Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नोटाबंदीनंतर पालिकेत १७ कोटींचा करभरणा

$
0
0

तीनशेहून अधिक मिळकतदारांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा रद्द झाल्यानंतर शहरातील ३३१ मिळकतदारांनी १७ कोटींहून अधिक रकमेचा पालिकेच्या तिजोरीत भरणा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन आठवड्यांपूर्वी हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. चलनात‌ून या नोटा रद्द करण्यात आल्या तरी पेट्रोल पंपासह काही ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारल्या जातील, असे केंद्राने जाहीर केले होते. निर्णयाचा फायदा घेण्यासाठी मिळकतदारांनी कराची लाखो रुपयांची थकबाकी जुन्या नोटांद्वारे भरण्याला प्राधान्य दिले. पालिकेच्या करभरणा केंद्रांवर मिळकतकर भरण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले आहे. जुन्या नोटांद्वारे अडीच लाखांपेक्षा अधिक मिळकतकराची थकबाकी भरणाऱ्यांची यादी पालिकेने तयार केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक कर ६७ लाख रुपयांचा असल्याचे समोर आले आहे.
मिळकतकराच्या थकबाकीसाठी पालिकेने अभय योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत दिली जात आहे. सुरुवातीच्या काळात योजनेला प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, नोटाबंदीनंतर पालिकेकडे लाखो रुपयांची थकबाकी भरण्यात आली. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांद्वारे थकबाकीदारांनी १४५ कोटींहून अधिक रक्कम पालिकेकडे भरली. पालिकेची लाखो रुपयांची थकबाकी असतानाही आजपावेतो पालिकेने थकबाकीदारांवर कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

थकबाकीदारांमध्ये नगरसेवकही
नोटाबंदीनंतर पालिकेचा लाखो रुपयांचा थकित कर भरणाऱ्यांमध्ये विद्यमान नगरसेवक, भाजपचे आमदार, माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, तसेच महापालिकेतील आजी-माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाने अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम भरणाऱ्यांची यादी पालिकेकडे मागितली आहे. चौकशी होणार असल्याने पालिका त्यांची नावे जाहीर करण्याची शक्यता नसल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातारा रस्त्यावरील वाहनांना उड्डाणपूलबंदी

$
0
0

शंकरशेट रस्त्याने येणाऱ्या वाहनांसाठीच उड्डाणपूल खुला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शंकरशेट रस्त्यावरील वाहनांना सारसबागेकडे जाण्यासाठी उड्डाणपूल खुला करण्यात आल्याने पुढील काही काळ सातारा रस्त्यावरून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना उड्डाणपुलाखालूनच जावे लागणार आहे. स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकातील उड्डाणपुलावरून केवळ शंकरशेट रस्त्याने येणारी वाहने जाऊ शकणार आहेत.
स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकातील ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शंकरशेट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी सातारा रस्त्याकडून शंकरशेट रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी असणारा उड्डाणपूल शंकरशेट रस्त्याने येऊन नेहरू स्टेडिअमकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीस नुकतीच सुरुवात झाली. ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण होईपर्यंतच हा निर्णय लागू असणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जेधे चौकात ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात गणेश कला क्रीडा मंचासमोरील बाजूचे काम करण्यात आले. त्यावेळी नटराज हॉटेलच्या बाजूची लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली होती. अद्याप ती लेन बंद आहे. तसेच, आता शंकरशेट रस्त्यावर एसटी स्टँडच्या समोर ग्रेडसेपरेटरसाठी खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे येथे वाहतुकीसाठी सिंगल लेनपेक्षा कमी रस्ता उपलब्ध आहे. परिणामी, गर्दीच्या वेळी वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागतात. या रांगा कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शंकरशेट रस्त्याने येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यासाठी उड्डाणपुलाचा वापर करण्याची सूचना केली आहे. त्यासाठी सातारा रस्त्याने शंकरशेट रस्ता व सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांना उड्डाणपूल तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
दरम्यान, शंकरशेट रस्त्याने येणाऱ्या एसटी बसला स्वारगेट स्टँडला जाण्यासाठी ढोले पाटील (सेव्हन लव्हज) चौकातून डावीकडे वळून डायस प्लॉट, मुकुंदनगर येथून लक्ष्मीनारायण टॉकिज चौकातून एसटी स्टँडकडे जावे लागणार आहे.

सातत्याने वाहतूक कोंडीचा त्रास
ग्रेडसेपरेटरचे काम आता मुख्य चौकापर्यंत आले आहे. त्यामुळे चौकातील वाहतूक धिम्यागतीने पुढे सरकत आहे. परिणामी, बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसर आणि टिळक रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे अर्धा ते पाऊण तास ही कोंडी ‘जैसे थे’ होती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचआयव्ही’ग्रस्तांना लाभणार दीर्घायुष्य

$
0
0

पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी होताच ‘एआरटी’ सुरू करा; ‘नॅको’चा आदेश

Mustafa.Attar@timesgroup.com
Tweet : @mustafaattarMT

पुणे : ‘एचआयव्ही’ग्रस्त पेशंटच्या शरिरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण (सीडी फोर काउंट) पाचशेच्या खाली येताच त्यांना तातडीने विषाणू प्रतिबंधात्मक उपचार (एआरटी) सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने (नॅको) घेतला आहे. त्यामुळे आता ‘एचआयव्ही’ग्रस्तांना दीर्घायुष्य लाभण्याची शक्यता आहे.
या निर्णयाची ‘नॅको’कडून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात नव्याने सहा हजार जणांना नव्याने ‘एआरटी’चे उपचार मिळण्यास सुरुवात झाली आहे. ‘एचआयव्हीग्रस्तांना एआरटी कधी सुरू करावी, या ​विषयी विविध मतप्रवाह आहेत. आजच्य घडीपर्यंत ३५० पर्यंत सीडी फोर काउंट असणाऱ्या पेशंटांना एआरटी देण्यात येत होती. आता एचआयव्हीची औषधे सुरू करण्यात यावी, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने नॅकोला केली होती. परंतु, नॅकोने ती शिफारस अद्याप मान्य केलेली नाही. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा या शिफारशींमध्ये बदल केला. पाचशेपेक्षा कमी सीडी फोर काउंट असणाऱ्या एचआयव्हीग्रस्तांना तत्काळ एआरटी सुरू करण्याची शिफारस संघटनेने ‘नॅको’ला केली होती. शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आदेश नॅकोने सर्व राज्य एड्स नियंत्रण संस्थांना दिले आहेत,’ अशी माहिती राज्याच्या आरोग्य खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
पाचशेपेक्षा सीडी फोर काउंट असताना ‘एआरटी’ सुरू केल्याने विषाणूंचा प्रादुर्भाव आणि संसर्ग कमी करणे शक्य आहे. सहा हजार पेशंटना नव्याने ‘एआरटी’ सुरू करण्यात आली. त्यांची दर सहा महिन्याला तपासणी करण्यात येत होती. दाम्पत्यामध्ये पत्नीला संसर्ग झाल्यास तिच्यामार्फत पतीला संसर्ग होण्याचा धोका कमी होऊ शकतो. त्याशिवाय गर्भवती महिलेला तातडीने ‘एआरटी’ सुरू केल्यास तिच्यापासून बाळाला संसर्ग होण्याचा धोकाही कमी होणार आहे. गर्भवतीसाठी सीडी फोर कांटची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. पूर्वी मातेपासून बाळाला होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण १५ टक्के होते; ते आता पाच टक्क्यांवर आले आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

राज्यातील सद्यस्थिती
७२
एआरटी केंद्राची संख्या
१७७
लिंक सेंटर
१ लाख ७७ हजार ४५२
एआरटीचे उपचार
५, ०००
पेशंटना सेकंड लाइन एआरटी
९५ टक्के
बाधित पेशंटना एआरटीचे उपचार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानधनाचा मार्ग मोकळा

$
0
0

आगामी बैठकीत ज्येष्ठ कलाकारांच्या अर्जांवर शिक्कामोर्तब शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या दोन वर्षांपासून मानधन थकित असलेल्या ज्येष्ठ कलाकारांच्या अर्जांची छाननी पूर्ण होऊन यादी तयार करण्यात आली आहे. मानधन समितीच्या आगामी बैठकीत समितीच्या अध्यक्षांच्या मान्यतेने यादीवर शिक्कामोर्तब होऊन तातडीने कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न सोडवला जाईल, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मानधन समितीचे सचिव यशवंत शितोळे य़ांनी ‘मटा’शी बोलताना दिली.
‘या संदर्भात समितीचे अध्यक्ष विक्रम गोखले यांची बैठकीसाठी वेळ मागितली असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत मानधनासाठीच्या अर्जांची अंतिम यादी ठरवण्यात येणार आहे. संबंधित यादीला विरोध करणाऱ्या सदस्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील बैठकीत मानधनाचा प्रश्न निकाली काढण्यात येईल,’ असे म्हणाले. मानधनाच्या यादीमध्ये आडकाठी आणणाऱ्या सदस्यांची चौकशी करण्यात येणार नाही. मात्र, त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आल्याने त्यांचा विरोध होणार नाही, अशी अपेक्षा आहे, याकडेही शितोळे यांनी लक्ष वेधले.
मानधन समितीमध्ये एकमत होत नसल्याने दोन वर्षांपासून ज्येष्ठ कलाकार मानधनापासून वंचित होते. यंदा विक्रम गोखले आणि अन्य समिती सदस्यांनी तीन बैठका घेतल्या. प्रत्येक बैठकीत मानधनाबाबत सदस्यांनी खोडा घातला. त्यांनी बैठकीच्या इतिवृत्ताबाबतही अनेक तक्रारी केल्या आहेत. या विषयी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. त्यांची पालकमंत्र्यांकडून चौकशी करण्याची चर्चा झाली होती. प्रत्यक्षात मात्र, तसे काहीच होणार असल्याचेही शितोळे यांनी नमूद केले.

गोखलेंच्या भूमिकेकडे लक्ष
या सर्व घडामोडींना कंटाळलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत त्यांनी पदाचा राजीनामा देण्याची धमकी दिली होती. सध्या ते चित्रीकरणात व्यग्र आहेत. त्यानंतर ते समितीच्या बैठकीला उपस्थित राहतील, अशी आशा प्रशासन व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना हा केवळ टक्केवारीचा पक्ष

$
0
0

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

‘शिवसेनेने महाराष्ट्रात जी कामे केली, ती बाळासाहेबांनी केली आहेत. उद्धव ठाकरे यांनी काय भांडवल टाकलं त्यात? अहो, हे नुसते व्याजच खात आहेत. शिवसेना हा टक्केवारीचा पक्ष आहे,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी शिवसेनेवर केली.
काँग्रेस कमिटी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हडपसर गांधी चाैकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राणे बोलत होते. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, विधान परिषद गटनेते शरद रणपिसे, माजी आमदार उल्हास पवार, पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे, महिला प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, माजी आमदार मोहन जोशी, महापालिका गटनेते अरविंद शिंदे, ब्लॉक अध्यक्ष प्रशांत तुपे, चंद्रकांत मगर, नगरसेवक सतीश लोंढे, नगरसेविका विजया वाडकर, कविता शिवरकर, रईस सुंडके, नितीन आरु, प्रशांत सुरसे, शफी इनामदार आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, ‘अकरा लाख रुपयांचा ड्रेस घालणारे व परदेशवारी करणारे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना देशातील गरीब जनतेचे घेणे देणे नाही. अच्छे दिन आणू न शकलेले हे सरकार अपयशी ठरले असून, जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी रोज एक नवीन निर्णय घेत आहे. त्यांनी केलेली एकही घोषणा राज्य व केंद्र सरकारने पूर्ण केलेली नाही. शेतक-यांची व्यथा या सरकारला समजत नसल्याने ४५०० कोटी पीक कर्जासाठी आवश्यकता असताना केवळ ४५० कोटी मंजूर केले. पैशातून सत्ता व सत्तेतून पैशाचे राजकारण सरकार करीत आहे.’
बाळासाहेब शिवरकर म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाने गरिबांसाठी खूप कामे केली. मात्र आम्ही कधीही मार्केटिंग केले नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदी निर्णय हिताचाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

‘नोटाबंदीचा सरकारने घेतलेला निर्णय आमच्या हिताचाच आहे. पण, कॅशलेस सुविधांची माहिती देण्याबाबत व्यवस्था अपुरी पडली आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे,’ असे चित्र ग्रामीण भागातील नागरिकांनी ‘मटा’कडे व्यक्त केले आहे.

केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर बँकांबाहेर रोज नागरिकांची नोटा बदलण्यासाठी, पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे. या गर्दीमध्ये उभ्या राहिलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया ‘मटा’ने जाणून घेतल्या. त्यातून ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक डिजिटल बँकिंग, नेटबँकिंग आदी कॅशलेस सुविधांपासून अनभिज्ञ असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे साहजिकच कॅश काढण्याकडे नागरिकांचा कल राहिला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांवर त्यामुळे कामाचा व्याप वाढला आहे. काहींच्या खात्यावर पुरेसे पैसे असूनही ते काढता येत नसल्याचे चित्र आहे.

बारामतीच्या लोणीभापकर परिसरात आठ ग्रामपंचायती आहेत. या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. पळशी गावापासून १२ किलोमीटर अंतरावर वडगाव निंबाळकर व १२ किलोमीटर अंतरावर जळगाव कं.प. मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. तेथे फक्त दोन हजार रुपये दिले जात आहेत. तर, पीडीसीसी बँकेत ५०० रुपये मिळत आहेत. इतके कमी रोख रुपये मिळत असल्यामुळे शेतातील कोणतीच कामे मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. गायींना गोळी-भुसा घेणेही शक्य होत नसल्याने दुध उत्पादनात घट झाली असल्याचे रामदास दुर्गाडे या व्यावसायिकाने सांगितले.

अनेक ग्राहक १०० व ५०च्या नोटा बँकेत जमा करीत आहेत. त्यामुळे कामकाज सुरळीत राहण्यास मदत होत आहे. चलनपुरवठा मागणीनुसार मिळाल्यास कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, ग्राहकांनी नेटबँकिंग वापरणे काळाची गरज आहे.

ए. डी. जोशी, व्यवस्थापक, बँक ऑफ बडोदा, बारामती

गेली चाळीस वर्षे आम्ही घरगुती गॅस सिलिंडरसाठी उन्हातान्हात रांगा लावून जास्तीचे पैसे मोजत असू. दोन वर्षांपासून एका कॉलवर सिलिंडर घरी येतो. त्यामुळे आमचा विश्वास आहे, की नोटाबंदीचा निर्णय नक्की हिताचाच असणार.

विजय गव्हारे, नागरिक, बारामती

आमच्या ठिकाणी नेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही. मिळाले, तरी वेग ‘टूजी’ असतो. त्यामुळे नेटबँकिंग करता येत नाही. ग्रामीण भागात कुठेही रोख रुपयाशिवाय व्यवहार होत नाहीत. बँक खात्यात पैसे आहेत. मात्र, ते काढता येत नाहीत. सरकारने चलनपुरवठा सुरळीत करावा हीच विनंती.

सुरेश मासाळ, नागरिक, मासाळवाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरूरमध्ये होणार पंचरंगी लढत

$
0
0

शिरूर : शिरूर नगरपालिका निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवसांनंतर शहरात नगरसेवक पदाकरिता तिरंगी, तर नगराध्यक्षपदाकरिता पंचरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या अपक्ष उमेदवार उज्ज्वला जयसिंग पाचर्णे, जनक्रांती आघाडीच्या डॉ. सुनीता पोटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत निश्चित झाली.

वॉर्ड क्र. १ मधून प्रकाश डंभाळे वॉर्ड क्र. २ मधून सारिका नवनाथ जामदार,योगेश जामदार यांनी तर वॉर्ड क्र ३ मधून माजी नगरसेवक संजय खांडरे, अपक्ष उमेदवार हाफिज बागवान, वॉर्ड क्र. ५ मधून चंद्रकांत लोखंडे, वॉर्ड क्र. ६ मधून सागर सातारकर, वॉर्ड क्र. ७ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले मनसेचे सुशांत कुटे वॉर्ड क्र. ८ मधून प्रमोद गायकवाड, उल्हास साखरे, वॉर्ड क्र. ९ मधून अमित कर्डिले, अनिकेत थोरात, वॉर्ड क्र. १० मधून वत्सला बाबूराव पाचंगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. नगरसेवक पदासाठी ११ जणांचे, तर नगराध्यक्षपदाकरिता एका उमेदवारीचा अर्ज बाद झाला होता.

माजी नगराध्यक्षा मनीषा राजेंद्र गावडे यांच्या वॉर्ड क्र. ६ मधून विकास आघाडीकडून दाखल करण्यात आलेला अर्ज बाद झाल्याने अपक्ष उमेदवार ज्योती चंद्रकांत लोखंडे यांच्या एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. नगराध्यक्षपदाकरिता भाजपच्या वत्सला बाबूराव पाचंगे, शिरूर शहर विकास आघाडीच्या वैशाली दादाभाऊ वाखारे, बसपचे शिफा सय्यद, लोकशाही क्रांती आघाडीच्या सविता अनिल बांडे व डॉ. वंदेपुष्पा ससाणे या पाच उमेदवारांमध्ये नगराध्यक्षपदाची लढत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी बंद करण्याचे ‘जलसंपदा’ला अधिकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका ठरवून दिल्यापेक्षा अधिक पाणी घेत असेल, तर पाण्याचा दरवाजा बंद करण्याचे अधिकार जलसंपदा विभागाला आहेत, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कृत्याची गुरुवारी पाठराखण केली. पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने पुरेसे पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याने कालवा दुरुस्तीसाठी आणि पुरेसे पाणी मिळण्यासाठी महापालिकेने कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी द्यावा, असाही सल्ला बापट यांनी दिला आहे.

महापालिका ठरवून दिल्यापेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचे कारण पुढे करून जलसंपदा विभागातील अभियंत्याने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन पाणी उचलण्याचा दरवाजा मंगळवारी रात्री अचानक बंद केला होता. यामुळे बुधवारी शहरातील मध्यवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. शहरात समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी पालिकेने २२०० कोटी रुपयांचा निधी कर्ज तसेच कर्जरोखेच्या माध्यमातून उभारण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर मांडला होता. हा प्रस्ताव काँग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेच्या मदतीने दफ्तरी दाखल केल्याने नाराज झालेल्या पालकमंत्री बापट यांनी शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी केला होता. याबाबत बापट यांना पत्रकार परिषदेत विचारले असता, ‘मी इतका चिल्लर नाही’ असे ते म्हणाले.

महापालिका जास्तीचे पाणी घेत असेल तर पाण्याचा दरवाजा बंद करण्याचा अधिकार जलसंपदा विभागाला असल्याचे सांगून त्यांनी या कारवाईची पाठराखण केली. जलसंपदा विभागाचे अधिकारी पाणी बंद करणार असल्याचे तुम्हाला माहीत होते का, असा प्रश्न विचारला असता, ही कारवाई करणार असल्याची पूर्वकल्पना आपल्याला होती. मात्र, चर्चेनंतर आपण पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या, असे त्यांनी स्पष्ट केले. धरणात यंदा मुबलक पाणीसाठा असला, तरी पाण्याची गळती थांबविण्यासाठी पालिकेने खडकवासला ते पर्वती दरम्यानची पाइपलाइन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यानंतरच ते नदीत सोडावे, तसेच कालव्याच्या माध्यमातून होणारी गळती थांबविण्यासाठी पालिका हद्दीतपर्यंतच्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असा सल्लाही बापट यांनी दिला.

पुणेकरांचा काटकसरीने पाणीवापर

विधानपरिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने ऑक्टोबर महिन्यात उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी कालवा समितीची बैठक घेतली नाही. पुढील आठवड्यात कालवा समितीची बैठक घेतली जाणार असून त्यामध्ये पुढील वर्षाचे पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. बैठक न घेता शेतीसाठी आवश्यक थोडे पाणी कालव्यातून सोडले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. शहराला दिले जाणारे पाणी आणि शहराची लोकसंख्या याचा विचार केला, तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुणेकर प्रतिव्यक्ती तीनशे लिटर पाणी वापरतात या विधानाला बापट यांनी पाठिंबा दिला. मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने सध्या पुणेकर काटकसरीने पाणी वापरत असल्याचे बापट यांनी नमूद केले.

‘पाण्यासाठी कर्जास मंजुरी द्या’

कर्ज किंवा कर्जरोखे उभारून समान पाणीपुरवठा योजना राबविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने दफ्तरी दाखल केला आहे. मात्र, हा प्रस्ताव मंजूर होणे शहराच्या हितासाठी महत्त्वाचे आहे. मुख्य सभेने त्याला मंजुरी द्यावी, यासाठी महापालिका आयुक्तांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न सर्वसाधारण सभेत प्रशासनाचा असेल, असे आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

शहरातील नागरिकांना समान पाणीपुरवठा केला जावा, यासाठी पालिकेने ही योजना आखली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘अमृत योजने’तून सुमारे सातशे कोटी रुपये मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित २२०० कोटी रुपये उभे करण्यासाठी पालिकेला कर्ज अथवा कर्जरोखे उभे करावे लागणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा या योजनेत वाटा नाही, असे म्हणणे चुकीचे असल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले. कर्ज घेऊन ही योजना राबविण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेने विरोध केला असून स्थायी समितीच्या बैठकीत हा ‌प्रस्तास दप्तरी दाखल केला आहे. हा प्रस्ताव १५ डिसेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरीसाठी येणार असल्याने हा विषय मान्य व्हावा, यासाठी आयुक्त कुमार यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

शहरासाठी ही योजना महत्त्वाची असून यासाठी कमी व्याजदराने टप्प्याटप्प्याने कर्ज घेतले जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नवी पाइपलाइन टाकणे, मीटर खरेदी आणि भूसंपादनाची कामे करता येणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ही तर अधिकाऱ्यांची मनमानी…

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लाखो पुणेकरांचा पाणीपुरवठा अचानक बंद करणे ही जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची मनमानी असल्याची टीका शहरातील स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. वैयक्तिक वीजपुरवठा; तसेच पाणीपुरवठा नोटीस दिल्याशिवाय बंद करता येत नाही, असे असताना कालव्यातून पाणी घेण्यास मज्जाव करून संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचा अधिकार जलसंपदा विभागाला कुणी दिला, असा प्रश्नही या स्वयंसेवी संस्थांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना विचारला आहे.

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याने पाणी बंद केल्याने शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा बुधवारी विस्कळित झाला होता. पुणेकर प्रति व्यक्ती ३०० लिटर पाणी वापरत असून शहरात ३५ ते ४० टक्के गळती असल्याचे वक्तव्य करून असा हिसका दाखविल्याशिवाय महापालिका वठणीवर येणार नाही, असे वक्तव्य महाजन यांनी केले होते. जलसंपदामंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत. शहराला १९९९च्या लोकसंख्येच्या हिशेबाने ११.५ टीएमसी पाण्याचा साठा मंजूर झाला आहे. त्यानंतर १७ वर्षे झाल्यानंतरदेखील सरकारने हा कोटा तसाच ठेवला आहे. या काळात शहराची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली असतानाही राज्य सरकार याकडे दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्न सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी विचारला आहे. मनमानी कारभार करून लाखो पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या जलसंपदा खात्याच्या त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही वेलणकर यांनी जलसंपदामंत्री महाजन यांच्याकडे केली आहे.

वेलणकर यांनी विचारलेले प्रश्न

पुणेकरांना पाणीवापराचे नियम लावताना कालवा समितीची बैठक झालेली नसतानाही कालव्यातून पाणी शेतीसाठी सोडण्याचा निर्णय कोणत्या अधिकारात घेतला?

शहरात पाण्याची गळती ३५ टक्के असेल, तर मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीखाली मुरले पाहिजे. पाच फुटांवर पाणी उपलब्ध होणे आवश्यक असताना पन्नास फूट खोदल्यानंतरही पाणी लागत नाही. याचा अर्थ पाणीगळती नाही, तर पाणीचोरी होत आहे, यावर राज्य सरकारने काय प्रयत्न केले?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञान नसलेल्यांचा साहित्य क्षेत्रात भरणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सध्याच्या परिस्थितीमध्ये साहित्य व्यवहारामध्ये साहित्याचे फारसे ज्ञान नसणाऱ्यांचा भरणा वाढला आहे. अशा वेळी साहित्याची आणि त्याच्या समीक्षेची योग्य समज असलेली व्यक्ती अक्षयकुमार काळे यांच्या रूपाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे,’ असे विधान कथाकार भारत सासणे यांनी केले.

‘रंगत संगत प्रतिष्ठान व लोकमंगल ग्रुप’तर्फे कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या १०७व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अक्षयकुमार काळे यांचा सासणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ‘रंगत-संगत’चे प्रमोद आडकर, ‘लोकमंगल’चे शिरीष चिटणीस आदी या वेळी उपस्थित होते. सासणे म्हणाले, ‘साहित्य संस्कृतीची वाट सध्या राजकारणासारखी होत चालली आहे. ज्यांना फारसे काही कळत नाही, अशी मंडळी साहित्य व्यवहारात येऊन आपले स्थान निश्चित करू पाहत आहेत. अशा वेळी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अक्षयकुमार काळे यांच्यासारखा साहित्याचा, कवितेचा सखोल अभ्यास करणारा व्यक्ती गरजेचा आहे. सध्या मानवाचे जीवन यंत्रवत होत चालले आहे. सध्या सर्वजण यंत्रांवर अवलंबून आहेत. अशा जगण्यापासून कविताच माणसाला वाचवू शकते.’

मर्ढेकरांच्या कवितेचे दाखले देऊन अक्षयकुमार काळे म्हणाले, ‘बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेचे भान सध्याच्या कवींना राहिले, तरच कवितेचा विकास शक्य होईल. प्रेम, सामाजिक, अध्यात्मिक अशा सर्वच विषयांमधील त्यांची कविता अंतर्मुख करणारी आहे. कष्टकरी, शोषित स्त्री ही कायम मर्ढेकरांच्या कवितेची नायिका होती. त्यामधून त्यांनी समाजमनाचा वेध घेतला. त्यांनी केलेल्या कवितेच्या अर्थांचे अनेक पडदे आहेत. त्यांचा अभ्यास केला, तरच कविता कळते. मर्ढेकरांच्या कवितेच्या सान्निध्यात राहिले, तरच त्यांची कविता अवगत होईल.’ कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘मर्ढेकरांची कविता’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. श्रीनिवास वारुंजीकर, मधुसूदन पत्की, चित्रा भिसे, राजश्री देशपांडे, हर्षल राजेशिर्के यांनी मर्ढेकरांच्या कवितेचे वाचन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्य संमेलन रखरखीत उन्हाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आचारसंहितेमुळे यंदाचे नाट्य संमेलन एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येईल,’ असे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नाट्य संमेलन उस्मानाबादला होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात उस्मानाबाद येथे असणारा रखरखीत उन्हाळा पाहता त्यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

नाट्य परिषदेच्या पुण्यातील उपनगरीय कोथरूड शाखेचे उद्घाटन जोशी यांच्या हस्ते गुरुवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आचार संहितेचा फटका आगामी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला बसला असून संमेलन लांबणीवर पडले आहे. साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणारे नाट्य संमेलन त्यानंतर आयोजित करावे लागणार आहे. याबाबत जोशी म्हणाले, ‘विविध निवडणुका असल्याने आचारसंहिता लागू आहे. अशा काळात प्रमुख पाहुणे बोलाविण्यासाठी अडचण निर्माण होते. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये संमेलन होईल की नाही, याबद्दल साशंकता आहे. मात्र, संमेलन होणार असून ते एप्रिल-मे महिन्यात आयोजित केले जाईल.’ संमेलन स्थळाविषयी त्यांना विचारले असता, ‘उस्मानाबाद व नागपूर या दोन ठिकाणांचे प्रस्ताव विचारधीन आहेत. पण, आगामी संमेलन उस्मानाबाद येथे होण्याची शक्यता आहे.’

या कार्यक्रमाला परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, मराठी नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, प्रवीण बर्वे, प्रकाश यादव, दीपक गुप्ते, समीर हंपी, सत्यजीत धांडेकर आदी उपस्थित होते. उत्तरार्धात बंडा जोशी, संतोष चोरडिया, महेंद्र गणपुले व वंदन नगरकर या कलावंतांनी ‘हास्यजल्लोष’ हा एकपात्री कार्यक्रम सादर केला. विनोद सातव यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात दोन युवकांचा मृत्यू

$
0
0

राजगुरूनगर : पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरूनगरजवळील चांडोली गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली.

समीर विजय चासकर (वय २२) व युवराज सोपान शिंदे (वय २३, दोघेही राहणार पडाळवाडी, ता. खेड) अशी मृत युवकांची नावे आहेत. खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली गावाजवळ दोन दुचाकींची ओव्हरटेक करताना समोरासमोर धडक झाली. या धडकेत पुण्याच्या दिशेने जाणारे समीर चासकर व युवराज शिंदे हे दोघे युवक दुसऱ्या एका टेम्पोच्या चाकाखाली सापडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाले. दुसऱ्या दुचाकीवरील अजिंक्य चावडा, सचिन शिरसाट, षन्मुख रूपेश थिगळे (रा. राजगुरूनगर) हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळाचा सर्व्हे पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पुरंदर येथील नियोजित विमानतळाचा ‘ऑब्स्टॅकल लिमिटेशन सर्व्हे (ओएलएस) पूर्ण झाला असून त्याचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील दीड महिन्यांत भूसंपादनासाठी पॅकेज तयार करण्यात येईल. हे पॅकेज शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय तयार होणार नाही, त्यामुळे स्थानिकांनी अफवांना बळी पडू नये,’ असे आवाहन ‘महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलमेन्ट कॉर्पोरेशन’चे (एमआयडीसी) अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून पुरंदर येथील नियोजित जागेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाले असल्याने पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाधिकारी सौरव राव, पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘चाकण येथील जागा ‘एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ने योग्य नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे पुरंदर येथील जागेचा विचार करण्यात आला. या जागेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून सर्वंकष अहवाल ‘एएआय’ला पाठवण्यात येणार आहे. या अहवालातील बदल, त्रुटी असल्यास त्यामधील बदल केले जातील.’

पाटील म्हणाले, ‘पुरंदर येथील जागेचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यासाठी सल्लागार समिती नेमण्यात येणार असून त्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. पुढील महिन्याभरात या कंपनीची नियुक्ती होईल. त्यानंतर आराखडा तयार करण्यास सहा ते सात महिन्यांचा कालावधी जाईल. या अहवालानंतरच विमानतळासाठी नेमकी किती जागा जागेल, याबाबत स्पष्टता येईल, असे पाटील यांनी सांगितले. जागा अंतिम करताना त्यामध्ये गावठाण अथवा गावे येणार नाहीत, याची काळजी घेण्यात येत असून स्थानिकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये.’

काय आहे सर्वेक्षणात

विमानतळाच्या प्रस्तावित जागेत कुठल्याही स्वरूपाचे हवाई अडथळे आढळलेले नाहीत. प्रस्तावित जागेला जोडणारे किती रस्ते उपलब्ध आहेत. धावपट्ट्यांसाठी पुरेशी जागा आहे की नाही, सध्याची रहदारी किती आहे. तिच्यावर काय परिणाम होणार, अशा विविध घटकांचा अभ्यास या सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीच्या कार्यकर्त्यांचा आळंदीमध्ये राडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
राजकीय वैमनस्यातून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उमेदवारांचे कार्यकर्ते आपसात भिडले आणि तुफान दगडफेक झाली. गाड्यांची तोडफोड करून या वेळी हवेत गोळीबार केल्याची परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली असून, या प्रकरणी भाजप उमेदवारासह दिघी पोलिसांनी २२ जणांना अटक केली आहे.
राजेंद्र सोपान गिलबिले (४६, रा. तापकीरनगर, आळंदी ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोन्या घुले, अतुल बोत्रे, राकेश सिंग, प्रमोद रावसाहेब तापकीर, बाळू चव्हाण, दिनेश चिंतामण वरुटे, कालिदास कुंडलीक तापकीर, महादेव रामचंद्र तापकीर, शांताराम गुलाब तापकीर, नवनाथ दिलीप तापकीर यांना अटक करण्यात आली आहे. सोन्या अनिल तापकीर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, प्रमोद रावसाहेब तापकीर (३९, रा. तापकीरनगर, डुडुळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भाजप उमेदवार सचिन रामदास गिलबिले, रामदास सोपान गिलबिले, शामराव सोपान गिलबिले, राजेंद्र सोपान गिलबिले, स्वप्नील उर्फ बंटी रामदास गिलबिले, निखिल गिलबिले, संदेश उर्फ पप्पू तापकीर, प्रभाकर बवले, प्रदीप ज्ञानेश्वर बवले, गणेश रहाणे, गुलाब दादाभाऊ वहिले, प्रवीण उर्फ तात्या बवले यांना अटक करण्यात आली आहे. तर पांडुरंग प्रभाकर वहिले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या तिकिटावर सचिन गिलबिले आणि शिवसेनेच्या तिकिटावर विद्यमाने नगराध्यक्ष रोहिदास तापकीर हे प्रभाग क्रमांक सात मधून निवडणूक लढवित आहेत. सचिन गिलबिले यांचे चुलते आणि रोहिदास तापकीर मागील निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. परंतु यंदा सचिन गिलबिले हे रोहिदास तापकीर यांच्या विरोधात निवडणूक लढवित असल्याने राजकीय वादंग सुरू झाले आहे.
राजेंद्र सोपान गिलबिले यांनी दिलेल्या फिर्याद म्हटले आहे की, सोन्या घुले, अतुल बोत्रे, राकेश सिंग, प्रमोद तापकीर आणि बाळू चव्हाण यांनी बुधवारी रात्री अतिथी हॉटेलसोमरील वाहने पाडली. त्यामुळे तात्या बवले यांच्याशी त्यांचा वाद झाला. त्यावेळी राजेंद्र गिलबिले तिथे गेले असता हे पाच जण तेथून निघून गेले. त्यानंतर आपल्या साथीदारांना घेऊन तिथे आले आणि त्यांनी दगडफेक केली. यामध्ये राजेंद्र गिलबिले आणि त्यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या आहेत. सोन्या घुले याने हवेत गोळीबार केला.
तर प्रमोद रावसाहेब तापकीर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, सचिन रामदास गिलबिले आणि रोहिदास तापकीर आळंदी नगरपालिकेच्या निवडणुकासाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यात मतभेद आहेत. बुधवारी प्रभाकर बवले यांचे भाऊ तात्या बवले यांनी त्यांची दुचाकी रोहिदास तापकीर यांच्या मोशी-आळंदी रस्त्यावरील कार्यालयासमोर पार्क केली होती. त्या वेळी त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर सचिन गिलबिले यांनी प्रमोद तापकीर यांना एका हॉटेलसोर बोलावून घेतले आणि मारहाण केली. राजेंद्र गिलबिले यांनी प्रमोद तापकीर यांच्या कानाला पिस्तूल लावून परत इकडे दिसलास तर मारण्याची धमकी दिली आणि हवेत गोळीबार केला. त्यानंतर सर्वजण रोहिदास यांच्या कार्यालयासमोर गेले. वाहनांची तोडफोड केली आणि जमलेल्या नागरिकांवर दगडफेक केली. त्यामध्ये काही जण जखमी झाले आहेत. दिघी ठाण्यातील फौजदार आर. व्ही. घाटगे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचे माजी उपमहापौर प्रसन्न जगताप भाजपमध्ये

$
0
0

म. टा.प्रतिनिधी‌, पुणे

काँग्रेसचे माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका स्वीकृत सदस्यासह २६ जणांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या कार्यालयात हे प्रवेश झाले. पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
महापालिकेच्या गेल्या ‌निवडणुकीला जगताप यांचा पराभव झाला होता. त्यापूर्वी त्यांना काँग्रेसकडून उपमहापौर म्हणून महापालिकेत संधी मिळाली होती. आगामी महापालिकेच्या निवडणुका या चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने झाल्याने याचा फायदा घेत जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पालिका निवडणुकीसाठीच्या अं‌तिम प्रभाग रचनेत सिंहगड रोडवरील दोन प्रभागांत मोठे बदल झाल्याने जगताप काँग्रेस पक्षाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा गेले काही दिवसांपासून सुरू होती. जगताप यांच्या प्रवेशामुळे सिंहगड रोडवरील भाजपची ताकद वाढण्यास अधिक मदत होणार आहे, असा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन् सुयश भावुक झाला...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शाळेत पहिल्या तासानंतर पळून जाताना येणारी मजा... वर्गात एखाद्याला टार्गेट करून मिळणारा आनंद... एकीकडे ओरडणारे सर, तर दुसरीकडे पाठीशी घालणाऱ्या प्रेमळ मॅडम... मित्रांसोबत केलेली मस्ती अशा एक ना अनेक आठवणींना उजाळा देताना अभिनेता सुयश टिळक भावूक झाला होता.
विद्या मंडळाच्या आपटे प्रशालेतर्फे देण्यात येणारा पु. ग. वैद्य पुरस्कार आपटे प्रशालेचाच माजी विद्यार्थी असणाऱ्या सुयशला संस्थेचे अध्यक्ष अॅड. अभय आपटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी सुयश आणि त्याच्या वर्गमित्रांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. विद्या मंडळचे कार्यवाह अजित गायकवाड या वेळी उपस्थित होते.
‘स्टेजवर बसून सन्मान स्वीकारण्याची माझी पात्रता नाही. आयुष्यभर ज्या शिक्षकांच्या खोड्या काढल्या; त्यांच्यासमोर पुरस्कार स्वीकारताना ओशाळल्यासारखे वाटत आहे. आम्ही शाळेचे नियम अनेकदा मोडले खरे... तरी शिक्षकांचे लाडके झालो. ज्यांचा मार खाल्ला त्यांच्या डोळ्यात आज दिसणारे प्रेम पाहून, खूपच समाधान वाटत आहे. शाळेने कधीही इतरांपुढे हात पसरवायला शिकवले नाही. त्यामुळेच आज आम्ही वेगवेगळी क्षेत्रे पादाक्रांत करतो आहोत,’ या शब्दांत सुयशने शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शाळेने दिलेले प्रेम, शाळेची इमारत, माणसं, माझे मित्र कधीच विसरू शकत नाही, हे सांगताना सुयश कमालीचा भावूक झाला. या वेळी सभागृहातील शिक्षकांचे डोळेही पाणावले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आत्मीयतेचे नाते या कार्यक्रमात उलगडले. वातावरण हलके करण्यासाठी सुयशने शिक्षकांची अनेक गुपिते उलगडून सर्वांना हसण्यास भाग पाडले. त्याने आणि त्याच्या मित्रांनी अनेक गमतीजमती आणि आठवणींना उजाळा दिला. स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पहली तारीख’ गाणे वाजले; ‘जमाना’ मात्र नाखुशच...

$
0
0

बहुसंख्य बँकांमध्ये नोटाच नसल्याने नाराजी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दर महिन्याच्या पायंड्यानुसार आकाशवाणीवर ‘आज पहली तारीख है,’ हे किशोरकुमारचे गाणे गुरुवारीही प्रसारित झाले; पण याच गाण्यातील ‘खुश है जमाना,’ ची प्रचिती मात्र पुणेकरांना आली नाही. त्याउलट पगार जमा झाला; पण घरी नाही आला, असाच अनुभव लाखो नोकरदारांनी घेतला. शहर आणि परिसरातील बहुसंख्य बँकांमध्ये नोटाच न आल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे.
खातेदारांना पगार किंवा पेन्शन काढता यावी, यासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे काही बँकांना अधिक रक्कम उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे या मोजक्याच बँकांमध्ये खातेदारांना दहा ते बारा हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळाली. बहुसंख्य बँकांमध्ये दोन ते पाच हजार रुपयांदरम्यानची रक्कम मिळू शकली. अनेक खासगी बँकांमधील रोख रक्कम दुपारीच संपुष्टात आल्याने खातेदार हवालदिल झाले होते. शहरातील तुरळक एटीएम सकाळी सुरू होती, तर सायंकाळनंतर काही मोजकी एटीएम सुरू झाली.
महिन्याचा पहिलाच दिवस असल्याने पगार किंवा पेन्शन काढण्यासाठी काही बँकांमध्ये प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या. विशेषतः राष्ट्रीयीकृत बँकांबाहेर मोठ्या रांगा होत्या. बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही शाखांना पुरेशी रोकड मिळाल्याने तिथे खातेदारांना सात ते बारा हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्यात आली. अन्य शाखांमध्ये अडीच ते सात हजार रुपयांदरम्यान रक्कम दिली गेली. या बँकांकडे प्रामुख्याने दोन हजारांच्या नोटा, तर इतर १०० व अन्य नोटा उपलब्ध होत्या. बँक ऑफ महाराष्ट्रच्या डेक्कन जिमखाना शाखेतील एटीएमबाहेर सायंकाळी भलीमोठी रांग लागली होती.
बँक ऑफ इंडियाच्या अनेक शाखांमध्ये खातेदारांना पाच हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्यात आली. बँकेच्या शाखांमध्ये दिवसभर पेन्शनर व पगारदारांची गर्दी होती. बँक ऑफ बडोदामध्ये खातेदारांना पाच ते सात हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्यात आली. काही ठिकाणी पेन्शनरांना अधिक रक्कम देण्यात आली.

चालू खाते असलेल्यांना ५० हजार रुपये
भांडारकर रोड, आपटे रोड, शिवाजीनगर, कोथरूड, बाणेर, कात्रज भागातील खासगी बँकांमध्ये रोकड कमी असल्याने या बँकांना रेशनिंग करावे लागले. काही बँकांमध्ये करंट खातेदारांना ५० हजार रुपये देण्यात आले. बचत खातेदारांना दोन ते सात हजारांपर्यंत रक्कम दिली गेली. मात्र, बहुतांश खासगी बँकांमध्ये दुपारी बाराच्या आसपासच रोख रक्कम संपुष्टात आली. त्यामुळे खातेदारांना निराश होऊन परतावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्काची पेन्शन मिळेना; बिले थकली, उधारी बंद

$
0
0

नोटाबंदीमुळे पेन्शनरांसमोर अनेक अडचणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका केंद्र आणि राज्य सरकारी पेन्शनरांनाही बसला आहे. सरकारने नोटाबंदी केल्यामुळे रोजच्या गरजेच्या वस्तूंची खरेदी अवघड होऊन बसली आहे. घर कामगारांना देण्याचे पैसे, दूधवाला, पेपरवाला या सगळ्यांची देणी थकली आहेत. त्यामुळे ज्येष्ठांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मत अनेक पुणेकर पेन्शनरांनी ‘मटा’कडे व्यक्त केले.
पुणे हे पेन्शनरांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. केंद्र व राज्य सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या पेन्शनरांची; तसेच पतीच्या मृत्यू पश्चात फॅमिली पेन्शन घेणारी अनेक कुटुंबे पुण्यात आहेत. बँकेत असलेल्या ठेवींवरील वार्षिक व्याज आणि दरमहा मिळणारी पेन्शन हाच आर्थिक स्रोत असलेल्या अनेकांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. पण त्याचा त्यांना दैनंदिन जीवनात खूप त्रास होत असल्याचे आवर्जून सांगितले.
फॅमिली पेन्शन घेणाऱ्या विजया पाठक म्हणाल्या, ‘बँकेत गेले; पण पूर्ण पेन्शन मिळाली नाही. सरकारने दिलेल्या आदेशांमुळे बँक कर्मचारीही हतबल आहेत. त्यांनी जास्तीत जास्त अडीच हजार रुपये दिले. औषधपाणी, महिन्याचा खर्च चालवणे अवघड होऊन बसले आहे. पैसे काढण्यासाठी पुन्हा पुन्हा बँकेत जाणे, रांगेत थांबणे आणि तरीही थोडीशीच रक्कम पदरी पडणे हे खूप त्रासदायक आहे. वयामुळे सारखे बँकेत जाणे जमत नाही. सरकारने निदान पेन्शनरांना तरी मोठी रक्कम द्यावी.’
प्रत्येक बँकेने उपलब्ध कॅशनुसार ग्राहकांना पैसे देण्याचे धोरण अवलंबले आहे. काही बँकांतून दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळाल्याचेही ज्येष्ठांनी सांगितले. ‘नोटाबंदीमुळे पेन्शन पूर्ण मिळत नाही. त्यामुळे घराचे महिन्याचे नियोजनच कोलमडले आहे. बँकांमध्ये मोठ्या रांगा आहेत आणि तेथील कर्मचारी सांगतील तेवढीच रक्कम पैसे काढण्याच्या स्लिपवर लिहावी लागते. दोन ते अडीच हजार रुपयेच मिळत असल्याने अवघड झाले आहे. दूध बिल, घरातील कामगारांचे पगार हे तरी रोखच द्यायला लागतात. ते देताच येत नाहीत. आम्हा पेन्शनरांना डेबिट आणि क्रेडिट कार्डे वापरताना बराच त्रास होतो. ते सोयीचे नाही. एकच गोष्ट दिलासादायक आहे की बँकेत ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांग आहे. त्यामुळे बराच वेळ आणि श्रम वाचतात,’ असे केंद्र सरकारी पेन्शनर प्रमोद पिंपळगावकर यांनी सांगितले.
मध्यमवर्गीय ज्येष्ठांना या नोटाबंदीचा मोठा फटका बसत आहे. पण पर्यायच नसल्याने ते त्रास सहन करत आहेत. याबाबत पेन्शनर शांताराम फाले म्हणाले, ‘नोटाबंदीमुळे आम्हा मध्यमवर्गीयांना बराच त्रास होत आहे. दर महिन्याची बिले देणे कठीण झाले आहे. किराणा दुकानदार, दूधवाला हे उधारीसाठी नाही म्हणतात. त्यामुळे रोजच्या जगण्यावर नोटाबंदीचा थेट परिणाम होत आहे. खेड्यांतही शेतीसाठीचे बी, खते यांची खरेदी करणे मुश्किल होऊन बसले आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी पैसे द्या, मगच पेट्रोल-डिझेल भरा

$
0
0

पेट्रोल डिलर्स असो‌सिएशनची भू‌मिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पेट्रोल पंपचालकांना ५०० रुपयांची जुनी नोट घेण्यास केंद्र सरकारने बंदी घातल्याच्या निर्णयाचा फटका उद्यापासून (शनिवार) सर्वसामान्य ग्राहकांना बसणार असून, ‘आधी पैसे द्या, मगच पेट्रोल डिझेल भरा,’ अशी भूमिका पेट्रोल डिलर्स असो‌सिएशनने घेतली आहे. विमानाची तिकिटे, विमानतळ, गॅस आऊटलेट (एलपीजी सोडून) या ठिकाणीही ५०० रुपयांची जुनी नोट आता चालणार नाही.
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या खरेदीसाठी जुन्या नोटा घेण्यास १४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. सरकारने ही मुदतवाढ अचानक रद्द करत या नोटा स्वीकारण्यास मनाई केली आहे. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री बारानंतर पेट्रोल पंपांवर ५०० रुपयांच्या जुन्या नोटा चालणार नाहीत. या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिलर्स असो‌सिएशनने पेट्रोल-डिझेल विक्रीची आचारंसहिता जाहीर केली असून, आधी पैसे तरच पेट्रोल-डिझेल अशी भूमिका घेतली आहे.

सुट्या पैशांची अडचण
एकीकडे सुटे पैसे उपलब्ध नाहीत, दुसरीकडे बँकांमधून मोठ्या प्रमाणात ग्राहकांना दोन हजार रुपयांच्या नोटा देण्यात येत आहेत. नागरिकांकडून पेट्रोल पंपावर १०० रुपयांचे पेट्रोल भरण्यात येते; तर दुसरीकडे १९०० सुट्टे मागण्यात येतात. त्यात अशा व्यवहारांचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जादा आहे. सरकारने ५०० रुपयांची नोट बंद केल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात २००० रुपयांच्या नोटांचा वापर वाढणार आहे. पंपावर वाद होऊ नयेत, तसेच कायदा सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणूनच आधी पैसे नंतर पेट्रोल डिझेल अशी भूमिका घेण्यात आल्याचे पुणे पेट्रोल डिलर्स असो‌सिएशनचे उपाध्यक्ष सागर रुकारी यांनी सांगितले.

कार्डांचा वापर वाढवा
पेट्रोल पंपचालकांना १०० व ५० रुपयांच्या नोटा असलेले एक लाख रुपये बँकांनी दररोज द्यावेत, असे सरकारचे आदेश आहेत. बहुतांश पंपांवर खासगी बँकांची डेबिट, क्रेडिट कार्ड मशीन आहे. या बँकांकडून पंपचालकांना सुट्टे पैसे देण्यात आलेले नाहीत. सुट्ट्या नोटांचा तुटवडा असल्याने नागरिकांनी डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर वाढवावा, असे आवाहन पंपचालकांनी केले आहे.

पेट्रोल पंपांवरील व्यवहार
- चलनातील नवीन ५०० व २००० रुपयाच्या नोटा स्वीकारल्या जातील
- चलनातील जुन्या १०, २०, ५०, १०० रुपयाच्या नोटा स्वीकारल्या जातील
- ग्राहकांनी डेबिट अथवा क्रेडिट कार्डला प्राधान्य द्यावे. (ही सुविधा संपूर्ण जिल्ह्यात उपलब्ध आहे)
- सुटे पैसे नसल्याने ग्राहकांनी पेट्रोल व डिझेल ५०० व २००० रुपयांच्या पटीतच भरावे. (त्याखालील रक्कम असल्यास नेमके पैसे ग्राहकांनी द्यावेत)

टोलही सुरू
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी गुरुवारी मध्यरात्री बारापासून टोल द्यावा लागणार आहे. ज्या ठिकाणी २०० रुपयांपेक्षा अधिक टोल हे, त्या ठिकाणीच ५०० रुपयांची जुनी नोट चालणार आहे. त्याशिवाय ‘फास्टॅगस्’च्या खरेदीसाठीही नोट चालणार आहे. निवडक टोलनाक्यांवर फास्टॅगस्खरेदीची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी ई-पेमेंट सुविधांचा वापर अधिकाधिक करावा, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. टोल नाक्यांवर पैसे स्वीकारण्याचा हा निर्णय, सुट्या पैशांचा अभाव, ई-पेमेंट सुविधा असली तरी तिचा पहिला दिवस, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मध्यरात्रीपासून टोलनाक्यांवर रांगा लागण्याची शक्यता उच्चपदस्थ सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे जिल्हा बँकेत ६२७ कोटी पडून

$
0
0

कर्जवाटप आणि कर्जवसुलीचे व्यवहार ठप्प

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुमारे ६२६ कोटी ९७ लाख रुपये पडून आहेत. करन्सी चेस्टमधून या नोटा स्वीकारण्यात येत नसल्याने या बँकेमार्फत होणारे साखर कारखाने, दुग्ध संस्था; तसेच कर्जवाटप आणि कर्जवसुलीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सहकारी बँकांबाबत घेतलेल्या भूमिकेचा निषेध म्हणून पाच डिसेंबरला स्टेट बँक ऑफ इंडियाची ट्रेझरी शाखा आणि ​जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे,’ असे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक विजय टापरे, सहायक सरव्यवस्थापक संजय शितोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या वेळी विविध सहकारी बँकांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये रवींद्र दोशी, सुनील देसाई, अनंत कुसुरकर, प्रमोद जाधव, राहुल आलमखाने, कैलास गायकवाड आदींचा समावेश होता.
‘केंद्र सरकारने आठ नोव्हेंबरला काढलेल्या परिपत्रकानुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जमा करून घेतल्या. मात्र, १४ नोव्हेंबरला जिल्हा बँकांना नोटा स्वीकारण्यास मनाई करण्यात आली. दहा ते १४ नोव्हेंबर या कालावधीत जमा झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा या सहकारी बँकांना चलन पुरवठा करणाऱ्या ‘आरबीआय’ नियुक्त करन्सी चेस्टमध्ये स्वीकारण्यात येत नाहीत. ही रक्कम सुमारे ६२६ कोटी ९७ लाख रुपये झाली आहे,’ असे टापरे आणि शितोळे यांनी स्पष्ट केले.
‘रक्कम स्वीकारण्यात येत नसल्यामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीवर ​विपरित परिणाम होत आहे. बँकेमार्फत होणारे साखर कारखाने, दुग्ध संस्था यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. कर्जवाटप आणि कर्जवसुलीचीही अडचण झाली आहे. बँकेच्या दैनंदिन व्यवहारासाठी राष्ट्रीयीकृत किंवा अन्य बँकांमार्फत रोकड देवघेवीचे व्यवहारही ठप्प झाले आहेत,’ असे ते म्हणाले.

काळ्या फिती लावून निषेध
‘आरबीआय’ दुजाभाव करत असल्याने सहकारी बँकांतील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज करून निषेध केला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी ​बँकेचा बँक कर्मचारी संघ आणि बँक एम्प्लॉइज युनियनने केलेल्या या आवाहनाला कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images