Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डासांना ऑक्टोबर हीट 'पोषक'

0
0

पंधरा ऑक्टोबरपर्यंत आढळले ८६७ चिकुनगुनिया पेशंट

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चालू महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडला असला तरी, त्यानंतर जाणवत असलेली ‘ऑक्टोबर हीट’ चिकुनगुनियासाठी पोषक ठरल्याचे दिसून आले आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक पेशंट आढळले असून, ही संख्या सप्टेंबरच्या दुप्पट आहे.
शहरात सप्टेंबर महिन्यात पावसाने हजेरी लावली. त्याबरोबर उनही पडत होते. ऊन पावसाच्या खेळामुळे सप्टेंबर महिन्यात वर्षात सर्वाधिक ३९० चिकुनगुनियाचे पेशंट असल्याचे निदान झाले. परंतु, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला देखील नवरात्रोत्सवात पावसाने हजेरी लावली. पहिल्या आठवड्यातच उन्हाचा चटका जाणवत होता. प्रतिकूल वातावरण असूनही चिकुनगुनियाच्या ८६७ पेशंटची नोंद झाली आहे. अद्याप खासगी क्लिनिकमध्ये ताप, सर्दी, खोकल्यासह संधीवाताच्या आजाराची लक्षणे असलेली पेशंट आढळून येत आहेत.
शहरातील सर्वच वॉर्डात चिकुनगुनियाचे पेशंट वाढले आहेत. त्यापैकी औंध, घोले रस्ता, कोथरुड ढोले पाटील नगररोड, संगमवाडी, भवानी पेठ, विश्रामबाग वाडा, सहकारनगर, हडपसर, कोंढवा वानवडी भागात सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत सर्वाधिक चिकुनगुनियाचे पेशंट आढळलले आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भवानी पेठ, संगमवाडी, ढोलेपाटील या भागात सर्वाधिक पेशंट आढळले आहेत. यापूर्वी विश्रामबाग वाडा, टिळक रोड, कोथरुड या भागात कमी पेशंट होते. परंतु, ऑक्टोबरमध्ये मात्र त्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे.
..
महिन्याचे नाव..... चिकुनगुनियाचे पेशंट......... डेंगीचे पेशंट
जानेवारी .......... ६८ ................२७
फेब्रुवारी ................१८............ ८
मार्च ................ २३ ................. ४
एप्रिल ................. ४ ................ ६
मे ...................... २१ ................ ९
जून ......................... ३९ .............. २५
जुलै .................. २७ ................ १५
ऑगस्ट ................ ११९ .................१००
सप्टेंबर .............. ३९० ................... २१४
ऑक्टोबर .............. ८६७ ................... १८२
एकूण .......................१५७६.....................५९०
..
ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडला. सध्या जाणवत असलेल्या उन्हामुळे एडिस इजिप्तीचे डास वाढत असल्याचे दिसून आले आहे. डास वाढल्याने ऑक्टोबर महिन्यात वर्षातील सर्वाधिक चिकुनगुनियाचे पेशंट आढळले आहेत. थंडी वाढल्यास चिकुनगुनियाची लागण कमी होऊ शकते.
डॉ. एस. टी. परदेशी, प्रभारी आरोग्य प्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एससीईआरटी बनले आता विद्या प्राधिकरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेची (एससीईआरटी/विद्या परिषद) पुनर्रचना करण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला असून, आता एससीईआरटी ‘विद्या प्राधिकरण’ म्हणून ओळखली जाणार आहे. या प्राधिकरणात गाभा समितीची स्थापना करण्यात येणार असून, त्यात प्रशासकीय आणि शिक्षण क्षेत्रातील २० तज्ज्ञांचे नेमणूक करण्यात येणार आहे. राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर वाढवणे आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा कार्यक्रम यशस्वी पार पाडणे, हे नव्याने स्थापन झालेल्या प्राधिकरणाचे मुख्य उद्दिष्ट राहील.
दरम्यान, एससीईआरटीची पुनर्रचना करण्याचे विचार सरकार करीत होते. त्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. विद्या प्राधिकरणात प्राधिकरणातील सदस्य, जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि शिक्षकांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. तसेच, शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक आदी अशासकीय सदस्यांचा समावेश आहे. पुणे येथे विद्या प्राधिकरणाचे मुख्यालय तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, मुंबई येथे प्रादेशिक कार्यालये राहणार आहेत.
राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर वाढवणे, अध्ययन व विकासाच्या विविध संधींसाठी साहित्य तयार करणे, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व तालुका स्तरावरील शिक्षकांची क्षमता समृद्ध करणे अशी कार्ये करावे लागणार आहेत. तसेच, अभ्यासक्रम व पाठ्यक्रम विकसित करावा लागेल. शिक्षक व अधिकारी यांच्या विकासासाठी तसेच मूल्यमापन प्रक्रियेच्या गुणवत्तासाठी व अडचणींवर मात करण्यासाठी काम करावे लागणार आहे.या समितीची तीन महिन्यांमधून एकदा बैठक होणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पकडले फसवणुकीचे ‘कॉल’

0
0

इंदूरमधील कॉलसेंटरवर सायबर सेलचा छापा; तिघे ठकसेन ताब्यात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सरकारी बँकेतील खात्यावर ११ हजार रुपये भरल्यानंतर १५ हजार रुपये मिळतील...एक लाख रुपये भरल्यास पाच लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवून शहरातील पन्नास गुंतवणूकदारांना लाखो रुपयांना गंडा घालणारे इंदूरमधील (मध्य प्रदेश) कॉलसेंटर सायबर सेलने उद्धवस्त केले आहे. फसवणूक करणाऱ्या या कॉलसेंटरमध्ये (बीपीओ) दीडशेहून अधिक कर्मचारी नोकरीस होते. येथून कोल्हापूर, ठाणे, मुंबई, नाशिक, सांगली आणि नागपूर येथील गुंतवणूकदारांना टोप्या घातल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी तिरुमूर्ती पूम नाडर (वय ७०, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नाडर यांचे शेअरकम कंपनीमध्ये डीमॅट खाते होते. काही दिवसांपूर्वी त्यांना अनोळखी मोबाइल तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार रुपये भरल्यास तीन दिवसांमध्ये १५ हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष नाडर यांना दाखविण्यात आले. त्याप्रमाणे नाडर यांनी ११ ऑगस्ट रोजी संबंधित खात्यात पैसे भरले. त्यानंतर लगेचच त्यांना आरोपींकडून फोन आले. त्याच खात्यावर एक लाख रुपये भरल्यास पाच लाख रुपये मिळतील, असा दावा करण्यात आला. याही आमिषाला बळी पडून नाडर यांनी पैसे भरले.
दूरध्वनीवर नमूद केल्याप्रमाणे नाडर यांना भरलेल्या रकमेचा परतावा काही मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी आलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्यास सुरुवात करून भरलेले पैसे परत मागितले. मात्र, आरोपींनी त्यांचा फोन उचलणेच बंद केले. त्यानंतर नाडर यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला, अशी माहिती सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास फौजदार नितीन खामगळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. खामगळ तपास पथकासमवेत इंदूर येथे गेले होते. त्यांनी रिपल अॅडव्हायजरी प्रायव्हेट लिमिटेड, विजयनगर येथील कॉलसेंटरमध्ये तपास केला. या ठिकाणी दीडशे जण नोकरीस होते. नाडर यांना फसवणारे मनीष जैन (वय २७, रा. इंदूर), राजेश सिंग अनुपसिंग राठोड (वय ३६, रा. अभिनंदनगर, इंदूर) आणि राजेशसिंग श्रीरामसिंग रजपूत (वय ३२, रा. इंदूर) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून मोबाइल, डायलर, कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. आरोपींच्या प्राथमिक चौकशीत त्यांनी कोल्हापूर, ठाणे, मुंबई, नाशिक, सोलापूर आणि नागपूर येथील ५० गुंतवणूकदारांना फसविल्याची कबुली दिली आहे. आरोपींना अटक करून विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उपायुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नीता मिसाळ, प्रवीण स्वामी, कर्मचारी संतोष जाधव, अस्लम आतार, राजू भिसे, किरण अब्दागिरे, अमित औचरे, आदेश चलवादी, नितीन चांदणे, योगेश वाव्हळ आणि शिरीष गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
..
‘सायबर सेलशी संपर्क साधा’
नागरिकांनी अशाप्रकारचे फसवे कॉल, एसएमएस तसेच ई-मेलना बळी पडू नये असे आवाहन पवार यांनी केले आहे. अशाप्रकारे कोणाचीही फसवणूक झाली असल्यास त्यांनी सायबर सेलकडे संपर्क साधावा असे आवाहनही पवार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच रक्तपेढ्यांना नोटिसा

0
0

रेकॉर्डचा अभाव, रक्त संक्रमण अधिकाऱ्यांची कमतरता कारणीभूत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेकॉर्डचा अभाव, रक्तपेढ्यांमध्ये रक्त संक्रमण अधिकाऱ्यांची (बीटीओ) कमतरता आदी त्रुटींमुळे शहरातील पाच रक्तपेढ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. शिवाय तीन रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. पुणे विभागाच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) ही कारवाई केली.
शहरातील रक्तपेढ्यांच्या कारभारासंदर्भात पेशंटसह अनेकांच्या विविध तक्रारी ‘एफडीए’कडे प्राप्त झाल्या होत्या. त्यांची दखल घेऊन रक्तपेढ्यांच्या तपासणीची विशेष मोहीम ‘एफडीए’ने हाती घेतली होती. एप्रिल ते ऑक्टोबरच्या दरम्यान शहरातील वीस रक्तपेढ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर ‘एफडीए’ने कारवाईचा बडगा उगारला. ‘शहरातील वीस रक्तपेढ्यांची सात महिन्यांत तपासणी कऱण्यात आली. त्यापैकी पाच रक्तपेढ्यांमध्ये त्रुटी आढळली. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली. रक्त संक्रमण अधिकाऱ्याने रक्तपेढीतील प्रत्येक रेकॉर्डवर स्वाक्षरी करणे अपेक्षित आहे. परंतु, रेकॉर्डवर त्यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचे दिसून आले. रक्तपेढीतील प्रत्येक गोष्ट रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली होणे अपेक्षित आहे. परंतु, चार ते पाच रक्तपेढ्यांमध्ये या गोष्टींचा अभाव आढळून आला. बहसंख्य रक्तपेढ्यांमध्ये पुरेसे रक्त संक्रमण अधिकारी नसल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे,’ अशी माहिती ‘एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त व्ही. ए. जावडेकर यांनी दिली.
रक्तदान शिबिरांमध्ये रक्तसंकलन करताना रक्त संक्रमण अधिकारी अनेकदा अनुपस्थित असल्याचे दिसून आले आहे. शिबिरातून संकलित केलेल्या रक्तामधून विविध घटक ठरावीक तासांच्या आतच वेगळे करणे गरजेचे आहे. त्यासाठी संकलनाची वेळ आणि रक्तातून घटक वेगळे केल्याच्या नोंदी ठेवणे अपेक्षित आहे. परंतु, रक्तपेढ्यांनी नोंदी ठेवले नसल्याचे आढळले. प्लाझ्मासारखा घटक वेगळा करताना त्याची वेळ रेकॉर्डमध्ये नोंद केली नसल्याचेही आढळले आहे. त्याशिवाय रक्तदात्यांच्या अर्जांची पूर्तता व्यवस्थित केली नसल्याचे दिसून आल्याचेही त्यांनी सांगितले.
..
तीन रक्तपेढ्यांचे परवाने रद्द
शहरातील तीन रक्तपेढ्यांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई रण्यात आली. त्यात चापेकर बंधू रक्तपेढी, अक्षय ब्लड बँक, आयुष ब्लड बँक यांचा समावेश आहे. परंतु, अक्षय ब्लड बँकेने परवाना रद्द कऱण्यासंदर्भात स्थगितीचे आदेश मिळविले आहेत. त्याशिवाय आणखी एका रक्तपेढीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे, असेही जावडेकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांना टोपी घालणारे कोठडीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वृद्धाश्रमात आजीवन राहण्यासाठी सर्व सुखसोयी देण्याचे आमिष दाखवून पैसे घेऊन तीस ज्येष्ठ नागरिाकांची चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता २४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
नितीन सदाशिव चव्हाण (वय ३१, रा. स्वानंद सोसायटी, वडगाव बु.), हिमांशु श्रीहरी जळुकर (४३, रा. सहकारनगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी वसंत पुरुषोत्तम सातपुते (वय ९०, रा. सहकार कॉलनी) यांनी तक्रार दिली होती. तक्रारदार आणि इतर २५ ते ३० ज्येष्ठ नागरिकांना आरोपींनी मौजे गऊडदारा येथील शांती चॅरिटेबल ट्रस्टच्या शांतीनिकेतन वृद्धाश्रमात आजीवन राहण्यासाठी सर्व सुखसोयी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेण्यात आले. त्यासाठी सदाशिव पेठेतील बिझिलँड इमारतीत कार्यालयही घेतले. ​ज्येष्ठांकडून पैसे घेऊन ठरल्याप्रमाणे त्यांना सोयीसुविधा दिल्या नाहीत. तसेच, त्याच्याकडून घेतलेली रक्कम परतही केली नाही, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
गुन्ह्यातील प्रमुख आरोपी अजय गोविंद भुते आणि त्यांची पत्नी प्राची यांनी पुण्यातील अनेक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली. अजय भुते आणि प्राची भुते हे अद्याप फरारी आहेत. त्यांचा शोध घ्यायचा आहे. त्यांच्याकडून रक्कम हस्तगत करायची आहे. मूळ करारनामे हस्तगत करायचे आहेत. याप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी त्यांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील अनंत चौधरी यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध मागण्यांसाठी ‘इंटक’ची निदर्शने

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अनागोंदी आणि भ्रष्टाचारी कारभाराची चौकशी करावी, बँकेवरील संचालक मंडळ बरखास्त करावे, सभासदांना लाभांशांची रक्कम तत्काळ द्यावी आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसच्या वतीने (इंटक) गुरुवारी पुण्यासह राज्यभर निदर्शने करण्यात आली. शहरात शंकरशेट रस्त्यावरील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
बँकेला २०१५-१६ या आर्थिक वर्षात ११ कोटी ४२ लाख ९५ हजार ४५४ रुपयांचा नफा झाला असून, रिझर्व्ह बँकेने लाभांश वाटपाला निर्बंध घातला आहे. तसेच, बँकेतील आंतरशाखा व्यवहाराचे समायोजन पूर्ण झालेले नसून त्या खात्यातील ८९ कोटी ४९ लाख रुपयांचा ताळमेळ लागलेला नाही. बँकेच्या स्वारगेट, दापोडी, कोल्हापूर आणि मुंबई शाखांसाठी रिझर्व्ह बँकेकडून परवानगी घेण्यात आलेली नाही, असा आरोप संघटनेने केला आहे. त्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बँकेच्या कारभाराची चौकशी करावी आणि बँकेवरील संचालक मंडळ बरखास्त करावे. तसेच, बँकेच्या सभासदांना त्यांच्या हक्काच्या लाभांशांची रक्कम तत्काळ द्यावी आणि स्थानिक सल्लागार समितीची निवडणूक लोकशाही पद्धतीने करावी, अशा मागण्या केल्या. इंटक राज्याचे कार्याध्यक्ष मुकेश तिगोटे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. निदर्शनात युवा इंटकचे अध्यक्ष कैलास कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
.......
‘आरोप बिनबुडाचे’
महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसने (इंटक) केलेल्या आरोपांमध्ये तथ्थ्य नाही. बँकेच्या अनागोंदी व भ्रष्टाचारी कारभाराची चौकशी करावी आणि बँकेवरील संचालक मंडळ बरखास्त करावे हे आरोप खोटे आहेत. बँकेच्या निवडणुकीत ‘इंटक’चा व पदाधिकाऱ्यांचा दारुण पराभव झाल्याचे त्यांच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे जयप्रकाश छाजेड आणि इंटक संघटनेवर अब्रु नुकसानीचा दावा ठोकण्यात येईल, असे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोवरून सर्वपक्षीय आंदोलन

0
0

म. टा. प्र‌तिनिधी, पुणे

शहरातील बहुचर्चित पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम नागपूर मेट्रो कार्पोरेशनकडे देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, आणि मनसेने पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गुरुवारी निदर्शने करून आंदोलन केले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महापौर प्रशांत जगताप, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, मनसेचे गटनेते किशोर शिंदे, काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अविनाश बागवे, कमल व्यवहारे, चेतन तुपे, वैशाली बनकर, शीतल सावंत, संजय बालगुडे, महेंद्र पठारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील बहुचर्चित पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम नागपूर मेट्रो कार्पोरेशनकडे देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काल जोरदार टिकेची झोड उठविण्यात आली होती. याकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे स्टेशन येथे निदर्शने करण्यात आली. पुणे मेट्रोला पीआयबीची मंजुरी देण्यास केंद्र सरकारने दोन वर्षांचा कालावधी लावला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. त्याही पुढे आता हे राज्य सरकार पुणे मेट्रोचे काम नागपूरला देत आहे, हे योग्य नाही. सरकारने त्यांचा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात इंजिनीअर तरुणीवर बलात्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी । पुणे

वाघोली परिसरात अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षांच्या तरुणीवर दोघांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीनंतर करण घुगे, महेश कोरडे आणि अविनाश विजयकुमार शेळके (रा. वाघोली) यांच्याविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी वाघोली परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शाखेत शिक्षण घेत आहे. १८ ऑक्टोबरला पीडित तरुणी परीक्षा देऊन खोलीवर जात होती. त्यावेळी तिच्याच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या करणने तिला अडवले. माझे सबमिशन सुरू आहे. फाइल लावण्यासाठी मदत कर, असे तो म्हणाला. त्यावेळी तिने 'मी तुला ओळखत नाही', असे सांगितले. त्याने पुन्हा विनंती केल्यानं तिनं फाइल घेऊन येण्यास सांगितले. दोघेही त्याच्या खोलीवर गेले. तेथे फाइल सापडत नाही, अशी बतावणी त्यानं केली. तसंच तिला खोलीत बोलावून घेतले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानं घाबरलेल्या तरुणीने कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, त्यानंतरही तिच्या मोबाइलवर वेगवेगळ्या दूरध्वनी क्रमांकावरून फोन आणि मेसेज येऊ लागले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी तिला महेश नावाच्या तरुणाचा मेसेज आला. त्यात 'तुझ्यासोबत काय झाले हे माहित आहे,’ असं त्यानं लिहिलं होतं. या प्रकाराबात तुला कसं कळलं, असं तरुणीनं त्याला विचारलं. त्यानंतर मदत करण्याच्या बहाण्यानं महेशनंही तिला त्याच खोलीवर नेलं. तेथे तिच्यावर बलात्कार केला. ही खोली मित्राचीच असल्याचं त्यानं तिला सांगितलं. यानंतर अविनाशनंही मेसेज करून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या त्रासाला कंटाळून अखेर तिनं घडलेल्या प्रकाराची माहिती मोठ्या बहिणीला दिली. त्यांनी लोणीकंद पोलीस ठाणे गाठून तिघांविरोधात तक्रार केली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बसमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर
हडपसरमधील वैभव थिएटर येथे वाघोलीकडे जाणाऱ्या एका बसमध्ये ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची पाटली चोरणाऱ्याला नागरिकांनी पाठलाग करून पकडले. या गुन्ह्यातील आरोपीचा साथीदार फरारी झाला आहे.
अनिल परशुराम गायकवाड (१९, रा. साईनाथ नगर, शिवाजी पुतळ्याच्या शेजारी, चंदननगर) असे चोरट्याचे नाव आहे. सुमन पुंडलिक हरपळे (६५, रा. फुरसुंगी गाव, ता. हवेली) असे तक्रार देणाऱ्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे.
हडपसर पोलिस ठाण्याच्या महिला सहायक पोलिस निरीक्षक रूपाली माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन हरपळे त्यांच्या शेजारील एका महिलेसोबत गाडीतळ येथून वाघोलीच्या बसने मगरपट्टा हॉस्पिटल येथे डॉक्टरकडे जात होत्या. बसमध्ये गर्दी होती त्यामुळे सुमन हरपळे बसमध्ये शेजारील खुर्चीला धरून उभ्या होत्या. त्यांची बस भाजीमंडई परिसरात आल्यावर त्यांच्या शेजारील दोन जणांनी त्यांच्या हातावर कापडी पिशवी टाकली आणि त्यांच्या हातातील बांगडी कापण्याचा प्रयत्न केला. हरपळे यांना हातातल्या बांगड्या कापल्या जात असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी हातावरची पिशवी झटकून बांगड्या आहेत का ते पाहिले. त्या वेळी त्यांच्या हातातली बांगडी गायब झाल्याचे त्यांना दिसून आले. या दरम्यान त्यांच्या शेजारी असणारे तरुण वैभव थिएटरच्या जवळ धावत्या बसमधून उतरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी बांगडी चोरीला गेली असून, बसमधून उतरण्याच्या तयारीतील दोन तरुणांनी त्या चोरल्या असल्याचा संशय व्यक्त केला आणि चोर, चोर असे ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकांनी चोरट्यांचा पाठलाग करून दोघांपैकी एका चोरट्याला पकडले. या झटापटीत एक चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ रस्त्याची कोंडी तात्पुरती सुटणार

0
0

सीओईपी चौकातील वाहतुकीत बदल
म. टा. प्रतिनिधी, पुणे
संचेती हॉस्पिटलच्या दारातील ‘बॉटलनेक’मुळे विद्यापीठ रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी आता सुटण्याची चिन्हे आहेत. विद्यापीठ रस्त्याने येऊन पुणे-मुंबई रस्त्याने निगडीच्या दिशेला जाणाऱ्या वाहनांसाठी नाबार्डच्या इमारतीसमोरील नवीन उड्डाणपुलाची विरुद्ध लेन खुली करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत या वाहनांना एक जास्तीची लेन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण हलका होणार आहे.
संचेती हॉस्पिटलकडून कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या (सीओआपी) दिशेला जाताना असलेल्या ‘बॉटलनेक’मुळे गर्दीच्या वेळेला विद्यापीठ रस्त्यावर वाहनांची रांग लागते. त्यातच नाबार्ड कार्यालयाच्या येथे डाव्या हाताने वळतानाही चिंचोळा रस्ता असल्याने कोंडीत भर पडते. आता सीओईपी चौकातून वाकडेवाडीकडे जाण्यासाठीच्या उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ‘नाबार्ड’च्या दारातून जाणाऱ्या लेनमध्ये कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ही कोंडी टाळण्यासाठी सीओईपी चौकातून निगडीकडे जाणाऱ्या वाहनांना ‘सीओईपी चौक ते पाटील इस्टेट झोपडपट्टी’ या उड्डाणपुलाची डावी लेन खूली केली आहे. हा बदल उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत राहणार आहे.
सीओईपी चौकातून पुणे-मुंबई रस्त्याने जाण्यासाठी आता उपलब्ध असलेल्या दोन लेनमधील डावीकडून लेन संगमवाडी, येरवड्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आहे. तर, निगडीकडे जाणाऱ्या वाहनांना उड्डाणपुलावरील लेनचा वापर करावा लागणार आहे. तसेच, गेल्या काही महिन्यांपासून संचेती हॉस्पिटलकडून आरटीओकडे जाणाऱ्या वाहनांना पाटील इस्टेट झोपडपट्टीपासून यू-टर्न घेऊन जावे लागत होते. मात्र, आता त्या वाहनांना सीओईपी चौकातून थेट जाता येणार आहे.
............
० पुणे-मुंबई रस्ता, संगमवाडी किंवा न. ता. वाडी परिसरातील वाहनांना सीओईपी चौकातून जंगली महाराज रस्त्याकडे येण्यासाठी केवळ उड्डाणपुलाचा वापर करावा लागणार आहे.
० या वाहनांना उड्डाणपुलाखालील रस्ता वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे सीओईपी चौकातील वाहनांची संख्या कमी होऊन ताणही कमी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारत माझा आजही कधी कधीच देश

0
0

ज्येष्ठ लेखक रामदास फुटाणे यांची खंत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘जातीच्या मोर्चांमुळे आपला प्रवास जात निर्मूलनापासून ती घट्ट करण्याकडे सुरू झाला आहे. समाजात गोंधळाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीची भीती वाटते. नव्या रचनेत समाजव्यवस्थेलाच धोका निर्माण झाला आहे. शहरात जाणवत नसली तरी गावात जात आजही घट्ट रुजलेली आहे. या सर्व परिस्थितीमुळे भारत माझा आजही कधी कधीच देश आहे, असे वाटते...’ हे बोल आहेत ज्येष्ठ लेखक व वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचे.
एरवी उपहासगर्भ कवितेतून व्यवस्थेवर कोरडे ओढणारे रामदास फुटाणे शुक्रवारी पोटतिडकीने समाज परिस्थितीवर भाष्य करत होते. ‘तीस वर्षांपूर्वी भारत माझा कधी कधी देश होता, तो आजही कधी कधीच देश आहे,’ अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. फुटाणे यांच्या ‘भारत माझा कधी कधी देश आहे,’ या कवितेला व कार्यक्रमाला तीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘संवाद पुणे’ व ‘प्रबोधन विचारधारा’ यांच्या तर्फे २५ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे फुटाणे यांचा सत्कार होणार आहे. या निमित्त ते पत्रकारांशी बोलत होते. ‘संवाद’चे सुनील महाजन या वेळी उपस्थित होते. चित्रकार, शिक्षक, चित्रपट निर्माता, आमदार ते भाष्यकार असा बहुआयामी प्रवास फुटाणे यांनी या भेटीत उलगडला. प्रसंगी चिमटे काढत त्यांनी सध्याच्या समाजव्यवस्थेवर भाष्य केले.
‘सहकार चळवळ संपल्याने कारखान्यांचे कंपनीकरण होत आहे. या व्यवस्थेत सर्वांना आरक्षण मिळाले तरी बेरोजगारीचा प्रश्न कायम राहील. समाजाचा प्रवास वाईट दिशेने सुरू आहे. मोर्चातून रस्त्यावर उतरलेली तरुणाई आपल्यालाच प्रश्न विचारणार आहे. या राजकारण्यांना असलेल्या भितीमुळे मोर्चे मूक आहेत. अराजकता ओढवण्याबरोबरच आर्थिक संकटाचा धोका निर्माण झाला आहे,’ याकडे फुटाणे यांनी लक्ष वेधले.
‘१९८६मध्ये मी राजकीय विडंबन कवितांचे कार्यक्रम करू लागलो. कविता जीवनाचे साधन होईल, असे कधी वाटले नाही. मला व्यंगचित्रकार व्हायचे होते, पण झालो व्यंगकवी,’ अशा शब्दांत फुटाणे यांनी आपला काव्यमय प्रवास कथन केला. ‘राजकारणात कोणाचा रोष कधी पत्करावा लागला नाही. पूर्वी टीका खेळीमेळीने घेतली जात होती, आता चित्र बदलले आहे,’ असे मतही त्यांनी नोंदविले.
-----------------
वात्रटिका नव्हे, भाष्यकविता
‘लोकभाषा ही मंचावरची गरज असते. सादरीकरणात बोलीभाषाच हवी. वात्रटिकाकार हा शब्द मंगेश पाडगावकरांचा आहे. माझ्या कविता या भाष्यकविता आहेत, पण सर्वच कवितांना वात्रटिका म्हणून ओळखले जाते,’ अशी खंत रामदास फुटाणे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यसंमेलनाध्यक्षपदी श्रीनिवास भणगेंच्या नावाचा प्रस्ताव?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आगामी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ रंगकर्मी श्रीनिवास भणगे यांचे नाव अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने सुचविले आहे. आगामी संमेलनाध्यक्षपदासाठी सुचविण्यात आलेले हे पहिले नाव आहे. पुणे शाखेने भणगे यांचे नाव गेल्या वर्षीही सुचविले होते.
नाट्य परिषदेतर्फे २०१७ मध्ये संपन्न होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सभासदांकडून नावे मागविण्यात आली आहेत. पुणे शाखेने शुक्रवारी भणगे यांचे नाव पत्राद्वारे मध्यवर्ती शाखेला कळविले. या पत्रात भगणे यांची परवानगी म्हणून स्वाक्षरी आहे. सूचक म्हणून पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख व अनुमोदक म्हणून प्रमुख कार्यवाह दीपक रेगे यांची स्वाक्षरी आहे.
‘नाट्य संमेलनाध्यक्षपदासाठी सदस्यांनी आपले सूचनापत्र संबंधित व्यक्तीच्या लेखी संमतीसह तसेच सूचक व अनुमोदकाच्या स्वाक्षरीसह परिषदेच्या मुंबई येथील मध्यवर्ती शाखेकडे पाठवावेत,’ असे आवाहन परिषदेने केले आहे. ‘सूचनापत्र ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने पाठवावीत. सूचक, अनुमोदक व सूचित व्यक्ती परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य असता कामा नये. मात्र, ते परिषदेचे आजीव सदस्य असायला हवेत,’ अशी सूचना परिषदेने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाशकुपी मंगळावर धडकली?

0
0

‘जीएमआरटी’ला गुरुवारीही सिग्नल नाहीत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
युरोपियन स्पेस एजन्सीची शिआपरेली ही अवकाशकुपी मंगळावर वेगाने धडकल्याचे आता स्पष्ट होत आहे. वेळेआधीच उघडलेल्या पॅरेशूटमुळे अवकाशकुपी अलगद मंगळाच्या जमिनीवर उतरण्याच्या प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे पार पडल्या नाहीत आणि मिनिटभर आधीच कुपीचा पृथ्वीशी संपर्क तुटला, असे इसाने गुरुवारी स्पष्ट केले. जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपने (जीएमआरटी) गुरुवारी पुन्हा केलेल्या पाहणीत कुपीकडून कोणतेही सिग्नल मिळाले नाहीत.
युरोपच्या २०२० मध्ये अपेक्षित असणाऱ्या मंगळ मोहिमेची पूर्वतयारी म्हणून मंगळाभोवती फिरणारे यान आणि शिआपरेली या अवकाशकुपीचे प्रक्षेपण करण्यात आले होते. अवकाशकुपीला सुरक्षित आणि अलगद मंगळाच्या भूमीवर उतरवण्याचे उद्दिष्ट्य या मोहिमेतून निश्चित करण्यात आले होते. बुधवारी (१९ ऑक्टोबर) अपेक्षेप्रमाणे कुपीचा मंगळाच्या जमिनीच्या दिशेने प्रवास सुरु झाला. मंगळाच्या वातावरणात कुपीने प्रवेश केल्यावर साधारण साडेपाच मिनिटे घटना अपेक्षेप्रमाणे घडल्या. मात्र, कुपीवरील पॅरेशूट अपेक्षित वेळेच्या आधीच उघडले. त्याचप्रमाणे कुपीचा वेग कमी करण्यासाठी ज्वलन होणारे रेट्रो रॉकेटही अपेक्षित वेळेपर्यंत सुरू राहिले नाहीत. परिणामी कुपीचा वेग कमी झाला नाही, असे इसाच्या शास्त्रज्ञांनी गुरुवारी स्पष्ट केले. भविष्यातील मंगळ मोहिमेवर थेट परिणाम होऊ नये यासाठी हा प्रयोग अयशस्वी झाल्याची घोषणा करण्यासाठी वेळ लागत असल्याचे अवकाशतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जीएमआरटीला गुरुवारी पुन्हा कुपीकडून काही सिग्नल येत आहेत का हे तपासण्याची विनंती इसाने केली होती. त्यानुसार वेधशाळेच्या ३० अॅन्टेना वापरून सायंकाळी चार ते सहा या वेळेत निरीक्षण करण्यात आले. मात्र, या काळात कुपीकडून कोणताही सिग्नल मिळाला नसल्याचे संस्थेचे अधिष्ठाता प्रा. यशवंत गुप्ता यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘३४ बुधवार’चा आता नवा ‘सन्मान’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
रस्त्यावर सर्व दिशांना मोठमोठे फ्लेक्स/बॅनर, महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी, मोठमोठ्या अलिशान गाड्यांच्या पार्किंगमुळे व्यापलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजू... अन् दाटीवाटीतल्या ‘३४ बुधवार’ ऐवजी जंगली महाराज रोडलगतच्या ‘हॉटेल सन्मान’ येथे वाढलेला राबता...
भारतीय जनता पक्षाच्या हंगामी स्वरूपातील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे शुक्रवारी औपचारिक उद्घाटन झाले.
जोगेश्वरी मंदिराशेजारी असणाऱ्या पक्षाच्या शहर कार्यालयाची अपुरी जागा आणि तेथे निर्माण होणारा पार्किंगचा प्रश्न, यामुळे भाजपने तात्पुरत्या स्वरूपात कार्यालयाचे स्थलांतर केले आहे. जंगली महाराज रोडजवळ शिरोळे रस्त्यावरील ‘हॉटेल सन्मान’ येथे भाजपचे कार्यालय असेल. महापालिकेच्या आगामी निवडणुकीपर्यंत हेच पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय राहणार असल्याने सर्व बैठका, पदाधिकाऱ्यांचे मेळावे, मार्गदर्शन सत्र आणि इतर घडामोडींसाठी हेच मुख्य केंद्र असेल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनीच जाहीर केले. शहराचे खासदार, आमदार, पदाधिकारी सर्व जण आपापल्या वेळेनुसार येथे कार्यकर्त्यांना भेटतील, असेही स्पष्ट केले गेले.
या हंगामी कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी शिरोळे रस्त्यावर ‘हॉटेल सन्मान’च्या बाहेर सर्वत्र भाजप कार्यकर्त्यांतर्फे मोठमोठे फ्लेक्स/बॅनर लावण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या स्वागताची जय्यत तयारी स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी केली होती. प्रदेशाध्यक्षांची धावती भेट असली, तरी त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल, या अपेक्षेने शहराच्या विविध भागांतील इच्छुक मोठ्या संख्येने शुक्रवारी सकाळी उपस्थित होते. या इच्छुकांसमवेत स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्तेही असल्याने हॉटेल सन्मानचे आवारही अपुरे पडले. कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेऊन दानवे पुढील कार्यक्रमासाठी तातडीने रवाना झाले. त्यानंतरही, भाजपचे अनेक इच्छुक पक्षातील वरिष्ठ नेते, खासदार-आमदार, पदाधिकारी यांच्याशी चर्चेत गुंग होते. गोपाळकृष्ण गोखले रस्ता (एफ. सी. रोड) आणि जंगली महाराज रोड यांना जोडणाऱ्या शिरोळे रस्त्यावर अनेक आलिशान गाड्या उभ्या राहिल्याने बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. तर, भाजपचा ‘लूक’ बदलत असल्याचीही चर्चा होती.
.................
खासदार काकडेंचे फोटो फ्लेक्सवर
गेल्या काही दिवसांमध्ये विविध पक्षांतून भाजपमध्ये झालेले प्रवेश खासदार संजय काकडे यांच्या पुढाकारातून झाल्याची चर्चा आहे. यापुढील काळातही काही प्रवेश त्यांच्या माध्यमातून होण्याची शक्यता असल्याने भाजपच्या लोकनियुक्त खासदार-आमदारांसह प्रत्येक पोस्टर/बॅनरवर राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांचीही छबी झळकत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नैसर्गिक इंधनाच्या आधारे अपारंपरिक ऊर्जास्रोतांची निर्मिती

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
प्लास्टिकची बाटली कापून, त्यात दोन साध्या शिसपेन्सिल्स वापरून तयार केलेला हायड्रोजन फ्युएल सेल आणि त्या आधारे लागणारे एलईडी लाइट्स.. एका भांड्यात चिखल वा शेणखत वापरून तयार झालेला बायोलॉजिकल फ्युएल सेल आणि त्या आधारे लागणारे दिवे.. हे सारे अभिनव प्रकल्प तुम्हाला भारती विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये फेरफटका मारल्यास अनुभवायला मिळतील.
भारती अभिमत विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये अभ्यासक्रमांविषयीची स्वायत्तता वापरून घेण्यासाठी गेल्या काही काळामध्ये व्यापक प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातूनच यंदा कॉलेजच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी अगदी साध्या साहित्यातून, नैसर्गिक रीतीने उपलब्ध होणाऱ्या इंधनांच्या आधारे अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या शक्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. कॉलेजचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकल्पांची ‘मटा’ला माहिती दिली.
डॉ. भालेराव म्हणाले, ‘आम्ही आमच्या अभ्यासक्रमातून इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे, विशिष्ट संकल्पनांसाठी म्हणून एकत्रित काम करणे आदी बाबींसाठी चालना देत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना छोट्या प्रकल्पांवर काम करायला लावले. विद्यार्थ्यांचे हे छोटे प्रकल्प या पुढील टप्प्यामध्ये मोठ्या प्रकल्पांमध्ये रूपांतरित करण्यासाठी चालना दिली जाणार आहे.’
नेहमीच्या वापरातील मिठाचे पाणी वापरून हायड्रोजन फ्युअल सेल तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटातील शुभांकर गुप्ता याने आपला हा प्रकल्प ग्रामीण भागामध्ये वीजेची कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा दावा केला. हायड्रोजन वायूची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यासाठीही याच प्रकल्पाचा वापर करणे शक्य असल्याचेही त्याने नमूद केले. शेण, शेताच्या परिसरात असणारा चिखल आणि त्यामध्ये असणारे जीवाणूही अशाच पद्धतीने वीजेची निर्मिती करू शकतात. एका भांड्यात पाणी, तर दुसऱ्या भांड्यात हा चिखल ठेवून, दोन्ही भांडी सॉल्ट ब्रीजने जोडली, तरी त्यामध्ये रासायनिक अभिक्रियेला चालना मिळते. भांड्यातील पाण्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केल्यास, या अभिक्रिया अधिक वेगवान होतात. त्यातून अंतिमतः एलईडी दिवे लावण्याइतपत वीजेची निर्मिती होणे शक्य असल्याचे आपल्या प्रकल्पातून समोर आल्याची माहिती सृजन श्रीवास्तव याने दिली. प्रा. डॉ. दीपक बनकर, प्रा. श्रीपाद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढील टप्प्यात हे प्रकल्प अधिक व्यापक पातळीवर नेण्याचा प्रयत्न होणार असल्याचेही या विद्यार्थ्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ऑरकस’च्या खासगीकरणास स्थगिती

0
0

काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीचा परिणाम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या मालकीचे हॉस्पिटल खासगीकरणाद्वारे चालविण्यासाठी देण्याच्या महापौरांच्या हट्टावर पाणी पडले आहे. वानवडी भागातील महापौर प्रशांत जगताप यांच्या प्रभागातील हॉस्पिटलची जागा ऑरकस हॉस्पिटलला चालविण्यास देण्याच्या सर्वसाधारण सभेच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाने स्थगिती दिली आहे. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याने ही स्थगिती देण्यात आली आहे.
महापालिकेच्या मालकीची हॉस्पिटल खासगी संस्थेला चालविण्यासाठी देताना तीस वर्षाचा करार करू नये, असा ठराव सर्व‍साधारण सभेत करण्यात आला आहे. पालिकेची हॉस्पिटल चालविण्यासाठी दिल्यास सर्वसामान्य नागरिकांना अल्पदरात उपचार मिळत नाहीत, त्यामुळे हॉस्पिटलचे खासगीकरण करु नये, असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करत गेल्या महिन्यात शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर जगताप यांच्या प्रभागातील हॉस्पिटल खासगीकरणाद्वारे चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने याला विरोध केलेला असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप, शिवसेना, मनसेच्या मदतीने हा प्रस्ताव मतदानाद्वारे मान्य करुन घेतला. हॉस्पिटलचे खासगीकरण करण्यास काँग्रेस तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सभासदांनी विरोध केला होता. मात्र, मतदान घेऊन हा विषय मंजूर करण्यात आला. महापौर जगताप यांच्या हट्टासाठी हा विषय मान्य करण्यात आला होता.
महापालिकेच्या मुख्य सभेने चुकीच्या पद्धतीने हा विषय मान्य केल्याने याला स्थगिती द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी करत हा प्रस्ताव स्थगित करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर या निर्णयाला स्थगिती देत या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्ण‍य मुख्यमंत्री कार्यालयाने घेतला आहे. ही प्रक्रिया काही दिवस थांबविण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.
०००
महापौर-पालकमंत्र्यांमध्ये वाद
महापौर प्रशांत जगताप आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या‍मध्ये गेल्या काही महिन्यांपासून कुरघोडी सुरू आहे. महापौरांनी मोठ्या हट्टाने सर्वसाधारण सभेत मान्य केलेल्या या खासगीकरणाच्या प्रस्तावाला स्थगिती द्यावी, यासाठी पालकमंत्री बापट यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे. महापौर जगताप यांच्यावरील प्रेमामुळेच मुख्यमंत्री कार्यालयाकडे बापट यांनी विशेष पाठपुरावा केला असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मसाप’च्या माजी पदाधिकाऱ्यांना डच्चू

0
0

संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतदारयादीतून वगळले
म. टा. प्रतिनिधी, पुणे
साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतदार यादीतून महाराष्ट्र साहित्य परिषदेने पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांची नावे वगळली आहेत. माजी पदाधिकाऱ्यांसह पिंपरी येथील संमेलनाचे स्वागताध्यक्ष, समन्वयक यांचेही नाव वगळण्यात आले आहे. मात्र, परिषदेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त मंडळाचे माजी अध्यक्ष यांचे नाव कायम ठेवण्यात आले आहे.
९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे राबविण्यात येत आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे, कवी प्रवीण दवणे, डॉ. जयप्रकाश घुमटकर व मदन कुळकर्णी हे चारजण आहेत. साहित्य महामंडळाच्या घटक संस्थेचे सभासद संमेलनाध्यक्षपदाचे मतदार असतात. मतदारांचा ठराविक कोटा असल्याने एकूण सभासदांपैकी ठराविक सभासदांची मतदार म्हणून निवड केली जाते. पण याबाबत कोणतीही नियमावली नसल्याने कार्यकारिणी ठरवेल, त्यांनाच मतदानाचा अधिकार प्राप्त होतो.
आगामी साहित्य संमेलनाची मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, त्यामधून परिषदेच्या माजी कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन, पिंपरी येथे झालेल्या ८९ व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर यांचे नाव मतदारयादीतून वगळण्यात आले आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर व परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे माजी अध्यक्ष अॅड. भास्करराव आव्हाड यांचे नाव कायम ठेवण्यात आले आहे. परिषदेत परिवर्तन झाल्याने नवनिर्माण पॅनलशी संबंधित सभासदांचे नाव वगळण्यात आले आहे. माजी अध्यक्षांची परिवर्तनशी जवळीक असल्याने तसेच पदाचे महत्त्व लक्षात घेता त्यांचे नाव कायम ठेवण्यात आल्याची साहित्य वर्तुळात चर्चा आहे.
साहित्य परिषदेचे राज्यभरात सुमारे ७० शाखांतून १२ हजार सभासद आहेत. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत यापैकी केवळ १७५ जण मतदार म्हणून निवडले जातात. परिषदेच्या पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांचा मतदार यादीत समावेश करावा, असा नियम नसला तरी सहसा त्यांना डावलले जात नाही. परिषदेचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळ व पदाधिकारी यांची संख्या मोठी असल्याने सभासद असलेले साहित्यिक व साहित्य रसिक यांचा निवडणूक प्रक्रियेशी फारसा संबंध येत नाही. त्यात पुन्हा पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांमुळे संख्या वाढू नये म्हणून समावेश करण्यात येत नाही, याकडे साहित्य वर्तुळातील जाणकारांनी लक्ष वेधले.
---------------------------
मतदार यादी सर्वसमावेशक करण्यात आली आहे. १७५ मतदारांमध्ये कार्यकारिणीचे ४० सदस्य आहेत. परिषदेचे कार्यक्षेत्र १४ जिल्ह्यात आहे. उर्वरित मतदार या प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येकी १० याप्रमाणे निवडण्यात आले आहेत. जिल्ह्यातील मतदार संख्येनुसार ही निवड करण्यात आली आहे.
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष- महाराष्ट्र साहित्य परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप युतीसाठी अनुकूल

0
0

सन्मानपूर्वक तडजोडीची अपेक्षा; भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांची स्पष्टोक्ती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेकडून युतीऐवजी स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले जात असताना, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी शुक्रवारी युतीबाबत अनुकूल असल्याचे स्पष्ट केले. ‘आम्ही युतीच्याच बाजूचे असून, सन्मानपूर्वक युती झाल्यास एकत्र निवडणूक लढवू’, असे त्यांनी जाहीर केले.
आगामी निवडणुकीनिमित्त भाजपच्या जंगली महाराज रोडलगत हंगामी निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते झाले. या वेळी शिवसेनेसोबत युतीसाठी आमची तयारी असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. सन्मानपूर्वक युती झाली नाही, तर निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी असल्याचा दावा त्यांनी केला.
शिवसेनेकडून गेल्या अनेक दिवसांपासून सन्मानपूर्वक युतीची भाषा केली जात आहे. भाजपदेखील आता तीच भाषा वापरत असल्याने सन्मानपूर्वक युती म्हणजे नक्की काय, असे विचारले असता दानवे म्हणाले, ‘निवडणुकीसाठीच्या जागांचा प्रस्ताव आमच्याकडून शिवसेनेला सादर केला जाईल. त्यांचा प्रस्तावही आमच्याकडे येईल. दोन्ही प्रस्तावांचा अभ्यास करून आम्हांला आणि त्यांना अनुकूल असलेल्या भागांत जागा निश्चित केल्या जातील. ही प्रक्रिया दोघांसाठी लाभदायक ठरल्यास आगामी निवडणुकांमध्ये एकत्र लढू.’
‘निवडणुकीसाठी युतीचे सर्वाधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. शिवसेना, रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम अशा सर्व मित्रपक्षांशी चर्चा करून निर्णय घेण्याच्या सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
...
पक्षात घेतले म्हणजे तिकीट नाही
दुसऱ्या पक्षातून येणाऱ्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश दिला म्हणजे त्यांचे पुढील निवडणुकीतील तिकीट नक्की झाले, असे होत नाही. भाजपमध्ये उमेदवारांची निवड करण्यासाठी स्वतंत्र मंडळ आहे. त्यांच्यातर्फेच, निवडणुकीतील उमेदवारी निश्चित होते. पक्षात प्रवेश देताना कोणालाही निवडणुकीत तिकीट देण्याचे आश्वासन दिलेले नाही, असा दावा दानवे यांनी केला. भाजपची काही ध्येय-धोरणे आहेत. पक्षात येणाऱ्यांनी त्यानुसारच वागले पाहिजे, असे बंधन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, सर्व आमदार, शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि पक्षाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. मनसेचे उपाध्यक्ष शिरीष भुजबळ यांनी दानवे यांच्या उपस्थितीत या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
..................
‘आगामी निवडणुकीसाठी सर्व तयारी या कार्यालयातून होणार असून, आगामी निवडणुकीत महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. त्या वेळी नव्या महापौरांचे स्वागत याच कार्यालयात केले जाईल.’
- रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचवीपासून ठरणार पास-नापास

0
0

Yogesh.Borate@timesgroup.com

पुणेः नापास न करण्याचे धोरण चौथीपर्यंतच राबवून पाचवीपासून रीतसर पास-नापासाची पद्धत सुरू करण्याची सूचना राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे. पाचवीत एखाद्या किंवा काही विषयांत मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्ष थांबवून त्या विषयांचे अधिक प्रशिक्षण देण्याचा विचार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. पाचवीपर्यंत नापास न करण्याची सूचना केंद्राच्या धोरणाबाबतच्या टिपणात असताना राज्यात ते चौथीपर्यंतच का, असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

शिक्षणहक्क कायद्यानुसार देशभरात सध्या इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही. मात्र, यामुळे शिक्षणाची गुणवत्ता खालावत असल्याची देशव्यापी तक्रार असल्याने हे धोरण पाचवीपर्यंतच राबविण्याची सूचना नव्या शैक्षणिक धोरणासाठीच्या टिपणात करण्यात आली आहे. याबाबत राज्यांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्राकडून विचार केला जात असून, याबाबत पुढील आठवड्यात दिल्लीतील बैठकीत सूचना दिल्या जाणार आहेत.

‘पाचवीच्या टप्प्यावर परीक्षा घेऊन, एखाद्या विषयात खूपच मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या विषयाचे अधिक चांगले प्रशिक्षण एक वर्ष देण्याची आमची सूचना आहे,’ असे तावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘पाचवीला मुलांची परीक्षा घेऊन, ते कोणत्या विषयात कमकुवत आहेत, याचा आढावा घेतला जावा. ते कमकुवत असलेल्या विषयांच्या अधिक तयारीसाठी मुलांना एक वर्ष मागे ठेवून, त्यांना त्या विषयाचे प्रशिक्षण द्यावे, अशी राज्याची भूमिका असून, ती आम्ही केंद्राकडे मांडणार आहोत.’

‘नो डिटेन्शन पॉलिसी’ म्हणजे परीक्षाच बंद हे चुकीचे आहे. त्यामुळे अभ्यास बंद अशीच मानसिकता बनली आहे. परीक्षा घेतली पाहिजे, परीक्षा घेऊन ज्या विषयात मुले कमी आहेत, त्या विषयात त्यांना अधिक चांगले शिकविले पाहिजे, ही भूमिका असल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअर तरुणीवर सामूहिक बलात्कार

0
0

वाघोलीतील प्रकार; तिघांना अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाघोली परिसरातील कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर दोघांनी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
या बाबत कम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यावरून करण श्रीकांत घुगे, महेश दत्तात्रय कोरडे आणि अविनाश विजयकुमार शेळके (सर्वजण रा. वाघोली) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी १८ ऑक्टोबरला परीक्षा देऊन घराकडे निघाली होती. त्यावेळी करणने तिला थांबवून माझे सबमिशन सुरू आहे. त्यासाठी मदत करण्याची विनंती केली. मात्र, संबंधित तरुणीने ओळखत नसल्याचे सांगितले. मात्र, करणने फारच गळ घातल्यानंतर तिने मदत करण्यास होकार दिला.
त्यानंतर पीडिता आणि करणसह त्याच्या रूमजवळ गेली. रूममध्ये गेल्यानंतर फाइल सापडत नसल्याची बतावणी करून त्याने पीडितेला बोलवून घेतले. ती रूममध्ये आल्यानंतर दरवाजा बंद करून त्याने तिच्यावर बलात्कार केला. घाबरलेल्या तरुणीने या प्रकाराची वाच्यता कोणाकडेही केली नाही. त्यानंतर तिच्या मोबाइलवर विविध क्रमांकांवरून फोन आणि मेसेज येऊ लागले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी महेशने तिला ‘तुझ्यासोबत काय झाले हे मला माहीत आहे,’ असा मेसेज पाठवला. त्यानंतर तिला मदत करण्याच्या बहाण्याने महेशने तिच्याशी ओळख वाढवली.
त्यावेळी तिने आपल्याला अनोळखी क्रमांकांवरून त्रास देणारे फोन येत असल्याचे महेशच्या कानावर घातले. अत्याचार झाल्याची जागा दाखविण्याचे निमित्त करून महेशने तिला त्याच रूम्मध्ये नेले. तेथे त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडितेला अविनाश याने मेसेज करून संपर्क साधला. त्यामुळे तिने घाबरून हा प्रकार मोठ्या बहिणीला सांगितला. त्यानंतर तिने लोणीकंद पोलिसांकडे तक्रार केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images