Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जालनापूरकर यांना दामले पुरस्कार प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महाराष्ट्रीय मंडळामुळेच मल्लखांब या खेळाचा प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरावर बारा देशांमध्ये होऊ शकला. या संस्थेने देशी क्रीडा प्रकारांसाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे,’ असे मत मल्लखांब या क्रीडाप्रकारातील माजी राष्ट्रीय खेळाडू राजीव जालनापूरकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रीय मंडळातर्फे जालनापूरकर यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘रमेश दामले स्मृती प्राइड ऑफ महाराष्ट्रीय मंडळ’ या पुरस्काराने डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कुस्ती खेळासाठी संपूर्ण कुटुंबासह प्रयत्न करणाऱ्या काका पवार यांचा देखील सन्मान या वेळी करण्यात आला. एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, धनंजय दामले या वेळी उपस्थित होते.
‘महाराष्ट्रीय मंडळाच्या संस्थापकांची खेळाबद्दल दृष्टी चांगली होती. देशी खेळांमध्ये दर्जेदार खेळाडू निर्माण करण्यासाठी कायमच संस्थेने पुढाकार घेतला. या संस्थेत अनेक वर्ष काम केल्यानेच नेतृत्व गुण जोपासता आले. त्याचा आज लौकिक जीवनात उपयोग होत आहे,’ याकडे जालनापूरकर यांनी लक्ष वेधले.
डॉ. उदय निरगुडकर म्हणाले, ‘देशी क्रीडा प्रकार सध्या दुर्मिळ होत चालले आहेत. महाराष्ट्रीय मंडळासारख्या संस्थांमुळे खेळाला चांगले दिवस येतील. या देशात क्रीडा संस्कृती म्हणावी तशी रूजली नाही. महाराष्ट्रीय मंडळाने क्रीडा संस्कृतीचा जागर करून संस्कृती जोपासण्याचा घेतलेला वसा अभिनंदनीय आहे. निरगुडकर यांच्या हस्ते महाराष्ट्रीय मंडळाच्या वेबसाइटचे प्रकाशन करण्यात आले. मंगेश वाघमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संत ज्ञानेश्वरांवरील दुर्मिळ ग्रंथ भेटीला

$
0
0

एरीना ग्लुस्कोआ यांचे संशोधन कारणीभूत

म. टा.प्रतिनिधी, पुणे

संत ज्ञानेश्वरांच्या चरित्रातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे दोन दुर्मिळ ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध होणार आहेत. ज्ञानेश्वरकालीन आळंदीचा परिसर, सिद्धेश्वर पीठ, तेथील परिसराचे वर्णन असलेले ‘अलंकापुरी महात्म्य’ हे संस्कृत भाषेतील दुर्मिळ हस्तलिखित आता वाचकांसमोर येणार आहे. या शिवाय ज्ञानेश्वरांची सहस्त्रनामे असलेले ‘ज्ञानेश्वर पंचरत्ने’ हे हस्तलिखित देखील उपलब्ध होणार आहे.
१८५६मध्ये ‘अलंकापुरी महात्म्य’ हे संस्कृत हस्तलिखित लिहिले गेले. त्यामध्ये अलंकापुरी, अलकानगरी, असे आळंदीचे वर्णन केले आहे. आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर, इंद्रायणी नदी, सिद्धपीठाजवळील कुबेरा नदी आदी आळंदीच्या परिसरातील प्रमुख स्थानांची माहिती या हस्तलिखितात उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाच्या ब्रँड अँबेसेडर एरीना ग्लुस्कोआ (मॉस्को) या हस्तलिखितावर संशोधन करीत आहेत. त्यांच्या संशोधनामुळेच हे हस्तलिखित प्रकाशात आले असून, ते आता सामान्य वाचकांनाही पुस्तक स्वरूपात वाचता येईल. या हस्तलिखिताबरोबरच ‘ज्ञानेश्वर पंचरत्ने’ या हस्तलिखिताचेही पुस्तक तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, उत्कर्ष प्रकाशनातर्फे ते प्रकाशित करण्यात येत आहे. ‘ज्ञानेश्वर पंचरत्ने’मध्ये विठ्ठलाचे भक्त संत ज्ञानेश्वर यांच्याऐवजी योगी ज्ञानेश्वर ही संकल्पना मांडण्यात आली आहे. शिवाय या हस्तलिखितात ज्ञानेश्वरांची एक हजार नामे लिहिलेली आहेत.
संत ज्ञानेश्वर हे विष्णूचे एक रूप समजून त्याची रचना करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही संतांचे सहस्त्रनाम नाही. मात्र या हस्तिलिखितात ते देण्यात आले आहे. त्यामुळे संशोधन आणि वाचकांच्या दृष्टीने हे पुस्तक अनोखी पर्वणी ठरणार आहे इंद्रायणी नदीला पंढरपूरच्या दिशेने पुढे भामा आणि भीमा नदी फुलगाव येथे मिळतात. त्याठिकाणी असलेल्या विठ्ठलमंदिरामध्ये हे हस्तलिखित सापडले आहे. ही सर्व हस्तलिखिते सध्या डेक्कन कॉलेजमधील मराठी हस्तलिखित विभागामध्ये उपलब्ध आहेत. वारकरी संप्रदायातील अनुयायांना आणि वाचकांना यानिमित्ताने आता ही दुर्मिळ हस्तलिखिते वाचायला मिळणार आहे.


नुकतीच आळंदीची एकादशी पार पडली. त्याच पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर महाराजांवर आधारित दुर्मिळ हस्तलिखिते पुस्तक स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या हस्तलिखितांमधील संदर्भ आणि माहिती फारशी प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे ही पुस्तके महत्त्वाची ठरणार आहेत.
वा. ल. मंजुळ, संत साहित्याचे अभ्यासक व संशोधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सवाई’त लघुपटांची पर्वणी

$
0
0

‘अंतरंग’मधून मिळणार दिग्गजांशी संवादसंधी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चौसष्ठाव्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात ‘षड्ज’ या उपक्रमांतर्गत संगीतातील मान्यवरांवर आधारित लघुपट पाहण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. त्याचबरोबर ‘अंतरंग’ या कार्यक्रमातून महोत्सवात सादरीकरण करणाऱ्या काही कलाकारांशी संवादही साधता येणार आहे. येत्या ७ ते ९ डिसेंबर दरम्यान सवाई गंधर्व स्मारकामध्ये या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवंगत गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी आणि सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांची यंदा जन्मशताब्दी. या पार्श्वभूमीवर ‘षड्ज’चा पहिला दिवस त्यांना समर्पित करण्यात येणार आहे. ७ डिसेंबर रोजी या वेळेत व्ही. राजगोपाल यांनी दिग्दर्शित केलेला सुब्बलक्ष्मी यांच्या वरील माहितीपट दाखविण्यात येईल. त्यानंतर उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्यावरील डॉ. के. प्रभाकर यांनी दिग्दर्शित केलेला माहितीपट पाहता येईल. ८ डिसेंबर रोजी ‘अंतरंग’मध्ये सूरबहार वादक उस्ताद इर्शाद खान आणि किराणा घराण्याचे गायक गणपती भट यांची मुलाखत रंगणार आहे. ९ डिसेंबर रोजी ‘षड्ज’ अंतर्गत फिरोज चिनॉय दिग्दर्शित डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्यावर आधारित माहितीपट दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर बासरीवादक बहिणी देबोप्रिया आणि सुचिस्मिता यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगणार आहे. या दोघी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या शिष्या आहेत. वरील सर्व कार्यक्रम सकाळी १०.३० ते १२.३० दरम्यान आयोजिण्यात आले आहेत. अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सतीश पाकणीकर उपस्थित होते.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा पहिला दिवस (बुधवार, ७ डिसेंबर) उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना, चौथा दिवस (शनिवार, १० डिसेंबर) एम. एस सुब्बालक्ष्मी यांना समर्पित करण्यात येईल, असेही जोशी म्हणाले. यंदाच्या महोत्वासाठी पीएमपीच्या सहकार्याने रमणबाग-कात्रज, रमणबाग-सिंहगड रस्त्यामार्गे धायरी, रमणबाग-कोथरूड आणि रमणबाग-कर्वेनगर अशा चार मार्गांवर विशेष बससेवा देण्यात येणार आहे.

गुंदेचा बंधूंना जोशी पुरस्कार
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना दर वर्षी ‘वत्सलाबाई जोशी पुरस्कारा’ने गौरविण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार प्रसिद्ध धृपद गायक पं. उमाकांत गुंदेचा आणि रमाकांत गुंदेचा या बंधूंना जाहीर झाला आहे. यंदा पुरस्काराचे बारावे वर्ष आहे. रुपये ५१ हजार, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ७ डिसेंबरला हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल. गुंदेचा बंधू ज्येष्ठ धृपद गायक फरिदुद्दिन डागर आणि झिया मोइनुद्दीन डागर यांचे शिष्य आहेत.

यंदा उलगडणार तबकडी युग
‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त यंदाही प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर प्रदर्शन लावणार आहेत. ‘तबकडी युग’ असे या प्रदर्शनाचे नाव असून, ग्रामोफोन रेकॉर्डच्या सुवर्णकाळातील तसेच, जाणकार संगीत रसिकांनी जतन करून ठेवलेल्या निवडक रेकॉर्डच्या मुखपृष्ठ आणि मलपृष्ठांच्या छायाचित्रांचे सादरीकरण प्रदर्शनात करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी पथके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
जिल्ह्यात होणाऱ्या दहा नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. मतांसाठी उमेदवारांनी सोने, चांदी किंवा रोख रकमेचे आमिष दाखवल्यास चौकशीसाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. जिल्ह्यात इंदापूर, बारामती, दौंड, सासवड, जेजुरी, शिरूर, तळेगाव दाभाडे, आळंदी, लोणावळा आणि जुन्नर या दहा नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी १०६९ उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षांच्या दहा जागांसाठी १०१ अर्ज आले आहेत. अर्ज माघारीसाठी एक डिसेंबरपर्यंत मुदत आहे.
‘नाकाबंदी करून बेकादेशीर रक्कम, मद्य, शस्त्रात्रे, भेटवस्तू यावर लक्ष ठेवणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवाराच्या हालचालींचे व्हिडिओ शुटिंग करणे, नोटा बंदीच्या पार्श्वभूमीवर साठा, वितरण, वाटप करण्यावर देखरेख ठेवणे यासाठी पथके असणार आहेत. त्यासाठी भरारीपथके, चेक पोस्ट नाका, व्हिडिओ सर्व्हिलन्स पथक अशी पथके तयार करण्यात आली आहेत,’ असे जिल्हाधिकारी सौरव राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘प्रत्येक पथकात ३० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स या विभागांतील अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे,’ असे राव म्हणाले. ‘सरासरीपेक्षा जास्त उमेदवार असलेल्या प्रभागांसाठी दोन ईव्हीएम मशिन वापरण्यात येणार आहेत,’ असे राव यांनी स्पष्ट केले.
....................
‘नो युवर कँडिडेट’ अ‍ॅप
नगरपरिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांची माहिती मतदारांना व्हावी, यासाठी प्रशासनाने ‘नो युवर कँडिडेट’ हे अ‍ॅप सुरू केले आहे. त्यामध्ये मतदार यादी, मतदान केंद्राचे ठिकाण, मतदाराचे नाव शोधण्यासाठी पर्याय, उमेदवाराने निवडणुकीत किती खर्च केला आहे, त्याची माहिती; तसेच मतदाराचे मतदान कोणत्या केंद्रावर आहे आदी माहिती मतदार हे अ‍ॅपच्या माध्यमातून पाहू शकणार आहेत. तक्रारीसाठी १८००२३३५२१२ हा टोल-फ्री क्रमांक आणि ७०६६७६८०६२ हा मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कँन्टोन्मेंटच्या हद्दीत ‘नो हॉर्न झोन’

$
0
0

वाढत्या ध्वनी प्रदूषणाला रोखण्यासाठी बोर्डाचे पाऊल
म. टा. प्रतिनिधी,पुणे
पुणे कँन्टोन्मेंट बोर्डासह लष्कराच्या हद्दीत वाहनांचा गोंगाट वाढत असल्याने बोर्डाने आता या परिसरात 'नो हॉर्न झोन' म्हणून जाहीर करण्यात आला आहे. बोर्डाच्या वतीने या भागात वाहनचालकांच्या हॉर्न वाजविण्यावर आता निर्बंध आणण्यात येणार आहेत.
लष्कराची हद्द असलेल्या पुणे कँन्टोन्मेंट बोर्डात पुण्याहून हडपसरला तसेच कोंढव्यावरून लष्कर भागात वाहनांची ये जा सुरू असते. या भागात चहूबाजूने वाहतूक कोंडी होत असते. त्याशिवाय रस्त्यावर रविंद्रनाथ टागोर शाळा आहे. शेजारीच आझम कॅम्पसमध्ये शैक्षणिक संकुल आहे. दुसरीकडे फॅशन स्ट्रीट, महात्मा गांधी रस्ता, इस्ट स्ट्रीट, शिवाजी मार्केट, भोपळे चौक, बाबाजान चौक असे अनेक महत्त्वाचा भाग आहेत. त्या भागात खरेदी विक्रीसाठी तसेच फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वाहनांचा गोंगाट होत असतो. त्याशिवाय स्वारगेटहून हडपसरच्या दिशेने पूलगेट मार्गे जाणाऱ्या बसेसची संख्या आणि चारचाकी वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.
कोंढवा, लष्कर भागात याच रस्त्यांच्या भागात मोठ्या प्रमाणात रहिवाशांची संख्या अधिक आहे. जुने वाडे, इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात रहिवाशी अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. रहिवाशांमध्ये वृद्धांची संख्या लक्षणीय आहे. या भागात ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह रोडरोमियोंकडून सातत्याने हॉर्न वाजविण्यात येते. हॉर्न वाजविण्याचे प्रमाण गेल्या अनेक महिन्यांमध्ये वाढले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंगाट होते. परिणामी ध्वनी प्रदूषणाची पातळी अधिक वाढल्याचे वारंवार दिसून आले आहे, असे निरीक्षण येथील जाणकार नोंदवित आहेत.
लष्कराच्या विविध भागात राहणाऱ्या नागरिकांसह रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या भागात ‘नो हॉर्न झोन’ करावा, अशी मागणी देखील नागरिकांकडून वारंवार बोर्डाच्या प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्या मागणीचा बोर्डाने गांभिर्याने विचार केला. त्यानंतर बोर्डाच्या हद्दीत ‘नो हॉर्न झोन’ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सांगितले.
या संदर्भात लष्कराच्या वाहतूक पोलिसांकडून देखील गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. हॉर्न वाजविल्याने होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे शांततेचा भंग होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी हॉर्न वाजविणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्याची मोहीम लष्कर पोलिसांनी हाती घेतली आहे. हॉर्न वाजविताना कोणी आढळल्यास संबंधितांना २०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे लष्कराच्या वाहतूक पोलिस निरीक्षक राजेंद्र देशमुख यांनी स्पष्ट केले.
०००
रात्रीच्या वेळी हॉर्न वाजविणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. अवेळी हॉर्न वाजविणाऱ्यांसह विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. संबंधितांना २०० रुपयांचा दंड करण्यात येईल.
- राजेंद्र देशमुख, पोलिस निरीक्षक, वाहतूक पोलिस विभाग
...
नवे धोरण आणणार
‘आयडीईएस’चे यज्ञेश्वर शर्मा यांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, हडपसर
कँटोन्मेंट स्मार्ट करण्यासाठी वर्षानुवर्षे ९९ वर्षाच्या भाडे करारानुसार मोडकळीस आलेले चाळ, बंगले , दुकाने यांचा करार रद्द करून नवे धोरण अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती डिफेन्स इस्टेट जनरल डायरेक्टर यज्ञेश्वर शर्मा (आयडीईएस) यांनी दिली.
पुणे कँटोन्मेंट कॅम्प येथे रविंद्रनाथ टागोर इंग्रजी माध्यमाची प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, प्रिन्सिपल डायरेक्टर डिफेन्स इस्टेस्ट गीना कश्यप पस्ती (आयडीइएस), भास्कर रेड्डी, कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर ए. के. त्यागी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ डॉ. डी. एन. यादव, पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, अशोक पवार, अतुल गायकवाड, विवेक यादव, किरण मंत्री, प्रियंका श्रीगिरी आदी उपस्थित होते.
पुणे कॅन्टोमेंन्ट बोर्ड हद्दीतील बाबाजान चौकातील १५ हजार चौरस फूटच्या जागेमध्ये प्राथमिक व १७ हजार चौरस फुटामध्ये माध्यमिक शाळा बांधण्यात येणार आहे.
शर्मा भाषणात म्हणाले, ‘कँटोन्मेंट शाळेचा दर्जा सुधारण्याकरिता इंग्रजी शिकवणारे शिक्षक हंगामी तत्त्वावर न नेमता कायम पदावर नेमावेत. शाळेतील शिक्षकाचे इंग्रजीवर प्रभुत्व चांगले असेल तरच उच्च दर्जाचे विद्यार्थी तयार होतील.’ ‘पुणे कँटोन्मेंटमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह, कार पार्किंग असे विकासकामे लवकरच सुरू करणार आहोत. पुणे कँटोन्मेंटच्या अडचणी व चांगल्या बाजू मला माहिती आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंटला निधी मिळेल असे प्रकल्प उभे करण्यात येतील,’ असेही त्यांनी सांगितले.
सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, ‘पुणे स्मार्ट बनत आहे. त्यानुसार पुणे कॅन्टोन्मेंटसुद्धा आदर्श कँटोन्मेंट व्हावे यासाठी प्रयत्नशील राहू. त्यासाठी लागणारा एक कोटींचा निधी मी स्वतः देईन.’ कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पुणे कँटोन्मेंटचे सीईओ यादव यांनी केले. आभार उपाध्यक्ष दिलीप गिरमकर यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमाननगरमध्ये एकेरी वाहतूक

$
0
0

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी निर्णय; प्रायोगिक तत्त्वावर १५ दिवसांसाठी अंमलबजावणी
म. टा. प्रतिनिधी, येरवडा
विमाननगरमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमचा मार्ग काढण्यासाठी येरवडा वाहतूक पोलिसांनी बुधवारपासून अंतर्गत रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू केली. कुठलीही पूर्व कल्पना न देता अचानकपणे एकेरी वाहतूकमुळे सकाळी वाहतूक कोंडी झाल्याने काही वेळ गोंधळ उडाला. एकेरी वाहतुकीच्या निर्णयावर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
गेल्या काही वर्षांत झपाट्याने विस्तारलेल्या विमाननगर भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या चार चाकी वाहनांचे अवैध पार्किंग आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे हा रस्ता अरुंद बनला आहे. विशेषतः श्रीकृष्ण चौक, दत्त मंदिर चौक, सीसीडी चौक, गणपती चौक या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होते. विमानतळाकडे जाणाऱ्या नागरिकांनाही अनेकदा या वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. त्यामुळे विमाननगर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याची विनंती परिसरातील नागरिकांनी वाहतूक उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांना केली होती. या पार्श्वभूमीवर येरवडा वाहतूक पोलिसांकडून बुधवारपासून श्रीकृष्ण चौक ते सीसीडी चौक आणि गंगापुरम ते गणपती मंदिर चौकापर्यंतचा रस्ता एकेरी केला.
वाहतूक पोलिसांकडून अचानक विमाननगरमधील रस्ते एकेरी केल्याने सकाळी काही वेळ वाहतूक कोंडी झाल्याने गोंधळ उडाला. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुमारे २५ वाहतूक पोलिस विमाननगर येथे तैनात करण्यात आले होते. वाहतूक पोलिसांनी कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक एकेरी वाहतूक सुरू केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
विमाननगरमधील रहिवाशी अनिल होशांगाबदे म्हणाले, ‘विमाननगर भागात सतत वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांनी वाहतूक उपायुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले होते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एकेरी वाहतूक करणे आवश्यक होते. त्यामुळे वाहतूक समस्या सुटण्यास मदत होईल.’
‘वाहतूक पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरू केली, हा खरेच चांगला उपक्रम आहे. मात्र, वाहतूक पोलिसांनी सर्वप्रथम रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करून रस्ते मोकळे करून घ्यावे. गणपती मंदिर चौकातील शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ते ओलांडता येत नसल्येन जीव मुठीत धरून चालावे लागते. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करावी,’ अशी अशी मागणी बिपिन खंडागळे याने केली.
याबाबत येरवडा वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे म्हणाले, ‘विमाननगर परिसरातील सर्व अंतर्गत रस्त्यावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी होत असल्याने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. श्रीकृष्ण चौक ते सीसीडी चौक आणि गंगापुरम ते गणपती चौक हे दोन प्रमुख रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.’ ‘पुढील पंधरा दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वांवर हा प्रयोग राबविणार आहे. या दरम्यान नागरिकांच्या हरकती आणि सूचना प्राप्त झाल्यावर एकेरी वाहतुकीबाबत अंतिम निर्णय घेणार आहोत, असेही मोळे यांनी सांगितले.
०००
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विमाननगर परिसरात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पुढील पंधरा दिवस प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या सूचना, हरकती प्राप्त झाल्यानंतर एकेरी वाहतुकीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
- बाजीराव मोळे, पोलिस निरीक्षक, येरवडा वाहतूक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शरिअतमध्ये हस्तक्षेप नको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘केंद्र सरकार मुस्लिम महिलांची काळजी करत असल्याचा दिखावा करत आहे. तीन वेळा ‘तलाक’ म्हणून तलाक देण्याच्या मुद्द्यावरून सरकार मुस्लिम कायद्यात बदल करू पाहत आहे. या बदलाविरोधात पाच कोटी मुस्लिम महिलांच्या सह्यांची मोहीम राबविली आहे. सरकारचा हा हस्तक्षेप म्हणजे संविधानाला धोका आहे, ’असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार व मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य ‘अहले सुन्नत वल जमात’चे मौलाना उबेदुल्ला खान आझमी यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
केंद्र सरकार मुस्लिमद्वेष करून त्यांच्या कायद्यात बदल करत असल्याचा आरोप करून त्या निषेधार्थ ‘कुल जमाअती तंजीम’च्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. पिंपरी येथील एचए कंपनीच्या मैदानावर ही सभा बुधवारी (३० नोव्हेंबर) पार पडली. या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी आलेले माजी खासदार आझमी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मौलाना अब्दुल अलीम फारुखी, मौलाना मकसूद रिझवी, मौलाना नय्यर नुरी, कारी इक्बाल, मौलाना फिरोज अजीज, मौलाना अलिम आदी या वेळी उपस्थित होते.
माजी खासदार आझमी म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम कायद्यात हस्तक्षेप करणे लाजिरवाणे आहे. भारतात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहत आहेत. त्यांना एकत्र बांधण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे. या कायद्याच्या आधारेच नागरिकांचे वागणे सुरू आहे. संविधानानुसार प्रत्येक धर्माला आपल्या संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे. या संविधानाच्या तरतुदीनुसारच मुस्लिमांसाठी शरिअत अॅप्लिकेशन अॅक्ट १९३७ मध्ये सुरू करण्यात आला. या कायद्यांतर्गत मुस्लिम समाजातील अंतर्गत प्रश्‍न सोडविण्याचा अधिकार दिला आहे; मात्र तलाकच्या प्रकरणावरून केंद्र सरकार या कायद्यात बदल करण्याच्या विचाराधीन आहे.’
‘मुस्लिम महिलांची काळजी असल्याचा खोटा दिखावा केला जात आहेत; मात्र गुजरातमधील दंगलीत मुस्लिम महिलांच्या हत्या करण्यात आल्या. त्या महिलांना अद्यापही न्याय देण्यात मोदींना यश आले नाही, अशी टीकाही या वेळी त्यांनी केली. मुस्लिम समाजबांधवांना नोकरी, रोजगार व कारखान्यांमध्ये संधी दिली जात नाही. देशाचे सैनिक शहीद होत आहेत, तरीही यावर उपाययोजना करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपयश येत आहे. निष्कारण अनेक लोकांना जेलमध्ये डांबले आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात पाच कोटी मुस्लिम महिलांच्या सह्या घेतल्या आहेत; तसेच अन्याय होतो की नाही याबाबत केंद्र सरकारने मुस्लिम महिलांचे जाहीर मतदान घ्यावे,’ असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुरुंगातून सुटल्यानंतर खंडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
तुरुंगातून सुटून आल्यानंतर एका सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारासोबत एक दुकानदार व त्याच्या भावाला किरकोळ कारणावरून जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच दहा हजार रुपये चोरून नेले. दरमहा दहा हजार रुपये हप्ता देण्याची मागणीही केली. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी सहा जणांस अटक केली आहे.
याबाबत सुरेश राठोड (वय ४९, रा. सॅलिसबरी पार्क) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून वैभव उर्फ पिंट्या माने (वय २४, रा. सोमवार पेठ), रोहित शिवाजी जाधव (वय २८, रा. मंगळवार पेठ), विक्रम मुकुंद कांबळे (वय ३२, रा. सोमवार पेठ), समीर नाझीर शेख (वय २८), चेतन गणपत घावटे (वय ३०) आणि नितीन गोविंद आदमाने (वय ४०, तिघे रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव उर्फ पिंट्या सराईत गुंड असून त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी व बेकायदा पिस्तूल बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सोमवार पेठेतील लहान-सहान व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना धमकावून पैसे उकळत त्रास देत होता. त्याने २०१५ मध्ये एका पक्षाच्या शाखा प्रमुखाला धमकावून खंडणी मागितली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (एमपीडीए) सहपोलिस आयुक्त सुनील रामानंद यांनी कारवाई केली होती. त्याला एक वर्षासाठी नाशिक तुरुंगात स्थानबद्ध केले होते. तो पंधरा दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटून बाहेर आला. बाहेर येताच त्याने सोमवार पेठेतील दुकानदाराला धमकाविले. सोमवार पेठेत तक्रारदार यांचे शॉप ड्राइव्ह नावाचे दुकान आहे. या दुकानाबाहेर लावलेला कॅमेरा त्यांनी काढला नाही. या कारणावरून आरोपींनी तक्रारदार व त्यांच्या भावाला अडवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, दुकानात घुसून महिन्याला दहा हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली. तक्रारदार यांना मारहाण करत दुकानातील दहा हजार रुपये काढून नेल्याची तक्रार त्यांनी दिली. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी समर्थ पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ससून’मध्ये उभारणार नवे ‘डेडहाउस’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
ससून हॉस्पिटलचा गेल्या काही वर्षांपासून ‘मेकओव्हर’ सुरू असून दुसऱ्या टप्प्यातील नव्या न्याय वैद्यकशास्त्र विभागासह पूर्वीपेक्षा जादा क्षमतेचे अत्याधुनिक ‘डेडहाऊस’ (शवविच्छेदन विभाग) आता उभारण्यात येणार आहे. सुमारे १८ कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून डेडहाउससह अन्य विविध प्रयोगशाळा आणि विभागांच्या कामांचे भूमिपूजन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
ससून हॉस्पिटलच्या आवारात सध्या काही वर्षांपासून पहिल्या टप्प्यातील अकरा मजली इमारतीचे काम सुरू आहे. अकरा मजली इमारतीमध्ये विविध विभागांचे नवे ऑपरेशन थिएटर, नवे बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) तसेच नर्ससाठीचे कक्ष आदींचा समावेश आहे. या विभागांच्या पायाभूत सुविधांसाठी ससून हॉस्पिटलने १०६ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला होता. प्रस्तावाला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता देऊन निधीची तरतूद केली आहे.
‘ससूनच्या ‘कॅम्पस मेकओव्हर’च्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांचा नव्या इमारतीच्या परिसरात प्रारंभ होत आहे. त्या ठिकाणच्या जागेपैकी सहा हजार स्क्वेअर मीटर जागेत अत्याधुनिक ‘डेडहाउस’ अर्थात नवे न्यायवैद्यकशास्त्र विभाग उभारण्यात येणार आहे. सध्या ‘डेडहाउस’मध्ये शवविच्छेदनासाठी एका वेळी ३२ मृतदेह ठेवण्याची क्षमता (कोल्ड स्टोरेज कॅबिनेट) आहे. एका वर्षात सुमारे साडेसहा हजारांहून अधिक मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाते. त्याशिवाय पुण्याबाहेरून येणाऱ्या मृतदेहांची संख्या आणखी आहे. त्यामुळे सध्याचे ‘डेडहाउस’ अपुरे ठरत आहे. नव्या ‘डेडहाउस’चा मूळ १०६ कोटींच्या प्रस्तावात समावेश आहे. आता या जागेत शंभर मृतदेह ठेवण्याची क्षमता असलेले ‘कोल्ड स्टोरेज कॅबिनेट’ तयार केले जाणार आहे,’ अशी माहिती ससून हॉस्पिटलच्या सूत्रांनी ‘मटा’ला दिली. आपत्कालीन परिस्थितीत मृतदेह ससूनमध्ये शवविच्छेदनासाठी येतात. त्यामुळे ‘डेडहाउस’मध्ये आणखी ५० मृतदेह ठेवण्याची क्षमता असलेले ‘कोल्ड स्टोरेज कॅबिनेट’ तयार करण्यात येणार आहे.

अवयव प्रत्यारोपण केंद्र
अवयवदानाची मोहीम राज्य सरकारने हाती घेतली आहे. त्या मोहिमेंतर्गत ससून सरकारी हॉस्पिटलमध्ये आता लवकर अवयव प्रत्यारोपण केंद्र उभारले जाईल. त्याकरिता सुविधा उभारल्या जाणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. त्याशिवाय ससूनच्या आवारात ३५० बेडचे कॅन्सर सेंटर उभारण्यात येणार असून ससून आवारात मेडिकल हब तयार करण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर सीआयडीचा अहवाल प्रसिद्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडून दर वर्षी प्रकाशित होणारा गुन्ह्यांच्या आलेखाच्या अहवालाला (क्राइम इन महाराष्ट्र) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै ​महिन्यातच शुभेच्छांचे अधिकृत पत्र दिले असताना, हा अहवाल प्रसिद्ध होण्यास नोव्हेंबर अखेर उजाडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
‘नॅशनल रेकॉर्ड क्राइम ब्युरो’तील तीन प्रकरणे या अहवालात समाविष्ट करायची असल्यामुळे या अहवालास उशीर लागला. पुढील वर्षीपासून हा अहवाल जुलै महिन्यापर्यंत प्रकाशित केला जाईल, असे आश्वासन ‘सीआयडी’चे प्रमुख संजय कुमार यांनी प्रकाशनप्रसंगी दिले.
गृह मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ नसल्याने ‘क्राइम इन महाराष्ट्र’ प्रकाशित होण्यास विलंब होत असल्याचे खासगीत कारण देण्यात येत होते. राज्यातील वाढलेल्या गुन्हेगारीचे प्रतिबिंब या अहवालात पडलेले असल्याने निवडणुकीच्या तोंडावर तो प्रसिद्ध करण्याचे लांबणीवर टाकण्यात येत असल्याची जोरदार चर्चा होती. ‘सीआयडी’ने अखेर सोमवारी या अहवालाचे प्रकाशन करून या चर्चेवर पडदा पाडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी २०१५ मध्ये २०१४ च्या ‘क्राइम इन महाराष्ट्रा’चे प्रकाशन केले होते. या वेळी फडणवीस यांनी पुढील अहवाल वेळेत तयार करण्याच्या सूचना ‘सीआयडी’ला दिल्या होत्या. ‘सीआयडी’ने त्यानुसार हा अहवाल वेळेत तयार केला. या अहवालात मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री (शहरे आणि ग्रामीण), गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांची शुभेच्छा पत्र जोडलेली असतात.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांच्या शुभेच्छा पत्रावर जुलै महिन्याचा उल्लेख आहे. तसाच उल्लेख हा गृहराज्यमंत्री आणि अप्पर मुख्य सचिवांच्या पत्रावरही आहे. पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी ऑगस्ट महिन्यांत पदभार स्वीकारल्याने त्यांच्या पत्रावर ऑगस्ट महिन्याची तारीख आहे. याचा अर्थ हा अहवाल ऑगस्ट महिन्यांत तयार होता. मात्र, तरीही त्याच्या प्रकाशनाला नोव्हेंबर अखेर झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अप्पर पोलिस महासंचालक संजय कुमार यांनी सांगितले की, ‘गेल्या वर्षीचा अहवाल प्रसिद्ध करताना मुख्यमंत्र्यांनी जुलै महिन्यांपर्यंत अहवाल प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अहवालात ‘एनसीआरबी’च्या अहवालातील तीन प्रकरणे आहेत. हा अहवाल सप्टेंबर महिन्यात प्रकाशित होतो. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील माहिती घेऊन राज्याचा अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी वेळ लागला. मात्र, पुढील वर्षीपासून जुलै महिन्यातच राज्याचा अहवाल प्रसिद्ध केला जाईल. ‘एनसीआरबी’तील माहितीनुसार ही तीन प्रकरणे नंतर प्रकाशित केली जातील.

‘नॅशनल रेकॉर्ड क्राइम ब्युरो’तील तीन प्रकरणे या अहवालात समाविष्ट करायची असल्यामुळे या अहवालास उशीर लागला. पुढील वर्षीपासून हा अहवाल जुलै महिन्यापर्यंत प्रकाशित केला जाईल.
- संजय कुमार, अप्पर पोलिस महासंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्याच्या पाण्याशी खेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणेकरांच्या पाण्याशी खेळ करण्याच्या जलसंपदा विभागाच्या लहरी कारभाराचा फटका बुधवारी निम्म्या पुण्याला बसला. कागदावर ठरविल्यापेक्षा अधिक पाणी वापरत असल्याचा आरोप करून, शहराचा पाणीपुरवठा जलसंपदा विभागाने मंगळवारी रात्री अचानक बंद केला. दररोज येणारे पाणी अचानक गायब झाल्याने गोंधळ उडाला आणि जवळपास निम्म्या पुण्यात बुधवारी पाणी येऊ शकले नाही. दरम्यान, शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी नंतर दिल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली.
दरम्यान, कालवा समितीच्या बैठकीत बापट यांनी ठरवून दिलेल्या क्षमतेनुसारच पाणी उचलले जात असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिका आणि जलसंपदा ‍विभागातील कारारानुसार साडेअकरा टीएमसी पाणीसाठा वर्षासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पालिकेला रोज साडेबाराशे एमएलडी‌ पाणी देण्याचा निर्णय झाला. यानुसार पालिका प्रशासन कॅनॉलमधून दररोज बाराशे एमएलडी पाणी उचलते. गेल्या अडीच महिन्यांपासून याच पद्धतीने पाणी घेतले जात आहे. मात्र, पालिका बाराशेऐवजी चौदाशे ते पंधराशे एमएलडी पाणी उचलत असल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून केला जात होता.
यावर महापालिका आणि जलसंपदा विभागात चर्चा सुरू असतानाच जलसंपदा विभागाचे अभियंता पांडुरंग शेलार यांनी मंगळवारी रात्री अचानक पर्वती जलशुद्धिकरण केंद्रात जाऊन पाणी उचलण्याचा दरवाजा बंद केला. यामुळे बुधवारी येथून होणारा पाणीपुरवठा विस्कळित झाला आणि जवळपास अर्ध्या शहराला पाणीपुरवठाच होऊ शकला नाही. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे मध्यवर्ती भागातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, शिवाजीनगर, डेक्कन, स्वारगेट, सहकारनगर, पर्वती, धनकवडी, कात्रज, कर्वे रोड याबरोबरच संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी या भागातील पाणीपुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले.
आज संपूर्ण शहरात पाणी नाही
पर्वती, लष्कर, वडगाव, नवीन होळकर याबरोबरच एसएनडीटी या जलकेंद्रांतील देखभाल दुरुस्तीची कामे करायची असल्याने आज, गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पाटबंधारे विभागाच्या आडमुठेपणामुळे बुधवारी पुरेसे पाणी न मिळालेल्या भागांतील नागरिकांना आता गुरुवारीदेखील पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.

मंत्र्यांनीही मीठ चोळले
पुणेकरांचे पाण्याविना हाल सुरू असतानाच पुण्यात आलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळले. पुण्यात आवश्यकतेपेक्षा अधिक पाणीवापर केला जातो. पाणीपुरवठ्यातील गळती रोखली, तर पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा सुरू ठेवता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पगार झाला; पैसे मिळणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणेकरांनी सुमारे महिनाभर नोटांविना काढला आणि आता पहिल्या तारखेचा आनंदही नोकरदारांच्या नशिबी नाही, असे दिसते. नव्या महिन्याचे पगार बँकांत जमा झाले असले, तरी बँकांकडेच नोटा नसल्यामुळे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील लाखो नोकरदारांचे धाबे दणाणले आहे. नोटांअभावी घरातील आवश्यक खर्च कसे भागवायचे, असा प्रश्न अनेक कुटुंबांपुढे पडला आहे. दरम्यान, पगारदार व निवृत्तीवेतनधारकांना रकमा देण्यासाठी बँकांनी जोरदार तयारी केली होती; परंतु नोटांचाच खडखडाट असल्याने त्यावर पाणी पडले असून, आणखी काही दिवस तरी हीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे.
गेल्या महिन्याचा पहिला आठवडा पार पडल्यानंतर केंद्र सरकारने आठ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यानंतर देशभरात नोटांची अभूतपूर्व टंचाई उद्भवली आहे. बँकेतून मिळणारी तुटपुंजी रोकड आणि मर्यादित ऑनलाइन व्यवहार वगळले, तर घरातील बहुसंख्य खर्च अनेकांना रोख रकमेतच करावे लागले आहेत. काही जणांनी दरमहा येणाऱ्या बिलांची उधारी ठेवली आहे, तर काही जणांनी मिळालेल्या नोटांमधून हे खर्च भागविण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्वभूमीवर आज एक तारखेला अनेकांचे पगार झाले. मात्र, हे पगार बँकेत जमा आहेत.
दुसरीकडे गेल्या काही दिवसांत पुण्यात नव्या नोटाच उपलब्ध न झाल्याची बँकांची तक्रार आहे. त्यामुळेच आठवड्याला २४ हजार रुपये काढण्याची रिझर्व्ह बँकेची परवानगी फक्त कागदोपत्रीच राहिली असून, मिळालेल्या नोटांमधून बँका ग्राहकांना हजार किंवा दोन-पाच हजार रुपयेच देत आहेत. जिल्हा बँकांच्या शाखांना तर नोटाच मिळत नसल्याने तेथील खातेदारांपुढे अधिक अडचणी उभ्या आहेत. अशा काळात महिन्याचा पगार बँकेत जमा कसा करणार आणि बँकेत जमा झाला तरी तेथून खातेदारांना रकमा कशा मिळणार, असा प्रश्न आहे. शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात काही लाख नोकरदार आहेत. गेल्या महिन्यात आर्थिक ताण सहन केल्यानंतर आता पगार जमा झाल्यावर पैसे काढण्यासाठी नोकरदारांची झुंबड उडण्याची शक्यता आहे; पण नोटांची टंचाई असताना या रकमा कुठून उपलब्ध करायच्या, असा प्रश्न बँकांपुढे उभा राहिला आहे.
नोकरदारांबरोबरच शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये निवृत्तांची संख्या प्रचंड आहे. यापैकी बहुतेक निवृत्तीवेतनधारकांची मदार दरमहा मिळणाऱ्या निवृत्तीवेतनाच्या रकमेवरच असते; तसेच या ज्येष्ठ नागरिकांमध्ये ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे पैसे न मिळाल्यास त्यांची अवस्थाही बिकट होणार आहे. अनेक खासगी व्यावसायिक आणि छोट्या व्यापाऱ्यांकडील कामगार; तसेच ठेकेदारांच्या कामगारांनाही रोखीतच पगार मिळतो. त्यांचीही बिकट अवस्था होणार आहे.

विड्रॉवलमध्ये तिपटीने वाढ
सर्वच बँकांमधून महिन्यातील इतर दिवसांमध्ये दररोज पैसे काढण्यासाठी (विड्रॉवल) येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तिपटीने वाढ होते, अशी माहिती देण्यात आली. आधीच नोटा मिळत नसताना या वाढीव विड्रॉवलची पूर्तता कशी करायची, असा प्रश्न बँकांपुढेही निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुबोधचा ‘सुखद’ एक्स्प्रेस-वे प्रवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई-पुणे प्रवासादरम्यान हा रस्ता केवळ ट्रकचालकांसाठी असल्याचा अनुभव आला, लेनची शिस्त न पाळण्याची सूट त्यांना आहे, कुठूनही कशीही गाडी चालवण्याची मुभा त्यांनाच आहे, द्रुतगती मार्गावर दुचाकीस्वारही दिसतात एवढेच नव्हे ते तुमच्याशी स्पर्धाही करतात, पाळीव जनावरे खुशाल फिरताना दिसतात… हे चित्र आपण कधीच बदलू शकत नाही, टोल भरतोय आणि आपण स्वतःच्या जीवाशीच खेळतोय… इतर अनेकांप्रमाणेच प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेनेही पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील आपल्या प्रवासाच्या ‘सुखद’ आठवणी ‘प्रवास’ या सेल्फ व्हीडिओच्या माध्यमातून त्याच्या फेसबुक अकाउंटला शेअर केल्या आहेत.

दोन-तीन वर्षांपूर्वी याच महिन्यात पुणे-मुंबई हायवेवर अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा बळी गेला होता, याची आठवण करून देऊन, हायवेवर चालणाऱ्या बेशिस्त कारभारात काहीच फरक पडला नसल्याची भावनाही सुबोधने या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. या व्हिडिओत सुबोध म्हणतो, ‘मुंबईहून पुण्याला प्रवास करताना जे अनुभवले तो ‘सुखद’ प्रवास कधीच विसरू शकणार नाही. हा रस्ता फक्त ट्रकवाल्यांसाठी बनलाय. लेनची शिस्त न पाळण्याची त्यांना सूट आहे. कुठूनही गाडी चालवण्याची ट्रकवाल्यांना मुभा आहे. काही अंतरावर खूप बाइकवाले दिसले, काही राँग साइडने येत होते. काही आमच्यासोबत चालले होते. काही जण आमच्या वेगाशी स्पर्धा करीत होते. त्यानंतर नॅशनल पार्कमध्येही आल्यासारखे वाटले. काही प्राणी दिसले, गाय-बैल चरताना दिसले. अत्यंत जवळचे मित्र आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचे याच महिन्यात दोन-तीन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले. अनेकांचे नातेवाइक इथेच गेले. मात्र, आम्ही अजूनही सुधारलेलो नाहीये. त्याच पद्धतीने एक्स्प्रेस-वेचा कारभार हाकतोय. टोल भरतोय आणि स्वतःच्या जीवाशी खेळतोय. खूप ‘सुखद’ असा हा प्रवास कधीच विसरू शकणार नाही. मला असे वाटते यात सुधारणा होण्याचे काहीच चान्सेस नाहीत.’

सुबोधने हा व्हिडिओ पोस्ट केल्यावर त्याच्या या उद्विग्न प्रतिक्रियेवर त्याच्या चाहत्यांसह या हायवेवर नित्य प्रवास करणारे कलावंत तसेच सर्वसामान्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून अनेकांनी ‘एक्स्प्रेस-वे’बाबतची मते मांडली आहेत.

सुबोधची उद्विग्नता हे सध्याचे वास्तव

एक्स्प्रेस-वेवर अपघाताचे बळी ठरलेले अभिनेता अक्षय पेंडसे यांचे बंधू तन्मय पेंडसे एक्स्प्रेस-वेवर निरपराध लोकांचा बळी जाऊ नये, यासाठी गेली चार वर्षे सुरक्षा आणि इतर कामांसाठी सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘हायवेवरची परिस्थिती बदलण्यासाठी सरकारकडून प्रयत्न कमी पडत आहेत. सरकार या समस्यांना गांभीर्याने घेत नाहीये. याबाबत मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधूनही त्यांची भेट मिळालेली नाही. अपघात झाल्यावर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येतो आणि पुन्हा मागे पडतो. होम डिपार्टमेंटकडून एमएसआरडीसीकडे पुन्हा हा विषय आला आहे. त्याचाच पाठपुरावा सुरू आहे. सुबोधने दिलेली उद्विग्न प्रतिक्रिया हे सध्याचे वास्तव आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरडोई पाणीवापर ३०० लिटर

$
0
0

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा पुणेकरांबाबत जावईशोध

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात दरडोई १७९ लिटर पाणी वापरणे अपेक्षित असताना पुणेकर मात्र, ३०० लिटर पाणी वापरत असल्याचा साक्षात्कार राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना झाला आहे. पुण्यातील पाणीगळती रोखली, तरच पाणीपुरवठा पूर्ववत सुरू ठेवण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पुणे महापालिकेला धरणातून देण्यात येणारे पाणी मंगळवारी रात्री जलसंपदा खात्याने अचानक तोडले. या संदर्भात पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या महाजन यांना पत्रकारांनी विचारले असता, ‘पाणी तोडले नाही. मात्र, शहरातील पाणीगळती वाढल्यास त्याचा गांभिर्याने विचार करावा लागेल. शहरातील वाढती पाणीगळती रोखणे महापालिकेची जबाबदारी आहे. राज्यात सर्वाधिक पाणीवापर पुण्यात होतो. पुणेकर दरडोई ३०० लिटर पाणी वापरत असतील तर तो, पाण्याचा अपव्यय आहे,’ असेही महाजन यांनी सुनावले.
‘दरडोई १७९ लिटर पाणी वापरावे, असे सर्वमान्य निकष आहेत. मात्र, पुणेकर ३०० लिटर पाणी वापरतात. त्यासंदर्भात अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. पुणेकरांना दरवर्षी ११.५० टीएमसी पाण्याची गरज आहे. परंतु, प्रत्यक्षात पुणेकर १४.५० टीएमसी पाणी वापरतात. भरीसभर म्हणजे आणखी दोन टीएमसी पाण्याची मागणी करण्यात येत आहे. पुणेकरांचे आम्ही पाणी तोडलेले नाही. पालिकेने पुढाकार घेऊन पाणीगळती कमी करण्याची आवश्यकता आहे. सध्या शहरात ३५ ते ४० टक्के पाणीगळती होते. धरणातील पाण्यावर शेतकऱ्यांचाही हक्क आहे. या संदर्भात पालिका आयुक्तांनी कबुली दिली आहे. खबरदारी म्हणून पालिकेला नोटिसाही दिल्या आहेत. गळती वाढल्यास त्याचा गांभिर्याने विचार केला जाईल,’ असेही महाजन म्हणाले.

गळतीचे खापर पुणेकरांवर?
दरडोई तिनशे लिटर पाणीवापर, हा ढोबळमानाने लावण्यात आलेला शोध आहे. महाजन यांच्या माहितीनुसार पाणीपुरवठा व्यवस्थेत गळती होत असेल, तर ते पाणी पुणेकरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळेच दरडोई तीनशे लिटर पाणीवापर होणे अशक्यच आहे. असे असतानाही गळतीचे खापर पुणेकरांवर फोडणे चुकीचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियम धुडकावला? मग कारवाई नक्की

$
0
0

वाहतूक पोलिसांची ‘कंट्रोल रूम’ ठेवणार नजर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिग्नल मोडला, ​झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे केले, वाहतुकीचा नियम बिनधास्त मोडत आहात... तर मग तुमच्यावर कारवाई होणारच आणि त्या कारवाईचा थेट ‘एसएमएस’ तुमच्या मोबाइलवर धडकणार आहे. त्या मेसेजमधील लिंक ओपन केली, तर नियम मोडतानाचा फोटोही पाहायला मिळेल.
वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची योजना हाती घेतली आहे. त्यासाठी अत्यंत सुसज्ज अशी ‘कंट्रोल रूम’ बांधायचे काम हाती घेण्यात आले असून, ‘फोक्स वॅगन’ने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या कंपनीने वाहतूक पोलिसांना ५५ लाख रुपयांची मदत केली आहे. रोटरीच्या माध्यमातून ही ‘कंट्रोल रूम’ बांधण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा मंगळवारी पार पडला.
वाहतूक शाखेच्या मुख्यालयात ही कंट्रोल रूम आकाराला येणार आहे. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त सुनील रामानंद, वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे आणि ‘फोक्स वॅगन’च्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी या ‘कंट्रोल रूम’च्या आराखड्यावर अंतिम हात फिरवला. या ‘कंट्रोल रूम’मध्ये तूर्त ‘एलईडी’ स्क्रीन बसवण्यात येणार आहे. भविष्यात या स्क्रीनची जागा ‘एलईडी वॉल’ घेईल. आधुनिक सॉफ्टवेअर आणि ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून नियम मोडणाऱ्या प्रत्येक चालकाची ‘इमेज’ क्लिक केली जाईल.
वाहन परिवहन शाखेकडून वाहनांची माहिती घेत असताना, वाहनमालकांचे मोबाइल क्रमांकही मिळवण्यात येणार आहेत. वाहनाचा क्रमांक पाहून त्या वाहनाच्या मालकाच्या मोबाइलवर कारवाईचा मेसेज धडकणार आहे. बाहेर गावच्या वाहनांच्या मालकांचे मोबाइल क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मेसेजमध्ये कारवाईची एक लिंक पाठवण्यात येणार आहे. ही ‘लिंक’ ओपन केली की नियम मोडतानाची ‘इमेज’ आणि कारवाईची माहिती त्यावर दिसणार आहे.

दंड भरण्याची ऑनलाइन सोय
नियम मोडणाऱ्या चालकांना दंड भरण्यासाठीची ऑनलाइन सोय करण्यात येणार आहे. मेसेजमधील लिंकवरच दंड भरण्यासाठी एक विंडो असणार आहे. पैसे भरल्यानंतरच त्या चालकाची सुटका होणार आहे. ऑनलाइनशिवाय वाहतूक शाखेत जाऊन दंड भरण्याची सोयही उपलब्ध राहणार आहे. दंड न भरल्यास त्या वाहनचालकाची आणि वाहनाची माहितीही मोटार परिवहन विभागाला देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बापटांनीच अडवले पुण्याचे पाणी

$
0
0

महापौर प्रशांत जगताप यांचा घणाघात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन शहरात समान पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचा प्रस्ताव स्थायी समितीने दफ्तरी दाखल केल्यानेच नाराज झालेल्या पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेचे पाणी बंद केल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी केला. पुणेकरांचे पाणी बंद करण्याची हिंमत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणाच्या पाठिंब्यामुळे आली, हे न कळण्याइतके पुणेकर दुधखुळे नाहीत, असा टोलाही महापौर यांनी पालकमंत्र्यांना लावला.
शहरात समानपाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्य आणि केंद्र सरकारने निधी देण्यास नकार दिल्याने पालिकेने ही योजना राबवावी, यासाठीचा संपूर्ण खर्च कर्ज किंवा कर्जरोखे घेऊन उभा करावा, असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास पुणेकरांवर कर्जाचा भार पडणार असल्याने पालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेच्या मदतीने हा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला. त्यानंतर त्याच दिवशी रात्री पाटबंधारे विभागातील अधिकारी पालिकेचा पाणीपुरवठा बंद केला जातो. राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने अचानकपणे पाणी बंद करणे योग्य नाही. पाटबंधारे विभागाने कुणाच्या आदेशानुसार पाणी बंद केले हे न कळण्याइतपत पुणेकर दुधखुळे नाहीत, अशा शब्दात महापौरांनी यांनी पालकमंत्र्यांना सुनावले.
भारतीय जनता पक्षाने सूडापोटी ही कारवाई केली असून, पुणेकरांना हक्काचे पाणी न मिळाल्यास रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ऑक्टोबरमध्ये कालवा समितीची बैठक घेऊन दोनवेळ पाणीपुरवठ्यासाठी १३५० एमएलडी पाणी दिले जाईल, असा शब्द बापट यांनी दिला होता. याबाबत पालकमंत्री बापट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय कोणाचा?
धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि शेतीसाठी दिला जाणारे पाणी याचे नियोजन करण्यासाठी कालवा समितीची बैठक घेतली जाते. या बैठकीत कशासाठी किती पाणी राखीव ठेवायचे याचा निर्णय होतो. ऑक्टोबर महिन्यात ही बैठक होणार होती, मात्र अद्यापही समितीची बैठक झालेली नसताना गेल्या दहा ते बारा दिवसापासून कालव्यातून पाणी सोडले जात आहे. बैठक झालेली नसताना हे पाणी कोणाच्या आदेशावरुन सोडले जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


पुणेकर पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करत आहेत. दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये एक दिवसाआड पाणी पुणेकरांनी घेतले. त्यामुळे पुणेकर दरडोई ३०० लिटर पाणी वापरतात, हा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा आरोप चुकीचा आहे. महाजन यांनी पुणेकरांना बदनाम करु नये. आपले अपयश झाकण्यासाठी चुकीची विधाने करू नयेत, त्याऐवजी पुणेकरांना आवश्यक असलेले १३५० एमएलडी पाणी तातडीने उपलब्ध करुन द्यावे.

प्रशांत जगताप, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पगार जमा झाल्याने बँकांबाहेर पुन्हा रांगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पगाराचा दिवस असल्याने बुधवारी अनेक बँकांबाहेर पुन्हा कमी अधिक प्रमाणात रांगा लागल्या होत्या. मात्र, बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मोजकीच रक्कम मिळाल्याने बँकांकडून खातेदारांना विशिष्ट मर्यादेतच पैसे देण्यात येत होते. काही बँकांना पैसे संपल्याने दुपारीच पैसे देणे थांबवावे लागले. काही बँकांनी सायंकाळनंतर एटीएम सुरू ठेवली होती; त्यामुळे पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर उशीरापर्यंत रांगा लागल्या होत्या.
राष्ट्रीयीकृत बँकांसह अन्य बँकांना बुधवारी मोजकीच रक्कम उपलब्ध झाली होती. त्यामुळे खातेदारांची पैसे काढण्याची मर्यादा अधिक असली, तरी सर्वांना थोडेफार तरी पैसे मिळावेत, यासाठी बँकांना रेशनिंग करावे लागले. बँकांकडून उपलब्ध रक्कम आणि रांगेतील खातेदार यांचा अंदाज घेत पैशांचे वितरण करावे लागले. काही ठिकाणी दोन ते अडीच हजार, काही ठिकाणी पाच, तर काही ठिकाणी सात हजार रुपये देण्यात आले. चालू अर्थात करंट खात्याच्या खातेदारांना क्वचितच ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकली. अन्यथा त्यांनाही २० किंवा २५ हजार रुपये देण्यात आले. त्यामुळे बँक कर्मचारी आणि खातेदारांमध्ये खटके उडत होते. मात्र, कर्मचारी किंवा शाखा व्यवस्थापकांसह अन्य खातेदारही त्यांची समजूत काढत होते. खातेदारांकडून बँकेत अजूनही पाचशे आणि हजार रुपयांच्या बाद नोटांचाच भरणा होत आहे. क्वचित काही खातेदार अन्य चलनातील नोटांचा भरणा करत आहेत, असे बँक कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरदारांना बँकांचा ठेंगा

$
0
0

कमी रक्कम उपलब्ध झाल्याने झाली गैरसोय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पगाराचा दिवस असूनही बुधवारी बँकांना रिझर्व्ह बँकेकडून नेहमीच्या गरजेच्या तुलनेत तुटपुंजी रक्कम उपलब्ध झाली. परिणामी शहरातील अनेक बँकांनी दुपारनंतर रोख रक्कम संपल्याचे फलक लावले होते. तर काही बँकांनी प्रत्येक खातेदाराला केवळ दोन, अडीच हजार रुपये देऊन अधिकाधिक नागरिकांना पैसे देण्याचा प्रयत्न केला.
बुधवारी रात्री, काही राष्ट्रीयीकृत बँकांना रोख रक्कम उपलब्ध झाल्याने गुरुवारी खातेदारांना पैसे मिळू शकतील, असे सांगण्यात आले. काही बँकांनी गुरुवारी पेन्शनरांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. शहरातील बहुतांश बँकांना बुधवारी नेहमीच्या गरजेच्या किंवा बँकेच्या मागणीच्या तुलनेत केवळ दहा ते पंधरा टक्केच रक्कम उपलब्ध झाली. काही बँकांना तर रोख रक्कमच मिळू शकली नाही. त्यामुळे ज्यांना तुटपुंजी रक्कम मिळाली, अशा बँकांनी आपल्या शाखांमध्ये ही रक्कम वाटून दिली. त्यानंतर खातेदारांची पैसे काढण्याची मर्यादा अधिक असली, तरी बँकेने मात्र, रांगेत असलेल्या खातेदारांची संख्या पाहून काही ठिकाणी दोन किंवा अडीच हजार, काही ठिकाणी पाच ते सात हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. खातेदारांची संख्या कमी असलेल्या मोजक्याच शाखांमध्ये बचत खातेदारांना दहा हजारांपेक्षा अधिक तर चालू खात्याच्या खातेदारांना ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकली.
बँक ऑफ महाराष्ट्रला बुधवारी रात्री उशिरा पुणे आणि मुंबईसाठी प्रत्येकी १०० कोटी रुपयांची रक्कम उपलब्ध झाली. यामध्ये पाचशे रुपयांच्या नव्या नोटेचाही समावेश होता. मात्र, ही रक्कम उशिराने उपलब्ध झाल्याने बुधवारी सकाळी वा दुपारी बँकेत आलेल्या खातेदारांना हवी तितकी रक्कम देता आली नाही. गुरुवारी मात्र, खातेदारांना रक्कम उपलब्ध होऊ शकेल. मात्र, ही रक्कम देखील पुरेशी नसल्याने स्थानिक पातळीवर खातेदारांची रांग व उपलब्ध रोकड पाहून प्रत्येक खातेदाराला विशिष्ट रक्कम देण्याच्या सूचना शाखा व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत.
गुरुवारी पेन्शनर आणि पगारदारांची गर्दी अधिक असेल, हे लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे. पगारदार व्यक्ती डेबिट-क्रेडिट कार्डांचा वापर करत असल्याने पगारदारांची गर्दी फारशी होणार नाही. मात्र, पेन्शनरांकडून कार्डांचा वापर कमी होत असल्याने त्यांना रोख रक्कम द्यावी लागणार आहे. त्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे, असे बँक ऑफ महाराष्ट्रकडून सांगण्यात आले.
स्टेट बँकेने गुरुवारी पेन्शनर आणि पगारदारांसाठी पुरेशी रक्कम उपलब्ध असेल, असे नियोजन केले आहे. विशेषतः पेन्शनरना कोणतीही अडचण येऊ नये, अशा दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

खराब नोटांचे प्रमाण वाढले
रिझर्व्ह बँकेकडेही पुरेशी रोकड उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येक बँकेच्या करन्सी चेस्टला मोजकेच पैसे मिळत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी मिळालेली रक्कम पगारामुळे एक ते दोन दिवसात संपेल, त्यानंतर पुन्हा किती रक्कम उपलब्ध होईल, हे सांगता येणार नाही. रिझर्व्ह बँकेकडून देण्यात येणाऱ्या शंभर अथवा त्याहून कमी मूल्यांच्या नोटांमध्ये जुन्या किंवा किंचित खराब नोटांचे प्रमाण अधिक आहे, असे एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या करन्सी विभागातील सूत्रांनी सांगितले.

बँकांचे अधिकारीही रांगेत
‘रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्टमधून पैसे मिळावेत, यासाठी सर्व बँकांच्या करन्सी चेस्टच्या अधिकाऱ्यांना मुंबईतील बेलापूर व फोर्ट येथील रिझर्व्ह बँकेत रांगा लावाव्या लागत आहेत. या अधिकाऱ्यांना टोकन दिले जात असून, त्यानुसार येण्यास सांगण्यात येत आहे. अनेकदा ही टोकन १००च्या पुढील नंबरची असून, आपला नंबर येण्यासाठी एक किंवा दोन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यानंतर नंबर आल्यावरही बँकेची गरज कितीही असली, तरी रिझर्व्ह बँक देईल, तितकी व देईल त्या नोटांमधील रक्कम स्वीकारून या अधिकाऱ्यांना परतावे लागत आहे,’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळाबाजार करणारे हिंदूही देशद्रोहीच

$
0
0

डॉ. श्रीपाल सबनीस यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मुस्लिमांवर केवळ भाजप सरकारच संशय घेते असे नाही, तर काँग्रेसच्या सरकारनेही तेच केले. त्यामुळे सरकार ही संकल्पनाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सर्व मुस्लिम देशभक्त नाहीत; पण सर्व हिंदू तरी कुठे देशभक्त आहेत,’ असे सांगून काळाबाजार करणारे, गरिबांना लुटणारे हिंदूही देशद्रोहीच आहेत, अशी टिप्पणी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी बुधवारी केली. देशात उजव्या संघटनांचा धुमाकूळ सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला.
बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशतर्फे मुजफ्फर सय्यद यांच्या ‘मातृभूमी’ कवितासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. लेखक, माजी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, शलाका गोळे, डॉ. भीमराव घाटगे, सुरेश टिळेकर, सोमेश्वर गणाचार्य, व्ही. रामचंद्रन या वेळी उपस्थित होते. ‘काळाबाजार रोखण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय लागू केला आहे. दहशतवाद्यांना फासावर लटकवा. दहशतवादी कारवायांमधील मुस्लिम देशभक्त नसतात; तसे काळाबाजार करणारे हिंदूही देशभक्त नाहीत,’ अशी टीका करून सबनीस यांनी केली. ‘कलेला जात-धर्म नसतो. कलेला त्यामध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न झाला तर ती कला राहत नाही. सर्व धर्मपरंपरेत दोष निर्माण झाले आहेत. विकाराशी लढणे म्हणजे जिहाद आहे,’ असेही ते म्हणाले.
देशमुख म्हणाले, ‘हल्ली जातीय-धार्मिक माणसे भेटतात; पण भारतीय माणूस भेटत नाही. सामाजिक उत्थान हा कला आणि साहित्याचा उद्देश आहे. माणसाला माणूस म्हणून जगू न देणाच्या विरोधात आपण भूमिका घेतली पाहिजे. जातीय, धार्मिक विखाराच्या वातावरणात माणुसकीचा पुरस्कार केला पाहिजे.’ ‘इस्लाम धर्म बाहेरून आला असेल, पण मुसलमान येथीलच आहेत. ८५ टक्के मुस्लिम धर्मांतरीत आहेत. असे असूनही किती काळ आमच्यावर संशय घेणार, यामुळे देश डळमळीत होत आहे,’ अशी उद्विग्न भावना सय्यद यांनी व्यक्त केली. धनंजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

‘तत्कालीन सरकार नालायक’

‘शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दीचा विसर पडलेले सध्याचे सरकार नालायक आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झटणाऱ्यांचा विसर पडणे यापेक्षा करंटेपणा तो काय,’ असा सवाल डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केला. ‘शेख डाव्या विचारसरणीते होते म्हणून, त्यांचे साहित्य जप्त करणारे तत्कालीन सरकार नालायक होते. फडणवीस यांच्या सरकारने शेख यांची साहित्यस्पंदने मुक्त करावीत,’ अशी मागणी डॉ. सबनीस यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हजारांच्या नोटेतील दहा लाख रुपये जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारने पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर टक्केवारी घेऊन काळापैसा कायदे​शीर करण्याचा गोरखधंदा शहरात जोरात सुरू आहे. शहरात दोन कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पकडल्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी नवीन दोन हजाराच्या कोऱ्याकरकरीत नोटांमधील दहा लाखांच्या रोकडसह व्यापाऱ्याला मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. या रकमेबाबत तत्काळ प्राप्तिकर विभागाला कळविण्यात आले आहे.
हरीओम मंगेश उणेचा (वय २१, रा. सहकारनगर) असे पकडण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. उणेचा यांच्याकडे दुचाकीची डीलरशिप आहे. दुचाकीवर एक व्यक्ती मोठी रक्कम घेऊन जात असल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून मंगळवारी रात्री सहकारनगरमध्ये उणेचा यांना दुचाकीसह पकडण्यात आले. त्यावेळी त्यांच्याकडे दोन हजाराच्या नवीन नोटामध्ये दहा लाख रुपये आणि शंभरच्या नोटांमध्ये वीस हजारांची रोकड आढळून आली, अशी माहिती दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी असता व्यवसायातील रक्कम असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधला. शहरात प्रथमच दोन हजाराच्या नवीन नोटांसह लाखोंची रक्कम पकडली गेल्याने खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images