Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सायबर क्राइमचा सुकाळ

$
0
0

गेल्या वर्षी दोन हजारांहून अधिक गुन्हे दाखल

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राज्यात सायबर क्राइमच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून, २०१५मध्ये दोन हजारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कम्प्युटरचा बेकायदा ताबा घेणे, संवेदनशील माहिती चोरणे, ई-मेलद्वारे नुकसान पोहोचविणे, महत्त्वाच्या माहितीत बदल अथवा खाडाखोड करणे, सर्व्हिस अॅटॅक, विषाणू पसरवणे, लॉजिकल बॉम्ब, ट्रोजन हल्ला, इंटरनेटची वेळ बदलणे, संकेस्थळावर (वेब जॅकिंग) ताबा, सिस्टीम चोरणे, कम्प्युटर सिस्टीमला धोका पोहोचविणे आदी गुन्हे मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत.
सायबर क्राइमचे सर्वाधिक गुन्हे मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपूर आणि पुण्यात दाखल करण्यात आले आहेत. राज्यात भारतीय दंड विधान संहिता आणि आयटी अॅक्ट २००० अंतर्गत गुन्हे दाखल केले जातात. राज्याच्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणारा ‘महाराष्ट्रातील गुन्हे २०१५’ हा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला.
राज्यात वाढलेले ऑनलाइन व्यवहार, इंटरनेटचा मुक्त वापर, मोबाइल इंटरनेट सेवा, वायफाय यांमुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे अहवालावरून दिसून येते. बहुतांश वेळा ऑनलाइन माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. त्यामध्ये सायबर दहशतवाद, लग्नाचे आमिष, नोकरीचे आमिष, गिफ्ट, परदेशवारी, अश्लील मेसेज पसरवणे, ऑनलाइन शॉपिंग, कार्ड पेमेंट, फिशिंग आदी प्रकारांचा अवलंब केल्याचे आढळून आले आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ८२५ जणांपैकी सर्वाधिक आरोपी १८ ते ३० या वयोगटातील असून, त्या खालोखाल आरोपी ३० ते ४५ या वयोगटातील आहेत. या आकडेवारीवरून इंटरनेटचा चुकीचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. २०१५मध्ये दाखल २,१९५ गुन्ह्यांमध्ये सायबर दहशतवादाचा केवळ एक गुन्हा दाखल आहे. २०१४ मध्ये या प्रकारचे चार गुन्हे दाखल करण्यात आले होते.

राज्यातील सायबर गुन्हे

वर्ष गुन्हे

२०१४ १८७९

२०१५ २१९५

..

भारतीय दंड विधानसंहितेनुसार

२०१४ १३४७

२०१५ १८४१

..

अटकेतील आरोपी

२०१४ ६६६

२०१५ ५८०

...

आयटी अॅक्टचे गुन्हे

२०१४ ५११

२०१५ ३४८

...

अटकेतील आरोपी

२०१४ २३५

२०१५ २३६

------------

स्थानिक, विशेष कायद्यान्वये दाखल गुन्हे

२०१४ २१

२०१५ ६

--

अटक आरोपी

२०१४ ४१

२०१५ ९

------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस आपल्या दारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पासपोर्टसाठी अर्ज दाखल केलेल्या अर्जदारांची पडताळणी करण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘एम पासपोर्ट अॅप’ सुरू केले आहे. या माध्यमातून अर्जदारांच्या घरी जाऊन त्यांच्या कागदपत्रांची पोलिसांकडून तपासणी करून सर्व माहिती ऑनलाइन भरण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्यातील सर्व पोलिस स्टेशनला टॅबलेट देण्यात आले आहे.
या सुविधेमुळे अर्जदारांना आता पोलिस स्टेशनच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. पासपोर्टसाठी अर्ज दाखल केल्यानंतर पोलिस व्हेरिफिकेशनसाठी लागणारा कालावधी अॅपमुळे कमी होणार आहे. ‘एम पासपोर्ट पोलिस अॅप’ सुरू करणारे पुणे हे राज्यातील पहिले तर, देशातील पाचवे शहर ठरले आहे. पोलिस आयुक्तालयात गुरुवारी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते या अॅपचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, सहआयुक्त सुनील रामानंद, पोलिस उपायुक्त श्रीकांत पाठक, सहायक पोलिस आयुक्त सतीश पाटील आदी उपस्थित होते.
या अॅपमुळे पोलिस व्हेरिकेशनसाठी लागणारा वेळ आठ ते दहा दिवसांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्जदारांना कमी कालावधीत पासपोर्ट मिळणे शक्य होणार आहे. ‘लष्कर पोलिस स्टेशन येथे प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्यानंतर हे अॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. व्हेरिफिकेशनचे कामकाज पाहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना अॅपसंदर्भात ट्रेनिंग देण्यात आले आहे. सर्व पोलिस स्टेशनला टॅबलेट देण्यात आले आहेत. तसेच ज्या पोलिस स्टेशनला जास्त आवश्यकता आहे तिथे आणखी टॅबलेट देण्यात येतील,’ असे शुक्ला यांनी सांगितले.
अर्जदारांना आता पोलिस स्टेशनला जाण्याची गरज पडणार नाही. कोणी पोलिस स्टेशनला बोलविले तर त्याबाबत सांगा, पोलिस अर्जदारांच्या घरी जाऊन व्हेरिफिकेशन करणार असल्यामुळे जीपीएसद्वारे त्यांचे लोकेशन मिळणार आहे. या अॅपमुळे बनावट पासपोर्टला आळा बसणार आहे. पोलिस व्हेरिफिकेशनमध्ये अर्जदारांचा वाया जाणारा वेळ यामुळे वाचणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पुण्यात प्रथमच अशा प्रकारचे अॅप सुरू करण्यात आले आहे. राज्यातील हा पहिला उपक्रम असल्याचे गोतसुर्वे म्हणाले. पोलिसांनी व्हेरिफिकेशन केल्यानंतर अर्जदारांची माहिती ऑनलाइन भरली जाणार आहे. त्यामुळे अर्जदारांना पासपोर्टची प्रकिया कोठे आली आहे, ते कळेल असेही गोतसुर्वे म्हणाले.

अॅप एका दृष्टिक्षेपात..
- टॅबलेटमधील जीपीआरएस आणि जीपीएस सिस्टीमुळे अर्जदारांच्या राहत्या ठिकाणाची पडताळणी शक्य.
- अर्जदाराला वारंवार पोलिस स्टेशनला बोलविण्याची गरज पडणार नाही. पासपोर्ट प्रक्रियेला गती शक्य.
- चारित्र्य पडताळणी ऑनलाइन प्रक्रिया करण्यासाठी सेवा हमी कायद्याअंतर्गत ​pcs.mahaonline.gov.in या वेबसाइटची निर्मिती. अर्जदारांसाठी माहिती उपलब्ध.
- अर्जदारांना पोलिस व्हेरिफिकेशनसाठी पोलिस स्टेशनला जाण्याची गरज नाही. पोलिसच अर्जदारांच्या घरी येऊन त्याच फोटो, कागदपत्रे याची माहिती टॅबद्वारे ऑनलाइन भरणार.
- बनावट कागदपत्रांचा वापर आणि बनावट पासपोर्ट तयार करणाऱ्यांवर वचक बसणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरोगामी चळवळीचा धारवड हरपला

$
0
0


डॉ. सुलभा ब्रह्मे यांना मान्यवरांची श्रद्धांजली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सुलभाताई या चळवळीतल्या ज्ञानवंत कार्यकर्त्या होत्या. त्या महाराष्ट्रातील एक संस्थाच होत्या. सर्व चळवळी, संस्था व राजकीय नेत्यांना त्यांचा आधार वाटत असे. त्यांच्या निधनाने समस्त पुरोगामी च‍ळवळीचा आधार गेला आहे, अशी भावना व्यक्त करून विविध मान्यवरांनी डॉ. सुलभा ब्रह्मे यांनी श्रद्धांजली वाहिली.

निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, पी. बी. सावंत, बी. जी. कोळसे-पाटील, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, आमदार जयदेव गायकवाड, मुक्ता मनोहर, अजित अभ्यंकर, प्रा. सुभाष वारे, किरण मोघे, अतुल पेठे, मकरंद साठे, गजानन परांजपे, मधुकर निरफराके, रजिया पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

लोकायतच्या माध्यमातून विज्ञान, समाज, अर्थशास्त्र यावरील डॉ. सुलभा ब्रह्मे यांचे लेखन व कार्य सदैव स्मरणात राहील. पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केलेले अर्थशास्त्र विषयातील त्यांचे संशोधन कार्य फार मोलाचे आहे.

- खासदार अनिल शिरोळे

सुलभाताईशी बुधवारीच बोलणे झाले होते. तेव्हाही ती कामात मग्न होती. पुरंदरच्या विमानतळसंबंधीच्या प्रश्नाबाबत नुकतीच तिने कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. तिचे काम शेवटपर्यंत सुरू होते. लोकप्रबोधन, लोकायत अशा विविध चळवळी तिने उभ्या केल्या. अनेक पुरोगामी चळवळींचा ती आधार होती. आयुष्याची ६० वर्षे तिने सार्वजनिक आयुष्यात व्यथित केली. वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत तिने अर्थशास्त्र हाच विषय निवडला होता.

- डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि बंधू


सुलभाताई या चळवळीतल्या ज्ञानवंत कार्यकर्त्या होत्या. वेगवेगळ्या चळवळींचे विश्लेषण करून त्यांनी त्यावर पुस्तके लिहिली. कार्यकर्त्यांचे प्रबोधन केले. अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत असलेल्या सुलभाताई या खऱ्या अर्थाने चळवळीच्या आधारवड होत्या.

-भाई वैद्य, ज्येष्ठ समाजवादी नेते


अभिजातता, हुशारी, विचारांची परिपक्वता आणि साधे राहणीमान असे हे वेगळे रसायन होते. अर्थ आणि विज्ञान या विषयांच्या इतिहासातील विविध टप्प्यांचे सखोल ज्ञान सुलभाताईंना होते. लोकविज्ञान चळवळ मजबूत करण्याचे काम त्यांनी केले. विज्ञानाचे सामाजिक आणि आधुनिक अंग तसेच विज्ञानाचे दुरुपयोग याबाबत सखोल मांडणी त्यांनी केली. बऱ्याचदा ही मांडणी वैज्ञानिकालाही जमत नाही.

- डॉ. अनंत फडके, लोकविज्ञान संघटना


सुलभाताईंनी लोकायतच्या संस्थापिका म्हणून महत्त्वपूर्ण काम केले. अनेक पुरोगामी चळवळीच्या त्या आधारस्तंभ होत्या. महिला, पर्यावरण, शेतकरी अशा समाजातील सर्व घटकांशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांचे काम आम्हाला कायमच प्रेरणा देत राहील. आम्हीही त्यांच्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करत राहू.

- नीरज जैन, लोकायत संस्था


माझ्यासारख्या अनेकजणी सुलभाताईंकडे पाहूनच सामाजिक कार्यात आल्या. खरोखरीच आदर्श म्हणाव्यात, अशाच त्या होत्या. त्यांच्याकडे वैचारिक प्रगल्भता होती. त्यांचे काम पाहून उमेद मिळायची. आता त्या नाहीत, याची उणीव कायम भासत राहणार आहे.

-मुक्ता मनोहर, सामाजिक कार्यकर्त्या

सुलभाताई या डाव्या चळवळीच्या मोठा आधार होत्या. अभ्यासक, संघटक अशा दुहेरी भूमिकेतून त्यांनी मार्गदर्शन केले. या भूमिका त्यांनी आयुष्यभर निभावल्या.

- अजित अभ्यंकर, अर्थतज्ज्ञ

सुलभाताईंनी स्वत:ला वाहून घेऊन काम केले. आपली सारी शक्ती त्यांनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी व चळवळीसाठी वापरली. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. सर्व क्षेत्रातील प्रश्नांची मांडणी त्या करत राहिल्या. त्या महाराष्ट्रातील एक संस्थाच होत्या. सर्व चळवळी, संस्था व राजकीय नेत्यांना त्यांचा आधार वाटत असे.

-कॉ. दत्ता देसाई
साधी राहणी, उच्च विचारसरणी

ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कार्यकर्त्या डॉ. सुलभा ब्रह्मे अनेक संस्थांच्या व चळवळींच्या आधारवड होत्या. कार्यकर्ते, विद्यार्थी, संघटना, कामगार चळवळींना भरघोस आर्थिक-भौतिक आधार देणाऱ्या सुलभाताईंची राहणी अतिशय साधी होती. त्यांचे घर सर्व कार्यकर्त्यांसाठी कायम खुले असायचे.

सुलभाताईंचे बालपण पुण्यात गेले. हुजुरपागेत शिक्षण घेतल्यानंतर सर परशुरामभाऊ कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी त्यांनी घेतली. त्यानंतर गोखले अर्थ-राज्यशास्त्र संस्थेतून कापड उद्योगावर पीएचडी संपादित केली. गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. या काळात अनेक सामाजिक-आर्थिक विषयांवरचे महत्त्वाचे अभ्यास त्यांनी हाती घेतले. विविध आंदोलनातून त्या शेवटपर्यंत कार्यरत होत्या. भारताचे विख्यात अर्थतज्ज्ञ आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. धनंजयराव गाडगीळ व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या प्रमिलाताई गाडगीळ यांच्या त्या कन्या होत.

सुलभाताईंचे मराठवाड्याचा विभागीय विकास आराखडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जमीन वापर हे काही महत्त्वाचे अभ्यास विषय होत. त्या महाराष्ट्र बँकेच्या संचालक मंडळाच्या सदस्या होत्या. तसेच शिक्षण प्रसारक मंळीच्या आजीव सदस्य होत्या. शंकर ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालयाची स्थापना करून डाव्या, पुरोगामी, परिवर्तनवादी विचारांचे एक केंद्र त्यांनी तयार केले. विविध सामाजिक प्रश्नांचा अभ्यास, संशोधन, अनेकविध प्रकाशने आणि लोकजागृतीचे कार्यक्रम यातून हा मंच त्यांनी कार्यरत ठेवला. उत्पादक ते उपभोक्ता हे दुवे जोडण्याबद्दल तसेच सहकार चळवळीविषयी त्यांना कायम आस्था होती.

त्यांनी लिहिलेले वेगवेगळ्या आर्थिक-सामाजिक-राजकीय विषयावरचे अनेक अभ्यासपूर्ण लेख, ५० हून अधिक पुस्तिका कार्यकर्त्यांसाठीचा अमोल ठेवा आहेत. धनंजयराव गाडगीळ यांचे लेखसंग्रह त्यांनी संपादित केले. १९७२ च्या दुष्काळाचे त्यांनी संशोधनात्मक काम केले होते. जागतिकरण, मुक्त व्यापार धोरण, सेझ प्रकल्प, जैतापूर अणुऊर्जा यांच्या विरोधातील लोकचळवळीत त्यांचा पर्यावरण संवर्धन आणि मानवी जीवनाच्या शाश्वत विकासाची संकल्पना घेऊन सक्रिय सहभाग होता. अलीकडच्या काळात केंद्र सरकारने केलेल्या गोवंश हत्याबंदीचा निषेध करून गोवंश हत्याबंदीचा आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणाम विषद करणारी त्यांची पुस्तिका संपूर्ण देशभरात चर्चेची ठरली होती. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी भांडवली मुल्यांची चिकित्सा करून पर्यायी विकासनीतीच्या अजेंड्यावर काम केले. तसेच याविषयी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना आणि चळवळींना मनापासून मदत केली. सतत उत्साही व हसतमुख चेहरा, बोलकेपणा व समोरच्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे समजून घेणे, ही त्यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते निर्मितीत राज्य आघाडीवर

$
0
0

सहा लाख किलोमीटरची उभारणी; केंद्राच्या अहवालातील वास्तव

Kuldeep.Jadhav@timesgroup.com
Tweet : kuldeepjadhavMT

पुणे : प्राणांतिक रस्ते अपघातांमध्ये देशभरात दुसऱ्या क्रमांकावर असलेले महाराष्ट्र राज्य रस्तेनिर्मितीत मात्र, अव्वल ठरले आहे. शहरी रस्ते, ग्रामीण भागातील रस्ते, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांचा एकत्रित विचार करता राज्यात सहा लाख आठ हजार १४० किमी रस्ते बांधण्यात आले आहेत. राज्यापाठोपाठ उत्तर प्रदेश, आसाम, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा क्रमांक लागतो.
राज्यातील रस्त्यांचबाबत कायमच चर्चा होते. रस्त्यांच्या दर्जाबाबतही नागरिकांमध्ये नकारात्मक भावना आहे. मात्र, देशामध्ये रस्ते निर्मिती व रस्त्यांच्या उपलब्धतेबाबत महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत खूपच पुढे असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘भारतातील रस्त्यांची आकडेवारी २०१४-१५’ या अहवालातून स्पष्ट झाले आहे. राज्यात सहा लाख आठ हजार १४० किमी लांबीचे रस्ते आहेत. अहवालात उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर असून, तेथे चार लाख १५ हजार ३८३ किमीचे रस्ते आहेत. आसाम आणि कर्नाटक राज्यात अनुक्रमे तीन लाख २६ हजार ५१२ किमी आणि तीन लाख २१ हजार ८०८ किमी लांबीचे रस्ते आहेत. पश्चिम बंगाल पाचव्या स्थानी असून, तेथे दोन लाख ९५ हजार ९९७ किमी लांबीचे रस्ते आहेत.
क्षेत्रफळाच्या दृष्टिने महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश ही दोन राज्ये मोठी आहेत. मात्र, महाराष्ट्राने त्यांनाही मागे टाकले आहे. दरम्यान, या अहवालात केवळ रस्त्यांची लांबी आणि उपलब्धता याचा उल्लेख करण्यात आला आहे. रस्त्यांच्या दर्जाबाबत काही मांडणी करण्यात आलेली नाही.

एकूण रस्त्यांच्या लांबीनुसार पहिली पाच राज्ये
महाराष्ट्र ६, ०८, १४० किमी
उत्तर प्रदेश ४, १५, ३८३ किमी
आसाम ३, २६, ५१२ किमी
कर्नाटक ३, २१, ८०८ किमी
पश्चिम बंगाल २, ९५, ९९७ किमी

राष्ट्रीय महामार्गांनुसार पहिली पाच राज्ये
उत्तर प्रदेश ८, ४८३ किमी
राजस्थान ७, ८८६ किमी
महाराष्ट्र ७, ०४८ किमी
कर्नाटक ६, ४३२ किमी
मध्य प्रदेश ५, १८४ किमी


राज्य महामार्गांनुसार पहिली पाच राज्ये
महाराष्ट्र ४०, १४४ किमी
कर्नाटक १९, ७२१ किमी
गुजरात १८, ०१७ किमी
तामिळनाडू ११, ७५२ किमी
राजस्थान १०, ९४१ किमी

(क्रमशः)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिंगरोडवर उभारणार ‘सायकल हाय वे‘

$
0
0

स्वतंत्र ट्रॅकवर मॅरेथॉनही घेता येणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ​तयार केलेल्या रिंगरोडच्या आराखड्यात ‘सायकल हायवे’ ही संकल्पना सुचवण्यात आली आहे. त्यानुसार या रिंगरोडमध्ये सायकलींसाठी स्वतंत्र ट्रॅक असणार असून, त्यामध्ये सायकल मॅरेथॉन स्पर्धाही घेता येणार आहे. या रिंगरोडसाठी सुमारे १७ हजार ४१२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ‘पीएमआरडीए’ हे केंद्र सरकार आणि अन्य मार्गांनी निधी उपलब्ध करणार आहे.
‘हा रिंगरोड १९९७च्या प्रादेशिक योजनेमध्ये दर्शवण्यात आला आहे. सुमारे १२९ किलोमीटर लांबीचा रिंगरोड आहे. हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी लागणारा निधी हा नॅशनल हायवेकडून; तसेच अन्य मार्गांनी उभा केला जाणार आहे,’ असे ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी सांगितले. ‘मूळ आराखड्यात रिंगरोडची रुंदी ९० मीटर होती​. ती ११० मीटर करण्यात आली आहे. नवीन आराखड्यात ‘सायकल हायवे’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यामध्ये रस्ता आणि फूटपाथ यामध्ये सायकल हायवेचा मार्ग असेल. त्यावरून फक्त सायकलींचाच वापर करता येणार आहे. या मार्गावर सायकल मॅरेथॉनदेखील घेता येणार आहे,’ असे झगडे यांनी स्पष्ट केले.
‘पुणे शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी रिंगरोड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे हा रस्ता होणे अत्यावश्यक झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ मे रोजी झालेल्या बैठकीत हा रस्ता ‘पीएमआरडीए’ने करावा, अशा सूचना दिल्या आहेत.’ असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुणे, जपानी संस्कृतीत आदानप्रदानाची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पुणे आणि जपानच्या संस्कृतीची देवाणघेवाण होण्याची गरज असून, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे,’ असे मत जपानचे भारतातील राजदूत केंजी हिरामात्सू यांनी व्यक्त केले. केंजी यांनी सिंहगड रोडवरील पुणे महापालिकेच्या पु. ल. देशपांडे उद्यानाला भेट देऊन पाहणी केली. फ्रेंड्स ऑफ जपान असोसिएशन पुणे या संस्थेने या भेटीचे नियोजन केले होते. या वेळी पॅट्रिशिया हिरामात्सु, महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, फ्रेंड्स ऑफ जपान संस्थेचे अध्यक्ष समीर खळे, सचिव आमोद देव, स्वाती भागवत, नगरसेविका मंजुषा नागपुरे, संतोष कांबळे, अमित आंबेडकर यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
केंजी म्हणाले की, ‘पुणे आणि जपानच्या सांस्कृतिक घडामोडीत अनेक ठिकाणी साम्य आहे. याविषयी दोन्ही देशांमध्ये देवाणघेवाण होण्याची गरज आहे. या उद्यानात आल्यास आपल्याला जपानचे निसर्ग सौंदर्य अनुभवता आले.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवा, त्याग सप्ताहाचे आजपासून आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त २ ते ९ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे आयोजन केले जाते, या सप्ताहाची यंदा तपपूर्ती असल्याने परिसंवाद, ग्रंथोत्सव, चित्रकला स्पर्धा, महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, तरुणांसाठी नोकरी मेळावा, बचत गटातील महिलांचा सन्मान असे उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती मुख्य संयोजक मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सप्ताहाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या हस्ते आज, शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. धानोरी येथील गोकुळनगर मधील श्री छत्रपती कुस्ती आखाडा मैदानात उद्या, शनिवारी (३ डिसेंबर) शिवशंभो ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या वेळी उपस्थित राहतील. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमांसाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, उल्हास पवार, शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, विश्वजित कदम, महापालिकेचे उपमहापौर मुकारी अलगुडे, दिप्ती चवधरी, चंद्रकांत छाजेड उपस्थित राहणार आहेत.
सेवा, कर्तव्य आणि त्याग या सप्ताहामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, जागर स्त्री शक्तीचा, राष्ट्रीय एकात्मता कविसंमेलन, इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त समाजकारणातील महिलांचे स्थान याविषयावरील परिसंवाद, करिअर मार्गदर्शन, नोकरी मेळावा, नृत्य स्पर्धा, तसेच महापालिकेत कचरागोळा करण्याचे काम करणाऱ्या महिलांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मधमाशा परागीभवनास घातक

$
0
0

वनक्षेत्रात पालन केल्यास वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मधमाशा या निसर्गातील परागीभवन करणाऱ्या सर्वोत्तम घटक आहेत, हा भ्रम आहे. त्या वर्चस्ववादी असून, मोजक्याच वनस्पतींचे परागीभवन करतात. वनक्षेत्रात मधमाशी पालन केल्यास जंगलातील अनेक वनस्पती आणि कीटकांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असा निष्कर्ष संशोधनातून पुढे आला आहे.
मधमाशीपालन हा शेतीला पूरक व्यवसाय असून, देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी शहरातही तो मोठ्या प्रमाणात राबविण्यात येतो आहे. मधाची वाढती मागणी लक्षात घेऊन नामांकित कंपन्यांनी गावकऱ्यांच्या सहभागातून वनक्षेत्रात मधमाशी पालनास सुरुवात केली आहे. स्थानिक प्रजांतीबरोबरच परदेशी जातीच्या मधमाशा जंगलात सोडून सर्रास मध गोळा केला जातो आहे. मात्र, वर्चस्व गाजविण्यात पटाईत असलेल्या या मधमाशा स्थानिक कीटकांसाठी घातक ठरणार आहेत.
मधमाशांमुळे नैसर्गिक घटकांवर होत असलेला परिणाम याबद्दल वरिष्ठ वन्यजीव शास्त्रज्ञ डॉ. रेनी बोर्जेस यांनी बुधवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘मधमाशा या परिपूर्ण परागकण वाहक (पॉलिनेटर्स) आहेत, हा सर्वांचा गैरसमज आहे. सर्व प्रकरांच्या वनस्पतींचे परागीभवन करण्याची त्यांची क्षमता नाही. उलट त्यांच्या हुकुमत गाजविण्याच्या स्वभावामुळे इतर कीटकांच्या वास्तव्यावर मर्यादा येऊ शकते, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मधमाश्यांची संख्या मर्यादेपेक्षा वाढल्यास काही ठरावीक पुष्प प्रजातींची संख्या वाढून इतर वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.’
प्रत्येक वनस्पतीचे वेगवेगळे परागकण वाहक ठरलेले असतात. जंगलातील अनेक परागीभवन करणारे कीटक आणि पतंग अद्याप दुर्लक्षित राहिले आहेत. त्यामुळे आपल्याला मधमाशांमुळे होत असलेल्या दुष्परिणामांची जाणीव झालेली नाही. मधमाशी पालन हा शाश्वत व्यवसाय असला तरी, जंगलातील परिसंस्थेसाठी घातक आहे. भीमाशंकर जंगल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मधमाशांचे पालन करण्यात येते. विशेषतः फुलांच्या हंगामध्ये लोक भीमांशकर परिसरात जंगलाच्या परिसरात मधमाशांचे बॉक्स आणून ठेवतात. हंगाम संपल्यावर मधमाशा आणि मध शहरात घेऊन जातात. त्यामुळे वनक्षेत्रातील परिसंस्थेला मधमाशांचा काहीच फायदा होत नाही, उलट स्थानिक परागकण वाहकांना अन्नाचा तुटवडा भासतो. मधमाशांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी वन क्षेत्रात मधमाशी पालनासंदर्भात ठोस भूमिका घ्यावी, असा सल्ला बोर्जिस यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'त्यांनी' जिंकली प्रतिभा ‘उजळवणारी’ पैज

$
0
0

शास्त्रज्ञ प्रा. पद्मनाभन यांचा सिद्धान्त खोटा ठरवण्यात न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञाला अपयश

मयुरेश प्रभुणे, पुणे

वैज्ञानिक जगतामध्ये दोन शास्त्रज्ञांमध्ये लागलेल्या पैजांनी (वेजर) अनेक महत्त्वाचे सिद्धान्त खरे किंवा खोटे ठरविले आहेत. दहा वर्षांपूर्वी दोन खगोलशास्त्रज्ञांमध्ये लागलेल्या अशाच एका पैजेमध्ये भारतीय खगोलशास्त्रज्ञ प्रा. टी. पद्मनाभन यांनी नुकतीच बाजी मारली. पैजेच्या अटीप्रमाणे न्यूझीलंडमधील खगोलशास्त्रज्ञ डॉ. डेव्हिड विल्टशायर यांनी आपली हार मान्य करून प्रा. पद्मनाभन यांना अत्याधुनिक दिवा भेट म्हणून पाठविला.

दहा वर्षांपूर्वी ११ ते १५ डिसेंबर २००६ दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठामध्ये ‘टेक्सास इन ऑस्ट्रेलिया’ ही आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. सापेक्षतावादावरील या परिषदेत आपल्या भाषणाच्या शेवटी प्रा. पद्मनाभन यांनी जगभरातून उपस्थित असणाऱ्या खगोलशास्त्रज्ञांना आव्हान देऊन एक पैज लावली. वैश्विक स्थिरांक (कॉस्मोलॉजिकल कॉन्स्टंट) ही संकल्पना दुसरे-तिसरे काही नसून, विश्वाचे एकूण ७५ टक्के वस्तुमान व्यापणारी कृष्णऊर्जा (डार्क एनर्जी) आहे. या कृष्णऊर्जेमुळेच विश्वाचा प्रसरण पावण्याचा वेग वाढत आहे. या दाव्याला खोटे ठरवणारा एकही निरीक्षणावर आधारित पुरावा पुढील दहा वर्षांत मिळणार नाही, असा दावा करून पैज स्वीकारण्याचे आव्हान त्यांनी उपस्थितांना दिले.

न्यूझीलंडमधील डॉ. विल्टशायर यांना हा दावा मान्य नव्हता. त्यांच्या म्हणण्यानुसार भविष्यात निरीक्षणांनी हे सिद्ध होईल, की गुरुत्वीय ऊर्जेच्या चुकीच्या मोजमापामुळे कृष्णऊर्जा ही संकल्पना अस्तित्वात आली, जी खगोलशास्त्रामधील ऐतिहासिक चूक ठरेल. डॉ. विल्टशायर यांनी प्रा. पद्मनाभन यांची पैज स्वीकारली. पैजेच्या अटीनुसार पद्मनाभन यांनी पैज जिंकली, तर त्यांच्या कृष्णऊर्जेच्या मोजमापाला उजळवण्यासाठी विल्टशायर यांनी पद्मनाभन यांच्या आवडीचा दिवा भेट म्हणून द्यायचा; आणि पैज विल्टशायर यांनी जिंकली तर विश्वाबद्दलच्या चुकीच्या संकल्पनांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रा. पद्मनाभन यांनी विल्टशायर यांना त्यांच्या आवडीचे घड्याळ भेट म्हणून द्यायचे. या भेटींची किंमत दोनशे डॉलरपेक्षा अधिक असणार नाही, असेही नमूद करण्यात आले.

दहा वर्षांनंतर पद्मनाभन यांच्या दाव्याला छेद देणारा एकही निरीक्षणावर आधारित पुरावा मिळाला नाही, म्हणून डॉ. विल्टशायर यांनी आपली हार मान्य केली. पैजेच्या अटीनुसार डॉ. विल्टशायर यांनी प्रा. पद्मनाभन यांना त्यांच्या आवडीचे घड्याळ भेट म्हणून नुकतेच पाठवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुधासाठी पैसे मागणाऱ्या पत्नीला पेटवले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

दुधासाठी पैसे मागितल्याने चिडलेल्या पतीने रॉकेल अंगावर ओतून पत्नीला पेटवून दिले. यामध्ये महिला गंभीर भाजली असून तिच्यावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपाचार सुरू आहेत. गुरुवारी (१ डिसेंबर) सकाळी अकराच्या सुमारास भोसरी, बालाजीनगर येथे ही घटना घडली.

रेखा शहाजी जाधव (वय २१, रा. बालाजीनगर, भोसरी) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती शहाजी रामा जाधव (२६) याच्याविरोधात भोसरी, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा आणि शहाजी दोघेही मजुरीचे काम करतात. बुधवारी सकाळीच किरकोळ कारणावरून त्यांची भांडणे झाली होती. त्या वेळी रेखाच्या वडिलांनी घरी येऊन दोघांची भांडणे सोडविली होती. रेखाचे वडील परत गेल्यानंतर शहाजीने तिला चहा बनविण्यास सांगितले. रेखाने दुधासाठी शहाजी यांच्याकडे पैसे मागितले. त्यामुळे चिडलेल्या शहाजीने रॉकेल तिच्या अंगावर ओतून पेटवून दिले आणि पसार झाला. यामध्ये रेखा ८० टक्के भाजली असून त्यांच्यावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुलभा ब्रह्मे यांचे निधन

$
0
0


कामगार चळवळीचा आधार
विचारवंत, अर्थतज्ज्ञ हरपल्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कार्यकर्त्या डॉ. सुलभा ब्रह्मे (८४) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. ब्रह्मे यांच्या पश्चात बंधू पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ, पुरुषोत्तम गाडगीळ व त्यांचे कुटुंबीय असा परिवार आहे. डॉ. ब्रह्मे यांच्या निधनाने देशभरातल्या अभ्यासक, डाव्या व पुरोगामी चळवळीच्या असंख्य विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा आधार गेल्याची भावना आहे. अनेक पुरोगामी संघटनांच्या आधारवड, अण्वस्त्र विरोधी आणि शांतता चळवळ, एन्रॉन, जैतापूरसारख्या आंदोलनाच्या विश्लेषक आणि कार्यकर्त्या अशी त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
नोटाबंदीच्या जनतेवरील घातक परिणामांबद्दल त्यांनी नुकतेच लेखन केले होते. गेल्याच आठवड्यात पुरंदरला भेट देऊन त्यांनी तिथल्या विमानतळविरोधी शेतकरी आणि स्थानिकांच्या संघर्षाला समर्थन दिले होते. बुधवारी त्यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यातच गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. लोकविज्ञान संघटनेच्या संस्थापक सदस्य म्हणून त्या गेली ३६ वर्षे सक्रिय होत्या. लोकायत, पुरोगामी महिला संघटना, बायजा ट्रस्ट आणि स्त्री मुक्ती चळवळीचा त्या आधार होत्या. अण्वस्त्र विरोधी आणि शांतता चळवळ, एन्रॉन,
जैतापूरसारख्या आंदोलनात विश्लेषक आणि कार्यकर्त्या अशी त्यांची महत्त्वाची भूमिका होती. प्रचलित विकास नीतीवर परखड टीका करत पर्यावरणवर्धक आणि लोककेंद्री विकासाचे पर्याय त्या हिरिरीने मांडत.
जागतिकीकरण विरोधी चळवळ, महाराष्ट्र दुष्काळ निवारण आणि निर्मूलन मंडळ, नामांतर चळवळ, हिंदू-मुस्लिम एकतेच्या चळवळी, धर्मनिरपेक्ष आंदोलनांमधील त्यांचा सहभाग मोलाचा होता. शाश्वत आणि जैव शेती, पाणलोट आणि शेतीच्या अर्थकारणाचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. भारताचे विख्यात अर्थतज्ज्ञ आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. धनंजयराव गाडगीळ व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या प्रमिलाताई गाडगीळ यांच्या त्या कन्या होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोचे भूमिपूजन २४ डिसेंबरला?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराचा बहुचर्चित मेट्रो प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, येत्या सात डिसेंबरला होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा असल्याने या काळात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे भूमीपूजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश बीडकर यांनी ही माहिती दिली.
शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी मेट्रो प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. हा प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, सात डिसेंबरला होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. पुणे मेट्रोला पीआयबी कमिटीने मान्यता दिली असून, अंतिम मंजूरी केवळ बाकी आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होणार असून, पंतप्रधान मोदी २४ डिसेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहे, त्याच वेळी मेट्रोचे भूमीपूजन करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे बीडकर यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशी ३१ किलोमीटरची मेट्रो शहरात प्रस्तावित करण्यात आलेली आहे. यासाठी सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँका, एटीएमबाहेर गर्दी कायम

$
0
0

मर्यादेपेक्षा कमी रकमेचे वाटप; पाचशेच्या नव्या नोटेची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
बँकेच्या खात्यात जमा झालेला पगार किंवा पेन्शन मिळविण्यासाठी महिन्याच्या दुसऱ्या दिवशी बँकांमधील गर्दीत वाढ झाली होती. शुक्रवारी गुरुवारच्या तुलनेत बँकांना काहीशी अधिक रोकड उपलब्ध झाली. मात्र, बँकेच्या शाखांमधून अजूनही पाचशेची नवी नोट मिळत नसल्याचेच चित्र आहे.

महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी बँकांमध्ये पगार-पेन्शन काढण्यासाठी गर्दी झाली होती. मात्र, बँकांना तोकडी रक्कम उपलब्ध झाल्याने खातेदारांना पुरेसे पैसे मिळू शकले नाहीत. अनेक बँकांमध्ये दुपारीच रोकड संपली होती. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशीचा ओढा कमी झाल्यानंतर आता आपल्याला पैसे मिळू शकतील, या विचाराने शुक्रवारी बँकांबाहेरील रांगा वाढल्या होत्या. दरम्यान, शनिवारीही बँका पूर्णवेळ कार्यरत असणार आहेत.

बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मोजकीच रोकड उपलब्ध करून देण्यात येत आहे. या तुटपुंज्या रकमेसाठीही बँकांच्या करन्सी चेस्ट विभागातील अधिकाऱ्यांना रिझर्व्ह बँकेच्या नवी मुंबईतील बेलापूर व मुंबईतील फोर्ट भागातील कार्यालयात दोन तीन दिवस रांगा लावाव्या लागत आहे. ज्या दिवशी ज्या बँकांचा क्रमांक लागेल, त्यांना त्यांच्या मागणीच्या काही प्रमाणात रोख रक्कम देण्यात येत आहे. ही रक्कम मिळाल्यानंतर ती पुण्यापर्यंत आणून त्याचे वितरण करण्यासाठी किमान एक ते दोन दिवसांचा कालवधी लागत आहे. रक्कम पुरेशी नसल्याने बँकांच्या करन्सी चेस्टना बँकेच्या शाखांना अगदीच मोजकी रक्कम देता येत आहे. परिणामी, खातेदारांना पैसे काढण्याची मर्यादा अधिक असली, तरी त्यापेक्षा कमीच रक्कम काढता येत आहे.

दरम्यान, शुक्रवारी काही बँकांना गुरुवारच्या तुलनेत थोडी अधिक रक्कम उपलब्ध झाली. त्यामुळे गुरुवारी ज्या बँकांमध्ये अडीच किंवा तीन हजार रुपये देण्यात आले होते, त्या बँकांमध्ये शुक्रवारी पाच हजार किंवा त्याहून अधिक रक्कम देण्यात आली. त्यामुळे खातेदारांना काहीसा दिलासा मिळाला.

आज बँका पूर्णवेळ कार्यरत

मागील वर्षी लागू झालेल्या नव्या नियमांनुुसार महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी बँका पूर्णवेळ कार्यरत असतात. आज ( तीन डिसेंबर) पहिला शनिवार असल्याने आज बँकांच्या कामकाजाच्या वेळेत खातेदारांना सर्व व्यवहार करणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात कोटींची रक्कम बारामतीत जप्त

$
0
0

मटा वृत्तसेवा, बारामती
बारामती नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाने भिगवण टोल नाक्यावर ६ कोटी ९८ लाख २५ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

केंद्र सरकारने पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी मोठ्यांची धडपड सुरू आहे. बारामतीमध्ये ६ कोटी ९८ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या स्थिर पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान,जप्त करण्यात आलेली रक्कम बारामती सहकारी बँकेची असल्याचा दावा बँकेने केला आहे. यामध्ये सोलापूर शाखा २ कोटी ९ लाख १२ हजार ५००, बार्शी शाखा २ कोटी ६७ लाख ४७ हजार, करमाळा शाखा १ कोटी ४६ लाख ६३ हजार ५००, टेंभूर्णी शाखा ७५ लाख २ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील सर्व तपास निवडणूक निर्णय अधिकारी करीत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. एवढी मोठी रक्कम सुरक्षा रक्षकांशिवाय फक्त दोन व्यक्ती ने-आण करत होते, असे पोलिसांनी सांगितले.

विम्याच्या भरवशावर...

निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकाने केलेल्या कारवाईतील सर्व रक्कम आमच्या बारामती सहकारी बँकेची आहे. तशी सर्व कागदपत्रे आम्ही सादर केली आहेत. या रक्कमेचा विमा उतरवलेला असतो. त्यामुळे काही काळजी नसते. पुढील काळात काळजी घेण्यात येईल, असे बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी सहारा स्टेडियमबाहेर रांग लावून लोक थांबतात, मग देशहितासाठी निर्णय घेतला असताना नोटा बदलताना बँकेच्या रांगेत थांबायचा त्रास होतो का,’ असा प्रश्न राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पत्रकार परिषदेत विचारला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा धाडसी निर्णय घेतल्यामुळे देशाला फायदाच होणार आहे,’ असेही काकडे यांनी स्पष्ट केले.

‘देशातील १३५ कोटी जनतेपैकी केवळ ५० लाख लोकांना नोटाबंदीचा त्रास होत आहे. हा देशहिताचा निर्णय आहे. या निर्णयामुळे झालेला फायदा सर्वांना दिसून येईल. तसेच, ३१ डिसेंबरपर्यंत ९० टक्के परिस्थिती पूर्ववत होईल,’ असे काकडे म्हणाले.

‘चलनातील काही नोटा यापूर्वी १९७७ मध्ये रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ४० वर्षांनी हा धाडसी निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेणे देशहितासाठी गरजेचे होते. नकली नोटा, दशहतवाद्यांना मिळणारी आर्थिक मदत, भ्रष्टाचार करून कमविलेला पैसा, या निर्णयामुळे हे प्रकार थांबणार आहेत. सरकारने दर १५वर्षांनंतर असा निर्णय घेतला पाहिजे,’ असेही काकडे यांनी सांगितले.

समर्थनासाठी रॅली

येत्या रविवारी नोट बंदी निर्णयाच्या समर्थनार्थ डेक्कन येथील छत्रपती संभाजी पुतळ्यापासून एस. पी. कॉलेजपर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर तेथे सभा होणार असून बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. ही रॅली पुणेकरांच्यावतीने काढण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार संजय काकडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्यासाठी पालकमंत्र्यांची मध्यस्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणेकरांवर कर्जाचा बोजा टाकत असल्याचे कारण पुढे करून समान पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. समान पाणीपुरवठा योजना पुणेकरांच्या हिताची असल्याने या योजनेला सर्वसाधारण सभेत मंजूरी द्यावी, यासाठी पालकमंत्री बापट हे सर्व पक्षांच्या नेत्यांबरोबरच चर्चा करणार असून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.

शहरात समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी सुमारे २८०० कोटी रुपये खर्च येणार आहे. यापैकी काही निधी महापालिकेला उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारने निधी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी येणारा उर्वरित २२०० कोटी रुपयांचा निधी पालिकेने कर्ज किंवा कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभा करावा,

असा प्रस्ताव पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र पुणेकरांना कर्जबाजारी करून हा प्रस्ताव मान्य करणार नाही, अशी भूमिका घेत स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य होणे शहराच्या हितासाठी आवश्यक असल्याने त्याला सर्वसाधारण सभेने मान्यता द्यावी, यासाठी पालिका आयुक्त कुमार यांनीही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत‌.

शहरातील प्रत्येकाला समान आणि चोवीस तास पाणी मिळावे, यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे हा विषय मान्य करावा, यासाठी पालकमंत्री बापट यांनी यामध्ये लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव कसा महत्त्वाचा आहे, हे पटवून देण्यासाठी बापट हे प्रत्येक पक्षातील वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करणार असून पालिकेतील सभासदांना याबाबतचे आदेश द्यावेत, यासाठी बापट यांनी प्रयत्न सुरू केले आहे.

वाढीव पाणीपट्टी रद्द करणार का?

राजकारण करण्यासाठी महापौर प्रशांत जगताप यांनी समान पाणीपुरवठा योजनेला खो घातल्याचा आरोप पालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी केला. तत्कालीन केंद्र सरकारने महापालिकेला जेएनएनयूआरएम योजनेतंर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. मात्र त्यातून कोणताही फायदा शहराला झाल्याचे दिसत नसल्याचे बीडकर यांनी सांगितले. जेएनएनयूआरएम मधून मिळालेल्या निधीतून जे प्रकल्प आले, त्याचा हिशेब महापौर जगताप यांनी पुणेकरांना द्यावा. समान पाणीपुरवठा योजनेला विरोध करताना पुणेकरांवर लादलेली वाढीव पाणीपट्टी महापौर रद्द करणार आहेत का, असा प्रश्नही बीडकर यांनी विचारला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखो लिटर पाण्याची नासाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेने केवळ ५० एमएलडी पाणी जादा उचलल्याचे कारण पुढे करून थेट पुणेकरांचे पाणी बंद करण्याची कारवाई करणारा जलसंपदा विभाग मुंढवा जॅकवेलचे पाणी पूर्ण क्षमतेने उचलत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे जलसंपदा विभागाकडून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे पुढे आले आहे. जॅकवेलमधून पूर्ण क्षमतेने पाणी न उचलणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची हिम्मत पालकमंत्री दाखविणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात झालेल्या करारानुसार वर्षभरात शहरात तयार होणारे साडेसहा टीएमसी सांडपाणी महापालिकेने सिंचनासाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी शेतीला देता यावे, यासाठी पालिकेने शंभर कोटी रुपये खर्च करून मुंढवा येथे जॅकवेल प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून नदीतील पाणी उचलून ते बेबी कॅनॉलमध्ये सोडले जाते. रोज ५०० एमएलडी इतके पाणी पालिका सिंचनासाठी उपलब्ध करून देऊ शकते. मात्र जलसंपदा विभागाकडून ५०० एमएलडी ऐवजी केवळ ५० ते १०० एमएलडी पाणी उचलले जात आहे. अनेकदा पाणी नको असल्याचे जलसंपदा खात्याकडून पालिकेला लेखी किंवा दूरध्वनीद्वारे कळविले जात असल्याचे समोर आले आहे. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आणली आहे.

जलसंपदा विभागाने सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत ९० दिवसांपैकी ४७ दिवस काहीही पाणी उचलले नाही. उर्वरित ४३ दिवसांमध्येही सरासरी २०० एमएलडी इतकेच पाणी उचलले आहे. गणेश विसर्जनानंतर स्वच्छतेच्या कामासाठी ८ ते १० दिवस नदीच्या स्वच्छतेसाठी पालिकेकडून मुंढवा जॅकवेल बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर जलसंपदा विभागाने तातडीने पाणी घ्यायला सुरुवात करणे आवश्यक होते. परंतु, प्रत्यक्षात २६ ऑक्टोबरला या विभागाने दोन पंपाद्वारे पाणी सोडण्यास सांगितले होते; तर सध्या एकाच पंपाद्वारे फक्त १२ तास मुंढवा जॅकवेलमध्ये पाणी सोडले जात आहे. पालिका पूर्ण क्षमतेने पाणी देण्यास तयार असतानाही जलसंपदा विभागाकडून केवळ टाळाटाळ केली जात असल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याची‌ टीका वेलणकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस रस्त्यावर कधी उतरणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘नोटाबंदीच्या निर्णयामुळे जनता रस्त्यावर आली आहे. व्यवसाय थंडावले आहेत. शेतीमालाला भाव नाही, तो रस्त्यावर फेकावा लागत आहे. बेरोजगारी वाढते आहे. देशातील अर्थतज्ज्ञ म्हणतात हा निर्णय योग्य नाही. काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर कधी उतरणार, याची जनता वाट पाहत आहे. नागरिकांच्या मनात काँग्रेसबद्दल विश्वास निर्माण करण्याची ही वेळ आहे,’ असे आवाहन कार्यकर्त्यांना करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ‘भाजप’वर टीका केली. ‘आम्ही काय कपडे घालायचे आणि किती जेवायचे हे सुद्धा तुम्हीच ठरवणार का,’ असा सवालही त्यांनी विरोधकांना केला.

आमदार मोहन जोशी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक तप - सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहा’चे आयाोजन केले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी राणे बोलत होते. या वेळी उपमहापौर मुकारी अलगुडे, आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, शहराध्यक्ष रमेश बागवे, आबा बागुल, वीरेंद्र किराड, रशिद शेख, श्रीरंग चव्हाण पाटील आदी उपस्थित होते. ‘एकेकाळी पुणे काँग्रेसचे होते. पण आता वाईट वाटते की आठ आमदार, दीड खासदारांपैकी एकही निवडून आला नाही. पुण्याला काँग्रेसने काय कमी केले,’ असा प्रश्न उपस्थित करत राणे यांनी उपस्थित काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांना जनतेमध्ये जाण्याचे आवाहन केले.

‘भाजप हा थापा मारणारा पक्ष आहे. भाजपने पुण्यासाठी काय केले? येथे झालेला विकास हा काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेला आहे. देशवासियों म्हटले तर देशभक्त होत नाही, त्यासाठी त्याग करावा लागतो आणि तो काँग्रेसने केला आहे. आपण लोकांना समजवायला कमी पडत आहोत. देशात अच्छे ‌दिन आणण्याची ताकद काँग्रेसमध्येच आहे,’ असे सांगून राणे यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले.नोटाबंदीमुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यवसाय थंडावले आहेत. शेतीमालाला उठाव नसून बेरोजगारी वाढल्याचे राणे म्हणाले. ‘बँकेत नोटा नाहीत, पैसे काढण्यावर बंधने आहेत. आपलेच पैसे आपण काढू शकत नाहीत. याला काय लोकशाही म्हणायची का? जनता थंड आहे, तुम्ही थंड बसलात; परंतु मी असा गप्प बसणार नाही,’ असे राणे म्हणाले.

पक्षासाठी बोलणारच...

पक्षहिताचे आहे ते बोलतो. काही लोकांना वाईट वाटते. मी काय करू. मी बोलत राहणार. चुकत असेल तर करा कारवाई. मी ज्या पक्षात आहे, तो सत्तेच राहावा, जनतेची सेवा करता यावी, यासाठी मी बोलतो आणि बोलत राहणार अशी टिप्पणी करत पक्षार्तंगत विरोधकांनाही राणे यांनी टोला हाणला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंफिऱ्यात अडकली मेट्रो

$
0
0

श्रीनिवास पाटील, डॉ. पी. डी. पाटील यांची फटकेबाजी

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘पुण्याची मेट्रो जमिनीखालून करायची की वरून करायची या गुंफिऱ्यात आपण अडकलो आहोत. मेट्रोचा गुंफिरा गिरीश बापट सोडवत आहेत...’ अशा शब्दांत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी ‘गुंफिरा’ या शब्दावरून राजकीय टोलेबाजी केली. पिंपरी येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनीही गुंफिरा या शब्दावरून साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना त्यांच्या अनुपस्थितीत चिमटा काढला. ‘साहित्य संमेलनाच्या वेळी मोठा गुंफिरा झाला होता...’ अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी सबनीस यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वादावरून केली. गुंफिरा म्हणजे गुंता या शब्दाची विविध रूपे राजकीय टोलेबाजीने अनुभवताना उपस्थित गुंफिऱ्यात गुंतत गेले.

निमित्त होते, बुकहंगामा डॉट कॉमतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांच्या ‘गुंफिरा’ या कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे. कथासंग्रहाच्या ई-बुक व ऑडियो बुकचे प्रकाशन राज्यपाल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. डॉ. पी. डी. पाटील, संमेलनाचे संयोजक सचिन इटकर, बुकहंगामाचे विक्रम भागवत व डॉ. वैद्य या वेळी उपस्थित होते.

‘पिंपरी येथे ८९ वे साहित्य संमेलन झाले तेव्हा मोठा गुंफिरा झाला होता,’ असा चिमटा पाटील यांनी काढला. सबनीस यांच्या मोदींवरील वक्तव्याची किनार पाटील यांच्या वक्तव्याला असल्याने उपस्थितांमध्ये खसखस पिकली.

वैद्य यांची टिप्पणी

डॉ. माधवी वैद्य यांनी साहित्य महामंडळाची अध्यक्षीय कारकीर्द संपल्यानंतर महामंडळ, साहित्य परिषद याविषयी न बोलणेच पसंत केले होते. त्यांनी आपला मोर्चा लेखनाकडे वळवला होता. ‘पी. डी. पाटील यांचे दातृत्व मोठे असून संमेलन भव्यदिव्य झाले. पिंपरी येथे झालेल्या संमेलनाला संमेलनाच्या इतिहासात तोड नाही,’ अशी टिप्पणी डॉ. वैद्य यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रेनडेड पेशंटकडून ७ जणांना जीवनदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘ब्रेन डेड’ पेशंटचे हृदय शुक्रवारी ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथून लोहगाव विमानतळावर नेण्यात आले. हॉस्पिटल ते विमानतळदरम्यानचे १५ किमीचे अंतर गर्दीच्या वेळेत अवघ्या १९ मिनिटांत पूर्ण करण्यात आले. तेथून ते हृदय विमानाने चेन्नई येथे प्रत्यारोपणासाठी नेण्यात आले. यासह आणखी एका ‘ब्रेन डेड’ पेशंटने अवयवदान केल्याने शुक्रवारी एकाच दिवसात हृदय, दोन यकृत, चार मूत्रपिंडे दान करून सात रुग्णांना जीवनदान देण्यात आले.
‘नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावर २८ डिसेंबरला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याच्या कुटुंबीयांनी पुढील उपचारांसाठी त्यास दीनानाथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, गंभीर मार लागल्याने पेशंटचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. पेशंटच्या मेंदूचे कार्य थांबल्याने त्याला ब्रेन डेड म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी नातेवाइकांना अवयवदान करण्याचे आवाहन केले. त्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन पेशंटचे वडील आणि भावाने अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलात दाखल पेशंटला एक मूत्रपिंड तर, दुसरे मूत्रपिंड नाशिक येथील पेशंटला देण्यात आले. याच हॉस्पिटलमधील पेशंटवर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.
सह्याद्री हॉस्पिटलमधील एका पेशंटच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केले. त्या पेशंटचे एक मूत्रपिंड आणि यकृत सह्याद्री हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. तर, एक मूत्रपिंड बीडला पाठविण्यात आले. शहरातून एकाच दिवशी दोन पेशंटने अवयवदान केल्याची ही दुर्मिळ घटना आहे. आतापर्यंत ५३ पेशंटच्या नातेवाइकांनी मरणोत्तर अवयवदानाचा निर्णय घेतला आहे, असे ‘झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटी’च्या (झेडटीसीसी) आरती गोखले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images