Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्यात 'कर्णा'वतार; सगळी संपत्ती देशाला अर्पण!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

आजच्या युगात 'दाता भवति वा न वा' या उक्तीचा प्रत्यय अनेकदा येत असला, तरी आपली कवचकुंडलं काढून देणाऱ्या महाभारतातील कर्णाचे अवतारही काही वेळा पाहायला मिळतात. पुण्यातील प्रकाश केळकर हे असेच आधुनिक कर्ण म्हणावे लागतील. कारण, या दानशूर आजोबांनी आपली सर्व संपत्ती, सुमारे १ कोटी रुपये देशाला अर्पण केले आहेत. मातृभूमीचं संरक्षण करणारे जवान आणि काळ्या मातीची सेवा करणाऱ्या बळीराजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी नम्रपणे सांगितलं.

प्रकाश केळकर हे मूळचे अहमदनगरचे. टेक्सटाइल मिलना कापूस पुरवण्याचा व्यवसाय त्यांनी अनेक वर्षं केला. निवृत्तीनंतर ते पत्नी दीपासह पुण्यात स्थायिक झाले. आज ते ७३ वर्षांचे आहेत. अलीकडेच त्यांनी आपल्या पत्नीशी चर्चा करून मृत्यूपत्र तयार केलं. त्यात, मृत्यूपश्चात आपल्या संपत्तीतील ३० टक्के वाटा सैनिक आणि शेतकऱ्यांना, ३० टक्के पंतप्रधान साहाय्यता निधीला ३० टक्के वाटा मुख्यमंत्री साहाय्यता निधीला आणि १० टक्के रक्कम पाच स्वयंसेवी संस्थांना द्यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

कामानिमित्त शेतकऱ्याचं आयुष्य मी अगदी जवळून पाहिलं. त्यांच्या व्यथा-वेदना-पिळवणूक-असहायता पाहून अस्वस्थ व्हायचो. तसंच, देशाच्या सैनिकांकडे होणारं दुर्लक्षही मनाला टोचायचं. ज्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत, दोन घास खाऊ शकतोय, त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या ४० कुटुंबांना मी प्रत्येकी पाच हजार रुपये दिले होते. पण, तो खारीचा वाटा होता. त्यामुळे आता मृत्यूनंतर माझी संपूर्ण संपत्ती देशाला अर्पण करायचा निर्णय मी घेतला आहे, अशा हृदयस्पर्शी भावना प्रकाश केळकर यांनी व्यक्त केल्या. 'जय जवान, जय किसान' असा नारा आपण देतो. पण, देशातल्या शेतकऱ्यांसाठी आणि लष्करांच्या जवानांसाठी काम करणारं सरकार अजून तरी सत्तेत आलेलंच नाही, असं परखड मतही त्यांनी मांडलं.

जिवंत असेपर्यंत शेतकरी आणि सैनिकांना शक्य तेवढी मदत करण्याचा आणि मृत्यूनंतर सारं काही त्यांनाच देऊन टाकण्याचा केळकर काकांचा विचार खूपच उदात्त आहे. आपल्या या निर्णयामुळे आणखी काही लोक सैनिक आणि शेतकऱ्यांसाठी पुढे आले तर हे दान सत्कारणी लागलं, असं मी मानेन, असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हातभट्ट्या, मटका-जुगार कायदेशीर करा: आठवले

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त | लोणावळा

सरकारने अवैध धंद्यांना कायदेशीर परवानगी दिली पाहिजे, अशी अजब मागणी खुद्द सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. लोणावळ्यात वॅक्स म्युझियममध्ये आठवलेंचा पुतळा ठेवला जाणार आहे. या कार्यक्रमानिमित्त ते लोणावळ्याला आले असता त्यांनी ही मागणी केली.

राज्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांमध्ये तरुण मोठ्या प्रमाणात काम करतात. त्यामुळे हे अवैध धंदे बंद केले तरी पुन्हा सुरु होतात. यावर उपाय म्हणून आठवलेंनी अशा प्रकारच्या धंद्यांना कायदेशीर परवानगी द्यावी. अनेक ठिकाणी जे ऑनलाइन मटका अड्डे सुरु आहेत. त्यांना 'महालॉटरी'च्या नावाने सुरू ठेवावे, असेही आठवले म्हणाले.

हातभट्ट्या लोकांना आवडतात म्हणून त्या बंद होत नाहीत. त्यामुळेच त्याला इंग्रजी आणि देशी दारू प्रमाणे परवाना द्यावा, असेही आठवलेंनी सांगितले. या अवैध धंद्यात लाखो तरुण गुंतले आहेत. त्यातून पोलिसांना लाखो रुपयांचा हप्ता मिळतो. हे धंदे जर कायदेशीर केले तर सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल, असा युक्तीवाद त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतंत्र पोलिस आयुक्तालयासंदर्भात मंत्रालयात आज बैठक

$
0
0

Rohit.Athavale@timesgroup.com
Tweet - @AthavaleRohitMT
पिंपरी : पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरू करण्याबाबत हालचालींना पुन्हा वेग आला आहे. पुणे शहर पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांना या संदर्भात मंत्रालयात होणाऱ्या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. शनिवारी (५ नोव्हेंबर) अतिरिक्त मुख्य सचिव गृहविभाग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, तत्पूर्वी उपायुक्त अरविंद चावरिया यांच्याकडून गुरुवारी (४ नोव्हेंबर) पिंपरी-चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाच्या इमारतीची पाहणी करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी; तसेच वाढते शहरीकरण या पार्श्वभूमीवर ​पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची गरज असल्याची बाब ‘मटा’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केली होती. गेल्या वर्षी ‘पुणे सुपर फास्ट’ कार्यक्रमात फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली होती. त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि ‘मटा’ने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अति उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र आयुक्तालयाच्या रचनेबाबत चर्चा केली होती. तसेच, ४ एप्रिलला या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती.
तत्पूर्वी स्वतंत्र आयुक्तालयाचा आराखडा आणि जागेचा शोध सुरू करण्यात आला होता. औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. स्वतंत्र आयुक्तालय सुरू करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशावरून ही समिती गठित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवडसह कोल्हापूर आणि मीरा-भाईंदर येथे स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. जानेवारी महिन्यात स्वतंत्र आयुक्तालय कार्यान्वित होईल असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
नवनगर विकास प्राधिकरणाच्या इमारतीमधील पाच मजले पोलिसांकडून पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तालयासाठी मागण्यात आले आहेत. एक-दोन मजले मिळाल्यास आयुक्तालय सुरू करण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सध्या या इमारतीत शिल्लक असलेले पाचही मजले मिळावे यासाठी पुणे आयुक्तालयातील अधिकारी प्रयत्न करीत आहेत. पोलिस उपायुक्त (मुख्यालय) अरविंद चावरिया यांनी गुरुवारी या इमारतीची पाहणी केली. आयुक्तालयासह मुख्यालयासाठी मोकळ्या पटांगणाची देखील गरज आहे. शहरात आज नवनगर विकास प्राधिकरणासह एमआयडीसीचे काही भूखंड शिल्लक आहेत. त्यांच्याकडून मुख्यालयासाठी जागा मिळाल्यास आयुक्तालय लवकर सुरू होऊ शकते.
स्वतंत्र आयुक्तालय सुरू करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च अपेक्षित असल्याचा अहवाल पुणे पोलिस आयुक्तांनी गृहविभागाला दिला आहे. ‘मटा’ने आयोजिक केलेल्या ‘पुणे सुपरफास्ट’ कार्यक्रमात राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाच्या उभारणीसाठी महानगरपालिकेने खर्चाचा भार उचलण्याची तयारी दर्शवावी असे आवाहन केले होते. त्यानंतर महापौर व तिन्ही आमदारांनी त्याला पाठिंबा तर दिलाच होता. पण सर्वपक्षीय शहराध्यक्षांनीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सहकार्य करण्याची भूमिका स्वीकारली.
...
हद्द निश्चित
सध्या पिंपरी-चिंचवडसाठीच्या आयुक्तालयाची हद्दी निश्चिती हा विषय जवळपास संपला आहे. लोणीकाळभोर, लोणीकंद, हवेली ही ग्रामीण पोलिस दलातील पोलिस ठाणी पुणे आयुक्तालयाला, तर चाकण, आळंदी, देहूरोड, तळेगाव ही पोलिस ठाणी स्वतंत्र आयुक्तालयाला जोडण्यात येण्याची शक्यता आहे. एकंदरीत विचार करता स्वतंत्र आयुक्तालय झाल्यावर दोन्ही आयुक्तालयाच्या हद्दीचा विस्तार होणार असून, चार/तीन परिमंडळ राहतील असे नियोजन होणार असल्याचे समजते.
---
अशी आहे समिती
पुणे शहर पोलिसांच्या प्रशासन विभागाचा अतिरिक्त कार्यभार असणाऱ्या अप्पर पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. स्वतंत्र आयुक्तालयासाठी पिंपरी-चिंचवडचे (पोलिस परिमंडळ तीन) उपायुक्त डॉ. बसवराज तेली, मुख्यालयाचे उपायुक्त अरविंद चावरिया, पिंपरी विभागाचे सहायक आयुक्त राम मांडुरके, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुरेश भोसले, निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार पळसुले, हिंजवडीचे वरिष्ठ निरीक्षक अरुण वायकर तसेच प्रशासन विभाग, मानव संसाधन विभाग, विशेष शाखा, वाहतूक शाखा (प्रशासन), बिनतारी संदेश विभाग, मोटार वाहन विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त आणि बीडीडीएस, क्युआरटी, मुख्यालयाचे वरिष्ठ निरीक्षक, पोलिस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, लेखा शाखा, अभिलेख शाखा, आस्थापना शाखा, पत्रव्यवहार शाखा, शस्त्रपरवाना शाखा, इमारत शाखेच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी’वर उद्योजकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘जीएसटी’चे दर अखेर गुरुवारी (३ नोव्हेंबर) निश्चित झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्या वेळी उद्योजकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ही नवी कर प्रणाली एक एप्रिल २०१७पासून लागू करण्याचा सरकारचा मानस आहे. जीएसटी लागू झाल्यावर मोबाइल आणि टेलिफोन बिल, मोबाइल, अन्न, छोटी वाहने, दागिने, कुरिअर पाठवणे महागण्याची शक्यता आहे. कपडे, मोठ्या मोटारी, फर्निचर, इलेक्ट्रानिक वस्तू, सिमेंट स्वस्त होऊ शकतात.
...
उद्योजकांसाठी दर उत्तम
केंद्र सरकारने जाहीर केलेले दर उद्योजकांसाठी चांगले आहेत. सरकारचे उद्योजकासाठीचे धोरण उद्योजकांना चालना देणारे आहे. उद्योजकांना याचा निश्चित फायदा होईल. पूर्वी २६ टक्के कर आकाराला जात होता. सध्या उद्योजकासाठी १२ ते १८ टक्के कर आकाराला जाणार आहे. त्यामुळे उद्योजकांना एकच कर भरावा लागणार आहे. या दरामुळे औद्योगिकनगरीतून बाहेर गेलेले अनेक मोठे उद्योग परत येतील. केंद्र सरकराच्या या दराचा उद्योजकांना फायदा होणार असल्याचे मत लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी व्यक्त केले आणि या दरांचे स्वागत केले आहे.
...
आठ दिवसांची मुदत
केंद्र सरकारने ‘जीएसटी’चे दर निश्चित केले आहेत. सोन्या-चांदीसाठी किती दर आहे, हे निश्चित नाही. सोन्यासाठी चार टक्के ‘जीएसटी’ लागू करण्यात येण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, त्यावर एकमत झालेले नाही. सोन्या-चांदीच्या दराबाबत आठ दिवसांनंतर स्पष्टता येईल. त्यानंतर त्यावर अधिक बोलणे उचित होईल, अशी माहिती ज्वेलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
...
उद्योग पुन्हा शहरात येतील
‘उद्योजकांना नेमका किती कर भरावा लागणार हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, विक्रीदर समान असणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजक बाहेर जाणार नाहीत. स्थांलातरित झालेले उद्योग परत शहरात येण्याची आशा वाढली आहे,’ असे मत लघुउद्योजक संघटनेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांनी व्यक्त केले आहे.
..
‘जीएसटी’चे दर अयोग्य
‘केंद्र सरकारने ‘जीएसटी’चे दर निश्चित केले आहेत. ‘जीएसटी’चे लागू केलेले दर योग्य नाहीत. या दरामुळे छोट्या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. दुसरीकडे मोठ्या व्यापाऱ्यांचा मात्र फायदा होणार आहे. जीएसटी कर का लावला, कर नेमके किती असणार हे सरकारने अद्याप स्पष्ट केले नाही. त्यामुळे दर निश्चित झाल्यावर याच्यावर अधिक बोलू,’ असे पिंपरी-रेडिमेड होलसेल असोशिएनचे अध्यक्ष महेश मोटवानी यांनी सांगितले.०००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत २५९ कोटींचा मिळकतकर वसूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाने ऑक्टोबरअखेर २५९ कोटी दोन लाख रुपये मिळकतकराची वसुली केली आहे. ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ कोटी ३१ लाख रुपयांनी अधिक आहे, अशी माहिती सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
महापालिकेच्या हद्दीत सुमारे सव्वाचार लाखांहून अधिक मिळकती आहेत. थकीत मिळकतधारकांकडून कर वसुलीसाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न होत आहेत. परंतु, शंभर टक्के यश मिळालेले नाही. त्यामुळे पाच लाख रुपयांवरील थकबाकीदारांना नोटीस बजाविणे, प्रशासन अधिकारी, सहाय्यक मंडलाधिकारी आणि गटप्रमुख यांनी घरभेटी देऊन नियमितपणे पाठपुरावा करणे, या अनुषंगाने प्रयत्न होत आहेत. थकबाकीदारांच्या घरांसमोर बॅँड वाजविण्याचा निर्णय गेल्या काही वर्षांपूर्वी प्रशासनाने घेतला होता. परंतु, त्याला तीव्र विरोध झाला. त्यामुळे निर्णय मागे घेणे प्रशासनास भाग पडले होते. या वर्षी प्रभावीपणे वसुली मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे मिळकतकर वसुलीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली, असा दावा गावडे यांनी केला आहे.
मिळकतकराचा रोख आणि डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा एक लाख ३२ हजार, चेकद्वारे ३६ हजार ३०० आणि ऑनलाइनद्वारे ७० हजार ३०० मिळकतधारकांनी भरला आहे. ३० सप्टेंबरअखेर थकबाकीसह पहिल्या सहामाहीची रक्कम भरणा न केलेल्या मिळकतधारकांना दोन टक्के दरमहा दराने शास्तीकर आकारण्यात येणार आहे. तसेच ३१ डिसेंबर २०१६ अखेर दुसऱ्या सहामाहीची रक्कम भरणा न केल्यास दुसऱ्या सहामाही रकमेवर शास्तीची आकारणी करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
थकबाकी असलेल्या सर्व मिळकतधारकांना नोव्हेंबर महिन्यात मागणीपत्र बजावण्यात येणआर आहे. चालू आर्थिक वर्षात जप्ती अधिपत्र बजाविण्यात आलेल्या थकबाकीदारांनी अद्यापही मिळकतकराचा भरणा केलेला नाही, अशा थकबाकीदारांच्या मिळकतींची जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-वाराणसी गाडीला तब्बल २८ तास उशीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नियोजित वेळेनुसार पुण्याहून गुरुवारी सकाळी सुटणारी पुणे-वाराणसी ही हॉलिडे स्पेशल रेल्वेगाडी तब्बल २८ तास उशिराने सोडण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. गुरुवारी सकाळी नऊ वाजतापासून शुक्रवारी दुपारपर्यंत प्रवाशांना ताटकळत रहावे लागले. परिणामी, रेल्वे स्टेशनवर नेहमीपेक्षा अधिक गर्दी होऊन प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. तसेच, रेल्वे प्रशासनाकडून तीन वेळेला गाडीच्या वेळेबाबत चुकीची माहिती दिल्याने प्रवासी संतप्त झाले होते.

उत्तर भारतात छट पूजेसाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे मध्ये रेल्वेने पुणे-वाराणसी आणि पुणे-जम्मूतावी या ‘हॉलिडे स्पेशल’ गाड्या सुरू केल्या आहेत. यामध्ये जम्मूतावी-पुणे ही गाडी पुण्याला आल्यानंतर, तिच गाडी पुण्याहून वाराणसीला जाते. बुधवारी पुण्यात दाखल होणारी गाडी तब्बल ३६ तास उशिराने आल्याने वाराणसी गाडी सोडण्यास विलंब झाल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

जम्मूतावी-पुणे गाडी बुधवारी रात्री नऊ वाजून १५ मिनिटांनी पुणे स्टेशनला येणे अपेक्षित होते. मात्र, ती शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास पुणे स्टेशनवर आली. त्यानंतर या गाडीची सफासाफाई करण्यात आली. त्यानंतर प्रवासासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यात आली. गाडीत पाणी भरण्यात आले. त्यानंतर दुपारी दोन वाजून १५ मिनिटांनी गाडी सोडण्यात आली.

रेल्वे प्रशासनाने आम्हा प्रवाशांना कोणतीही मदत केली नाही. ‘गाडीला उशीर होणार असल्याची माहिती एसएमएसद्वारे पाठवली नाही. शहराबाहेरून आम्ही पुणे स्टेशनला आलो. त्यामुळे २८ तास आम्ही येथेच प्लॅटफॉर्मवर आहोत. आमच्यासाठी कसलीही व्यवस्था करण्यात आली नाही,’ अशी खंत प्रवाशांनी व्यक्त केली. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून सोडल्या जाणाऱ्या स्पेशल गाड्यांना नेहमीच उशीर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बुधवारी रात्री पुण्यात दाखल होणाऱ्या जम्मूतावी-पुणे गाडीला सिग्नल न मिळाल्याने या गाडीला ३६ तास तास उशीर झाला. त्यामुळे या गाडीतील प्रवाशांना जेवन व खाण्या-पिण्यापासून सर्वच गोष्टींची गैरसोय झाली.

‘प्रवाशांना वाऱ्यावर सोडले’

हॉलिडे स्पेशल एसी गाडी असल्याने रेल्वेने या गाडीसाठी नेहमीपेक्षा ४०० रुपये जादा तिकिट आकारले होते. मात्र, या गाडीमध्ये ‘खानपान’ व्यवस्था करण्यात आली नव्हती. रेल्वे प्रशासनाने जादा पैसे आकारून या प्रवाशांना वाऱ्यावर सोडले, अशी टीका रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकतर्फी प्रेमातून महिलेवर वार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूडमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीच्या आईवर घरात शिरून वार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली आहे. जखमी महिलेवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अक्षय काशिनाथ धनवे (वय १९, रा. कोथरुड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा फुल व हार विक्रीचा व्यवसाय आहे. तर त्यांच्या शेजारी आरोपीचा भाऊ फुलांचे गुच्छ विक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी रात्री तक्रारदार आणि त्यांची मुलगी घरामध्ये हार विणत बसलेल्या होत्या. त्या वेळी धनवे दारूच्या नशेमध्ये त्यांच्या घरी गेला. त्याने तक्रारदार यांच्याकडे पिण्यासाठी चहा मागितला. परंतु, तो दारू प्यायलेला असल्यामुळे तक्रारदार यांच्या मुलीने घरामध्ये दूध शिल्लक नसल्याचे सांगितले. तेव्हा, त्याने कोरा चहा दिला तरी चालेल असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार या चहा बनविण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये गेल्या. आरोपीही त्यांच्या पाठीमागे स्वयंपाकघरामध्ये गेला. त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी दिल्यानंतर तक्रारदार या गॅसवर चहा ठेवत असतानाच त्याने हातामधील ब्लेडने तक्रारदार यांच्या गळ्यावर दोन वार केले. त्या ठिकाणाहून पसार झाला. तक्रारदार यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांची मुलगी धावत आली. मुलीने तिच्या मोठ्या भावाला फोन करून बोलावून घेतले. मुलाने त्यांना तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचे समोर येत आहे. तक्रारदार यांच्या मुलीवर आरोपीचे एकतर्फी प्रेम होते. तक्रारदार यांची मुलगी त्याच्याकडे लक्ष देत नव्हती. आई व वडिलांच्या धाकामुळे त्याला भाव देत नसल्याचा त्याचा समज झाला होता. त्यामुळे त्याने मुलीच्या आईवर वार केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याच्याकडे या हल्ल्यामागील कारणाचा तपास सुरू आहे. अटक करून त्याला कोर्टाने हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक व्ही. पी. रजपूत अधिक तपास करीत आहेत.

सोनसाखळी हिसकावली

मार्केटयार्ड परिसरात ‘मॉर्निंग वॉक’साठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याबाबत ५३ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दोन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार एका सहकारी महिलेसह शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघाल्या होत्या. गंगाधाम रोडने वर्धमानपुऱ्याच्या दिशेने चालत जात असताना पाठीमागून दुचाकीवरून दोन जण आले. त्यांनी तक्रारदार यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून नेली. या प्रकरणी उपनिरीक्षक आर. जी. पावरा अधिक तपास करीत आहेत.

चार लाखांची घरफोडी

धायरी परिसरात बंद फ्लॅट फोडून चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला. या प्रकरणात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबक अच्युत जोशी (वय ५३, रा. धायरी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी गावात गारमळा परिसरात रिया सोसायटीमध्ये जोशी राहतात. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास फ्लॅट बंद करून बाहेरगावी गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी फ्लॅटचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेली ४० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा चार लाख सहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. जोशी तीन नोव्हेंबर रोजी रात्री घरी आले. त्या वेळी त्यांना घरफोडी झाल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ सिंहगड रोड पोलिसांकडे धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास करणाऱ्या पक्षालाच प्राधान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही पुणे शहराच्या विकासाचाच विचार करणार आहोत. विकासाच्या नियोजनाचा अभाव, राजकारणामुळे रखडलेले प्रकल्प, रस्ते, पाणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील त्रुटी हेच मुद्दे सातत्याने उगाळले जातात. आता या साऱ्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आमचे मत आणि प्राधान्य शहराच्या विकासाला हातभार लावणाऱ्या पक्षालाच असेल,’ असे पुण्यातील व्यापारी वर्गाने ठणकावून सांगितले आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. लवकरच राजकीय रणधुमाळी सुरू होईल. त्या पार्श्वभूमीवर मतदारराजा असलेल्या सामान्य नागरिकांसह विविध घटकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पुढाकार घेतला आहे. शहरातील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘द पूना मर्चंट्स चेंबर’च्या पदाधिकाऱ्यांची मते ‘मटा’ने जाणून घेतली. वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोड, कर आकारणी, सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याबरोबरच निर्णयप्रक्रियेत व्यापाऱ्यांचा देखील समावेश करावा, अशा विविध मागण्यांचा जाहीरनामा शहरातील व्यापारी वर्गाने ‘मटा’कडे मांडला. त्याबरोबर विविध मुद्द्यांवर भाष्य करून परखडपणे मते नोंदवली. रस्ता, पाणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पार्किंग, कर आकारणी, ‘स्मार्ट सिटी’सारख्या मुद्यांकडे लक्ष वेधले.


प्रवीण चोरबेले (अध्यक्ष, द पूना मर्चंट्स चेंबर) :

नाना, भवानी पेठेतून १९७९ मध्ये भुसार बाजार मार्केट यार्डमध्ये स्थलांतरित झाला. मार्केट यार्डातील बाजार हा मध्यवस्तीत आहे. वाहतुकीची मोठी समस्या तेथे भेडसावते आहे. वाहतुकीच्या कोंडीला दररोज सामोरे जावे लागत आहे. जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग द्यावा, अशी पूर्वीपासूनची मागणी धूळ खात पडून आहे. व्यापार शहरात करीत असलो, तरी सध्या जागा अपुरी पडत असल्याने गोडाउनला शहराजवळ पर्यायी जागा द्यावी. जकातीनंतर एलबीटी सुरू झाला. त्याला विरोध केल्यानंतर युती सरकारने तो रद्द केला. ‘जीएसटी’ कर जीवनावश्यक वस्तूंवर लावण्यात येऊ नये, अशी मागणी आहे. गुलटेकडी येथील बाजारपेठ मोठी आहे. सध्या तेथे वाहतुकीची कोंडीची समस्या मोठी आहे. मार्केट यार्डातील रस्त्यांची दुरवस्था आहे. पुरेसे पाणी उपलब्ध नाही. दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्याने सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी सक्षम करावी. वाहतुकीच्या कोंडीमुळे शेतीमाल बाजारात वेळेवर येत नसल्याने त्यांचे नुकसान होते. कोंडी दूर करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल तयार केले नाहीत. पुणे शहर ‘स्मार्ट सिटी’ होत असल्याने त्याची जबाबदारी महापालिकेने घ्यायला हवी. पुण्याच्या अनेक भागात कचरा वाढतो आहे. कचऱ्यासाठी बायोगॅस प्रकल्प करण्यात पालिकेला अपयश आले आहे. अनेक कर थकबाकीदार आहेत. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना सवलत न देता, कर न भरणाऱ्यांना अभय योजना लागू होते. सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांमागे कर भरण्यासाठी तगादा लावला जातो. त्यांना सवलत दिली जात नाही. शहरात पाण्याचे नियोजन नाही. काही भागात २४ तास पाणी, तर काही भागात अर्धा तासही पाणी नसते.

वालचंद संचेती

माजी अध्यक्ष, द पूना मर्चंट्स चेंबर

पुण्याचा विकास करणाऱ्या पक्षालाच आमचे प्राधान्य राहणार आहे. त्या पक्षालाच आम्ही मत देणार आहोत. पुण्यात स्वच्छतेचा अभाव आहे. डेंगी, चिकुनगुनियासारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. सध्या घोषणा खूप होतात; पण त्याची अंमलबजावणी होत नाही. त्याची जबाबदारी घ्यायला हवी. शहराचा विस्तार होत असल्याने वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहराच्या विकासाचे नियोजन नाही. सार्वजनिक वाहतुकीसाठी पुरेशा प्रमाणात बस उपलब्ध करण्याऐवजी दारे कोणत्या बाजूला हवी, यावर वाद होतो. राजकारणामुळे विकास रखडला आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत कोणताही पक्ष सत्ताधारी झाला तरी चालेल; पण विकास झाला पाहिजे. पंधरा वर्षांपासून पुण्याच्या सभोवती रिंग रोड होणार असे ऐकतो. तो राजकारणातच अडकला आहे. हैदराबादला रिंगरोड झाला. त्या धर्तीवर व्यापार संकुल, रस्त्याचे नियोजन हवे. महापालिकेच्या अनेक शाळा बंद पडल्या असून त्या खासगी शिक्षण संस्थांना चालविण्यास द्याव्यात.

जवाहरलाल बोथरा (उपाध्यक्ष) :

एका वर्षापासून पुणे शहर ‘स्मार्ट सिटी’ करण्याची चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात नगरसेवक काम करीत नाहीत. विविध आजार वाढत आहेत. दिवाळीत २५ हजार वाहने रस्त्यावर आली आहेत. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे पुढील २५ वर्षांचे नियोजन हवे. सातारा रस्ता, कात्रज, नगर रस्ता, हडपसर येथे ‘बीआरटी’ सुरू करण्यात आली. व्यवस्थित नियोजन केले नसल्याने ती योजना फसली. बँकॉक, शांघायच्या धर्तीवर जास्त लांबीचे उड्डाणपूल उभारण्याची गरज आहे.

राजेंद्र बांठिया (माजी अध्यक्ष) :

शहराच्या विकासाचे अनेक निर्णय होत असले, तरी अधिकाऱ्यांसह नगरसेवकांची अंमलबजावणीची मानसिकता नाही. व्यापारी मोठ्या प्रमाणात कर भरतात. करातून मिळणाऱ्या उत्पन्नातून सोयी सुविधा दिल्या जातात. त्या सुविधा उपलब्ध करताना व्यापाऱ्यांना विश्वासात, निर्णय प्रक्रियेत घेतले पाहिजे. हैदराबादमध्ये रात्री शहर स्वच्छ केले जाते त्याप्रमाणे पुण्यात स्वच्छता करायला हवी. फुटपाथवर अतिक्रमणे होत आहेत. त्यावर नियंत्रण असावे.

रायकुमार नहार (सहसचिव) :

शहराचा अद्याप विकास आराखडा मंजूर झाला नाही. आरक्षित जागांच्या मूळ हेतूला बाधा पोहोचली आहे. पालिकेच्या शाळांमधून शिक्षण दिले जात नाही. पटसंख्या कमी असल्याने अनेक शाळा बंद पडल्या आहेत. उद्याने असली तरी त्याचे व्यवस्थापन होत नाही. उद्यानात खेळण्यासाठी मुलांना पुरेशी खेळणी नसतात.

नितीन ओसवाल (सदस्य) :

नगरसेवक नागरिकांचे प्रश्न सोडवत नाहीत. पुण्यात मेट्रोची चर्चाच अधिक झाली. मेट्रो होणार की नाही, हे सांगायला कोणी तयार नाही.

अतुल गुंदेचा (सदस्य) :

वाहतुकीची कोंडी होते. सार्वजनिक वाहतूक आणि सुरक्षितता, हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. बस आणि पोलिसांची संख्या वाढवायला हवी.

देवेंद्र अग्रवाल (सदस्य) :

‘पीएमपी’सारखी सार्वजनिक वाहने वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे खासगी वाहनांची संख्या वाढते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करायला हवी.

विजय नहार (सदस्य)ः

पूर्वीची बाजारपेठ आता राहिली नाही. कार्यक्षेत्र वाढले आहे. त्यामुळे बाजाराला मिळणारा चटई निर्देशांक क्षेत्र (एफएसआय) वाढवून मिळायला हवा. व्यापाऱ्यांना बाजार समिती आणि पुणे महापालिकेला कर द्यावा लागतो. त्यामुळे कर आकारणीत सुसूत्रता असावी.

ईश्वर नहार (सदस्य) :

शहरात पार्किंगची समस्या वाढत आहे. बीओटी तत्त्वावर पार्किंग उभारले पाहिजे.

नागराज ओसवाल (सदस्य) :

शहरात स्वच्छतागृहांची संख्या अपुरी आहे. सशुल्क शौचालये उभारणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​बारावीची प्री-लिस्ट पूर्णपणे ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या प्री-लिस्टचे कामही आता पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार यंदापासून मंडळ राज्यभरातील ज्युनिअर कॉलेजांना छापील प्री-लिस्ट देणार नाही. कॉलेजांनी ऑनलाइन प्री-लिस्टच्या आधारे परीक्षेचे कामकाज करण्याच्या सूचना मंडळाने दिल्या आहेत.
मंडळाने ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपले व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीपासून मंडळाच्या दहावी- बारावीच्या परीक्षांचे अर्ज पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीनेच भरून घेण्यात आले. त्या पाठोपाठ आता मंडळाने प्री-लिस्ट बाबतही असाच निर्णय घेतल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. मंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, मंडळ यापूर्वी राज्यभरातील ज्युनिअर कॉलेजांना बारावीच्या परीक्षेपूर्वी छापील प्री-लिस्ट देत असे. फेब्रुवारी- मार्च २०१७ मध्ये आयोजित बारावीच्या परीक्षेपासून ज्युनिअर कॉलेजांना अशा प्री-लिस्ट दिल्या जाणार नाहीत. सर्व ज्युनिअर कॉलेजांनी ऑनलाइन प्री-लिस्टच्या प्रिंट काढून घेऊन, त्यामध्ये असलेल्या माहितीची जनरल रजिस्टरप्रमाणे तपासणी करून घ्यावी. दुरुस्त्या असल्यास, त्याही ऑनलाइन 'एडिट' हा पर्याय वापरून १५ नोव्हेंबरपर्यंत मंडळाला कळवाव्यात. राज्यातील सर्व उच्चमाध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजांच्या प्राचार्यांनी या पद्धतीने कार्यवाही करावी, असेही पत्रकात स्पष्ट केले आहे.

प्री-लिस्ट म्हणजे काय?
बोर्डाच्या परीक्षेपूर्वी ज्युनिअर कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती मंडळाकडे पाठविली जाते. या माहितीच्या आधारे मंडळ विद्यार्थ्यांची कच्ची यादी तयार करून, ती कॉलेजांकडे पाठवते. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे छायाचित्र, नाव, परीक्षेसाठीचे विषय आदी तपशिलाचाही समावेश असतो. या याद्या प्री-लिस्ट म्हणून ओळखल्या जातात. प्री-लिस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या तपशिलापैकी काही तपशील चुकला असल्यास, त्यामध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा कॉलेजांना उपलब्ध असते. अशा दुरुस्त्या केल्यानंतरच परीक्षेसाठीच्या अंतिम याद्या तयार होत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘निवृत्तदिनी पीएफ’ योजनेची सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
निवृत्तीच्या दिवशीच प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) आणि पेन्शन कर्मचाऱ्यांच्या हाती देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला एम्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशनच्या (ईपीएफओ) पुणे विभागीय कार्यालयाने सुरुवात केली आहे. ‘ईपीएफओ’कडून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तीन महिने अगोदरच संबंधित संस्था किंवा कंपन्यांना पाठवण्यात येणार आहे.
‘ईपीएफओ’च्या पुणे विभागीय कार्यालयाअंतर्गत सुमारे ३० लाख ‘पीएफ’ची खाती आहेत. त्यापैकी पुण्यात दर महिन्याला सुमारे १५ हजार कर्मचारी निवृत्त होत असतात. त्यांना या निर्णयाचा लाभ मिळू शकणार आहे.
खासगी क्षेत्रातील नोकरदारांना ‘पीएफ’ची रक्कम निवृत्तीच्या दिवशी देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पुनर्विलोकन बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर केंद्रीय भविष्य निधीचे आयुक्त डॉ. व्ही. पी. जॉय यांनी सर्व कार्यालयांना परिपत्रक पाठवून या निर्णयाची अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
या निर्णयानुसार आता ‘ईपीएफओ’च्या कार्यालयाकडून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी संबंधित संस्था किंवा कंपन्यांना पाठवण्यात येणार आहे. संस्था किंवा कंपन्यांना निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ‘पीएफ’ आणि पेन्शनबाबतचे अर्ज १४ दिवसांपूर्वीच ‘ईपीएफओ’ कार्यालयाकडे सादर करावे
लागणार आहेत.
राज्यात ‘ईपीएफओ’ची पाच विभागीय कार्यालये असून, सहा उपविभागीय कार्यालये आहेत. पुणे विभागीय कार्यालयाअंतर्गत कोल्हापूर आणि सोलापूर उपविभागीय कार्यालयांचा समावेश होतो. या कार्यालयांमध्ये सुमारे ३० लाख ‘पीएफ’ची खाती आहेत. त्यापैकी दर महिन्याला सुमारे १५ हजार कर्मचारी निवृत्त होत असतात. त्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे ‘ईपीएफओ’च्या पुणे विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यालयांमध्ये फलक लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. ते फलक ​इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषेत लावण्याच्या सूचना ‘ईपीएफओ’च्या मुख्यालयाकडून देण्यात
आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्ता बर्वे, महेश काळे यांना पुलोत्सव तरुणाई पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या ‘पुलोत्सवा’चे यंदाचे वर्षही गाजणार आहे. दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीसह प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे व गायक महेश काळे यांना ‘पुलोत्सव तरुणाई पुरस्कार’ देण्यात येणार आहे. सामाजिक कार्यासाठी नाम फाउंडेशनला ‘पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. दिवंगत अभिनेत्री व नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांना यंदा पुलोत्सव विशेष सन्मान (मरणोत्तर) प्रदान करण्यात येणार आहे. १० ते १३ नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणाऱ्या पुलोत्सवामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

यंदाच्या वर्षीचा पुलोत्सव पुण्यातील सर्व भागातील रसिकांना सहभागी होता यावे, यासाठी बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अण्णा भाऊ साठे सभागृह, गणेश कला क्रीडा केंद्र येथे महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१० नोव्हेंबर रोजी, सायंकाळी ६ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असून या वेळी मुक्ता बर्वे यांना ‘पुलोत्सव तरुणाई सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, २१ हजार रुपये रोख शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ११ रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे गायक महेश काळे यांना ‘पुलोत्सव तरुणाई सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच दिवंगत अभिनेत्री व नृत्यांगणा अश्विनी एकबोटे यांना पुलोत्सव विशेष सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार पं. सुरेश तळवळकर यांच्या हस्ते देण्यात येईल.


‘नाम फाउंडेशन’चा गौरव

नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे व इतर मान्यवर संचलित ‘नाम फाउंडेशन’ला यंदाचा ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पु. ल. देशपांडे व सुनिताबाईंच्या दातृत्वाला सलाम करणारा हा पुरस्कार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ आणि २५ हजार रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरराष्ट्रीय आयोगावर पुणेकर तरुण

$
0
0

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

आंतरराष्ट्रीय कायद्यांतील दुरुस्ती आणि सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर एका पुणेकर तरुणाच्या रूपाने प्रथमच एका भारतीयाची निवड झाली आहे. अनिरुद्ध राजपूत असे या तरुणाचे नाव असून, त्याला आशिया-पॅसिफिक विभागामध्ये सर्वांधिक मते मिळाली आहेत.

आंतरराष्ट्रीय विधी आयोगासाठी झालेल्या मतदानामध्ये आफ्रिका, आशिया-पॅसिफिक, पूर्व युरोप, दक्षिण अमेरिका व कॅरेबिअन बेटे आणि पश्चिम युरोपीय देश या विभागांमधून ३४ सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये आशिया-पॅसिफिक विभागामध्ये १६० मते मिळवत, अनिरुद्ध राजपूत या विभागात पहिल्या क्रमांकावर राहिला. तर, १४८ मते मिळवत जपानचे शिनया मुसरे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. चीनचे हुईकांग हुआंग आणि जॉर्डनचे महमूद दैफल्ला मौद १४६ मतांसह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. नव्याने निवडण्यात आलेला हा आयोग पाच वर्षांसाठी असून, जानेवारीपासून त्याचे काम सुरू होईल.

‘आयएलएस’मधून पदवी

अनिरुद्धने पुण्याच्या ‘आयएलएस’मधून कायद्याची पदवी घेतली, तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्याने एलएलएम ही पदव्युत्तर पदवी घेतली. सुप्रीम कोर्टामध्ये सहा वर्षांपासून प्रॅक्टिस करत असताना, लवाद, सार्वजनिक कायदे आणि व्यावसायिक प्रकरणांवरच त्याने लक्ष केंद्रीत केले होते. सिंगापूरच्या नॅशनल विद्यापीठातून त्याने नुकतीच पीएचडी पूर्ण केली. त्याचे संशोधन सुरू असतानाच, परराष्ट्र मंत्रालयाने मेमध्ये अनिरुद्धचे नामांकन पाठविले होते. राजपूत सहा वर्षांपासून सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करत असून, परराष्ट्र मंत्रालयाच्या वर्तुळात असणाऱ्या वकिलांपेक्षा अन्य व्यक्तीचे प्रथमच नामांकन करण्यात आले होते. या आयोगावर प्रथमच एका भारतीयाला संधी मिळाली आहे, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले. अनिरुद्धच्या निवडीसाठी अनेक देशांनी सहकार्य केले. त्यामुळेच, त्याला एवढे मोठे मताधिक्य मिळाले, सहकार्यासाठी सर्वांचे आभार मानत असल्याचे अकबरुद्दीन यांनी ट्विटरवरील एका प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे.

सर्वांत तरुण सदस्य

अनिरुद्ध राजपूतच्या रुपाने आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर प्रथमच भारतीयाची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, ३३ वर्षांचा अनिरुद्ध या आयोगावरील आतापर्यंतचा सर्वांत तरुण सदस्य आहे. या आधी २०११मध्ये फ्रान्सच्या मॅथियास फोर्टयू यांची ३७व्या वर्षी निवड झाली होती. त्यामुळे अनिरुद्ध या आयोगामध्ये निवड झालेला सर्वांत तरुण सदस्य असल्याचे सांगण्यात येते.

आयोगाचे काम मोलाचे

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १९४७मध्ये आंतरराष्ट्रीय विधी आयोगाची स्थापना केली. नवे आधुनिक कायदे तयार करणे आणि त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया राबविणे, यासाठी हे आयोग प्रामुख्याने काम करत असते. या आयोगाचे मुख्यालय जीनिव्हामध्ये आहे. आपत्कालिन परिस्थितीतील नागरिकांना मदत, विविध देशांच्या अन्य देशांतील अधिकाऱ्यांच्या विशेषाधिकाराची जपणूक यांसह विविध विषयांवर हा आयोग काम करत असतो.

संघ ‘कनेक्शन’ची चर्चा

आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर अनिरुद्ध राजपूतच्या निवडीमागे, त्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असणाऱ्या संबंधांची चर्चा होत आहे. अनिरुद्ध हा पूर्वी पुण्यातील नवी पेठेत रहायचा. त्या वेळी तो लोकमान्य नगरातील लोकमान्य सायम् शाखेमध्ये जात असे. नंतरच्या काळात दिल्लीत स्थायिक झाल्यानंतर संघाशी संबंधित असणाऱ्या ‘जम्मू-काश्मीर स्टडी सेंटर’ या संस्थेचा संचालक म्हणूनही तो काम करत आहे. या संबंधांमुळेच, पीएचडी सुरू असतानाच त्याच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुरुंगांना शेतीतून दोन कोटींचा नफा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याच्या तुरुंग विभागात केल्या जाणाऱ्या शेतीचे उत्पादन तब्बल साडेतीन कोटींवर पोहचले आहे. यामध्ये तुरुंग विभागाला गेल्या वर्षी दोन कोटींचा नफा झाला आहे. आधुनिक पद्धतीने शेतीचा प्राधान्य दिल्यामुळे उत्पादनात व नफ्यात प्रत्येक वर्षी वाढ होत आहे. शेतीच्या उत्पादनात पैठण खुल्या तुरुंगाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

राज्यातील २९ तुरुंगांकडे ८१९ हेक्टर जमीन असून त्यापैकी ३२७ हेक्टर जमीन शेतीयोग्य आहे. यापैकी १८६ हेक्टर क्षेत्र बागायती व १४० हेक्टर जिरायती क्षेत्र आहे. ८० हेक्टर क्षेत्र पडीक आहे. तुरुंग विभागाकडून खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात फळभाज्या, पालेभाज्या, गहू, ज्वारी, तूर, सोयाबीन अशी विविध पिके घेतली जातात. तर, विसापूर, कोल्हापूर, पैठण येथील तुरुंगात ऊसाची लागवड केली जाते. शेतीमधून तुरुंगातील ८२९ पुरुष कैद्यांना तर ४० महिला कैद्यांना काम मिळत आहे. कैद्यांनी केलेल्या कष्टाचे फळ चांगलेच मिळत आहे.

राज्यातील तुरुंगात २०१५-१६ मध्ये तुरुंगाला शेतीतून तीन कोटी ६४ लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. यामध्ये एक कोटी साठ लाखांचा खर्च झाला आहे. दोन कोटी चार लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. शेती उत्पादनात पैठण खुले तुरुंगाने सर्वाधिक उत्पन्न घेतले आहे. त्यानंतर विसापूर खुले तुरुंग आणि नाशिक खुल्या तुरुंगाने शेती उत्पादनात दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला आहे. गेल्या पाच वर्षांत तुरुंगाला शेतूमधून मिळणाऱ्या उत्पादनात दुप्पट वाढ झाली आहे. तर नफा चारपटीने वाढला आहे. तुरुंगाची शेती आधुनिक पद्धतीने करण्यासाठी २१.६३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

औषधी वनस्पतींची लागवड

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ याच्या अनुदानातून येरवडा खुल्या तुरुंगामध्ये सीता अशोक या औषधी वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे. तर येरवडा मध्यवर्ती तुरुंग व इतर दहा तरुंगात मंडळाकडून मिळालेल्या अनुदानातून चंदनाची लागवड करण्यात आली आहे. तसेच, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांर्तगत येरवडा तुरुंगात अळींबा उत्पादन प्रकल्प उभारण्यात आला होता. महापालिकेच्या सहकार्यातून बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला आहे. कैद्यांना काम मिळावे आणि त्यांचे पुनर्वसन व्हावे म्हणून तुरुंग विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केळकर दाम्पत्याचे दातृत्वाचे गौरीशंकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मातृभूमीचे संरक्षण करणारे जवान आणि काळ्या मातीची सेवा करणाऱ्या बळीराजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुण्यातील प्रकाश केळकर यांनी आपली अंदाजे एक कोटी रुपयांची सर्व संपत्ती दान केली आहे. केळकर आणि त्यांच्या पत्नी दीपा केळकर यांनी मृत्युपत्र तयार करून संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या दातृत्‍वाची सर्वत्र चर्चा आहे.

पुण्यात राहणारे प्रकाश केळकर निवृत्त कापूस तज्‍ज्ञ आहेत. त्यांनी नोकरीच्या काळात शेतकऱ्यांचे दुःख फार जवळून अनुभवले. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य लष्करात दाखल झालेला असताना त्याच्या कुटुंबीयांना परिस्थितीशी झगडण्यासाठी होणारा त्रास केळकर यांनी पाहिला असल्याने वयाच्या उत्तरार्धात देशासाठी अन्न पिकवणाऱ्या आणि देशाला सुरक्षित ठेवणाऱ्यांना मदत करावी, या हेतूने केळकर यांनी एक कोटी रुपयांहून अधिक संपत्ती लष्कर आणि शेतकऱ्यांना द्यायचे ठरवले आहे.

‘आमच्या मृत्युपत्रानुसार आमची ३० टक्के रक्कम पंतप्रधान मदतनिधीला, ३० टक्के मुख्यमंत्री मदतनिधीला आणि ३० टक्के लष्करासाठी देण्यात येणार आहे. उर्वरित दहा टक्के रक्कम सामाजिक काम करणाऱ्या पाच स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणार आहोत. निवृत्तीनंतर मी व माझी पत्नी दीपा यांनी संपूर्ण संपत्ती देशाला देण्याचे ठरवले. त्यानंतर त्यासाठीची प्रक्रियेची माहिती घेण्यास प्रारंभ केला. आम्ही पंतप्रधान कार्यालय, अर्थ मंत्रालय, संरक्षण मंत्रालय यांच्याशीही संपर्क साधून माहिती घेतली. त्यानंतर एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या मदतीने आम्ही आमचे मृत्युपत्र बनविले आहे. आमच्या निर्णयाला आमच्या दोन मुलींनी पाठिंबा दिला,’ असे केळकर यांनी सांगितले.

‘जात, धर्म, पंथ वर्ग मला कधीही कळले नाही, अजूनही कळलेले नाही. त्याबाबत आमचे अज्ञान आहे. केवळ मतांसाठी राजकारणी जात, धर्माच्या नावावर समाजाला तोडण्याच्या प्रयत्न करीत आहेत. आपण भारतीय आहोत, असे कोणीही सांगत नाही. आम्ही मात्र मरेपर्यंत भारतीयच राहणार आणि देशासाठी झटत असलेल्यांना कायम मदतीचा हात देत राहणार,’ अशा शब्दांत केळकर यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

यापूर्वीही मदत

केळकर यांनी यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रमांसाठी अर्थिक मदत दिली आहे. २००९ मध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांना त्यांनी दोन लाखांहून अधिक रुपयांची मदत केली आहे. याशिवाय भटक्या निमुक्तांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीही वेळोवेळी केळकर यांनी आपल्या दातृत्वाचा हात पुढे केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता लक्ष माघारीकडे

$
0
0

बंडखोर, दोन्ही काँग्रेसच्या भूमिकांवर रंगत अवलंबून

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील निवडणुकीत सर्वांचे लक्ष माघार कोण घेणार, याकडे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात मनोमिलन होणार का; तसेच बंडखोर रिंगणातून बाहेर पडणार का, यावर मतदार संघातील रंगत अवलंबून आहे.
उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज, शनिवारी (५ नोव्हेंबर) अंतिम मुदत आहे. या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अनिल भोसले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, भाजपचे नगरसेवक अशोक येनपुरे आणि शिवसेनेचे जिल्हापरिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली खंडागळे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. मनसेचे नगरसेवक बाबू वागस्कर यांचा अर्ज बाद ठरल्याने ते अगोदरच ​निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकले गेले आहेत.
ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. काँग्रेसनेही उमेदवार उभा केल्याने अडचण झाली आहे. काँग्रेसने एक पाऊल मागे घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसले यांचा मार्ग सुकर होणार आहे. मात्र, काँग्रेसने माघार न घेतल्यास राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांचा अर्ज मागे घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजप आणि शिवसेना यांची मते दोन्ही काँग्रेसच्या तुलनेत कमी आहेत. या परिस्थितीत मनसेची ३६ मते महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या मतदार संघात दहा उमेदवार असून, ६८८ मतदार आहेत.
.............
एकास एक उमेदवारी ?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधातील मतांची फूट टाळण्यासाठी एकास एक उमेदवार देता येईल का, यासाठी शुक्रवारी इतर पक्षांच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. यामध्ये काँग्रेस, भाजप आणि शिवसेना परस्परांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देणे सर्वांनाच अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारास पुढे करून त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा, अशीही चर्चा सुरू झाली होती. त्यादृष्टीने माजी आमदार विलास लांडे यांचे नाव पुढे आले. या संदर्भात काही वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी संपर्कही झाल्याची चर्चा होती. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सक्रिय झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मुळातच लांडे आपली उमेदवारी कायम ठेवणार की लढतीतूनच माघार घेणार, याबाबत उलटसुलट चर्चा असून माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिल्लक विजेसाठी पर्याय शोधा

$
0
0

राज्य विद्युत नियामक आयोगाचे महावितरणला निर्देश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महावितरणकडे यंदा वर्षभरात सुमारे २५ हजार दशलक्ष युनिट वीज शिल्लक राहणार असून, २०१९-२० पर्यंत हेच प्रमाण सुमारे ४२ हजार दशलक्ष युनिटपर्यंत वाढण्याची शक्यता ‘राज्य विद्युत नियामक आयोगा’ने वर्तवली आहे. महावितरणने शिल्लक वीज विकण्याचे पर्याय शोधून सध्या करण्यात आलेले वीज खरेदीचे करार स्थगित ठेवण्याच्या सूचनाही आयोगाने केल्या आहेत.
कमी खर्चाची वीज प्रथम खरेदी करण्याचे तत्त्व, महिनानिहाय उर्जेच्या गरजेचा अंदाज आणि करारबद्ध असलेल्या विविध स्त्रोतांकडील विजेची उपलब्धता विचारात घेऊन आयोगाने वीज खरेदीचे परिमाण आणि खर्चाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार यंदा २५ हजार दशलक्ष युनिट, तर २०१९-२० पर्यंत सुमारे ४२ हजार दशलक्ष युनिटपर्यंत वीज शिल्लक राहण्याची शक्यता आयोगाने वर्तवली आहे.
आयोगाने वीज खरेदीवरील खर्च कमी व्हावा, यासाठी शिल्लक असणारी वीज विकण्याचे पर्याय तपासून पाहण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. वीजनिर्मितीचे काही संच प्राथमिक अवस्थेत आहेत. त्या संचांबरोबर महावितरणने वीज खरेदीचे करार केले आहेत. ते करार स्थगित ठेवण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. याबाबत आढावा घेण्याचे ​निर्देश आयोगाने दिले आहेत.
..
विनामीटर कृषि पंपांच्या वीजदरात वाढ
महावितरणने कृषी पंपांना जास्त वीज दिल्याचे प्रस्तावात दाखवले होते. ते आयोगाने नामंजूर केले आहे. अद्याप सुमारे ३६ टक्के कृषी ग्राहकांनी मीटर बसवले नसल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदवले आहे. मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी, यासाठी मीटर न बसवणाऱ्या कृषी पंपांच्या वीजदारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
.................
एका दृष्टिक्षेपात..
* औद्योगिक वीज दरात पुढील चार वर्षांमध्ये सरासरी सुमारे ०.४ ते ०.५ टक्के वाढ.
* रेल्वेसह भविष्यात येणाऱ्या मेट्रो आणि मोनोरेलचे वीजदर एकत्र करण्यात आले आहेत.
* अस्थिर आकारांच्या भागांची प्रथमच वहन आकार आणि ऊर्जा आकार अशा दोन भागांत विभागणी.
* उच्चदाब ग्राहकांच्या अखंडित आणि खंडित पुरवठ्याच्या वीजदरातील या दोन उपवर्गवारी एकत्रित.
.........................
पुढील तीन वर्षांतील निवासी वीजदर ( दर रुपयामध्ये)
वर्ष युनिट नवीन दर
२०१७-१८ १ ते १०० ४.२१
१०१ ते ३०० ७.९४
३०१ ते ५०० १०.९१
५०१ ते १००० १२.४१
१००० पेक्षा जास्त १३.६९
..................................................................
२०१८-१९ एक ते १०० ४.२५
१०१ ते ३०० ७.९९
३०१ ते ५०० १०.९४
५०१ ते १००० १२.४३
१००० पेक्षा अधिक १३.७१
.......................................................
२०१९-२०२० एक ते १०० ४.२९
१०१ ते ३०० ८.०२
३०१ ते ५०० १०.९७
५०१ ते १००० १२.४८
१००० पेक्षा जास्त १३.७६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनसे’ कार्यकर्त्यांसाठी राज ठाकरेंचा मेळावा

$
0
0

येत्या मंगळवारी मार्गदर्शन करणार; निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी (८ नोव्हेंबरला) हा मेळावा होणार असून, ठाकरी शैलीत राज स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून पालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये मनसेमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली आहे. पालिकेतील गटनेतेपद बदलण्यात आले असून, निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या दोन नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. गेल्या महापालिका निवडणुकीत पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस खालोखाल सर्वाधिक जागा मिळविलेला पक्ष म्हणून संधी मिळालेल्या मनसेला पाच वर्षांत आपली छाप मतदारांवर पाडता आली नाही. दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतलेल्या मनसेला विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली होती. परंतु, त्यानंतर मनसेच्या विजयाचा आलेख उंचाविण्याऐवजी तो घसरत गेल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचे समोर आले. एका भूमिकेवर ठाम न राहता महापालिकेच्या सभागृहात प्रत्येकवेळी घेतलेल्या धरसोड वृत्तीमुळे मनसेच्या सभासदांना अनेकदा टीकेलाही सामोरे जावे लागले आहेत.
गेल्या पालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवून देखील मनसेला सक्षम असे नेतृत्व न मिळाल्याने पक्षाची क्रेझ हळूहळू कमी होत आहे. त्यातच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील काही विद्यमान नगरसेवक अन्य पक्षांमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांचा मेळावा कार्यकर्त्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मेळाव्यात ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बालगंधर्व रंगमंदिरात मेळावा होणार असून, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, राजन शिरोडकर, अनिल शिदोरे, दीपक पायगुडे, आदित्य शिरोडकर, रिटा गुप्ता यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या पुलांच्या डागडुजीला मुहूर्त

$
0
0

वर्षभरात काम पूर्ण करणार; सात कोटींचा खर्च येणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील जुन्या आणि धोकादायक पुलांच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. महापालिकने सहा पुलांची कामे सुरू केली असून, त्यासाठी सात कोटी रुपये खर्च येणार आहे. साधारणतः वर्षभरात ही कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
महाड येथील सावित्री नदीवरील धोकादायक पूल वाहून गेल्याच्या घटनेला तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या दुर्घटनेत अनेकांना जलसमाधी मिळाली. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या महापालिकेने शहरातील धोकादायक पुलांची माहिती गोळा करून त्यांची तातडीने डागडुजी करण्याचा निर्णय घेतला. संभाजी, शिवाजी, बालगंधर्व, वेलस्ली यांबरोबरच राजाराम पुलाच्याही दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. शिवाजी आणि संभाजी पुलाचे काम सुरूही करण्यात आले आहे.
मुळा-मुठा नदीवरील अनेक पुलांपैकी बहुतांश पूल ब्रिटिशकालीन आहेत. शहरात सुमारे ३० पूल असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. महाड दुर्घटनेनंतर शहरातील पुलांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. तीन वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने शहरातील महत्त्वाच्या पुलांचे सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी सल्लागाराची नियुक्तीही करण्यात आली होती. त्याचा अहवाल मिळूनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नव्हती.
महाड दुर्घटनंतर जाग्या झालेल्या पालिका प्रशासनाने यामध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली असून, वर्षभरात सहा पुलांच्या दुरुस्तीची कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवाजी तसेच संभाजी पुलाच्या डागडुजीचे काम प्रशासनाने अगोदरच सुरू केले आहे. पुढील काही महिन्यांतच हे काम पूर्ण केले जाईल, असा प्रशासनाचा दावा आहे. शहरातील पूल वाहतुकीसाठी योग्य असले तरी, त्यामध्ये काही प्रमाणात दुरुस्ती अहवालामध्ये सूचविण्यात आली आहे. त्याकडे दुर्लक्ष नको म्हणून कामे हाती घेण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदेश पर्यटनाला वाढती पसंती

$
0
0

मॉरिशस, दुबई, सिंगापूर, थायलंडवर पुणेकरांचा भर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘कुछ बडा हो जाये’ या पर्यटकांच्या बदललेल्या मानसकितेमुळे दिवाळीची सुट्टी यंदा परदेशी पर्यटनासाठी खूपच फायदेशीर ठरली आहे. छोट्या सुट्ट्यांचा पुरेपूर फायदा घेऊन पुणेकरांनी मॉरिशस, दुबई, सिंगापूर, थायलंड या देशांमध्ये पर्यटनावर भर दिल्याचे आढळून आले आहे.
आल्हाददायक वातावरणामुळे दिवाळीच्या सुट्टीत मोठी भटकंती करायची, हे पर्यटकांचे वर्षानुवर्षांचे जणू समीकरणच बनले आहे. मात्र, बदलत्या काळानुसार पर्यटकांचे प्राधान्यक्रमही बदलले आहे. छोट्या सुट्टीत मोठा पल्ला गाठण्याची क्रेझ वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीमध्ये राज्यांतर्गत पर्यटनाबरोबरच परदेशवाऱ्यांना तुफान प्रतिसाद मिळाला आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बहुतांश पुणेकर परदेश दौऱ्यांसाठी रवाना झाले आहेत. परदेशवारीमध्ये दक्षिण आशियाई देशांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. विशेष म्हणजे तीन ते चार महिने आधी नियोजन केल्याने देशांतर्गत पर्यटन सहलीच्या खर्चामध्ये पर्यटकांनी परदेशवारीची पॅकेजेस प्राप्त केली आहेत.
केरळ, राजस्थान, मध्य प्रदेशातील सहलीसाठी पाच ते सात दिवसांसाठी जेवढा खर्च येतो, त्या रकमेत दक्षिण आशियाई देशांमधील पर्यटनाचा आनंद घेता येतो. हे आर्थिक गणित समजून घेऊन पुणेकर पर्यटकांनी छोट्या परदेश दौऱ्यांना प्राधान्य दिले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विमानांच्या तिकिटांमध्ये पंधरा टक्क्यांनी घट झाल्याने विदेश सहलींना प्रोत्साहन मिळाले आहे. पुण्यासह महाराष्ट्रातून सिंगापूर, थायलंड, कंबोडिया यांसह मॉरिशस, दुबईला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. हिवाळी सुट्ट्या परदेशात घालविणाऱ्या पर्यटकांमध्ये यंदा २५ टक्के वाढही झाली आहे.
पर्यटनाची संकल्पना दर वर्षी बदलत आहे. पूर्वी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देशांतर्गत पर्यटनाला मागणी होती. आजही ही क्रेझ कायम आहे. या शिवाय दिवाळीत परदेशात जाणाऱ्यांची संख्याही उल्लेखनीय वाढली आहे. दोन दिवस, तीन दिवस, पाच आणि आठ दिवसांचे पॅकेज घेऊन पर्यटक मॉरिशस, दुबई, सिंगापूर, थायलंड, कंबोडिया या देशांमध्ये सहलीला गेले आहेत. अंदमानच्या दौऱ्यांनाही चांगली मागणी आहे, असे प्रसिद्ध पर्यटन व्यावसायिक झेलम चौबळ यांनी सांगितले.
..
गणेशोत्सवापासूनच मार्केटिंगवर भर
पर्यटकांच्या मागणीचा विचार करून यंदा पर्यटन कंपन्यांनी गणेशोत्सवापासूनच परदेश सहलींची आकर्षक पॅकेज जाहीर केली होती. आगाऊ बुकिंग करणाऱ्यांना विमान प्रवासाबरोबरच इतर खर्चावरही भरघोस सवलती मिळाल्या. बहुतांश विमान कंपन्यांनीही यंदा पर्यटकांना विमानप्रवासासाठी भुरळ घालणाऱ्या योजना जाहीर केल्या होत्या. त्यामुळे सहकुटुंब परदेश दौऱ्यांचे प्रमाण वाढले असून, परदेशात दिवाळी सेलिब्रेशनचा अनुभव घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंपचालकांचा संप अखेर मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पेट्रोल पंपचालकांना एक लीटर पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीमागे अनुक्रमे १५ पैसे आणि १० पैसे कमिशन वाढवून देण्याचे पेट्रोलियम कंपन्यांनी लेखी मान्य केल्याने पंपचालकांनी त्यांचा संप मागे घेतला. येत्या १५ नोव्हेंबरपासून पंपचालकांना नवीन दरानुसार कमिशन दिले जाणार आहे.
पेट्रोलियम कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात ‘ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशन’ने (एआयपीडीएस) ऐन दिवाळीत बंदचा इशारा दिला होता. डीलरच्या कमिशनमध्ये वाढ करण्याची संघटनेची मुख्य मागणी होती. त्यासाठी १९ आणि २६ ऑक्टोबर सायंकाळी सात ते सव्वासात या वेळेत पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. तीन व चार नोव्हेंबरला पेट्रोल खरेदी व विक्री बंद ठेवण्यात आली. यानंतरही पेट्रोलियम कंपन्यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या नसत्या, तर पेट्रोल विक्री बंद करण्याचा इशारा असोसिएशनने दिला होता. असोसिएशनची तीव्र भूमिका पाहून अखेर पेट्रोलिअण कंपन्यांना माघार घ्यावी लागली. मुंबई येथे झालेल्या बैठकीत इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलिअम व भारत पेट्रोलिअम या कंपन्यांचे प्रमुख अधिकारी व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत कंपन्यांनी पंपचालकांच्या मागण्या मान्य केल्या. वाढीव दरानुसार कमिशन देण्याच्या करारावर त्यांनी स्वाक्षरीही केली. गेल्या महिन्यात पंपचालकांना दिल्या जाणाऱ्या कमिशनमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या प्र​ती लिटर विक्रीमागे अनुक्रमे १० पैसे आणि आठ पैसे वाढ करण्यात आली होती आणि आता नव्याने केलेली वाढ, यामुळे आम्ही संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असे, असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images