Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कचऱ्याच्या विल्हेवाटीचे सक्षम धोरण हवे

$
0
0

कचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींची एकमुखी मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उंचच उंच इमारती आणि चकाचक रस्ते उभारून पुणे शहर ‘स्मार्ट’ होणार नाही. शहराचे सौंदर्य खुलविण्यासाठी स्वच्छतेची यंत्रणा सक्षम झाली पाहिजे. कचऱ्याबद्दल महापालिकेचा कारभार ‘एक ना धड भाराभार चिंध्या’ असून, कचऱ्यासाठी तातडीने स्वतंत्र ठोस धोरण आखण्याची गरज आहे. या समस्येचा प्राधान्यक्रम ठरवून प्रकल्पांची नियोजनबद्ध अंमलबजावणी झाली पाहिजे. कचरा निर्मिती आणि प्रकल्पांचे नियमित ऑडिट करण्याची सक्ती गरजेची असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
पुणे महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारराजा असलेल्या सामान्य नागरिकांसह विविध घटकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पुढाकार घेतला आहे. शहरातील प्लास्टिक, वैद्यकीय, घन कचरा, ई-कचरा, तसेच ओला कचऱ्याचे वर्गीकरण, विल्हेवाटीसाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींची मते ‘मटा’ने जाणून घेतली. गेल्या काही वर्षांत निर्माण झालेली कचरा जिरविण्याची आव्हाने, प्रशासकीय पातळीवरील प्रकल्प, लोकसहभागातून राबविण्यात येत असलेले उपक्रम, लोकप्रतिनिधींची भूमिका अशा विविध मुद्द्यांवर उपस्थितांनी त्यांनी परखडपणे मते नोंदविली. आगामी महापालिका निवडणुकीत पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने आश्वासनांचा पाऊस पडणार आहे. यातून वर्षानुवर्षे रखडलेले बांधकाम प्रकल्प, मुबलक पाणी, सार्वजनिक व्यवस्था सुधारण्यासाठी अनेक उत्तमोत्तम पर्याय पुढे येतील, पण यामध्ये शहरातील कचरा वर्गीकरणाबद्दल फारशी चर्चा होत नाही. त्यामुळे संस्थांच्या प्रतिनिधींनी कचरा हा विषय जाहीरनाम्यात आला पाहिजे, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील कचरा व्यवस्थापन चांगले आहे, असे सातत्याने सांगितले जात असले तरी पुढील काही वर्षात लोकसंख्येच्या रेट्यामुळे कचरा व्यवस्थापनाबद्दल गांभीर्याने मार्ग काढावा लागणार आहे. कचरा डेपोजवळील गावकऱ्यांनी आंदोलन केल्यावर खडबडून जागे व्हायचे, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने कान उघाडणी केल्यावर वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस पाडायचा आणि थोड्या दिवसात पुन्हा या कागदांना कचऱ्यापेटी दाखवायची ही भूमिका महापालिकेने बदलली पाहिजे. शहरात ओला आणि सुका कचऱ्याबरोबर ई-कचरा, घरात तयार होणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे. यासाठी स्वतंत्र उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत. प्रगत देशातील अद्ययावत तंत्रज्ञान आणून, ही समस्या सुटणार नाही. लोकांपर्यंत पोहोचून कचरा वर्गीकरणाची अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. कचऱ्यासाठी मलमपट्टी नव्हे तर कायमस्वरूपी परिणामकारक ठोस धोरण स्वीकारणे आवश्यक आहे, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

किशोरी गद्रे

सल्लागार, जनवाणी संस्था

शहरातील कचरा समस्या ही सूक्ष्म व्यवस्थापनाचा विषय आहे. यासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध करण्याची गरज आहे. अत्याधुनिक यंत्र आणले म्हणून ही समस्या सुटणार नाही. आपल्याला कचरा उचलण्याची प्रक्रिया सुधारण्याची गरज आहे. ही प्रक्रिया खर्चिक नसून, नियोजन सुधारणे आवश्यक आहे. जनवाणीच्या माध्यमातून आम्ही शहरातील काही वॉर्डमध्ये कचरा व्यवस्थापन यशस्वी करून दाखविले आहे. विविध वॉर्डातील नगरसेवक कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी इच्छुक आहेत. ते त्यांच्या पातळीवर प्रयत्न करीत आहेत; मात्र त्यांना योग्य दिशा मिळत नसल्याने समस्या सुटण्याऐवजी त्यातील गुंतागुंत वाढत आहे. शहर पातळीवर धोरण निश्चित करून स्थानिक पातळीवर त्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. यासाठी लोक प्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या मार्फत लोकसहभागातून निश्चितच मार्ग काढता येईल.

प्रभाकर कुकडोलकर, पर्यावरण अभ्यासक

कचरा वर्गीकरण, विल्हेवाटीसंदर्भात कायदे अनेक आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शहरात २००८ नंतर उभ्या राहिलेल्या इमारतींनी कचरा जिरवण्याचा प्रकल्प करणे बंधनकारक असताना मात्र महापालिकेकडून सोसायट्यांना सर्रास पूर्णत्त्वाचा दाखला दिला जातो. काही वर्षांत बांधकाम व्यावसायिक नामानिराळा होतो आणि महापालिकेच्या फतव्यांना रहिवाशांना सामोरे जावे लागते. ज्या संस्था कचरा विघटन प्रकल्प राबविण्यास इच्छुक असतात, त्यांना महापालिकेकडून पुरेसे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत नाही. या प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रणा सर्वसामान्य सोसायट्यांना परवडणार नाही. तरी देखील सभासद एकत्र येऊन प्रकल्प उभारत आहेत. कचऱ्यातून तयार होणाऱ्या खताला चांगला भाव मिळत नाही. प्रकल्पाच्या देखभालीवर वर्षाला होणारा खर्च आणि खताला मिळणारा भाव यात मोठी तफावत आहे. प्रकल्प असलेल्या सोसायट्यांना महापालिकेकडून करामध्ये केवळ पाच टक्के सवलत दिली जाते. ती अपुरी आहे. या उपक्रमाला प्रोत्साहन मिळाले नाही तर निधी अथवा देखभालअभावी हे प्रकल्प बंद पडण्याचा धोका आहे. अनेक सोसायटींच्या बाबतीत हीच परिस्थिती निर्माण झाल्यास सोसायट्यांचा कचरा पुन्हा रस्त्यावर येईल. मग, या शहराच्या आरोग्याचे काय होईल याचा विचार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी करायला हवा.

मेधा ताडपत्रीकर, रुद्रा एन्व्हायर्न्मेंटल सोल्युशन इंडिया कंपनी

शहरातील प्लास्टिक कचऱ्याच्या विघटनासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आहे. संस्थेचे पाच जणांचे पथक आजपावेतो आठ हजार घरांपर्यंत पोहोचले आहे. नागरिक त्यांच्याकडील प्लास्टिक कचरा आम्हाला वेगळा करून देत आहेत. महापालिकेने इच्छाशक्ती दाखविल्यास त्यांनाही कचरा वर्गीकरणाचे चांगले परिणाम निश्चित बघायला मिळतील. पालिका प्रशासनाने चार वर्षांत कचरा वर्गीकरणासाठी अनेक फतवे काढले. मात्र, त्यांना अद्याप अपेक्षित यश लाभलेले नाही. नागरिकांना कचरा समस्येचे गांभीर्य समजून सांगण्यात, जनजागृती करण्यात महापालिका अयशस्वी ठरली आहे. लोकांना आजही कचरा वेचकाच्या हातात दिलेल्या कचऱ्याचे पुढे काय होते, हे माहीत नाही. कचरा डेपो परिसरातील ग्रामस्थांनी आंदोलन केल्यावर प्रशासन जागे होते, सोसायट्यांना पत्र जातात. मात्र, काही दिवसांतच वातावरण निवळते. गेल्या दहा वर्षांत महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून वेगवेगळे कचरा विघटन प्रकल्प उभारले आहेत. पण ते यशस्वी झाले का, अयशस्वी ठरण्यामागची कारणे काय, या प्रकल्पांमुळे कचरा समस्येवर काही परिणाम झाला का आदी प्रश्न अनुत्तरीत आहेत. एकीकडे स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहात असताना कचऱ्याच्या समस्येची प्रशासकीय स्तरावर हेळसांड होत आहे.

...

प्रिया भिडे, सल्लागार, ओला कचरा खत निर्मिती प्रकल्प

कचरा वर्गीकरण करणे आणि सोसायट्यांनी कचरा परिसरातच जिरविणे हे मान्यच. एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने कचऱ्याबद्दल गंभीर असणे आवश्यक आहे. शहरातील विविध सोसायट्यांनी गेल्या पाच वर्षांत उत्तम प्रयोग राबवून ते यशस्वी केले आहेत. मात्र, सर्वच सोसायट्या बदलतील अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. ओला कचरा जिरवण्याची जबाबदारी सोसायट्यांवर ढकलली की आपले काम झाले अशी सध्या महापालिकेची मानसिकता आहे. शहरातील अनेक सोसायट्यांनी गेल्या दोन ते तीन वर्षांत ओला कचरा जिरवण्यासाठी प्रकल्प उभारले. पण, त्यातील अनेक देखभाली अभावी बंद पडले आहेत. तर काही ठिकाणी लोक स्वतःहून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून देत असताना महापालिकेची गाडी तो कचरा पुढे एकत्रच टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. कचरा वर्गीकरण आणि विल्हेवाट ही प्रक्रिया कीचकट आहे. ती सोडविण्यासाठी महापालिकेने वॉर्डस्तरीय मॉनिटरिंग सिस्टीम उभारली पाहिजे. अभ्यासकांचा सहभागी करून घेण्याची गरज आहे. समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवून महापालिका, लोकप्रतिनिधी आणि अभ्यासकांनी एकत्रित कचऱ्याचे धोरण निश्चित करणे गरजेचे आहे.

..

मालती गाडगीळ, खजिनदार, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत

कचरा प्रश्नाबद्दल महापालिकेने अद्याप धोरण निश्चित केलेले नाही. सध्या समस्येच्या मुळापासून उच्चाटनासाठी प्रयत्न करण्याऐवजी मलमपट्टी करण्यातच वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो. कष्टकरी कर्मचारी त्यांच्यापरीने उत्तम काम करीत आहेत. मात्र, कचरा निर्मितीच्या तुलनेत त्यांची संख्या अत्यल्प आहे. शहराचा विस्तारलेला पसारा आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पुण्याच्या कचऱ्याविषयी महापालिकेने स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची आवश्यकता आहे. कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी एक धोरण घेऊन त्याची प्राधान्यक्रमाने अंमलबजावणी झाली पाहिजे. सर्वांचा विचार करण्याच्या प्रयत्नात प्रशासनाचा आजपर्यंत कोणताही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. या प्रयोगांमध्ये अमाप पैसा खर्च होत असून, आपण कचरानिर्मिती आणि विल्हेवाटीच्या दुष्टचक्रात अडकलो आहोत. दिशा नसल्याने लोकप्रतिधीही त्यांच्या पातळीवर जमेल त्या पद्धतीने हा विषय हाताळण्याचा प्रयत्न करतात. कचऱ्याबद्दल आक्रमक होऊन ठोस अंमलबजाणी हा एकमेव पर्याय आहे.

........................

काय करायला हवे?

- कचरा व्यवस्थासाठी दूरदृष्टी दाखवून आराखडा निर्मिती.

- कचरा विल्हेवाटी संदर्भात राबविण्यात येणाऱ्या कामांचे नियमित ऑडिट.

- एकच धोरण निश्चित करून कचरा वर्गीकरण ते विल्हेवाट प्रक्रिया पूर्ण करावी.

- कचरा वर्गीकरणाबद्दल जनजागृती आवश्यक

- नव्याने उभारण्यात येणाऱ्या सोसायट्यांमधील कचरा वर्गीकरण प्रकल्पांबद्दल कडक धोरण स्वीकारले पाहिजे.

- सोसायट्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रॉपर्टी टॅक्समध्ये मिळणारी पाच टक्के सवलत वाढविणे आवश्यक.

- ई-कचरा वर्गीकरण, स्वीकृती केंद्र, कचरा विल्हेवाटीची प्रकिया सुधारण्याची गरज

- वैद्यकीय कचरा, सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर विल्हेवाटीची प्रक्रिया सुधारणे आवश्यक

- कचरा वेचकांची वैद्यकीय सुरक्षा लक्षात घेऊन त्यांच्या प्रलंबित प्राथमिक मागण्या पूर्ण कराव्या.

- कचरा जिरवण्यास इच्छुक सोसायट्यांना महापालिकेने सहकार्य केले पाहिजे

- सोसायट्यांमध्ये तयार होणाऱ्या खताची जबाबदारी महापालिकेने स्वीकारावी.

- सोसायट्यांमधील कचरा विघटन प्रकल्पाचा देखभाल खर्च भरून काढण्यासाठी प्रॉपर्टी टॅक्समध्ये अधिक सवलत मिळाली पाहिजे.

- नव्याने उभारण्यात येणाऱ्या सोसायट्यांमधील कचरा प्रकल्पांबद्दल महापालिकेने ठोस पावले उचलावीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हा काही पाठिंबा नाही : दवणे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘माझ्या काव्यसंग्रहाची विश्लेषणात्मक समीक्षा करून माझी दखल घेणाऱ्या श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारून मला ‘श्रीपाल’ सहवास लाभला आहे,’ असे संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार प्रवीण दवणे यांनी सांगताच ‘मी दवणे यांचा कलावंत म्हणून सन्मान केला आहे. अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून नाही. मी कोणत्याही व्यासपीठावरून इतर सर्व उमेदवारांचा जाहीर सन्मान करू शकतो. त्यामुळे या सत्काराला दवणे यांनी पाठिंबा समजू नये,’ असा टोला ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी लगावला.
रंगत-संगत प्रतिष्ठान व लोकमंगलतर्फे साहित्य संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार प्रवीण दवणे यांचा डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्या वेळी सबनीस यांनी दवणेंची चांगलीच फिरकी घेतली. अॅड. प्रमोद आडकर, उद्धव कानडे, बंडा जोशी आदी या वेळी उपस्थित होते.
‘साहित्यसंमेलनाच्या अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सत्कार होत आहे. याचा अर्थ सबनीस यांनी दवणे यांना पाठिंबा दिला असे नाही; तर दवणे हे एक उत्तम कलावंत आहेत. त्यांचे धीरगंभीर, अंतर्मुख करणारे, विचारशील, विनोदी असे अनेक विषयांवर भाष्य करणारे काव्यसंग्रह आहेत. काव्याच्या सर्वच प्रकारांमध्ये मुक्तपणे मुशाफिरी करणाऱ्या दवणे यांचा सन्मान करायला मिळणे ही आनंदाची बाब आहे.’ असेही सबनीस यांनी सांगितले. ‘धर्मांध लोक आणि सत्तांध राजकारण्यांमुळे समाज सुधारणार नाही. तर महाराष्ट्रातील कला आणि संस्कृतीच्या जोपासनेनेच समाज सुधारेल,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘आयुष्यातील विनोद आणि मिश्किलता हरवली तर मुश्कीलता येईल. विनोद करणे आणि कळणे ही सदृढ मानसिक आरोग्याची लक्षणे आहे. जो हसत नाही तो गंभीर विचारवंत असा सध्या समज झाला आहे. अशी गंभीर माणसे चांगल्या विनोदाला दाद देत नाहीत, घरी जाऊन सवडीने हसतात,’ असे सांगत दवणे यांनी सभागृहात हशा पिकवला. ‘संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीच्या कालखंडाने अनेक गोष्टी शिकवल्या. त्यावर लिहिणार आहे. निवडून आलो. तर संमेलनाच्या दृष्टीने काम करीन जर नाही आलो तर पुन्हा लेखन सुरू करीन,’ असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात हास्यकवीसंमेलन रंगले. डॉ. मधुसुदन घाणेकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रम्प यांची निवड धोक्याची : जेफ्री आर्चर

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष कधीच होणार नाहीत, असे वाटत असताना ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. कधीही सिनेट सदस्य किंवा मेयर नसलेली तसेच कुठलाही कारभार हाताळला नसलेली व्यक्ती जगातील सर्वात मोठा देश चालवणार आहेत. मला हे धोक्याचे वाटते,’ अशी भीती प्रसिद्ध ब्रिटिश लेखक जेफ्री आर्चर यांनी व्यक्त केली.
‘धिस वॉज ए मॅन’ या आपल्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पुण्यात आलेल्या आर्चर यांनी ट्रम्प यांच्या विजयापासून देशातील नोटाबंदीच्या निर्णयापर्यंत विविध विषयांवर भाष्य केले.
आर्चर म्हणाले, ‘सर्व राजकारण्यांचा तिरस्कार करण्याची नवी मानसिकता जगभरात निर्माण होत आहे. त्यामुळे ‘मी राजकारणी नाही, मला मते द्या,’ असे म्हणणाऱ्याचा विजय होत आहे. अमेरिकनांनी एका अशा व्यक्तीस निवडून दिले आहे, जी कधी सिनेट सदस्य नव्हती, मेयर नव्हती. ते आता जगातील सर्वात मोठा देश चालवणार आहेत. हे भंयकर आहे.’
‘नोटाबंदीच्या निर्णयाचा उपयोग झाला की नाही हे अजून एका वर्षांत दिसेल,’ असेही त्यांनी नमूद केले. आपल्याकडेही पाचशे आणि हजाराच्या बऱ्याच नोटा आहेत, असे आर्चर यांनी मिश्किलपणे सांगितले. ‘धिस वॉज ए मॅन’ हे त्यांच्या ‘द क्लिफ्टन क्रॉनिकल सिरीज’ या पुस्तकांमधील सातवे आणि शेवटचे पुस्तक आहे. ‘मी लेखक नाही, गोष्टी सांगणारा- ‘स्टोरीटेलर’ आहे. भारतीयांना मुळातच गोष्टी सांगणाऱ्यांविषयी प्रेम आहे,’ असे ऑर्चर यांनी आवर्जून नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठशे दुचाकींचा लिलाव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, येरवडा

येरवडा पोलिस ठाणेअंतर्गत मागील वीस वर्षांत विविध गुन्ह्यांत जप्त केलेल्या बेवारस दुचाकींचा गुरुवारी जाहीर लिलाव करण्यात आला. सुमारे आठशे वाहनांची लिलावात साडे अकरा लाखांची बोली लागली. शहरातील दीडशेहून अधिक व्यापारी लिलावात सहभागी झाले होते.
येरवडा पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यांत वापरण्यात आलेल्या आणि वर्षानुवर्षे पोलिस ठाण्याच्या आवारात धूळ खात पडलेली वाहने भंगारात विकण्यास कोर्ट, पोलिस प्रशासन आणि आरटीओने काही दिवसांपूर्वी परवानगी दिली होती. वाहने भंगारात विक्री करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार गुरुवारी लिलाव होणार असल्याच्या जाहिराती पोलिसांनी विविध वर्तमानपत्रात जाहिराती प्रसिद्ध केले होते.
शहरातील मंगळवार पेठ, शंकरशेठ रोड, भवानी पेठ, हडपसर, कोंढवा भागातून सुमारे १६३ व्यापारी उपस्थित होते. साडे तीन लाखांवर सुरू झालेली बोली तब्बल अकरा लाख एकावन्न हजारांवर अंतिम ठरली. कोंढवा येथील रहिवाशी आणि मंगळवार पेठेतील व्यापारी अजिम हासमुद्दीम शेख यांनी सर्वाधिक बोली लावून भंगार वाहनांची खरेदी केली. आगामी काळात आणखीन काही बेवारस वाहनांची संबंधित विभागांची परवानगी घेऊन लिलाव केला जाईल, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक मुकुंद महाजन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​निवडणुकीचा ‘ट्रेलर’ सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रभागरचना आज, शुक्रवारी अंतिम होणार असतानाच, आगामी निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेचा बिगुलही वाजला आहे. पालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याच्या सूचना आणि त्यावर हरकती स्वीकारण्याचे सविस्तर वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यानुसार प्रभागनिहाय प्रा-रूप मतदारयादी पुढील वर्षी १२ जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार असून, २१ जानेवारीला त्या अंतिम केल्या जातील.
महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर होतानाच, निवडणुकीशी संबंधित पुढील सर्व कार्यक्रम निवडणूक आयोगाने सर्व महापालिकांना पाठविला आहे. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने सप्टेंबर २०१६ मध्ये विधानसभा मतदारसंघानुसार केलेल्या यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली जावी, असे निर्देश सर्व महापालिका आयुक्तांना दिले आहेत. सप्टेंबरनंतर मतदार नोंदणी मोहिमेतील अर्जांची पुरवणी यादी निवडणूक आयोगातर्फे पुढील वर्षी ५ जानेवारीला प्रसिद्ध केली जाईल. या पुरवणी यादीचेही प्रभागनिहाय विभाजन करण्यात येऊन एकत्रितरित्या ‘प्रा-रूप प्रभागनिहाय मतदार यादी’ १२ जानेवारीला जाहीर करावी, असे आदेश आयोगाने दिले आहेत.
प्रभागनिहाय प्रा-रूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर १७ जानेवारीपर्यंत नागरिकांना हरकती-सूचना दाखल करता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या मुदतीत आलेल्या हरकती-सूचनांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २१ जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. विधानसभेच्या १६ सप्टेंबरच्या विधानसभा निहाय मतदार यादीचे महापालिकांच्या नव्या प्रभागांनुसार विभाजन करण्यास त्वरेने सुरुवात करावी, अशा सूचनाही पालिकांना देण्यात आल्या आहेत.
विधानसभा मतदार यादीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाविष्ट असलेल्या एकूण मतदारांची संख्या आणि महापालिका निवडणुकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रा-रूप मतदार यादीतील एकूण संख्या समान असल्याची खबरदारी घेण्याची जबाबदारी महापालिकांनी घ्यावी, असे आयोगाने सुचविले आहे. विधानसभेच्या यादीत मतदारांची नावे असूनही ती महापालिकेच्या प्रभागाच्या यादीतून वगळण्यात आली असल्यास, अशा मतदारांची नावे यादीत समाविष्ट केली जातील, असे आयोगाने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतिम प्रभागरचना पालिकेच्या ‘वेब’वर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रभागरचना आज, शुक्रवारी अंतिम होणार असून, महापालिकेच्या वेबसाइटवर सर्व ४१ प्रभागांचा अंतिम नकाशा प्रसिद्ध केला जाणार आहे. प्रभागरचना अंतिम झाल्याने आता महापालिका निवडणुका लढविणाऱ्या इच्छुकांच्या तयारीला वेग येण्याची चिन्हे आहेत.
पुढील वर्षी फेब्रुवारीत महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने (चार सदस्यांचा एक प्रभाग) घेण्याचे सरकारने निश्चित केले. त्यानुसार शहरातील ४१ प्रभागांची प्रारूप रचना गेल्या महिन्यात जाहीर केली गेली. त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल नुकताच निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला होता. राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या फायद्याची प्रभागरचना केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता; तसेच काही ठिकाणी नैसर्गिक हद्दींमध्ये बदल झाल्याची टीका करण्यात आली होती. त्यामुळे प्रभागात नेमके किती बदल होणार, कोणत्या प्रभागांमध्ये बदल होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंतिम प्रभागरचना शुक्रवारी जाहीर केली जाणार असून, ती पालिकेच्या साइटवर पाहता येईल, अशी माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली.
प्रारूप प्रभागरचनेत काही मोजक्या ठिकाणी बदल होण्याचे संकेत असून, खूप मोठ्या बदलांची शक्यता अत्यंत कमी आहे. मोठे बदल झाल्यास आरक्षणातही फेरबदल होण्याची शक्यता वाढते. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार प्रारूप प्रभागरचना जाहीर केल्यानंतर आरक्षणात बदल करता येत नसल्याने काही किरकोळ स्वरूपाचे बदल अपेक्षित आहेत. सर्वाधिक हरकती नोंदविण्यात आलेल्या प्रभागांमध्येच काही बदल होऊ शकतात, अशी चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘त्या’ करदात्यांच्या माहितीस टाळाटाळ

$
0
0

पुणे : एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर या नोटांच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत लाखो रुपयांचा मिळकतकर भरणाऱ्यांच्या नावांची लपवाछपवी करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. हजार आणि पाचशे रुपयांच्या माध्यमातून गेल्या पंधरा दिवसांत पालिकेकडे तब्बल १४५ कोटी ५६ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. यातील सर्वाधिक नोटांचा भरणा केलेल्या मिळकतधारकांच्या नावांची माहिती मात्र लपविण्यास सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला जाहीर केला होता. त्यानंतर महापालिकेचा मिळकतकर, पेट्रोलपंप, हॉस्पिटल अशा प्रमुख ठिकाणी या नोटा चालतील, असे स्पष्ट केल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये तब्बल २३४ कोटी १६ लाख रुपयांचा महसूल पालिकेकडे जमा झाला आहे. यापैकी १४५ कोटी रुपयांचा महसूल या नोटांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
रद्द नोटांचा उपयोग करत ४६ हजार २१२ मिळकतदारांनी या आधारे पालिकेकडे कोट्यवधी रुपयांचा भरणा केला आहे. या नोटांद्वारे सर्वात अधिक रक्कम कोणी भरली याची माहिती लपविण्यास मिळकतकर विभागाने सुरुवात केली आहे. ही माहिती गोपनीय असल्याचे कारण पुढे करत ही माहिती देण्यास वारंवार नकार देण्यात येत होता. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी यामध्ये हस्तक्षेप करून माहिती द्यावी, अशा सूचना मिळकतकर विभागाला दिलेल्या असतानाही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत आहे.

काळेबेरे असण्याची शक्यता
हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांद्वारे पालिकेकडे मिळकतकर भरणाऱ्यांची यादी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आली नसल्याने यामध्ये काळेबेरे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चलनातून रद्द झालेल्या नोटांद्वारे अनेक शासकीय तसेच महापालिकेतील अधिकाऱ्यांनी मिळकतकर भरल्याने ही यादी समोर आल्यास गोंधळ उडेल, या भीतीने मिळकत विभागातील अधिकारी लपवाछपवी करत असल्याची चर्चा पालिकेत जोरदार सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटांच्या बंडलांचा रस्त्यावर ‘पाऊस’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिवाजीनगर परिसरातील मंगला थिएटरसमोर जुन्या नोटांच्या बंडलांचा पाऊस रस्त्यावर पडल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. काही नागरिकांनी रस्त्यावर पडलेली बंडले उचलून आपल्या घरी नेली; त्यातील दीड लाख रुपये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.
गुन्हे शाखेने काळा पैसा पांढरा करणाऱ्या एका व्यावसायिकाला बुधवारी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी ही कारवाई मंगला थिएटरजवळच केली होती. त्यामुळे रस्त्यावर पडलेली ही बंडले या कारवाई दरम्यानचाच एक भाग असल्याची चर्चा आहे. या अनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येत असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने केलेल्या कारवाईत एक कोटी ११ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. महापालिकाभवनासमोरील, मंगला थिएटरजवळील एका इमारतीतून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा असलेली ही रक्कम जप्त करण्यात आली. या कारवाईदरम्यान या इमारतीतून नोटांची बंडले रस्त्यावर आली असावीत, असा अंदाज आहे.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दीड लाख रुपयांची बंडले जमा करण्यात आली आहेत. या नोटा रस्त्यावर कशा आल्या, याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार नोटांची अनेक बंडले रस्त्यावर फेकण्यात आली होती. रस्त्यावरून जाणारे-येणारे नागरिक ती बंडले आपल्या खिशात घालून गायब हाेत हाेते. त्यातील दोन बंडले शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जमा झाल्यानंतर या प्रकारला वाचा फुटली.
नोटांच्या बंडलांचा रस्त्यावर ‘पाऊस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​वाहतुकीसाठी रविवारी रस्ते बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
संविधान सन्मान मूक (मूक) मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध रस्ते वाहतुकीसाठी रविवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. या मोर्चात सहभागी नागरिकांची गर्दी लक्षात घेता वाहने पार्किंग करण्यावरही बंधने घालण्यात आली आहेत. मोर्चाच्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून मुख्य रस्ते; तसेच उपरस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
संविधान सन्मान मूक मोर्चा रविवारी सकाळी सुरू होईल. जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी पुतळा येथून मोर्चाला सुरुवात होईल. खंडुजीबाबा चौक, टिळक चौकातून लक्ष्मी रोडने, संत कबीर चौक, डावीकडे वळून पॉवर हाउस चौक, उजवीकडे वळून समर्थ पोलिस ठाणे, बॅनर्जी चौकातून उजवीकडे वळून नेहरू मेमोरियल समोरून आंबेडकर पुतळा, डावीकडे वळून इस्कॉन मंदिर, डावीकडे वळून हॉटेल ब्लू नाइल, कौन्सिल हॉल या ठिकाणी मोर्चा पोहोचेल. कौन्सिल हॉल येथे मोर्चाचा समारोप होईल. सोलापूर रोड, नगर रोड, सातारा रोड, पुणे-मुंबई रोडने शहरात येणाऱ्या वाहनांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

तीन हजार स्वयंसेवक
शहरात २७ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या संविधान सन्मान मूक मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी सुमारे तीन हजार स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. स्वयंसेवकांना पोलिसांकडूनही मार्गदर्शन करण्यात आले आहे.
दलित, ओबीसी, अल्पसंख्याक, आदिवासी आणि भटके विमुक्त समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते विधान भवन या मार्गे हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. मोर्चाच्या आयोजकांनी जिल्हाधिकारी सौरव राव यांची भेट घेऊन नियोजनाबाबत चर्चा केली. मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने खबरदारी घेण्याच्या सूचना राव यांनी दिल्याचे आयोजकांनी पत्रकारांना सांगितले.
हा मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने व्हावा, यासाठी सुमारे तीन हजार स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. त्यांना पोलिसांनीही मार्गदर्शन केले आहे. या मोर्चासाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी करू नये, मोर्चाच्या मार्गात कचरा टाकू नये, वाहतुकीला अडथळा आणू नये आदी बाबींवर भर देण्यात आला आहे.
या मोर्चात पुणे शहराबरोबर पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने सामील होणार आहेत. याशिवाय सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांतूनही नागरिक येणार आहेत. मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय पुणे महापालिकेकडूनही पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

मोर्चाच्या मार्गावरील बंद रस्ते
- लक्ष्मी रस्ता - मोर्चा कौन्सिल हॉलला पोहोचेपर्यंत
- नामदार गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता) - खंडुजीबाबा चौक ते चाफेकर चौकापर्यंत
- बाजीराज रस्ता - पुरम चौक ते शिवाजी रस्ता
- जंगली महाराज रस्ता - स. गो. बर्वे चौकामध्ये बंद राहणार
- कर्वे रस्ता - नळस्टॉप चौकातून पुढे बंद राहील
- केळकर रस्ता - आवश्‍यकतेनुसार बंद राहणार
- नेहरू रस्ता - सेव्हन लव्हज चौकामधून पुणे स्टेशनकडे बंद राहील
- टिळक रस्ता- आवश्‍यकतेनुसार बंद राहील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या नोटांमध्ये लाच स्वीकारली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘बार रेस्टॉरंट’च्या परवान्यास आवश्यक असणारा अनुकूल अहवाल देण्यासाठी वाहतूक पोलिसाने सव्वा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्याने तडजोडीनंतर एक लाख १५ हजार रुपये जुन्या नोटांमध्ये स्वीकारण्याची तयारी दर्शवली; मात्र ही रक्कम गुरुवारपर्यंतच मिळाली पाहिजे, असा आग्रह धरला अन् तो अलगद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
वाहतूक शाखेतील पोलिस हवालदार सोहनलाल नानुराम चुटेले (५३, नेमणूक कोरेगाव पार्क, वाहतूक शाखा) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते कोरेगाव पार्क वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षकांचे लेखनिक आहेत.
पोलिस मित्र असलेल्या अर्जदाराने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जानुसार उत्पादन शुल्क विभागाने पोलिस परवान्यासाठी तो पुणे पोलिसांकडे पाठवला होता. आयुक्तालयातून हा अर्ज वाहतूक शाखेत पाठवण्यात आला होता. चुटेले यांनी अनुकूल अहवाल देण्यासाठी अर्जदाराकडे एक लाख २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती एक लाख १५ हजार रुपये जुन्या नोटांच्या रूपात स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले, अशी माहिती अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.

जुन्या नोटा आहेत तर...
सरकारच्या जुन्या आदेशानुसार पेट्रोल पंप, गॅस एजन्सी अशा विविध ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत गुरुवारी संपत होती. त्यामुळे चुटेले यांनी लाचेची रक्कम ही गुरुवारीच द्यावी, असा आग्रह धरला होता. ही रक्कम गुरुवारी न दिल्यास अनुकूल अहवाल देणार नाही, अशी तंबीच त्यांनी दिली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्काळ सापळ्याचे आयोजन केले. चुटेले यांनी त्यांच्या ऑफिसच्या बाहेर लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

सव्वा लाख आणखी कोणासाठी?
चुटेले यांनी मागितलेली लाचेची रक्कम वरिष्ठांना देण्यात येणार होती का, याचा तपास करण्यात येत आहे. तक्रारदार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन चुटेले यांनी मागणी केलेल्या लाचेची रकमेविषयी विचारणा करणार होते; मात्र त्यांची वरिष्ठांशी भेट होऊ शकली नाही. चुटेले ही रक्कम कोणाकोणाला देणार होते, याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येणार आहे.

आठ महिने अर्ज का ठेवला?
पोलिस परवाना मिळवण्यासाठी तक्रारदाराने मार्च महिन्यात अर्ज केला होता. हा अर्ज तत्काळ लष्कर वाहतूक शाखेकडे देण्यात आला होता. गेले आठ महिने या अर्जावर निर्णय का होऊ शकला नाही? पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या आदेशाला वाहतूक पोलिसांकडून केराची टोपली का दाखवली जाते, असे प्रश्न या कारवाईमुळे उपस्थित झाले आहेत. शुक्ला यांनी यापूर्वी वाहतूक पोलिसांच्या बैठकांमध्ये वाहतूक पोलिसांच्या लाचखोरीबद्दल जाहीररीत्या नाराजी व्यक्त करून कारवाईची तंबी दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमआरडीए’ला सरकारची समज

$
0
0

पुणे : गतिमान विकासासाठी स्थापन झालेल्या पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल्स) ‘स्लो ट्रॅक’वरच आहे. ही नियमावली तयार न झाल्यामुळे पीएमआरडीएच्या हद्दीतील हजारो छोट्या प्लॉटधारकांची बांधकामे रखडली आहेत. मुदतीत ही नियमावली तयार न केल्याबद्दल राज्य सरकारनेही पीएमआरडीएला समज दिली आहे.
हद्दीतील बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार पीएमआरडीएला देण्यात आले. दरम्यान, पीएमआरडीएने स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करून त्याआधारे बांधकाम परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, सहा महिने लोटले, तरीही ही नियमावली तयार झालेली नाही. एक सामायिक नियमावली अद्याप अस्तित्वात न आल्यामुळे ड वर्ग महापालिकेच्या नियमावलीचा आधार घेऊन बांधकाम परवानगी देण्यात येत आहे. मात्र, त्यातील तरतुदींमुळे छोट्या प्लॉटधारकांची अडचण होत असल्याची तक्रार नागरी हक्क संस्थेचे सुधीरकाका कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. आरक्षित जमिनींचा मोबदला सुधारित भूमी अधिग्रहण कायद्यानुसार देण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘नदीसुधार’चा निधी राज्याकडे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील नदीसुधारणा योजनेंतर्गत केंद्राने महापालिकेला ८४१ कोटी रुपयांचा निधी मान्य केला. हा निधी मिळविल्याचे श्रेय घेऊन तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुणेकरांकडून नागरी सत्कारही करून घेतला. मात्र अद्यापही या योजनेचा एक रुपयादेखील पालिकेला मिळालेला नाही. केंद्राकडून या योजनेसाठी आलेला २५ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने दाबून ठेवल्याचा आरोप पालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला.

शहरातील नदी सुधारण्यासाठी केंद्र सरकारने जपान येथील जायका कंपनीकडून कर्ज घेऊन महापालिकेला अनुदान स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. नदी सुधारणा करण्यासाठी ९९० कोटी रुपयांचा पालिकेचा प्रकल्प असून यातील ८५ टक्के रक्कम म्हणजेच ८४१ कोटी रुपये केंद्राने देण्याचे जाहीर केले आहे. तर उर्वरित १५० कोटी रुपये महापालिकेला भरावे लागणार आहे. पुणे शहरातील नदीची स्वच्छता करण्यासाठी या योजनेअंतर्गत ८४१ कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याची घोषणा तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकर यांनी जानेवारी २०१६ मध्ये केली होती. या योजनेसाठी निधी‌ उपलब्ध करून दिल्याचे श्रेय घेऊन पुणेकरांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे जाहीर सत्कारदेखील करून घेण्यात आला. मात्र, त्यानंतर आजपर्यंत या योजनेचा एक रुपयादेखील पालिकेला मिळाला नसल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारने या योजनेंतर्गत महापालिकेला देण्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडे पाठविला. मात्र राज्य सरकारने गेले आठ महिन्यांपासून हा निधी दाबून ठेवल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या सभासदांनी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले.

सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच सभागृह नेते शंकर केमसे यांनी जायका प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे. आतापर्यंत‌ या योजनेच्या माध्यमातून किती खर्च केला, याबाबत प्रश्न उपस्थित केला. या योजनेसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत २५ कोटी रुपये मान्य करुन राज्य सरकारकडे पाठविले असल्याचा खुलासा पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी केला. राज्य सरकारच्या बजेटमध्ये या निधीसाठी अर्थशीर्ष नसल्याने हे पैसे पालिकेला मिळू शकत नाही. यासाठी कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असून त्यानंतर हा निधी पालिकेला मिळेल, असे कुलकर्णी यांनी सांगितले. हा निधी पालिकेला मिळावा, यासाठी स्वतंत्र बँकखाते काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी राज्य सरकार कोणताही हिस्सा देणार नाही. उलट केंद्राने पालिकेला दिलेले २५ कोटी रुपयांचा निधी दाबून ठेवण्याचे काम भाजप सरकार करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केले. पालिकेच्या हक्काचे पैसे राज्य सरकारच्या तिजोरीतून आणण्यासाठी महापौरांनी पाठपुरावा करावा, अशी‌ मागणीही यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांना अखेर मिळाल्या पाचशेच्या नव्या नोटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सुमारे आठ ते दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाचशेची नवी नोट अखेर पुणेकरांच्या पदरात पडली. अमेरिकन डॉलरसारखी दिसणारी, पांढरट राखाडी रंगाची ही नोट चर्चेचा विषय बनली होती. त्यामुळे ही नोट पदरात पडताच या नोटेसोबत सेल्फी काढून ते शेअर केले जात होते. सायंकाळपर्यंत सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर हे फोटो व्हायरल झाले होते.

काही खासगी बँका आणि मोजक्याच राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमधून पाचशेच्या नोटांचे वितरण करण्यात आले. बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणावर, तर कमी प्रमाणात शंभराच्या नोटा उपलब्ध होत्या. ‘एटीएम’मध्येही दोन हजार रुपयांच्या नोटाच भरण्यात आल्या होत्या.

काही खासगी बँकांमध्ये बुधवारी दुपारनंतर, तर राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये गुरुवारी पाचशेच्या नव्या नोटा वितरणासाठी उपलब्ध झाल्या. रांगेत उभे असलेल्यांपैकी ज्यांना सर्वप्रथम ही नोट मिळाली, त्यांनी जल्लोषातच ही नोट इतरांना दाखवण्यास सुरुवात केली; मात्र बँकांकडे पाचशेच्या नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने प्रत्येकाला मोजक्याच नोटा दिल्या जात होत्या.

‘वीस-पंचवीस मिनिटे रांगेत उभे राहिल्यानंतर माझा नंबर आला. बँकेकडे त्या वेळी उपलब्ध रकमेनुसार कॅशियरने प्रत्येकाला जास्तीत जास्त आठ हजार रुपये देता येतील असे सांगितले. त्याच वेळी त्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन नोटा आणि पाचशेच्या चार नोटा देत असल्याचे सांगितल्याने मला खूप आनंद झाला. मी पाचशेच्या अधिक नोटांची मागणी केली. या नोटा मोजक्याच असल्याने प्रत्येकाला जास्तीत जास्त चार नोटाच देण्यात येतील, असे कॅशियरने सांगितले; मात्र, नवी नोट आपल्याला मिळाली, याचा आनंद मोठा होता,’ असे प्रतीक जाधव याने सांगितले.

‘आतापर्यंत दोन वेळा बँकेतून पैसे काढले. परंतु, दोन्ही वेळा दोन हजारांचीच नोट मिळाली. सुटे पैसे न मिळाल्याने खूप त्रास झाला. आज पहिल्यांदाच पाचशेच्या नोटा मिळाल्याने खूप मोठा दिलासा मिळाला,’ असे नीलेश गायकवाड याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाते नसलेल्यांपुढे उभा प्रश्नांचा डोंगर

$
0
0

बँकिंग परिघाबाहेर ४२ टक्के नागरिक असल्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बँकेतून अथवा पोस्ट ऑफिसमधून बदलून घेण्याची मुदत गुरुवारी मध्यरात्री संपली. आता या नोटा बँकेच्या खात्यात भरून मगच पैसे काढता येणार आहेत. त्यामुळे बँकिंग परिघाबाहेर असलेल्या व्यक्तींनी काय करायचे, असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील ४२ टक्के नागरिक अजूनही बँकिंग परिघाबाहेर असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

पंतप्रधान जन-धन योजनेदरम्यान शहर आणि जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर खाती उघडली गेली; मात्र त्यासाठीही किमान काही ओळखपत्रांची अट घालण्यात आली होती. त्यामुळे भाडेतत्त्वावर राहणारे किंवा झोपडपट्टीत राहणारे किंवा सातत्याने स्थलांतरित होणारे असे नागरिक बँकिंग परिघाबाहेरच राहिले होते. अशा व्यक्तींना बँक खाते असलेल्या व्यक्तींकडे या नोटा देऊन त्यांचे ना हरकत पत्र घेऊन त्यांच्या खात्यात हे पैसे भरावे लागतील.

जन-धन योजना राबवण्यात आल्यानंतरही पुणे जिल्ह्यातील सुमारे ४२ टक्के नागरिक बँकिंग परिघाबाहेर असतील, असा अंदाज आहे. ज्यांच्याकडे पुरावे नाहीत, अशा व्यक्ती बँक खाते उघडू शकलेल्या नाहीत. त्यामुळे आपल्याकडे पाचशे किंवा हजारच्या नोटा आहेत, म्हणजे आपण गुन्हेगार आहोत, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होत आहे. या अपराधीपणाच्या भावनेबरोबरच या व्यक्ती नोटा बदलून देणाऱ्या कमिशन एजंट्सच्या आमिषांना बळी पडत आहेत. त्यांच्यामध्ये याबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे, असे बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.

...

ढीगभर पुरावे लागणार

ज्यांचे बँक खाते नाही, अशा व्यक्ती जुन्या नोटा इतरांच्या खात्यात भरू शकतील; मात्र त्यासाठी संबंधित खातेदाराचे ना हरकत पत्र, स्वतःचे अधिकारपत्र, ओळखपत्र असे पुरावे द्यावे लागतील; मात्र इतके पुरावे असतील, तर संबंधित व्यक्तीला स्वतःचेच खातेही काढता येईल. त्यामुळे ही नसती उठाठेव कशाला, असा सवाल उपस्थित होत आहे.

...

ज्यांचे खाते नाही, अशा व्यक्तींना त्यांच्याकडे असलेले किमान पुरावे अथवा फक्त फोटो व फॉर्म भरून खाते उघडण्याची परवानगी द्यायला हवी. असे खाते उघडल्यानंतर त्यात पैसे भरता येतील. त्यानंतर आवश्यक निकषांनुसार केवायसी प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांना खात्यातून पैसे काढण्याची परवानगी द्यावी. असे झाले तर ही समस्या काही अंशी सुटू शकते.

- विद्याधर अनास्कर, बँकिंग तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकांना निवृत्तीदिनी सर्व कागदपत्रे सोपवणार

$
0
0

विनोद तावडे यांची घोषणा; डॉ. कुलकर्णी यांचा हृद्य सत्कार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्वांना सोबत घेऊन जाणारे रसायन... उत्तम संघटक आणि कार्यकर्ता...लोकप्रिय तसेच दूरदृष्टी असणारा प्राध्यापक...मैत्रीत कधीच राजकारण न आणणारी व्यक्ती, लोकांकडून हक्काने काम करून घेणारा माणूस... जिंदादिल आणि निर्मळ व्यक्तिमत्त्व..अशा स्तुतिसुमनांचा वर्षाव ‘एपीके’ अर्थात डॉ. ए. पी. कुलकर्णी सरांवर गुरुवारी झाला. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी डॉ. कुलकर्णी यांच्या सत्कारासमयी प्राध्यापकांच्या हाती सेवानिवृत्तीदिनीच सर्व कागदपत्रे सोपविण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला.
डॉ. ए. पी. कुलकर्णी ३५ वर्षांच्या सेवेनंतर हरिभाई देसाई कॉलेजच्या उपप्राचार्य पदावरून गुरुवारी निवृत्त झाले. त्यानिमित्त डॉ. कुलकर्णी यांचा सपत्नीक तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे, राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, द पूना गुजराती के‍ळवणी मंडळाचे अध्यक्ष किरीटभाई शहा, सचिव जनकभाई शहा, हेमंत मणियार, विश्वस्त हरिभाई शहा, बीएमसीसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. एन. रावळ, माजी प्राचार्य डॉ. अनिरुद्ध देशपांडे, देसाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे आदी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, ‘प्राध्यापकमंडळी अनेक वर्षे विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करतात. मात्र, निवृत्तीनंतर त्यांना वेळेवर पेन्शन मिळत नाही. सेवा पुस्तिकेसारखी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी त्यांचा खूप वेळ खर्च होतो. त्यामुळे त्यांवर विपरित परिणाम होतो. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्राध्यापकांना निवृत्तीच्या दिवशीच सेवानिवृत्तीची कागदपत्रे देण्यात येतील. त्याचे काम संबंधिताच्या निवृत्तीच्या वर्षभर आधीच करण्यात येईल.’ डॉ. कुलकर्णी हे जिंदादिल व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांचा मित्र म्हणून या कार्यक्रमाला आल्याचे तावडे यांनी सांगितले.
डॉ. गाडे म्हणाले, ‘डॉ. अनिल कुलकर्णींसारख्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापकांची कॉलेज आणि विद्यापीठांना गरज आहे. त्यांच्यासारखे प्राध्यापक विद्यार्थ्यांना पडणाऱ्या प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे देऊ शकतील. नव्या पिढीच्या प्राध्यापकांसमोरील आव्हाने वेगळी आहेत. अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी डॉ. कुलकर्णी यांच्यासारख्या प्राध्यापकांचे कार्य प्रेरणादायी ठरेल.’ डॉ. देशपांडे म्हणाले, ‘डॉ. कुलकर्णी हे अतिशय निर्मळ मनाचे गृहस्थ आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी अफाट आहेत. याची प्रचिती इथे जमलेल्या जनसुदायाच्या कौतुकातून येत आहे.’
काकडे यांनी डॉ. कुलकर्णी यांच्या आठवणी सांगितल्या. डॉ. माने यांच्या हस्ते डॉ. कुलकर्णी यांना निवृत्तीची कागदपत्रे देण्यात आली. हरिभाई शहा डॉ. रावळ, मणियार, डॉ. पठाडे, डॉ. एन. डी. पाटील, रमेश शिंदे यांनी डॉ. कुलकर्णी यांच्या आठवणी सांगितल्या. डॉ. गणेश राऊत यांनी प्रास्ताविक केले.

आजपर्यंत विविध वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला आणि खूप बोललो. मात्र, आज या निवृत्तीच्या क्षणी बोलणे अवघड झाले आहे. द पूना गुजराती के‍ळवणी मंडळाने कॉलेजमध्ये काम करण्याची संधी दिल्यानेच येथवर येऊ शकलो. माझ्या कामावर मी समाधानी आणि आनंदी आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्ष डॉ. अनिरुद्ध देशपांडे, विनोद तावडे, प्राध्यपकांच्या संघटना, विद्यार्थी व कुटुंबीय या सर्वांचा माझ्या यशात मोठा वाटा आहे. या सर्वांच्या ऋणात राहणेच पसंत करीन.

- डॉ. ए. पी. कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेतृत्व टिकविण्यासाठी शिक्षणनि​धीला विरोध

$
0
0

​शिक्षक नेत्यांवर विनोद तावडेंची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणासाठी लोकसहभागातून निधी गोळा करण्यास होणारा विरोध शिक्षक नेत्यांचा नेतृत्व टिकविण्यासाठीचा प्रयत्न असल्याची टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी पुण्यात केली. त्याचवेळी या पुढील काळात शिक्षकांना अध्यापन आणि लोकसहभागातून निधी संकलन अशा दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील एका खासगी कार्यक्रमानंतर तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी प्रस्तावित विद्यापीठ कायदा, अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, पाषाण शाळांबाबत निर्माण झालेले प्रश्न, विद्याप्राधिकरणाच्या निर्मितीनंतरचे बालभारतीचे अस्तित्त्व आदी मुद्द्यांबाबत शिक्षण खात्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ‘येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात अकरावी प्रवेशासाठी कॉलेजांमधून स्पर्धा अनुभवायला मिळत असलेल्या निवडक शहरांमधून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवत्तेला वाव देऊन लक्ष्मीला सरस्वतीवर मात करू देणार नाही,’ असेही तावडे यांनी नमूद केले.
तावडे म्हणाले, की ‘लोकसहभागातून निधी उभारण्यासारख्या विरोध केल्याने नेतृत्व टिकते असे शिक्षक नेत्यांना वाटते. आदिवासी भागातील शिक्षकही लोकसहभागातून दीड कोटींच्या घरात निधी उभारू शकत असल्याचे राज्याने अनुभवले आहे. पॅशन म्हणून शिक्षणाकडे पाहणारे शिक्षक असा विरोध करत नाहीत. या पुढील काळात शिक्षकांना शिकविणे आणि निधी गोळा करणे या दोन्ही भूमिका वठवाव्या लागतील. हा निधी गोळा करण्यासाठी शिक्षकांनी लोकसहभाग घ्यावा अशी अपेक्षा आहे. ’
जिल्हा परिषदेच्या शाळांचा विकास करण्यासाठी, गावांमध्ये या शाळांविषयी अधिक आत्मियता निर्माण होण्यासाठी या शाळा पुढील काळात संबंधित गावच्या शाळा म्हणून ओळखल्या जातील. त्यासाठीही खात्यामध्ये विचार सुरू असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. विद्याप्राधिकरणाच्या निर्मितीचा इयत्ता सातवीच्या पुस्तकांच्या प्रक्रियेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. येत्या शैक्षणिक वर्षामध्येही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वेळेतच मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, बालभारती आणि विद्याप्राधिकरण याचे अस्तित्व अबाधित राहणार असून, दोन्ही संस्था येत्या काळात एकत्रितपणे काम करणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.

‘विद्यापीठ कायदा अंतिम टप्प्यात’
शिक्षणहक्क कायद्यामध्ये सर्वसमावेशक शिक्षणाचा आग्रह धरण्यात आला आहे. त्यामुळे या पुढील काळात पाषाण शाळांमधील विद्यार्थ्यांचे त्यांच्या परिसरातील जवळच्या इतर शाळांमधून समायोजन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी वाहतुकीची सुविधा पुरविणे किंवा संबंधित शाळांमध्ये जवळच्या शाळांमधील शिक्षकांना पाठविण्याचा पर्याय विचाराधीन आहे. प्रत्येक शाळेमध्ये गरजेनुसार योग्य त्या पर्यायाचा विचार केला जाणार असल्याचे तावडे म्हणाले. प्रस्तावित नव्या विद्यापीठ कायद्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा कायदा प्रत्यक्षात येण्याचा विश्वास असल्याचे तावडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर नियोजनात व्यापाऱ्यांना प्रतिनिधीत्व हवे

$
0
0

सरकार आश्वासने पाळत नसल्याचा पुणे व्यापारी महासंघाचा दावा; व्यापारवाढीसाठी सु​विधांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधानसभा निवडणुकीच्यावेळी दिलेले एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन अद्याप कागदावरच आहे. जकात रद्द केल्याचे सांगूनही पुन्हा अधूनमधून होणारी आकारणी, शहरात व्यापारवाढीसाठी सोयीसुविधांचा अभाव, रस्ते, फूटपाथची वारंवार होणारे अतिक्रमण, खोदाईच्या नियोजनाचा अभाव, आरोग्य सेवेची दुरवस्था या संदर्भात राज्यातील आणि पालिकेतील पालिका सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत. व्यापाऱ्यांनी आपल्याला मते द्यावीत, असे राजकीय पक्ष आवाहन करतात. या पार्श्वभूमीवर आगामी पालिकेच्या निवडणुकीत विधानसभेप्रमाणे पुणे शहरातील व्यापारी निश्चितच वेगळी आणि निर्णायक भूमिका घेतील असा दावा पुणे व्यापारी महासंघाने केला.
महापालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम लवकरच सुरू होईल. त्या वेळी सर्वच पक्षांकडून आश्वासनांची खैरात केली जाईल. सामान्यांना गाजर दाखविण्याचे काम केले जाईल. परंतु, निवडणुकीनंतर पुन्हा जैसे थे अशीच परिस्थिती पाहायला मिळते. परंतु, गेल्या काही वर्षांतील अनुभव पाहता आता मतदारराजा जागा झाला आहे. व्यापारीही जागे झाले आहेत, या शब्दांत पुण्याच्या विविध भागात व्यापार करणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुणे व्यापारी महासंघाने ‘मटा’च्या व्यासपीठावर आपला जाहीरनामा मांडला. सरकार, पालिका प्रशासन, सत्ताधारी आश्वासने पूर्ण करीत नसल्याची टीका करून विधानसभा निवडणुकांप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत ‘आम्ही आमची ताकद दाखवू’, असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी दिला. व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पालिकेच्या आखाड्यात व्यापाऱ्यांनाही स्वीकृत नगरसेवक पद देण्याची जोरदार मागणी या वेळी करण्यात आली.

फत्तेचंद रांका, अध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ

विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपने एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांसमवेत अनेकदा बैठका झाल्या. परंतु, अद्याप हे आश्वासन पाळण्यात आलेले नाही. आयात, निर्यातीवर दहा टक्के कर भरावा लागेल असे सांगण्यात आले होते. परंतु, पालिका प्रशासनाकडून थेट शंभर टक्के एलबीटी वसूल केला जातो. ९० टक्के रक्कम नंतर परतावा घ्या, असे सांगितले जाते. मूळ एलबीटी रद्द करून त्याऐवजी वार्षिक ५० कोटींपेक्षा अधिक व्यवहार असलेल्या व्यापाऱ्यांसाठी एलबीटी सुरूच ठेवण्यात आला. या विषयी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली असता, त्यावर अद्याप सुनावणी घेतलेली नाही. एलबीटी कशावर आणि किती टक्के लावावा याचे मूल्यांकन केले जात नाही. जकात रद्द केली असे म्हटले जात असले तरी, प्रत्यक्षात त्याची अधूनमधून आकारणी होते. शहरात पायाभूत सुविधांचा दुष्काळ आहे. शहराचा व्यापाराच्या वाढीसाठी सोयी दिल्या तर व्यापार वाढेल; पण तसे होत नाही. वॉकिंग प्लाझा करण्याची आमची तयारी आहे, पण समांतर रस्ते कोठे आहेत? बाजीराव, लक्ष्मी आणि कर्वे रोडवर वॉकिंग प्लाझासाठी वाहतूक बंद करणे शक्य नाही. व्यापारासंदर्भात कोणताही कायदा करताना छोट्या-मोठ्या व्यापारी घटकांशी चर्चा करायला हवी, कोणतेही धोरण आखताना त्यात व्यापाऱ्यांचा समावेश व्हायला हवा, बाणेर, बालेवाडी हा चकचकीत असलेला भाग पुन्हा स्मार्ट सिटी म्हणून करण्यात काय अर्थ आहे. शहरातील अन्य भाग स्मार्ट सिटी करण्यासारखे नाहीत का? विधानसभा निवडणुकीवेळी व्यापाऱ्यांच्या एकजुटीने शहराला खासदार, आमदार दिले. आता आमदार, खासदार आमचे प्रश्न सोडविणार नसतील तर हीच एकजूट पुन्हा दाखवून देऊ.

महेंद्र पितळिया, सचिव, पुणे व्यापारी महासंघ

शहराचा विकास व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. व्यावसायभिमुख धोरण राबवायला हवे. परंतु, पालिकेचे तसे धोरण नाही. सध्या रोजगार तसेच, महसूलही वाढत आहे. एलबीटीतून मोठ्या प्रमाणात पालिकेला उत्पन्न मिळत आहे. परंतु, पालिकेकडून अथवा सत्ताधाऱ्यांकडून शहरातील विविध भागातील व्यवसाय वाढीसाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. शहरात विविध प्रकारच्या बाजारपेठ उभारल्या पाहिजेत. त्यासाठी जागा आणि वेळेची मर्यादा निश्चित केली पाहिजे. केवळ घोषणांची आतषबाजी होते. परंतु, प्रत्यक्षात काहीच होत नाही. पार्किंगचे देखील सर्वसमावेशक धोरण असावे. रस्ते मोठे हवेत. सार्वजनिक वाहतूक सक्षम हवी. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल हवेत. शहराचा विकास करणाऱ्यालाच आम्ही मत देणार आहोत. व्यापाऱ्यांना राजकीय पक्षांशी घेणे देणे नाही. पण पालिकेच्या सत्तेत आम्हाला सहभागी करून घ्यायला हवे.

मनोज सारडा, अध्यक्ष, पुणे जिल्हा होजिअरी, रेडिमेड हँडलूम असोसिएशन

महापालिकेचा कारभार करांवरच चालतो. आमच्याकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल केला जातो. मग आम्हाला कोणतेही धोरण आखताना प्रतिनिधित्व का दिले जात नाही? प्रत्येक वॉर्डात व्यापाऱ्यांना चांगले काम करण्याची संधी द्यावी. अनेक नगरसेवक वॉर्डातील सोयी सुविधांकडे लक्ष देत नाहीत.

संजीव पठारे, अध्यक्ष, कम्प्युटर्स अँड डीलर्स मीडिया असोसिएशन

लोकसंख्येच्या तुलनेत शहरात उद्यानांची कमतरता आहे. क्रीडांगणे नाहीत, पुरेसे पार्किंग नाही. पुनर्विकास केला जातो; पण सर्व भागात उद्यानांसह पार्किंगच्या विकासाचे नियोजन होत नाही. केवळ वाडे पाडून विकास होत नाही. शहरात अस्वच्छता पसरली आहे. डेंगी, चिकुनगुनियाचे आजार वाढले आहेत. सदाशिव, नारायण पेठेसारख्या भागात ससूनसारख्या सरकारी हॉस्पिटल नाही. आयटी, उद्योजकांना येणाऱ्या अडचणींचा पालिका प्रशासनाने सोडवाव्यात. आयटी एक्स्पोसाठी पालिकेने पुढाकार घ्यावा.

नितीन पंडित, अध्य़क्ष, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन

महापालिकेच्या मालकीची स्वतःची क्रीडांगणे उपलब्ध नाहीत. विविध शिक्षणसंस्थांची क्रीडांगणे आहेत. पालिकेने पुढाकार घेऊन ही क्रीडांगणे काही तासांसाठी खुली करून देण्याची आवश्यकता आहे. शहराच्या मध्यवस्तीत अपुरा पाणी पुरवठा होतो तर, झोपडपट्टीत चोवीस तास पाणी मिळते. सर्व भागात समान पद्धतीने पाणीवाटप केल्यास पाण्याची बचत होईल. वाडासंस्कृतीमुळे रस्ते वाढले नाहीत. मध्यवस्तीत पार्किंगची बिकट अवस्था आहे. सदाशिव, नारायण पेठेत पार्किंग करून नागरिकांना लक्ष्मी रस्त्यावर जावे लागते.

अजित सांगळे, अध्यक्ष, कर्वे रोड व्यापारी संघटना

रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली आहेत. त्यावर नियंत्रण करणे अपेक्षित असताना तात्पुरती मलमपट्टी केली जाते. सांडपाणीचा पुनर्वापर व्हायला हवा. शहरातील नाट्यगृहांची अवस्था बिकट आहे. महापालिकेच्या मालकीच्या उद्यानांच्या पाच टक्के जागांवर खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांना त्या ठिकाणी जागा दिल्यास त्या व्यवस्थितपणे तेथे उभ्या राहतील. शहराच्या मध्यवस्तीमधील इमारतींमधील पार्किंगची मर्यादा वाढविण्याची गरज आहे. व्यापारी असलो तरी चोर नाही. त्यामुळे सन्मानाने वागणूक हवी.

कुरेश घोडनदी, अध्यक्ष, पुणे वेल्डिंग डीलर्स असोसिएशन

शहरात विविध विकासकामे करता येऊ शकतात. वाहतुकीच्या जटील समस्येवर देखील तोडगा निघू शकतो. कोणत्याही अडचणींवर मात करता येऊ शकते. परंतु, शहरासह राज्यातील सत्ताधाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे प्रश्न सोडवायचे नाहीत. ते सोडविण्याची त्यांच्या इच्छाशक्ती नाही. शाळा, वैद्यकीय सुविधांचा दर्जा राखला गेला पाहिजे. लक्ष्मी रोडवय विविध सुविधा मिळायला हव्यात. शहरातील व्यापाऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठीच पालिकेच्या राजकारणात आम्हाला स्वीकृत नगरसेवक पद मिळाले पाहिजे.

रावस पंडलू, अध्यक्ष, पुणे वॉच डीलर्स असोसिएशन

शहरात बीआरटीचा मार्ग करण्यात आला. पण, बीआरटीच्या मार्गावर बस जाते की खासगी वाहने जातात हा संशोधनाचा विषय आहे. एलबीटी कर आकारणी चुकीची आहे. सरकारने केवळ आश्वासनांची खैरात केली. पण पदरात अजून काहीच पडले नाही.

अरविंद कोठारी, अध्यक्ष, मोबाइल डीलर्स असोसिएशन

शहराला स्मार्ट सिटीचा चेहरा देण्याचा प्रयत्न आहे. पण स्मार्ट सिटीऐवजी स्मार्ट प्रभाग करण्याकडे नगरसेवकांनी लक्ष द्यायला हवा. निवडणुकीवेळी नगरसेवक आश्वासने देतात. अहवाल देतात. पण काहीच करीत नाहीत. पाच वर्ष विकासकामे करण्याचा बाँड लिहून देणाऱ्यांना निवडून द्यावे. पार्किंग, ग्रंथालयासाठी जागा आरक्षित केल्या जातात. पण, वर्षानुवर्षे या जागांचा वापर होत नाही. निवडणुका जवळ आल्या की निधी वाया जातो की नगरसेवकांची टक्केवारी वाया जाते हा खरा प्रश्न आहे.

अभय व्होरा, अध्यक्ष, पुणे पेपर्स ट्रेस असोसिएशन

महापालिकेच्या शाळांची दुरवस्था झाली आहे. मध्यवस्तीत पार्किंगची समस्या कायम आहे. त्याचा व्यापाराला फटका बसतो. अनेक शाळा सध्या बंद पडल्या आहेत. शहरात स्वच्छतेचा अभाव असल्याने डेंगी, चिकुनगुनियाचे आजार वाढले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुरस... राजकीय धक्क्याची!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्राबल्य असलेल्या ‘कर्वेनगर’ (प्रभाग क्र. ३१) मध्ये प्राबल्य निर्माण करण्यासाठी इतर पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. या प्रभागात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असल्याने आजी-माजी नगरसेवकांसह सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चुरस वाढत चालली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिलीप बराटे, लक्ष्मी दुधाने (प्रभाग क्र. ३१) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजेश बराटे, सुरेखा मकवान (प्रभाग क्र. ३२) या दोन्ही प्रभागांचा बहुसंख्य भाग आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके, मनसेच्या भाग्यश्री दांगट (प्रभाग क्र. ३०) यांच्या प्रभागाचा काही भाग नव्याने निर्माण झालेल्या ‘कर्वेनगर’ (क्र. ३१) या प्रभागात समाविष्ट झाला आहे. राष्ट्रवादी आणि मनसेने या भागांवर वर्चस्व असले, तरी ते मोडून काढण्यासाठी भाजपसह काँग्रेस आणि शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे.
राजाराम पुलालगतच्या मातोश्री वृद्धाश्रमापासून या प्रभागाची सुरुवात होते. कर्वेनगरचा संपूर्ण भाग, हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचा परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, काकडे सिटी, वारजे जलशुद्धीकरण केंद्र, शिरीष सोसायटी, श्री समर्थ सोसायटी, ब्रह्मचैतन्य सोसायटी, वारज्याचा काही भाग, दुधाने नगर, कमिन्स कॉलेज, शाहू कॉलनी असा सर्व परिसर या प्रभागामध्ये समाविष्ट झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर दिलीप बराटे आणि सचिन दोडके या प्रभागाऐवजी शेजारील प्रभागातून लढणार आहेत. त्यामुळे, विद्यमान नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्यासह त्यांचे पती माणिक दुधाने, संतोष बराटे, दिलीप ज्ञानोबा बराटे, प्रमोद शिंदे नीता शिंदे, संतोष फेंगसे, तानाजी शिंदे अशी काही नावे इच्छुकांमध्ये अग्रभागी आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येही इच्छुक कार्यकर्त्यांची दमदार फळी आहे. यामध्ये, विद्यमान नगरसेवक राजेश बराटे यांचे नाव सर्वांत पुढे असले, तरी त्यांच्या पक्षांतराची चिन्हे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, विद्यमान नगरसेविका सुरेखा मकवान, नगरसेविका भाग्यश्री दांगट यांचे पती कैलास दांगट, शैलेश जोशी, सुशीला जोशी, सचिन विप्र, संजय नांगरे, विनोद मोहिते आणि आनंद पाटील ही नावे सध्या चर्चेत आहेत.
भारतीय जनता पक्षाकडून माजी नगरसेवक शिवराम मेंगडे व त्यांच्या पत्नी शशिकला मेंगडे, गणेश पासलकर, दत्ता देशमुख, डॉ. राजेंद्र खेडेकर, कल्पना पुरंदरे, नंदकुमार घाटे, चंद्रकांत चौधरी आणि मयूर आटाळे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. इतर पक्षांतून काही उमेदवार आयात केले गेले, तर त्यांनाही थेट संधी मिळण्याची चिन्हे आहेत.
शिवसेनेकडून संदीप मोरे, दीपिका मोरे, दिनेश बराटे, सचिन थोरात, अजय भुवड, दत्ता माने, नारायण शिंदे, वैशाली दिघे ही नावे चर्चेत आहेत.
काँग्रेसकडून विजय खळदकर, सरिता वडियार आणि मोनिका ढमढेरे अशी नावे सध्या पुढे येत असून, त्यामध्ये आणखी काही नावांची भर पडण्याची शक्यता आहे.
..............
प्रभाग क्र. ३१ कर्वेनगर
लोकसंख्या : ७३,८०७
आरक्षण :
अ : ओबीसी
ब : महिला
क : महिला
ड : खुला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला आयोगाकडे पाच लाख खटले

$
0
0

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांची कबुली

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘कायद्यापुढे सर्व समान, स्त्री-पुरुष असा भेद नाही,’ ही वाक्ये केवळ राज्यघटनेत आहेत. प्रत्यक्षात समाजात समानता नांदत नाही. महिला आयोगाकडे दररोज सव्वाशे खटले दाखल होत असून यामध्ये ‘लिव्ह इन’ आणि लैंगिक अत्याचारांच्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. महिला आयोगाकडे सध्या सुमारे पाच लाख खटले विविध कारणांनी प्रलंबित आहेत,’ अशी कबुली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी गुरुवारी दिली.
पुणे बार असोसिएशनतर्फे आयोजित ‘महिला सशक्तीकरण’ या विषयावरील व्याख्यानात रहाटकर बोलत होत्या. असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. यशवंत शिंदे, सचिव अ‍ॅड. सत्य‌जित तुपे, सदस्य अ‍ॅड. संजीव मंडलिक या वेळी उपस्थित होते.
‘महिला आयोगाकडे दाखल झालेले खटले शक्यतो समुपदेशन करून सोडवण्याकडे कल असतो. शंभरपैकी सत्तर खटले हे समुपदेशनातून सोडविले जातात,’ याकडे रहाटकर यांनी लक्ष वेधले. ‘एका आठवड्यात दोन दिवस आयोगाचे न्यायालय असते. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कायदा पोहोचवण्याचे आणि महिलांचे रक्षण आणि सन्मानाकरिता आयोग कार्यरत आहे. उच्च न्यायालयाला दिलेले अधिकार महिला आयोगाला दिलेले असल्याने आयोगाने सुचविलेली शिफारस सरकारला फेटाळता येत नाही. महिलांबाबतच्या योजनांवर सूचना देण्याचा अधिकार आयोगाला असून कुठे सरकार कमी पडते, कुठे आणखी प्रयत्न करायला हवेत, याबाबत नेहमीच सरकारला सुचना देण्यात येतात,’ असे त्यांनी सांगितले.
अ‍ॅड. शिंदे म्हणाले, ‘मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे, ही मागणी गेल्या बावीस-तेवीस वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबतच्या प्रस्तावाला १९७८ साली मंजुरी देण्यात आली. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.’

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे, ही अत्यंत रास्त मागणी आहे. याबाबत मी सरकारदरबारी नक्की प्रयत्न करेन.
विजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे: शहाकडे सापडले एक कोटी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यात एक कोटी रकमेच्या पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा बदलून देण्यासाठी आलेल्या एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भरत राजमल शहा असे या व्यक्तीचे नाव असून आता हे प्रकरण आयकर विभागाकडे सोपविण्यात आले आहे.

भरत शहा हा इसम त्याच्याकडील एक कोटीचा ब्लॅक मनी २५ टक्के भावाने व्हाइट करायला येणार असल्याची टीप खबऱ्यांनी लष्कर पोलीस ठाण्याला दिली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी एम.जी.रोडवरील कॅनरा बॅंकेजवळ सापळा रचून शहा याला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड मिळाली. यात ५०० रुपये मूल्याच्या २२ हजार ४४४ नोटा तर १ हजार रुपये मूल्याच्या २८ नोटा आढळून आल्या. या सर्व नोटा बदलून घेण्यासाठी तो आला होता. या प्रकरणाचा पुढील तपास आयकर विभाग करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images