Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आरक्षणाला धक्का लावणारा बदल नाहीच

$
0
0

हरकतींचा अभ्यास करून बदल करू; सीताराम कुंटे यांची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘प्रभागरचना करताना मतदारांचे ब्लॉक तुटता कामा नये, अशा निवडणूक आयोगाच्या सूचना होत्या. त्यामुळे काही ठिकाणी नैसर्गिक हद्दी बदलल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे. नागरिकांनी नोंदविलेल्या हकरतींचा अभ्यास करून त्यामध्ये गरजेनुसार बदल केले जातील. मात्र, सुधारणा करताना प्रभागातील आरक्षणाला धक्का लागेल असा कोणताही बदल करता येणार नाही,’ असे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत नागरिकांकडून आलेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी म्हणून कुंटे यांची नियुक्ती केली होती. शुक्रवारी कुंटे यांनी प्रभागरचनेबाबत नागरिकांच्या हरकती आणि सूचना जाणून घेतल्या. नागरिकांनी नैसर्गिक हद्दी बदलण्यात आल्याच्या हरकती नोंदविल्या. त्यामध्ये तथ्य आढळल्यास आवश्यकतेनुसार बदल केले जातील. मात्र, हे बदल करताना त्या प्रभागातील आरक्षणाला कोणताही धोका निर्माण होइल, असे बदल केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रभागरचना कशी करावी, यासाठी आयोगाने काही नियम घालून दिले होते. त्यानियमानुसारच पालिकेने बहुतेक ठिकाणी प्रभागरचना केली असल्याचे दिसत आहे. प्रभागरचना करताना मतदारांचे ब्लॉक तोडू नये, अशा सूचना आयोगाच्या असल्याने काही ठिकाणी नैसर्गिक हद्दीत बदल झाल्याचे दिसत असल्याचेही कुंटे म्हणाले. नागरिकांनी पालिकेकडे नोंदविलेल्या हरकतींचा अभ्यास करुन त्यामध्ये सुधारणा करणे शक्य असल्यास बदल केला जाईल. मात्र, हा बदल करताना त्या प्रभागातील आरक्षणाला धक्का लावता येणार नाही. नागरिकांनी नोंदविलेल्या हरकतींपैकी बहुतांश हरकती नैसर्गिक हद्दीबाबतच असल्याचे कुंटे यांनी नमूद केले. या विषयीचा अहवाल लवकरच निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला जाईल. त्यानंतरच आयोगातर्फे अंतिम प्रभाग रचना जाहीर करेल, असेही कुंटे यांनी स्पष्ट केले.‍
..
प्रभागाच्या हद्दीचा ताळमेळच नाही
महापालिकेने प्रभागरचना तयार करताना प्रभागाची हद्द आणि क्षेत्रिय कार्यालय यांचा ताळमेळ घातला नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. वडगावशेरीमधील प्रभाग क्रमांक ३ मध्ये विमाननगर- सोमनाथनगरला टिंगरेनगरचा काही भाग, बर्माशिल झोपडपटी, खेसे पार्क हा भाग जोडण्यात आला आहे. हा भाग येरवडा क्षेत्रिय कार्यालयाशी संबधित आहे. मात्र, हा भाग आता ज्या प्रभागाला जोडला गेला आहे, तो प्रभाग नगररोड क्षेत्रिय कार्यालयात येतो. त्यामु़ळे या भागातील नागरिकांना जवळचे क्षेत्रिय कार्यालय सोडून लांबच्या क्षेत्रीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार आहेत. त्यामुळे हा भाग प्रभाग क्र. २ ला जोडावा, अशा हरकती या भागातील नागरिकांनी नोंदविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जागरूक पुणेकरांच्या अभ्यासपूर्ण हरकती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांची रचना करताना पालिका प्रशासनाने नैसर्गिक हद्दी तोडल्या असून, नाले, नदी, महत्त्वाचे रस्ते डावलण्यात आले आहेत. काही प्रभागांमध्ये चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकण्यात आले असून, काही प्रभागांना नावे देताना मनमानी कारभार केला आहे. अशा आशयाच्या हरकती पुणेकरांनी शुक्रवारी नोंदवल्या. नोंदवलेल्या हरकती विचारात घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची मागणीही जागरूक नागरिकांनी केली.
महापालिकेने निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रा-रूप प्रभाग रचनेवर नोंदविलेल्या हरकतींवर बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सीताराम कुंटे या वेळी उपस्थित होते. नागरिकांना आपल्या हरकती आणि सूचना योग्यप्रकारे मांडता याव्यात, यासाठी पालिकेने प्रत्येक प्रभागासाठी निश्चित वेळ ठरवून देण्यात आली होती. त्यानुसार सकाळी दहा वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत चाललेल्या या प्रक्रियेत ३१९ नागरिकांनी सहभाग घेतला. महापालिका आयुक्त कुणाल कुमार, निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सौरभ राव या वेळी उपस्थित होते.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रा-रूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना देणारे सुमारे ११०२ अर्ज पालिकेकडे आले होते. दिवसभर चाललेल्या या सुनावणीमध्ये १३३ आक्षेप घेण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक आक्षेप प्रभागाच्या हद्दीबाबत होते. त्यानंतर चुकीच्या पद्धतीने प्रभागात पडलेले आरक्षण आणि विनाकारण प्रभागाचे नाव बदलण्याबाबत हरकती नोंदविण्यात आल्या. नागरिकांनी नोंदविलेल्या हरकतींवर आयोगाने नेमलेले अधिकारी आपले मत देतील त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी १९ नोव्हेंबरपर्यंत अहवाल आयोगाकडे पाठवतील. त्यानंतर गरजेनुसार आवश्यक ते बदल करून आयोग २५ नोव्हेंबरला अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार असल्याचे कुणाल कुमार यांनी सांगितले.
..
‘प्रभागांना शहिदांची नावे द्या’
प्रभागाची नावे देण्यावरून अनेकदा वाद निर्माण होतात. ते टाळण्यासाठी प्रभागांना नावे देताना देशासाठी शहीद झालेल्यांची नावे देण्यात यावीत, अश सूचना मांडण्यात आल्या. प्रभागातील प्रत्येक गटातील उमेदवाराला एकच चिन्ह देण्यात यावे, आदी महत्त्वपूर्ण सूचना पुणेकरांनी मांडल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगची जागा पडतेय अपुरी

$
0
0

वाहनांची वाढती संख्या कारणीभूत; वाहतूक पोलिसांवर मोठा ताण येण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दसरा-दिवाळीत रस्त्यावर आलेली हजारो नवी वाहने आणि दररोज शेकडो वाहनांची पडणारी भर दिवसेंदिवस पुण्यातील वाहतूक कोंडी वाढवत आहेत. त्यात पार्किंगची जागा अपुरी पडू लागल्याने नागरिकांकडून रस्त्यावरच दुहेरी पार्किंग करण्यात येत असल्याने रस्त्यावरील कोंडीत भरच पडत आहे. ही कोंडी रोखण्यासाठी उपलब्ध परिस्थितीत ठोस उपाययोजना योजनांची आवश्यकता असून, त्यासाठी वाहतूक पोलिसांना कंबर कसावी लागणार आहे.
नुकतीच पार पडलेली दिवाळी वाहन उद्योगाला चांगली गेली असून, पुण्यात या काळात हजारो वाहनांची विक्री झाली आहे. त्याशिवाय सरासरी सातशे वाहनांची पुण्यात दररोज खरेदी होते. पुणेकरांकडून मंदीच्या काळातही वाहनांची खरेदी करण्याचा प्रमाणे तुलनेने फारसे कमी झालेले नाही. त्यात पुण्यातील रस्त्यांचे क्षेत्रफळ हे केवळ सात टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे रस्त्यांवर कोंडी होण्याचे प्रमाण वाढत आहे.
..
रस्ते होणार एकेरी
रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक सुरू ठेवणे आणि त्या वाहतुकीचा वेग वाढवणे या प्रमुख उपाययोजना अंमलात आणण्यात येतात. रस्त्यावरील वाहनांची गर्दी वाढतच राहिली तर वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी रस्ते एकेरी करण्यावर भर दिला जातो. नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्ता, जंगली महाराज रस्ता हे प्रमुख रस्ते गेल्या काही वर्षांत एकेरी करण्यात आले. भविष्यात शहरातील आणखी काही प्रमुख रस्त्यांवर एकेरी करण्याचे धोरण स्वीकारावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण होईल. रस्ते एकेरी झाल्यावर तेथे पार्किंगच्या जागाही उपलब्ध होतात.
..
पे अँड पार्किंगची गरज भासणार
रस्त्यांवर वाहने उभी करताना बेशिस्तपणा अधिक असतो. वाहने योग्यरित्या पार्क केली नाहीत तर इतर वाहनांना जाण्यासाठी लागणारी कॅरेज विड्थ कमी पडते आणि त्यातून कोंडीचे प्रमाण वाढते. पार्किंगमधून वाहने चोरी जाण्याचे प्रमाणही अनेकदा वाढलेले दिसते. या पार्श्वभूमीवर ‘पे अँड पार्किंग’ची भूमिका घेणे प्रशासनाला भाग पडते. नागरिकांना आपली वाहने रस्त्यावर उभी करताना पैसे द्यावे लागल्यावर ते अनेकदा काळजी घेतात आणि योग्यरितीने आपली वाहने पार्क करतात.
..
दुहेरी पार्किंगची समस्या गंभीर
जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्ता, लक्ष्मी रस्ता या रस्त्यांवर प्रामुख्याने दुहेरी पार्किंगची समस्या भेडसावते आहे. अनेकदा वाहन चालक आपल्या वाहनात बसून राहतात आ​णि वाहन रस्त्यावर तसेच सुरू ठेवतात. त्याचा पाठीमागून येणाऱ्या वाहनांना अडसर होऊन वाहतूक कोंडी वाढते आहे. वाहतूक पोलिसांनी गर्दीच्या रस्त्यांवर अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून दुहेरी पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला होता.
.............
पुण्यातील वाहनांची संख्या
पुणे- ४८ लाख
पिंपरी-चिंचवड- १३.८० लाख
दुचाकीची संख्या- ३० लाखांहून अधिक
रस्त्याचे सरासरी क्षेत्रफळ- ७ टक्के
.........
पुण्यातील वाढती वाहन संख्या भविष्यातील अनेक समस्यांची नांदी ठरण्याची शक्यता आहे. ही वाहन संख्या रोखण्यासाठी सक्षम अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज आहे. पार्किंगसाठी उपलब्ध जागा कमी पडत असून आणखी पार्किंग प्लॉट निर्माण करणे गरजेचे आहे. नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्या चालकांवर मोठ्या प्रमाणात दंडाची कारवाईची आवश्यकता आहे.
डॉ. प्रवीण मुंढे, पोलिस उपायुक्त, वाहतूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सार्वजनिक वाहतुकीसाठी रिक्षालाही हवे बळ

$
0
0

'मटा'च्या व्यासपीठावर रिक्षाचालकांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सार्वजनिक वाहतुकीत ‘पीएमपी’सह महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रिक्षाचालकांना महापालिकेने व राजकर्त्यांनी कायमच वाऱ्यावर सोडल्याची भावना रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘मटा जाहीरनामा’च्या व्यासपीठावर मांडल्या.

आपल्या मागण्यांचा विचार केला जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी ‘पीएमपी’बरोबरच रिक्षांनाही सक्षम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. रिक्षाचालकांसाठी घरकुल योजना राबविण्याची, तसेच सीएनजी पंप आणि रिक्षा स्टँड वाढविण्याची, रिक्षांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.

पुणे महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. लवकरच राजकीय रणधुमाळी सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदारराजा असलेल्या सामान्य नागरिकांसह विविध घटकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पुढाकार घेतला असून, त्यासाठी ‘मटा व्यासपीठ’ हा उपक्रम सुरू केला आहे. रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी या व्यासपीठावर आपल्या आणि शहरामध्ये भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. शहराच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध गोष्टींचा ऊहापोह त्यांनी केला. आम आदमी रिक्षा संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य, सहसचिव आनंद अंकुश, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ ढोले, रिक्षा फेडरेशनचे खजिनदार बापू भावे आणि रिक्षा पंचायतीचे सिद्धार्थ चव्हाण ‘मटा व्यासपीठा’वर एकत्र आले होते.

‘शहरातील सार्वजनिक वाहतूक सुधारावी; वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन रस्त्यांची निर्मिती करावी; सार्वजनिक आरोग्यासाठी व गोरगरिबांना परवडेल अशी वैद्यकीय सुविधा देण्यासाठी महापालिकेचे दवाखाने अद्ययावत करावेत; महापालिकेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय उपलब्ध करावी; सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी पीएमपी व ऑटो रिक्षाला बळ द्यावे,’ अशा मागण्या रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी केल्या.

‘मटा जाहीरनामा’च्या माध्यमातून सामान्य नागरिकांना एक चांगले व्यासपीठ मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. रिक्षाचालकांना भेडसावणाऱ्या समस्या ‘मटा’च्या माध्यमातून महापालिका प्रशासन, राजकारणी मंडळी आणि अन्य सरकारी संस्थांनाही कळतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी आयुक्तालयासाठी पोलिस भरतीवर खल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन करण्यासाठी आवश्यक पोलिसांची भरती करण्यासाठी राज्य सरकारच्या कर्मचारी कपातीच्या नियमातून मार्ग काढण्याचा विचार सुरू झाला आहे. कर्मचारी, निधी अशा बाबींवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक शनिवारी मुंबईत पार पडली.
पिंपरी-चिंचवडसह अन्य चार ठिकाणी स्वंतत्र पोलिस आयुक्तालय स्थापन करण्याबाबत गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्या कार्यालयात बैठक झाली. महासंचालक सतीश माथूर, पुण्याच्या आयुक्त रश्मी शुक्ला, पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव, कोल्हापूर, कोकण आणि अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक या बैठकीला उपस्थित होते. चारही आयुक्तालये कार्यान्वित करण्यासाठी सुमारे ७०० ते ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी ४८३ कोटी रुपये रुपये खर्च येईल, असा अहवाल आयुक्तांनी दिला आहे. विशेष म्हणजे या खर्चात इमारतींच्या निधीचा समावेश नाही.
माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी हा खर्च निम्याने कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या इमारतीमधील चार मजले (सुमारे ४ हजार चौरस फूट) जागा आयुक्तालयाला ​दिली जाऊ शकते. मात्र, आयुक्तालयास ही जागा पुरेशी नसल्याचे मत अधिकाऱ्यांनी बैठकीत नोंदविले. या खर्चासह अडीच हजार कर्मचारी-अधिकारी प्रारंभी आवश्यक आहेत, तर ४०० कर्मचारी पुणे शहर पोलिसांकडून देण्यात येणार आहेत. निकषांनुसार पिंपरी-चिंचवड आयुक्तालयासाठी २१०० कर्मचाऱ्यांची नव्याने भरती करावी लागणार आहे.
आयुक्तालय कार्यान्वित होण्यासाठी अपेक्षित खर्चाला हातभार लावण्याची तयारी शहरातील खासदार, आमदार आणि महापौर यांनी दर्शविली होती. अधिकाऱ्यांनी आयुक्तालयाचा सर्व समावेश आराखडा तयार केला आहे. राज्य सरकारने मध्यंतरी शासकीय कर्मचाऱ्यांची ३० टक्के कपात करण्याबाबत अध्यादेश काढला होता. आता नव्याने आयुक्तालय सुरू करायचे झाल्यास हा अध्यादेश पोलिस खात्यासाठी बदलावा लागणार आहे. दरम्यान, शनिवारच्या बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांनी याबाबत बोलण्यास नकार दर्शविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाट्य स्पर्धेसाठी रंगकर्मींनी पुढे यावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘हौशी कलाकारांसाठी आयोजित राज्य नाट्य स्पर्धेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेची नाटके पाहण्यासाठी प्रेक्षकच नसतात. शिवाय स्पर्धकही कमी होत चालले आहेत. त्यामुळे स्पर्धेला पुन्हा उभारी देण्यासाठी रंगकर्मी आणि नाट्यपरिषदेने प्रयत्न करावेत,’ या शब्दांत राज्याच्या सांस्कृतिक संचलनालयाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या प्रमुख अमिता तळेकर–धुमाळ यांनी विनवणीचा राग आळवला.
मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ रंगकर्मी अनंत मेहेंदळे तथा स्वरुपकुमार यांना मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी तळेकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर होते. कार्यक्रमात कुंदा हंपी आणि उषा देशपांडे यांना माता जानकी पुरस्कार, सीमा चांदेकर यांना रंगकर्मी प्रपंचलक्ष्मी पुरस्कार, स्वाती देशमुख आणि अविनाश देशमुख यांना लक्ष्मी नारायण दाम्पत्य पुरस्कार आणि दिलीप पेटवे यांना चित्तरंजन कोल्हटकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तळेकर यांच्यापाठोपाठ नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांनीही पुण्यातील नाटकाच्या चळवळीला पुन्हा उभारी देण्यासाठी रंगकर्मींनी प्रयत्न करावेत,अशी विनंती केली. त्यामुळे सांस्कृतिक कार्य संचलनालय आणि नाट्यपरिषद नाट्यक्षेत्राच्या विस्तारासाठी काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तळेकर म्हणाल्या, की ‘राज्य नाट्य स्पर्धेला उभारी देण्यासाठी नाट्यपरिषद आणि ज्येष्ठ रंगकर्मींनी सरकारला मदत करावी तसेच सूचना कळवाव्यात. जेणेकरून सरकार त्यादृष्टीने प्रयत्न करील. मराठी रंगभूमीची वृद्धी व्हावी; यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.’ ‘पुण्यातील नाटकांची चळवळ ठप्प झाली आहे. ती वाढवण्यासाठी ज्येष्ठ रंगकर्मींनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी येणाऱ्या वर्षात ४ ते ५ चांगली नाटके करण्याच्या प्रयत्नात आहे,’ असे सुरेश देशमुख यांनी सांगितले.
---------------------------
‘कला क्षेत्रासाठीही अधिक गुण’
क्रीडापटूंना ज्याप्रमाणे शालेय स्तरावर ज्यादा गुण दिले जातात त्याचप्रमाणे कला क्षेत्रात सलग ५ वर्षे कार्यरत असलेल्या कलाकारांनाही अधिक गुण देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, लवकरच बैठक होणार आहे,’ अशी माहिती श्रीमती तळेकर यांनी दिली.
-------------
नाटकासाठी वेडा झालो...
‘आयुष्यभर नाटकाचा ध्यास घेतल्याने मला त्याचेच वेड लागले. बक्कळ पगाराची नोकरी सोडली, लग्न झाल्यावर सासऱ्याची बोलणी ऐकून घेतली, संसारात फारसे लक्ष दिले नाही, मुलगा कितवीत शिकतो हे अनेकदा आपल्याया माहीत नसायचे. नाटकाच्या वेडापायी प्रपंचाचा भार कधी अंगावर घेतला नाही. पण त्याचा मला अजिबात पश्चात्ताप होत नाही,’ या शब्दांत स्वरुपकुमार यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकप्रतिनिधी म्हणून सांगण्यास लाज वाटते

$
0
0

‘राष्ट्रवादी’च्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांची खंत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘गेली दीड वर्षे महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कचऱ्याच्या समस्येत काहीही फरक पडलेला नाही. उलट हा प्रश्न अधिकच वाढला आहे. स्वच्छतेसाठी पालिकेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कारांनी गौरविले जात असताना दुसरीकडे शहरातील अनेक रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साठल्याचे चित्र पाहून पुणे शहराचे लोकप्रतिनिधी म्हणवून घेण्याची लाज वाटते’, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी संताप व्यक्त केला.
‘शहरातील कचराप्रश्न मार्गी लावावा, यासाठी गेली दीड वर्षे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांकडे आपण पाठपुरावा सुरू केला आहे. गेल्या वर्षी यावरून पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनही केले होते. मात्र, त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. उलट शहरातील कचराप्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे,’ अशी खंत श्रीमती चव्हाण यांनी व्यक्त केली. शहरातील अनेक रस्त्यांवरील कचरा नियमित उचलला जात नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग झाले असून, डेंगी, चिकुनगुणियाच्या पेशंटची संख्या वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. रस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य आहे, याकडे डोळेझाक करण्याची भूमिका प्रशासन घेत असून, अधिकाऱ्यांनी वेगळ्या प्रकारचे चष्मे घातलेत की काय, असा प्रश्न पडतो असेही त्या म्हणाल्या.
शहरातील कचऱ्याचा प्रश्न पाहता येथील लोकप्रतिनिधी आणि नागरिक म्हणवून घेण्याची मला लाज वाटते. आयुक्तांकडे याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला, तेव्हा ‘अधिकारी माझे ऐकतच नाहीत; मीही हतबल झालो आहे,’ असे उत्तर आयुक्त देत असल्याचे चव्हाण म्हणाल्या. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असतानाही हा प्रश्न सुटत नसल्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून महापौरांनी लक्ष घालून हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी प्रशासनाला ठरावीक मुदत द्यावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.
त्यावर पुढील महिनाभरात शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आदेश प्रशासनाला देणार असल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विलास लांडेंचा भोसलेंना पाठिंबा

$
0
0

नाट्यमय घडामोडींनंतरही कागदोपत्री उमेदवारी कायमच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधानपरिषदेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी शनिवारी राष्ट्रवादी बंडखोर उमेदवार विलास लांडे यांचा अर्ज मागे घेण्यावरून नाट्यमय घडामोडी घडल्या. माघारीचा प्रयत्न अशस्वी ठरल्यानंतर लांडे यांनी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अनिल भोसले यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी लांडे यांनी पाठविलेल्या प्रतिनिधीकडे अधिकृत पत्र नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज स्वीकारला नाही. त्यामुळे लांडे यांना स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागले. मात्र, तोपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ संपली. त्यामुळे नाईलाजास्तव लांडे यांनी निवडणुकीत आपली उमेदवारी कायम असली तरी, आपला पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार अनिल भोसले यांना असल्याचे जाहीर केले. त्यांच्या विजयासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही स्पष्ट केले.
विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून भोसले यांच्यासह लांडे यांच्याही नावाची चर्चा होती. राष्ट्रवादीने भोसले यांना उमेदवारी जाहीर केल्याने नाराज झाल्याने लांडे यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरला. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी कोण माघार घेणार, याबाबत तर्कवितर्क सुरू होते. अपक्ष उमेदवार केदार उर्फ गणेश गायकवाड, प्रकाश गोरे, बापू थिगळे यांनी शनिवारी अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार गोपाळ तिवारी, शिवसेनेचे माऊली खंडागळे यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरुन अर्ज मागे घेतला.
अर्ज माघारी घेण्यासाठी काही अवधी शिल्लक असताना लांडे यांचे प्रतिनिधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आले. या प्रतिनिधीकडे लांडे यांचे अधिकृत पत्र नसल्याने त्यांचा अर्ज मागे घेण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यानंतर अवघ्या काही म‌िनिटांमध्येच लांडे स्वत: कार्यालयात दाखल झाले. आपला अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती केली. मात्र, माघार घेण्याची मुदत तीन वाजता संपल्याचे सहायक निवडणूक अधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितले. लांडे यांचा अर्ज स्वीकारण्याची विनंती भोसले यांनी केली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
..
उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज स्वीकारण्याची विनंती आपण निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली, मात्र तांत्रिक कारणामुळे अर्ज मागे घेतला गेला नाही. मी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा कार्यकर्ता असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अनिल भोसले यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
विलास लांडे, बंडखोर, राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंतरराज्य टोळी पुण्यात गजांआड

$
0
0

खरेदीच्या बहाण्याने दागिने लुटण्यात होता हातखंडा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दागिन्यांच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरून दागिने चोरणाऱ्या चार महिला आणि पुरुषाचा समावेश असणाऱ्या आंतरराज्य टोळीला गजांआड करण्यात यश आले आहे. या टोळीने गुजरात, केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मोठ्या सराफी पेढ्यांमध्ये जाऊन करामती केल्याचे उघड झाले आहे.
चेतन उर्फ राहुल बाबूराव कच्छवाय (वय २९, रा. केशवनगर मुंढवा, मूळ गुजरात), सुचित्रा किशोर साळुंखे (वय ४५, रा. अकलूज, ता. माळशिरस), ज्योत्स्ना सूरज कच्छवाय (वय २६, रा. अप्पर इंदिरानगर), मंजिरी प्रशांत नागपुरे (वय ३५, रा. सुखसागरनगर, कात्रज) आणि कोमल विनोद राठोड (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी एकमेकांचे ओळखीचे आणि नातेवाइक आहेत. त्यांनी केरळमधील तीन ठिकाणी बड्या सराफांच्या दुकानात चोरी केल्याचे व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. गुजरात, मुंबई, सोलापूर आणि कर्नाटकातदेखील चोऱ्या करताना हे आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या आरोपींवर पुण्यातही चार गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पुणे आणि अन्य राज्यातील बड्या सराफांच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने जाऊन दागिने चोरणाऱ्या टोळीतील आरोपी मुंढवा परिसरात आले आहेत, अशी माहिती मुंढवा परिसरात पेट्रोलिंग करत असताना सहायक पोलिस निरीक्षक युवराज नांदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ११ सप्टेंबर रोजी त्यांनी ठाण्यातील वामन हरी पेठे या प्रसिद्ध पेढीतून सोन्याच्या दोन बांगड्या, एक नेकलेस चोरल्याचे त्यांनी कबूल केले. या टोळीवर अनेक राज्यांत गुन्हे दाखल आहेत. या टोळीला ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पुण्यात कुख्यात गुन्हेगार कुणाल पोळची बहीण मंजिरी प्रशांत नागपुरे हिचाही टोळीत समावेश आहे. पोळचा काही वर्षांपूर्वी खून झाला. सहायक पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, युवराद नांद्रे, कर्मचारी लक्ष्मण शिंदे, माणिक पवार, शिवाजी घुले, प्रगती नाईकनवरे, गीतांजली जाधव, संगीता जाधव, नमिता येळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडी तुटली; युती सावरली

$
0
0

राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार लांडे रिंगणात कायम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शनिवारी शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली खंडागळे यांच्यासह चार अपक्ष उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले.
त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अनिल भोसले, काँग्रेसचे संजय जगताप, भाजपचे अशोक येनपुरे, अपक्ष उमेदवार यशराज पारखी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विलास लांडे यांच्यातच लढत होणार आहे. आघाडीमध्ये बिघाडी झाल्याने या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीने आपले स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. भाजप आणि शिवसेनेमध्ये अखेरच्या क्षणी युती झाल्याने शिवसेनेन अर्ज मागे घेतला. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार लांडे यांनी अर्ज मागे घेण्यासाठी प्रतिनिधी पाठविला होता. मात्र, या प्रतिनिधीकडे लांडे यांचे अधिकृत पत्र नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज दाखल करून घेण्यास नकार दिला.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मनसेचे उमेदवार राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर यांनी उमेदवारी अर्जांसोबत आपल्याकडे कोणत्याही स्वरुपाची सरकारी थकबाकी नसल्याचे प्रतिज्ञापत्र न जोडल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला होता. त्यामुळे रिंगणात दहा उमेदवार राहिले होते.
शनिवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने किती उमेदवार अर्ज मागे घेतात यावर निवडणुकीची गणिते ठरणार होती. अपक्ष तसेच बंडखोर इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी गेल्या दोन दिवसापासून पक्षश्रेष्ठींनी चांगलीच धावपळ केली होती. अखेरच्या दिवशी कोण अर्ज माघारी घेणार, आघाडी होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरले होते. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दहा पैकी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता पाच उमेदवारांमध्ये निवडणूक होणार असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टीची मते निर्णायक ठरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्वाधिक झोपडपट्ट्या आणि दाट लोकवस्तीचा अंतर्भावर असलेल्या प्रभाग क्रमांक सहामध्ये अनेक आजी माजी नगरसेवक ​निवडणुकीत आमनेसामने येणार आहेत. नव्याने तयार झालेल्या या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे वर्चस्व अधिक आहे. तरी देखील आगामी निवडणुकीत भाजपची लाट येथे उफाळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. प्रभागात राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात सरळ लढत असली तरी, आघाडी आणि युतीवर अनेक समीकरणे अवलंबून आहेत.
सध्याचा प्रभाग क्रमांक १४, १५ तसेच प्रभाग क्रमांक १६ आणि १७ चा काही भाग मिळून नवीन प्रभाग क्रमांक सहा तयार झाला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका मीना परदेशी, किशोर विटकर, काँग्रेसच्या शशिकला आरडे तर शिवसेनेचे संजय भोसले यांच्या प्रभागातील भाग नवीन प्रभागात आला आहे. प्रभागात मुस्लीम, मराठा मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. ८५ टक्के भाग हा झोपडपट्टीचा असून हरिगंगा, कुमार पर्णकुटी, कुमार आंगण, डॉ. आंबेडकर सोसायटी अशा मोठ्या सोसायट्यांचा समावेश या प्रभागात आहे. प्रभागातील लोकसंख्या ८४,९४८ असून, अनुसूचित जातीची २१ हजार तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ७०६ आहे. प्रभागात अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे.
प्रभागात काँग्रेसच्या जुन्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी आणि सेना, भाजपची युती झाल्यास निकालाची गणिते बदलू शकतात. माजी नगरसेवक संतोष आरडे, जॉन पॉल, सुनील मलके, माजी‌ स्थायी समिती अध्यक्षा संगीता देवकर, अविनाश साळवे, माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर मोझे ही नावे काँग्रेसकडून चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे माजी युवक अध्यक्ष मंगेश गोळे यांच्यासह माजी उपमहापौर शिवाजी क्षीरसागर, हनीफ शेख, रवी परदेशी, ऋषी परदेशी, रावसाहेब खंडागळे यांच्यासह काही नावांची चर्चा आहे. शिवसेनेची सर्व मदार नगरसेवक संजय भोसले, माजी नगरसेवक जानू आखाडे यांच्यासह जुन्या आजी-माजी कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. महिला सर्वसाधारण गटामधून पत्नी अ​श्विनी भोसले यांना तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न विद्यमान नगरसेवक संजय भोसले करीत आहेत. भाजपला या प्रभागात आयात उमेदवार मिळाल्यास निवडणुकीत वेगळे चित्र पहायला मिळू शकते.
या भागातून मनसेला यापूर्वी राजेंद्र एंडल यांच्या रूपाने नगरसेवकपद प्राप्त झाले होते. त्यामुळे मनसेकडून उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. शिवाय आरपीआय (आठवले गट), बसपा, एमआयएमचे देखील उमेदवार या प्रभागात उभे राहण्याची शक्यता आहे. काही पक्षाच्या इच्छुकांनी तर आतापासूनच पॅनेल तयार करून प्रचारयंत्रणा राबविण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेकडून महेश शिंदे, विशाल शेंडकर, सुनील जाधव, श्वेता चव्हाण, जानू आखाडे, संतोष शेंडगे, विलास कांबळे, विकास लोखंडे, तर भाजपकडून संतोष राजगुरु, अजय जानराव, विकास सोनवणे, संतोष पाटोळे, मनसेकडून एंडल यांच्यासह रूपेश घोलप, सादिक शेख, लक्ष्मण काते, जेमा चव्हाण, पुनाजी जगताप, अश्विनी देवकर यांची नावे चर्चेत आहेत. या प्रभागात झोपडपट्टीतील मतदारांचा कौल महत्वपूर्ण ठरणार आहे.
००००००००००
प्रभाग क्र ६
येरवडा
लोकसंख्या : ८४,९४८
आरक्षण :
अ : एससी
ब : ओबीसी (महिला)
क : महिला
ड : खुला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीचा कडाका कायम; तापमानात किंचित वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यासह राज्यातील थंडीचा मुक्काम कायम असला, तरी किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. शनिवारी पुण्यात १२.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. राज्यातील सर्वांत नीचांकी किमान तापमान नगर येथे (११.२ अंश सेल्सिअस) नोंदले गेले. पुढील दोन ते तीन दिवस थंडीची तीव्रता कायम राहील, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.
उत्तरेकडील राज्यातून थंड आणि कोरडे वारे राज्याकडे वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील थंडीचा कडाका वाढला आहे. ऑक्टोबर हीट संपल्यामुळे उन्हाचा कडाका कमी होऊन पुण्यात आता दिवसाही काहीसा गारवा जाणवत आहे. दुपारच्या वेळातही काही भागात बोचरे वारे वाहत आहेत. त्यामुळे दिवसा जाणवणारा काहीसा गारवा सायंकाळनंतर आणखी तीव्र होत आहे. सायंकाळनंतर गारवा चांगलाच वाढत असून, पहाटेही मोठ्या प्रमाणावर थंडी जाणवत आहे.
हवेत वाढलेल्या गारव्याची आणि कोवळ्या सूर्यकिरणांची मजा लुटत सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्याही वाढल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर घराबाहेर पडताना पुणेकर स्वेटर, शाली, कानटोपी, मफलर असा जामानिमा करूनच बाहेर पडत असल्याचे चित्र ​दिसत आहे. शनिवारी पुण्यात ३० अंश सेल्सिअस कमाल तर, १२.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. हे किमान तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांनी कमी होते. नाशिक येथे १२.६, सातार येथे १३.२, महाबळेश्वर येथे १६.८, सांताक्रूझ येथे १९, रत्नागिरी येथे १५.५, उस्मानाबाद येथे १३.९, अमरावती येथे १५ तर यवतमाळ येथे १५.४ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.
पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यातील थंडीची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. पुण्यातही थंडीची तीव्रता कायम राहून किमान तापमान १२ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महार रेजिमेंटच्या दोन बटालियनचा सन्मान

$
0
0

लष्करप्रमुखांच्या हस्ते राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यंदा अमृतमहोत्सव साजरा करत असलेल्या महार रेजिमेंटच्या दोन बटालियनचा नुकताच राष्ट्रपतींचा ध्वज (प्रेसिडेंशियल कलर) प्रदान करून गौरव करण्यात आला. राष्ट्रपतींच्या वतीने लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग यांनी महार रेजिमेंटच्या २० आणि २१ व्या बटालियनला राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान केला.
महार रेजिमेंटची स्थापना होऊन ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मध्य प्रदेशातील सागर येथील महार रेजिमेंटच्या रेजिमेंटल सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात हा ध्वज प्रदान करण्यात आला. महार रेजिमेंटने आतापर्यंत नऊ बॅटल ऑनर्स, १२ थिएटर ऑनर्स सन्मान, आठ लष्करप्रमुखांनी दिलेली प्रशस्तीपत्रके आणि १९ कमांडर प्रशस्तीपत्रकांसह अनेक शौर्यपदके मिळवली आहेत.
स्थापनेपासून आतापर्यंत देशसेवेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल महार रेजिमेंटच्या २० आणि २१ या दोन बटालियनला प्रतिष्ठेचा ध्वज देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग यांच्या हस्ते महार रेजिमेंटवरील पोस्टाच्या फर्स्ट डे कव्हरचे अनावरण करण्यात आले. तसेच दिवंगत लष्करप्रमुख जनरल के. व्ही. कृष्णराव यांच्यावरील पुस्तकाचे व दिवंगत मेजर आर. परमेश्वरन यांच्यावरील कादंबरीचे प्रकाशनही या वेळी झाले. अनुसुया प्रसाद परेड मैदानावर ध्वज प्रदान संचलन पार पडले. लष्करप्रमुखांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. लष्करात दाखल झाल्यानंतर अवघ्या दहाव्या दिवशी हौतात्म्य आलेल्या अनुसुया प्रसाद यांचे नाव या मैदानाला देण्यात आले आहे. लष्करातील सर्वांत तरुण महावीरचक्र विजेते प्रसाद यांना १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धात शमशेर नगर येथील लढाईत हौतात्म्य प्राप्त झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाख मिनिटांचे सर्फिंग

$
0
0

‘एसटी’च्या वायफाय सुविधेला प्रचंड प्र​तिसाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये बसविलेल्या वाय-फायचा प्रवाशांनी भरभरून लाभ घेतला. गेल्या १५ दिवसात वायफायवर एक लाख ६० हजार मिनिटे मोफत सर्फिंग केले. या सेवेला प्रवाशांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता एसटीने ही सुविधा ५० गाड्यांवरून ३२५ गाड्यांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेच्या माध्यमातून प्रवासादरम्यान चित्रपट पाहण्याला पसंती मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे.
एसटी महामंडळाने १६ ऑगस्टपासून स्वारगेट व शिवाजीनगर आगारातील ‘हिरकणी’ आणि ‘परिवर्तन’ या प्रकारातील ५० गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वाय-फाय सेवा देण्यास सुरुवात केली. या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आणखी २७५ गाड्यांमध्ये ही सेवा देण्यास सुरुवात केली आहे. ‘हिरकणी’, ‘​परिवर्तन’ पाठोपाठ आता ‘शिवनेरी’ आणि ‘शीतल’ या प्रकारच्या बसमध्येही वायफाय सुविधा देण्यात आली आहे.
खासगी प्रवासी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी एसटीमध्येही आधुनिक सोयीसुविधा देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये ‘पूश बॅक सीट’पासून ‘वायफाय’चा समावेश करण्यात आला. एसटीने ‘यंत्र मीडिया सोल्युशन’ या कंपनीशी करार करून त्यांच्याद्वारे गाड्यांमध्ये वायफाय हॉटस्पॉट बसविण्यात आली आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये १५० गाड्यांतील प्रवाशांनी १.६० लाख मिनिटे इंटरनेटचा वापर केला आहे, अशी माहिती ‘यंत्र मीडिया सोल्युशन’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
-------
पुढीलवर्षीपर्यंत सर्वच गाड्या ‘वायफाय’मय
आतापर्यंत एसटीच्या ३२५ गाड्यांमध्ये वायफाय हॉटस्पॉट बसविण्यात आले आहे. हॉटस्पॉटची कार्यपद्धती आणि त्याचा वापर याची पाहणी नोव्हेंबर अखेरपर्यंत केली जाणार आहे. गाडीतील शेवटच्या रांगेतील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना वायफायची रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारी डिसेंबरअखेरपर्यंत सोडविण्यात येणार आहे. या सेवेची पडताळणी झाल्यानंतर डिसेंबर २०१७पर्यंत एसटी महामंडळाच्या १८,९९४ गाड्यांमध्ये वायफाय हॉटस्पॉट यंत्रणा बसविण्याचे महामंडळाचे उद्दिष्ट आहे, असेही ‘यंत्र मीडिया’च्या अधिकाऱ्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सार्वजनिक सेवांची स्थिती सुधारा

$
0
0

रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची अपेक्षा; नागरी सेवांवरही भर हवा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सार्वजनिक वाहतूक, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात पुणे शहराची पीछेहाट होत आहे. एकीकडे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, दुसरीकडे आरोग्य आणि शिक्षणाची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांची वाढ खुंटल्याने सातत्याने कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहराचा स्मार्ट सिटीच्या दृष्टिने विकास करावयाचा असल्यास संबंधित क्षेत्रांचा प्राधान्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांना उपयुक्त सेवा आणि सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. या सर्वांची पूर्तता करू शकणाऱ्यांचाच झेंडा पुणे महापालिकेवर फडकला पाहिजे, अशी अपेक्षा रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
पुणे महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांसह विविध घटकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने उपलब्ध करून दिलेल्या ‘मटा जाहीरनामा’ या व्यासपीठावर रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचा अजेंडा मांडला. त्यामध्ये त्यांनी सार्वजनिक वाहतूक, आरोग्य व शिक्षणाचे सक्षमीकरण आणि मूलभूत सोयीसुविधांची निर्मिती या विषयांवर त्यांनी भर दिला.
..........
श्रीकांत आचार्य (सल्लागार, आम आदमी रिक्षा संघटना)
पुणेकर महापालिकेकडे कर भरतात. त्याचा हिशेब आणि मोबदला मिळणे हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे. महापालिकेची सर्व स्तरावर कार्यक्षमता वाढविली पाहिजे. शहर विकासाचे दीर्घकालीन नियोजन आखण्याची आवश्यकता आहे. नाहीतर, एकाच रस्त्यावर तीन ते चार वेळा नियोजन बदलून पुणेकरांचा पैसा वाया घालविला जातो. त्यामुळे अना‍श्यक कामे टाळली पाहिजेत.
शहरात वाहनांची संख्या वाढत आहे, पण, त्या तुलनेत रस्ते वाढविले आणि विकसित केले जात नाहीत. भविष्यात हा मुद्दा ज्वलंत ठरण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात प्रदूषणाचा प्रश्न भयंकर झाला आहे. पुण्यातही ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी वाहनांची वाढती संख्या रोखली पाहिजे. सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्याची आवश्यकता आहे. पीएमपी आणि ऑटो रिक्षा सेवेला सक्षम केले पाहिजे. ओला-उबेरमुळे रिक्षा चालकही अडचणीत आले आहेत. ओला-उबेरला कायदेशीर परवानगी दिल्यास, चारचाकी वाहनांची संख्या वाढून संपूर्ण शहराच्या वाहतुकीची वाट लागेल. त्याविरोधात महापालिकेने आवाज उठवला पाहिजे. शहरातील, विशेषतः मध्यवस्तीतील रस्ते खूपच अरूंद आहेत. ते विस्तारले पाहिजेत. रस्त्यांचा विचार करता शहराला पीएमपी आणि रिक्षा व्यतिरिक्त आणखी सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांची आवश्यकता नाही.
शहराला स्मार्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे. तो निधी महापालिका प्रशासन कोठून आणणार आहे?, जकात, एलबीटी रद्द केला आहे. महापालिकेला निधी कोढून मिळणार आहे? सद्य परिस्थितीत आरोग्य आणि शिक्षण या घटकांच्या सक्षमीकरणासाठी महापालिकेकडे निधी नाही. महापालिकेच्या शाळा व हॉस्पिटलची दुर्दशा झाली आहे. महापालिकेने त्याकडे पुरेसे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. असे असताना स्मार्ट सिटीसाठी पैसे कोठून आणणार, हा प्रमुख मुद्दा आहे.
.....
एकनाथ ढोले (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र वाहतूक सेना)
फूटपाथ चालताना पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होते. शहरातील बहुतांश फूटपाथ पाच ते सात मीटरचे आहेत. सर्वप्रथम त्यांची रुंदी वाढवली पाहिजे. तसेच, बहुतांश फूटपाथवर अतिक्रमणे झालेली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच चालावे लागते. रस्त्यावरून चालण्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. पुण्यासारख्या महानगरात ही अशोभनीय बाब आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी वाढविताना फूटपाथदेखील वाढविले पाहिजेत. शहरात दररोज हजारो वाहनांची भर पडत आहे. त्यातुलनेत रस्ते, पार्किंगची व्यवस्था नाही. शहराच्या मध्यवस्तीतील ९० टक्के वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. ज्यांच्याकडे गाडी लावण्यासाठी स्वतःची जागा उपलब्ध असेल, त्यांनाच गाडी खरेदी करण्याचा अधिकार द्यावा किंवा गाडी खरेदी करताना पार्किंगच्या जागेचा प्रश्न सोडवावा, असे धोरण महापालिकेने अवलंबिले पाहिजे. उद्यानांची परिस्थिती बिकट आहे. अपवाद वगळता सर्वच उद्यानांतील खेळणी नादुरुस्त आहेत. तेथे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष नाही. काही ठिकाणी मुबलक पाणी, तर काही पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे पाण्याचे एकसमान वाटप होणे गरजेचे आहे. तसेच, मीटरद्वारे प्रीपेड पद्धतीने पाणी पुरवठा करणे शक्य आहे का, याचाही विचार झाला पाहिजे. शहराची वाटचाल पाहता येत्या काळात प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्याची चिन्हे आहेत. प्रदूषणामुळे मुठा नदी, तसेच शहरातील नाल्यांचे अस्तित्व मिटले आहे. ते पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शहरातील एक थेंबही सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत सोडण्यावर बंदी घातली पाहिजे. तसेच, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अत्याधुनिक प्रक्रियेचा अवलंब केला पाहिजे.
......
बापू भावे (खजिनदार, रिक्षा फेडरेशन)
रिक्षाचालक गेल्या अनेक वर्षांपासून सेवाभावी वृत्तीने पुणेकरांची सेवा करीत आहेत. बहुतांश रिक्षा चालकांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांना स्वतःचे घर घेणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी महापालिकेने ‘एसआरए’च्या धर्तीवर घरकुल योजना राबविली पाहिजे. उपनगरांमध्ये अशा प्रकारच्या योजना राबविणे शक्य आहे. शहराच्या विस्ताराप्रमाणे रिक्षा स्टँड उपलब्ध करून दिले पाहिजेत. उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे. शहर विकासाचे नियोजन करताना उपनगरत रिक्षा स्टँडना परवानगी दिली पाहिजे. अनेक रिक्षा चालकांना स्टँडवर थांबण्यासाठी जागा मिळत नाही. शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. रस्त्यांचे रुंदीकरण करणे अत्यावश्यक आहे. जोपर्यंत वाहतुकीचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत महापालिकेने प्रभावी योजना राबविली पाहिजे. गर्दीच्या वेळेला शहरातील महत्त्वाच्या व कायम गजबजलेल्या असणाऱ्या रस्त्यांवर केवळ सार्वजनिक वाहतुकीला परवानगी द्यावी.
.......
सिद्धार्थ चव्हाण (प्रतिनिधी, रिक्षा पंचायत)
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने वाहनांची संख्या खूप वाढली आहे. लोकसंख्येचा विचार करता शहरातील रिक्षा स्टँडही अपुरे पडत आहेत. पीएमपी शहराची जीवनरेखा आहे. पीएमपी पाठोपाठ रिक्षातून दररोज पाच ते १० लाख प्रवासी प्रवास करतात. म्हणजेच, सार्वजनिक वाहतुकीत रिक्षा हा मोठा घटक आहे. गेली ४३ वर्षे रिक्षा चालक पुण्यात सेवा देत आहेत. महापालिकेने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. महापालिकेने आता रिक्षा चालकांसाठी घरकुल व शहरात रिक्षा भवन बांधावे. तसेच, रिक्षाच्या पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे. ९५ टक्के रिक्षा रस्त्यावरच उभ्या कराव्या लागतात. सार्वजनिक पार्किंग व्यवस्थेत, मॉलमध्ये रिक्षा पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही. महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले पाहिजे.
.......
काय करायला हवे !
रिक्षासाठी सीएनजी पंपांची संख्या वाढवावी.
रिक्षाचालकांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी.
ओला-उबेरच्या माध्यमातून मोठ्या संख्येने येऊ घातलेल्या चारचाकी वाहनांना विरोध करावा
रस्त्यांची रुंदी वाढवावी, सार्वजनिक वाहतूक सक्षम करावी.
रिक्षा चालकांसाठी घरकूल योजना राबवावी.
महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी योजना राबवावी.
महापालिकेच्या दवाखान्यांचा दर्जा सुधारा.
..........
उपलब्ध असलेल्या सुविधा रेटिंग
१) पाणी ७
२) सांडपाणी ६
३) सार्वजनिक वाहतूक ४
४) सार्वजनिक आरोग्य (स्वच्छता आणि आरोग्य सुविधा-दवाखाने वगैरे) २
५)उद्याने- करमणूक ४
६)महापालिका शाळा ३
७)कर आकारणी ३
८)पार्किंग २
९)रस्ते- फूटपाथ ४
१०)-स्मार्ट सिटी ३
..............
महापालिकेकडून अपेक्षित कामांचा प्राधान्यक्रम
१) पाणी २
२) सांडपाणी ५
३) सार्वजनिक वाहतूक १
४) सार्वजनिक आरोग्य ४
५) उद्याने- करमणूक ६
६) महापालिका शाळा ३
७) कर आकारणी ९
८) पार्किंग ८
९) रस्ते-फूटपाथ ७
१०) स्मार्ट सिटी १०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विठ्ठल कामत यांच्या ‘ऑर्किड’वर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेचा मिळकत कर थकविल्याबद्दल प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांच्या बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किडवर शनिवारी पालिकेकडून जप्तीची कारवाई करण्यात आली. पालिकेने सुरू केलेल्या या मोहिमेअंतर्गत गेल्या १५ दिवसांत दहा मिळकतींना सील ठोकण्याची कारवाई केली आहे.

हॉटेल ऑर्किडने चार वर्षांपासून १२ कोटींची थकबाकी भरलेली नव्हती. त्यांना वेळोवेळी नोटिसा बजावूनही थकबाकी भरली जात नसल्याने अखेर पालिका प्रशासनाकडून शनिवारी या हॉटेलला सील ठोकून त्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. पालिकेने दोन दिवसांपूर्वी कोरेगाव पार्क येथील रेस्टॉरंट अँड बार, डार्क हाउस यासह ४ मिळकती सील करून त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवतांच्या मूर्ती, वीरगळांची तस्करी

$
0
0

Chaitrali.Chandorkar@timesgroup.com
Tweet : @ChaitralicMT

पुणे : महाराष्ट्राच्या संपन्न शिल्पकलेचा वारसा सांगणाऱ्या देवतांच्या मूर्ती, शूरवीरांची स्मृतिचिन्हे समजले जाणारे आणि उघड्या आकाशाखाली पडून असणारे वीरगळ, तसेच भग्न मूर्ती या गोष्टी आता आलिशान बंगले आणि फार्म-हाउस, तसेच हॉटेलची शान वाढवू लागल्या आहेत. समाजकंटकांनी या वारशाला तस्करीच्या विश्वात आणून त्याद्वारे लाखो रुपयांच्या कमाईचा उद्योग सुरू केला आहे. सरकारदरबारी यांची नोंदच नसल्याचा फायदा उठवला जात आहे. तस्करी मार्केटमध्ये या वस्तू येणे म्हणजे उघड चोरीच ठरते आहे.

दिवेआगर येथील सुवर्णगणेश असो किंवा कंधार किल्ल्यातील विष्णुमूर्तीच्या चोरीचे प्रकरण, पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेल्या अशा घटना मोजक्याच आहेत. प्रत्यक्षात मात्र राज्याच्या ग्रामीण भागातून सध्या अशा अनेक मूर्ती मोठ्या प्रमाणात गायब होत आहेत. या वारशावर डोळा ठेवून असणारे तस्करांचे रॅकेट आता दुर्गम भागातही सक्रिय झाले आहे. या वारशाशी कुणालाच देणे-घेणे नसल्याचा फायदा हे चोरटे उठवत आहेत.

आंतरराष्ट्रीय काळ्या बाजाराशी संबंध असलेल्या तस्करांच्या टोळ्याच यामागे असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. याबद्दल बोलताना वारसा अभ्यासक साईली पलांडे-दातार म्हणाल्या, ‘दुर्दैवाने मंदिराबाहेर किंवा नागरिकांच्या अंगणात असलेल्या मूर्तींची नोंद सरकारकडे नाही. प्रश्नोत्तरांचा मनस्ताप नको म्हणून मूर्ती चोरीला गेल्यावर गावकरी पोलिसांकडे तक्रार नोंदवत नाहीत. शहरातील मंडळी ‘तुमच्या दारातील मूर्ती आम्हाला विकत देता का,’ अशी थेट मागणीही करतात. नागरिकांनी वंशपरंपरेनुसार आलेल्या ऐतिहासिक वस्तूंची सरकारकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे; पण त्याबाबतही लोक उदासीन आहेत.’

तक्रारींकडे दुर्लक्ष

भग्नावस्थेतील मूर्तीची पूजा करायची नाही, अशी प्रथा असल्याने अनेक गावांमध्ये शेकडो वर्षे जुन्या रेखीव, सुबक मूर्ती माळरानांवर वर्षानुवर्षे ठेवलेल्या असतात. आत्तापर्यंत कोणत्याही पहाऱ्याशिवाय त्या सुरक्षित होत्या. गावकरी जाता येता वीरगळी, मूर्तींवर नजर ठेवायचे. गिर्यारोहकांनाही कोणत्या आणि किती मूर्ती आहेत याची माहिती होती. सध्या अनेक किल्ले आणि मंदिरांजवळील काही वीरगळ, मूर्ती कमी झाल्याचे ऐकायला येते आहे. यासंदर्भात किल्लाप्रेमींनी पुरातत्व विभागाकडे तक्रार केल्या आहेत, पण ही बाब त्यांच्या अखत्यारित नसल्याचे सांगून अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याची बाब इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठल कामत यांच्या 'ऑर्किड'वर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महापालिकेचा मिळकत कर थकविल्याबद्दल प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांच्या बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किडवर शनिवारी पालिकेकडून जप्तीची कारवाई करण्यात आली. पालिकेने सुरू केलेल्या या मोहिमेअंतर्गत गेल्या १५ दिवसांत दहा मिळकतींना सील ठोकण्याची कारवाई केली आहे.

हॉटेल ऑर्किडने चार वर्षांपासून १२ कोटींची थकबाकी भरलेली नव्हती. त्यांना वेळोवेळी नोटिसा बजावूनही थकबाकी भरली जात नसल्याने अखेर पालिका प्रशासनाकडून शनिवारी या हॉटेलला सील ठोकून त्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. पालिकेने दोन दिवसांपूर्वी कोरेगाव पार्क येथील रेस्टॉरंट अँड बार, डार्क हाउस यासह ४ मिळकती सील करून त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अचानक हृदयविकार होतो कसा?

$
0
0

Mustafa.Attar@timesgroup.com
Tweet: mustafaattarMT

पुणे : अचानक आलेल्या ‘हार्ट अॅटॅक’मुळे दोन प्रतिष्ठित व्यक्तींचा नुकताच मृत्यू झाला. या घटनांमधून अचानक ‘हार्ट अॅटॅक’ कसा येतो, याकडे वैद्यकविश्वाचे लक्ष वेधले आहे. प्रामुख्याने या संदर्भात हृदयरोगतज्ज्ञांनी विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे. हृदयविकाराचा झटका आणि ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ हे दोन वेगळे प्रकार आहेत. अचानक एखादी व्यक्ती मृत्यू पावते, तिला हृदयविकाराचा झटका आल्याचे म्हटले जाते. पण, त्याला झटका नसून त्याला ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ आल्याचे म्हटले जाते.

भारतातील अनेकांना ‘कार्डियाक अरेस्ट’ आणि ‘तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका’ यांतील फरक माहिती नाही. भारतात सुमारे २५ लाख नागरिक हे ‘सडन कार्डियाक अरेस्ट’चे पेशंट आहेत. एका टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात नागरिक हे हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडतात. हार्ट अॅटॅक आणि ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ यातील फरक जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

हार्ट अॅटॅक

कोलेस्टरॉलचे रक्तवाहिनीत प्रमाण आढळल्याने त्यामुळे वाहिनीला जखम होते. रक्त गोठते आणि रक्तपुरवठा होत नाही. तो सुरळीत न झाल्याने हृदयाच्या स्नायूंना प्राणवायू (ऑक्सिजन) मिळत नाही. पेशंटला त्वरित उपचार किंवा वैद्यकीय मदत मिळाल्यास तो वाचू शकतो.

सडन कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय?

हृदयाच्या ठोक्याची लय बिघडते. हृदयाचे ठोके जलद गतीने पडू लागतात. अशा परिस्थितीत अचानक शुद्ध हरपते आणि हृदयाची क्रिया बंद होते. लवकर उपचार न मिळाल्यास काही सेकंदातच मृत्यू अटळ असतो.

सडन कार्डियाक अरेस्टची लक्षणे

‘सडन कार्डियाक अरेस्ट’ येण्याची काही विशेष लक्षणे नसतात. अचानक शुद्ध हरपणे, श्वास बंद होणे, रक्तदाब आणि नाडी न लागणे ही प्रामुख्याने लक्षणे मानली जातात. अचानक हृदय बंद पडले, तर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचविणे गरजेचे आहे. तसे झाल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. अशा वेळी अॅम्ब्युलन्स अथवा वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्या पेशंटच्या हृदयाचे पंपिंग सुरू ठेवण्याचा प्रयत्न करावा, म्हणजेच ‘कार्डिओ पल्मनरी रिसीटेशन’ (सीपीआर) पद्धतीने उपचार सुरू ठेवावेत. ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात पपिंग करणारे नैसर्गिक पेसमेकर प्रकारचा एक घटक असतो. त्यात बिघाड झाल्यास हृदयाचे ठोके वाढतात. हृदयाचे पंपिंग बंद होऊन पेशंटचा मृत्यू होतो.

‘सडन कार्डियाक अरेस्ट’चे पेशंट कोण?

‘सडन कार्डियाक अरेस्ट’चा पूर्वी कोणाला धोका पोहोचला असेल, तर त्या व्यक्तीचे हृदय हे ३५ टक्क्यांपेक्षा कमी चालते. एखाद्याच्या कुटुंबात अशा प्रकारे मृत्यू झाल्याची घटना पूर्वी घडली असल्यास, अशा व्यक्तीला ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ येण्याची शक्यता अधिक असते.

‘सडन कार्डियाक अरेस्ट’ कसा टाळू शकतो?

पुण्यासह महाराष्ट्रात ‘सडन कार्डियाक अरेस्ट’बाबत फारशी जनजागृती नाही. साधा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पेशंटवर प्रथमोपचार काय करावेत, याबाबत फारसे ज्ञान नाही. त्याबाबत माहिती नसल्याने वैद्यकीय उपचारांची वाट पाहावी लागतो. तोपर्यंत ‘गोल्डन अवर्स’चा वेळ निघून गेल्याने पेशंट उपचारांअभावी दगावतो. त्याकरिताच अशा पेशंटचे प्राण वाचवायचे असतील, तर हृदयाचे पपिंग करणे, शॉक देण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

... तर जीवदान मिळू शकते

अमेरिकेप्रमाणे पुण्यासह भारतात ‘सीपीआर’चे प्रशिक्षण देण्याची गरज.

हृदयविकाराच्या पेशंटला प्रथमोपचार मिळाल्यास ४० टक्के पेशंट वाचू शकतात.

आरोग्यदायी जीवनशैली हवी.

अनुवंशिकता, जन्मतः दोष असल्यास सडन कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो.

सीपीआरबाबत जनजागृती वाढविण्याची गरज.

हृदयविकार, ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ टाळण्यासाठी नियमित तपासणी आवश्यक.



‘सडन कार्डियाक अरेस्ट’ किंवा हृदयविकाराचा झटका आल्यास पेशंटला तातडीने ‘सीपीआर’ देण्याची गरज असते. त्या करिता कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते सामान्य व्यक्तींनादेखील हृदयाचे पपिंग कसे करावे, श्वासोच्छवास कसा द्यावा याबाबत प्रशिक्षित करण्याची आवश्यकता आहे. याबाबत जागृती झाल्यास ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ आलेल्या पेशंटना वाचविणे शक्य आहे.

डॉ. ऋतूपर्ण शिंदे, हृदयरोगतज्ज्ञ, संजीवनी हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूत्रपिंडाच्या आजाराच्या जनजागृतीसाठी...

$
0
0

पुणे : पूर्वी हाताच्या बोटावर मोजता येणारे मूत्रपिंड रोगतज्ज्ञ शहरात होते. आता ही संख्या दोन आकडी झाली आहे. पूर्वी एकमेकांना प्रॅक्टिस करताना येणारे अनुभव शेअर करावेत. गप्पा माराव्यात. ज्ञानांची देवाणघेवाण व्हावी, यासाठी शहरातील मूत्रपिंड रोगतज्ज्ञ एकमेकांना भेटायचे. सुमारे पंधरा वर्षांपासून हा उपक्रम उपक्रम सुरू आहे. त्या उपक्रमाला आता संस्थात्मक स्वरूपाचा आकार येत आहे. मूत्रपिंड रोगतज्ज्ञांची राष्ट्रीय पातळीवर ‘इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी’ ही संघटना कार्यरत आहे. त्या संघटनेच्या छत्र छायेखाली पुणे शाखेची काही वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली. त्याला अधिकृत मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.

‘इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी’ या संघटनेची पुणे शाखा म्हणून पुण्यातील काही मूत्रपिंड रोगतज्ज्ञांनी एकत्र येऊन ही शाखा स्थापन केली. त्यात काही वर्षांपासून मूत्रपिंड रोगतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास अंबिके, डॉ. डी. बी. कदम, डॉ. अनिल गोडबोले, डॉ. व्हॅलेंटाइन लोबो यांसारख्या तज्ज्ञांनी पुढाकार घेतला. आता या शाखेच्या माध्यमातून पुण्यात मूत्रपिंड रोगाच्या आजाराबाबत जागृती करण्यासंदर्भात उपक्रम राबविले जात आहेत.

मूत्रपिंड रोगशास्त्रात नवे येणारे बदल, नवे तंत्र, नव्या थेरपी यांसंदर्भात संघटनेच्या बैठकांमध्ये चर्चा होते. त्यातून ज्ञानाचे देवाणघेवाण केले जाते. विविध परिषदांचे आयोजनदेखील केले जाते. मूत्रपिंड रोगशास्त्रात विविध उपशाखा आहेत. त्या शाखांमध्ये डायलिसिस करणाऱ्या तंत्रज्ञांना अद्ययावत करणे, त्यांना विविध प्रकारचे तंत्र शिकविणे यासारख्या गोष्टींवर भर दिला जात आहे. ट्रान्सप्लांट अर्थात अवयव प्रत्यारोपण ही नवी शाखा आली आहे. त्याबाबत पेशंट, दात्यामध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरात मूत्रपिंड रोगतज्ज्ञांसह डायलिसिस सेंटर वाढत आहेत. त्यातील डायलिसिस टेक्निशियनसाठी वैद्यकीय निरंतर शिक्षणाचे (सीएमई) आयोजन, त्याशिवाय, पॅरामेडिकल स्टाफना प्रशिक्षण देण्याबाबतचे उपक्रम राबविले जात आहेत. शहरात आजमितीला सुमारे पंचवीसहून अधिक मूत्रपिंड रोगतज्ज्ञ कार्यरत असले, तरी सध्या शाखेची सदस्यसंख्या कमी आहे. शाखेची अधिकृत मान्यता झाल्यानंतर त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images