित्ताने आपली ताकद दाखवून देण्याचा त्यांचा उद्देश असल्याची चर्चा पक्षात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीची सामान्यांना झळ

$
0
0

केंद्र सरकारच्या निर्णयावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘बड्या लोकांचे घबाड बाहेर येईल, म्हणून अनेकजण नोटाबंदी हा चांगला निर्णय असल्याचे म्हणत होते. मात्र, या निर्णयाची आता सामान्यांना झळ बसायला सुरुवात झाली आहे,’ या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केंद्र सरकारवर टीका केली.
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने नोटाबंदीचा चांगला निर्णय घेतला. मात्र त्यानंतरचे नियोजन योग्य पद्धतीने न केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशीच परिस्थिती पुढील काही महिने राहिल्यास अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे, अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इच्छुकांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पक्षाच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी महापौर मोहनसिंग राजपाल आदी या वेळी उपस्थित होते.
‘डॉक्टरांनी ऑपरेशन जरी चांगले केले; तरी त्यानंतर योग्य पद्धतीने पेशंटची सेवा न केल्यास तो दगावण्याची शक्यता असते, अशीच काहीशी स्थिती नोटाबंदीच्या निर्णयामुळे झाली आहे. महिना होऊनही परिस्थिती सुधारत नसल्याने नागरिक कुरकुर करायला लागले आहेत. नोटांवर बंदी घालून दुसरीकडे जनधन खात्यातून पैसे न काढण्याचे आवाहन मोदी करीत आहेत. पैसेच नाही काढले, तर प्रपंच कसा चालवणार’ असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.
नोटाबंदीपूर्वी पाचशे आणि हजारच्या नोटांमधील १५.४२ लाख कोटींचे चलन व्यवहारात होते. त्यापैकी ११.२१ लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत अजून १ लाख ५० हजार कोटी जमा होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच १५ लाख कोटींपैकी १३ लाख कोटी पुन्हा जमा होत असतील तर, २ लाख कोटी काळा पैसा आहे असे म्हणता येईल. हा आकडा सरकारच्या दाव्यापेक्षा नक्कीच कमी आहे. त्यामुळे या नोटबंदीतून काय लाभ झाला याचा विचार करायची गरज आहे. ही परिस्थिती न सुधारल्यास अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध कारणांनी पुरुषांच्या आत्महत्या वाढल्या

$
0
0

मुंबई, पुण्यात सर्वाधिक प्रकार; प्रेमप्रकरण, कर्जबाजारीपणा कारणीभूत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात पुरुषांच्या आत्महत्येच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. राज्यात विशेषतः मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. नैराश्य, आजारीपण, नापास होण्याची भीती, प्रेमप्रकरण, कर्जबाजारीपणा या विविध कारणांमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. पुरुषांच्या आत्महत्या वाढण्याबरोबरच राज्यातील एकूण आत्महत्येच्या प्रकारातही चार टक्के वाढ झाली आहे.
राज्याच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा ‘महाराष्ट्रातील गुन्हेगारी २०१५’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यामध्ये आत्महत्यांसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. राज्यात २०१५ मध्ये १६,९७० जणांनी आत्महत्या केल्या. पैकी १२, ३४५ पुरुष, तर, ४,३१४ महिला आहेत. २०१४ मध्ये १६,३०६ जणांनी आत्महत्या केल्या. एकूण आत्महत्येच्या घटनांमध्ये पुरुषांच्या आत्महत्या ६.८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर, महिलांच्या आत्महत्या ३.६२ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. आजारपण आणि कौटुंबिक कारणामुळे निराश झालेल्यांनी मरणाला कवटाळण्याचे प्रमाण मोठे आहे. बेरोजगारी, परीक्षेत नापास झाल्यामुळे, कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या करण्याच्या प्रमाणातही वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील सर्वाधिक आत्महत्यांची नोंद मुंबई शहरात झाली आहे. मुंबईत गेल्या वर्षी १,१२२ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर पुण्याचा क्रमांक लागत असून,शहरात ८७३ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर जळगाव असून, तेथे ७६० जणांनी आत्महत्या केल्या आहेत. पुणे ग्रामीणमध्ये ६१० जणांनी आत्महत्या केल्या आहे. पुणे शहर आणि ग्रामीण एकत्रित केल्यास राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे दिसून आले आहे.

बेवारस मृतदेह वाढले

राज्यात बेवारस मृतदेह आढळण्याच्या प्रमाणात २०१५मध्ये वाढ झाली आहे. या वर्षी राज्यात सहा हजार १८५ बेवारस मृतदेह आढळून आले. २०१४ मध्ये राज्यात चार हजार ८६० बेवारस मृतदेह आढळले होते. राज्यात सर्वांत जास्त बेवारस मृतदेह मुंबई शहर (१०८३), मुंबई रेल्वे (१०१०), ठाणे (४४०), पुणे शहर (३५५), पुणे रेल्वे (३६३), आणि नागपूर रेल्वे (४१०) येथे आढळले आहेत.

राज्यातील आत्महत्या

वर्ष आत्महत्या पुरुष महिला

२०१४ १,६०६ ११,८२८ ४,४७६
२०१५ १६,९७० १२,३५४ ४,३१४

शहरानुसार आत्मत्या

शहर आत्महत्या पुरुष महिला

मुंबई शहर १,१२२ ७२८ ३९३
पुणे शहर ८७३ ६३७ २३६
जळगाव ७६० ६२२ १३८
पुणे ग्रामीण ६१० ४७६ १३४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑपरेशन चांगले, उपचारांचे काय? :शरद पवार

$
0
0

नोटाकोंडीवरून शरद पवार यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘बड्या लोकांचे घबाड बाहेर येईल, म्हणून अनेकजण नोटाबंदी हा चांगला निर्णय असल्याचे म्हणत होते. मात्र, या निर्णयाची आता सामान्यांना झळ बसायला सुरुवात झाली आहे. डॉक्टरांनी ऑपरेशन जरी चांगले केले; तरी त्यानंतर योग्य पद्धतीने पेशंटची सेवा न केल्यास तो दगावण्याची शक्यता असते, अशीच काहीशी स्थिती नोटाबंदीच्या निर्णयामुळे झाली आहे’, अशी खोचक टीका अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली.

नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी पाचशे आणि हजारच्या नोटांमधील १५.४२ लाख कोटींचे चलन व्यवहारात होते. त्यापैकी ११.२१ लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत अजून १ लाख ५० हजार कोटी जमा होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच १५ लाख कोटींपैकी १३ लाख कोटी पुन्हा जमा होत असतील तर, केवळ २ लाख कोटी काळा पैसा आहे असे म्हणता येईल, असा ‘हिशेब’ही पवारांनी मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय हेतूनेच पाणी तोडले : अजित पवार

$
0
0

गिरीश बाप‌ट यांच्यावर अजितदादांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राजकीय पाठिंबा असल्याशिवाय कोणताही अधिकारी शहराचे पाणी तोडूच शकत नाही. पुणेकरांचे पाणी बंद करण्यामागे राजकीय खेळी असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव न घेता रविवारी केली. पुणेकर काटकसरीनेच पाणी वापरत असून, मी पालकमंत्री असताना शहराला कधीही पाणी कमी पडू दिले नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. ‘अधिक पाणी वापरत असल्याचे कारण पुढे करत जलसंपदा विभागातील अधिकाऱ्याने शहराचा पाणीपुरवठा बंद केला. केवळ एक अधिकारी हा निर्णय घेऊ शकत नाही, राजकीय पाठबळ असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. हे सरकार पाण्यावर राजकारण करत आहे. पुणेकर नागरिक जास्त पाणी वापरतात म्हणून कारवाई केल्याचे भाजपचे मंत्री याचे समर्थन करतात. पुणेकर नागरिक हे गरजेपुरतेच पाणी वापरतात,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीसाठी योग्य वेळी उमेदवार जाहीर केले जातील. इतर पक्षाचे नेते समोरचा उमेदवार बघून निर्णय घेतात. मात्र, पक्ष सर्व खबरदारी घेऊनच तिकीट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीला सामोरे जाताना पक्षातील इच्छुकांनी राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या पाच वर्षांत केलेली कामे जनतेसमारे घेऊन जावी. आघाडी सरकारच्या काळात शहरासाठी ‌विविध योजनेतून तब्बल २४०० कोटी रुपयांचा निधी आणला. या निधीच्या माध्यमातून करण्यात आलेली कामे सर्वसामान्यांपर्यंत पोचवावीत, असे आवाहन त्यांनी केले. पक्षाच्या वतीने अर्जासाठी घेण्यात येत असलेल्या रकमेबाबत चर्चा सुरू आहे. ही रक्कम अजित पवार किंवा वंदना चव्हाण यांच्या घरात जाणार नसून, पक्षाकडे हा निधी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘तुमचं काय सुरू आहे, ते आम्हाला माहिती आहे’

निवडणुकीत तिकीट मिळावे यासाठी अनेक जण वेगवेगळे डावपेच आखतात; आमच्या जवळ येऊन वकिली पॉइंट टाकतात. मात्र, ‘तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी आहात तिथला मी हेडमास्तर आहे,’ अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. ‘आम्ही काही पतंग नाही उडवत, विटी-दांडू नाही खेळत, तुमचे काय सुरू असतं, ते आम्हाला चांगलं कळतं,’ असेही पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images