Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘आधुनिकतेमुळे जातो शेतकऱ्याचा बळी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘सत्तर वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही. शेतीमध्ये आधुनिकतेचा शिरकाव झाल्याने शेतकऱ्याचा बळी जात आहे. पिकांवरील औषध फवारणीचा होणारा परिणाम त्याला माहीत नसतो. हे शेतकऱ्याने स्वत: ओढवून घेतलेले दु:ख आहे,’ अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केली.
अमरावती येथील कलावंत संजय गणोरकर यांच्या ‘लहरी निसर्ग आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणारा शेतकरी’ या विषयावरील शिल्पप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सोमवारी डॉ. अवचट बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत जागृती निर्माण व्हावी या हेतूने हे प्रदर्शन राज्यभर शहरातून भरविण्यात येत आहे. सृष्टी सांस्कृतिक आणि विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालन येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रसंगी माजी प्राचार्य भाऊसाहेब जाधव, सुधीर पटवर्धन, भारतीय जैन संघटनेचे प्रफुल्ल परख, पत्रकार शर्मिष्ठा भोसले, कवी भारत दौंडकर आणि कल्पना दुधाळ आदी उपस्थित होते.
‘शेतकरी आत्महत्येसारख्या संवेदनशील विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रदर्शने भरविली जातात, ही राज्यातील जनता जागी असल्याची खूण आहे. मात्र, तेवढेच पुरेसे नाही. या समस्येच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे,’ असे सांगून अवचट म्हणाले, की ‘सत्तर वर्षांपूर्वी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. पाऊस झाला नाही तर, शेतकरी मुंबईमध्ये जाऊन हमाली करायचा आणि उन्हाळ्यात शेत नांगरायला गावी परतायचा. जसा शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला, तसे चित्र पूर्णत: बदलले. भूलभुलैय्यात शेतकरी सापडला आहे. गुरांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. पिकांवर औषधांच्या फवारण्या केल्या जात आहेत. या आधुनिकतेच्या पुरलेल्या वाटेचे ते बळी ठरले आहेत. हे ओढवून घेतलेले दु:ख आहे.’
भारत दौंडकर आणि कल्पना दुधाळ यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कवितेतून वाचा फोडली. सूत्रसंचालन प्रशांत कोठाडिया यांनी केले.
--------------
अंतर्मुख करणारी चित्रे
प्रदर्शनात टेराकोटामधील मांडण्यात आलेली विविध प्रकारची म्यूरल्स लक्ष वेधून घेत आहेत. खोल फुटक्या विहिरीवर दोर घेऊन चढणारी माणसे, नवऱ्याच्या अस्थीविसर्जनाची फुटलेली मडकी मांडीवर घेऊन बसलेल्या दोन बायका, करपलेले पीक...शेतकऱ्यांचा आत्महत्यासारख्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधणाऱ्या अशा कलाकृतींनी उपस्थित अंतर्मुख होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


९२ लाखांची फसवणूक

0
0

बनावट क्रेडिट कार्डांद्वारे स्टेट बँकेला गंडा; दोघे आरोपी अटकेत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बनावट कागदपत्रांच्या आधारे स्टेट बँकेची (एसबीआय) पंच्याहत्तर क्रेडिट कार्डे सोर्स करून ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. अवघ्या साडेतीन महिन्यांत एवढी मोठी फसवणूक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या सायबर सेलने या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता असून, याद्वारे क्रेडिट कार्ड फसवणुकीचा नवीन प्रकार समोर आला आहे. कमलकिशोर उर्फ हसन हनीफ शेख (वय २५, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, मूळ रा. लखनऊ) आणि यादवेंद्र प्रताप शिवकुमार सिंग (वय ४०, रा. विद्यानगर, वडगाव शेरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी स्टेट बँकेच्या विजय बालाजी शिंदे (वय ३१, रा. नवी मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे.
..
कशी होते फसवणूक
‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या ग्राहकांसाठी क्रेडिट कार्डची सुविधा ही स्टेट बँकेमार्फत देण्यात येते. ‘एसबीआय’चे क्रेडिट कार्ड विभागाचे काम नामदार गोपालकृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता) येथील कार्यालयातून चालते. ‘एसबीआय’ने ग्राहकांकडील माहिती, कागदपत्रे संकलित करणे, अर्ज भरणे यासाठीचे काम ‘इंटेल नेट ग्लोबल सर्व्हिसेस’ कंपनीला दिले आहे. आरोपी हसन या कंपनीत ‘सेल्स एक्झिक्युटिव्ह’ म्हणून नोकरीस होता. क्रेडिट कार्डसाठी लागणारी कागदपत्रे ग्राहकांकडून घेऊन ती मुख्य शाखेत पाठवण्याचे काम त्याच्याकडे होते. या कागदपत्रांमध्ये अफरातफर करून त्याने ७५ क्रेडिट कार्डे ‘एसबीआय’मधून काढली. या प्रकरणी नदीम शेख यांनी तक्रार दाखल केली होती. शेख यांनी क्रेडिट कार्ड न काढताही त्यांच्या नावावर ८९ हजार रुपये काढल्याचे दिसून आले.
..
कसा झाला तपास
शेख यांची तक्रार आल्यानंतर सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी तपास सुरू केला. शेख यांचे क्रेडिट कार्ड काढताना त्यांची कागदपत्रे जोडल्याचे लक्षात आले होते. शेख यांच्या नावाने क्रेडिट कार्ड काढलेल्या अधिकाऱ्याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी ते हसनने काढल्याचे लक्षात आले. हसनकडून आलेल्या अर्जांची छाननी केली असता ७५ क्रेडिट कार्डांवर संशय व्यक्त करण्यात आला. या क्रेडिड कार्डांद्वारे कोठून पैसे काढण्यात आले, याचा तपास केला असता तपकीर गल्ली आणि कोंढवा ही ठिकाणे समजली.
..
अशा प्रकारे काढले पैसे
हसनने पैसे काढण्यासाठी यादवेंद्रची मदत घेतली. यादवेंद्रने वडगाव परिसरातून कार्डांद्वारे ३२ लाख रुपये काढल्याचे लक्षात आले आहे. क्रेडिट कार्ड स्वाइप मशिन असलेल्या व्यावसायिकांना आरोपींकडून विश्वासात घेण्यात येई. वस्तू खरेदी करण्यापेक्षा स्वाइप केल्यानंतर पैसे देणारे दुकानदार शोधण्याचे काम हे दोघे करीत असत. त्यासाठी दुकानदारांना कमिशनही देण्यात येईल. कार्ड स्वाइप केल्यानतंर दुसऱ्या दिवशी दुकानदाराच्या खात्यात पैसे जमा होत असत. पैसे खात्यावर जमा झाले की ही जोडगोळी त्याच्याकडून परत घेत असत. हसनने बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याचे दाखवले आणि त्याआधारे एका खासगी बँकेकडून स्वाइप मशिन मिळवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळींची मागणी वाढणार?

0
0

तूर डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ झाली स्वस्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील घाऊक बाजारात ग्राहकांकडून डाळींची मागणी यंदा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीचा अनुभव पाहता गेल्या आठवड्यापासून डाळींची होणारी दरवाढ थोडीशी थांबली आहे. गेल्या आठवड्यात तूरडाळ, हरभराडाळ, मूगडाळीचे दर दोनशे ते पाचशे रुपयांनी उतरले. उडीद डाळही पाचशे रुपयांनी घटली आहे.
गेल्या आठवड्यात मटकी डाळ आणि मसूरडाळीचे दर स्थिर होते. कडधान्याचेही दर स्थिर होते. हरभरा डाळीचे दर उतरल्यामुळे बेसनासह भाजक्या डाळीच्या दरात थोडीशी वाढ झाली. परंतु, मागणी वाढण्याची शक्यता असल्याने डाळीमध्ये आणखी दरवाढ होण्याची अधिक शक्यता आहे. ‘मार्केट यार्डात डाळींचे दर गेल्या आठवड्यापासून उतरले आहेत. या आठवड्यात हे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. परंतु, सध्या ग्राहकांकडून फारशी मागणी नाही. परंतु, दिवाळीसाठी मागणी वाढल्यास त्याचा परिणाम डाळींच्या किमतीवर होऊ शकतो,’ अशी शक्यता व्यापारी विजय राठोड यांनी व्यक्त केली.
‘पावसामुळे नव्या डाळी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात उपलब्ध होईल. त्यामुळे दिवाळीदरम्यान डाळींचा फारसा पुरवठा होणार नाही. येत्या चार ते आठ दिवसांत लातूरमधून हरभरा डाळ मिळणे मुश्कील होणार आहे. सध्या विदर्भात थोड्या प्रमाणात हरभरा डाळ उपलब्ध आहे. सरकार डाळ आयात करणार असल्याची केवळ घोषणाच करते. प्रत्यक्षात आयात डाळ अद्याप उपलब्ध झालेली नाही. गेल्या वर्षी डाळींमुळे बेसन आणि भाजकी डाळ महागली होती, ’ अशी माहिती डाळींचे व्यापारी नितीन नहार यांनी दिली.
..
केंद्रीय अन्न मंत्रालयाने राज्यांना डाळीची मागणी नोंदविण्याची सूचना केली होती. महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी डाळीची मागणी केंद्राकडे केलीच नाही. त्यामुळे आयात होऊ शकलेली नाही. तसेच, देशातील मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याने राज्य सरकारने पाठविलेला डाळ दर नियंत्रण कायद्याचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला आहे. त्यामुळे डाळींची मागणी वाढल्यास पुन्हा डाळ तेजीत येण्याची चिन्हे आहेत.
नितीन नहार, डाळींचे व्यापारी
..
डाळींच्या किंमती (क्विंटलमध्ये)
डाळ २०१५चे दर (रुपयांत) यंदाचे दर (रुपयांत)
तूर डाळ ............१५, ५०० ९५०० ते १२,५००
हरभरा डाळ......६,८००...................... १२,५०० ते १३,०००
मूग डाळ ..........१,५०० ६,५०० ते ७,०००
मसूर डाळ............ ७,००० ते ७५०० ६,६०० ते ६,७००
मटकी डाळ .........१०,००० ..................... ६,८०० ते ७,५००
उडीद डाळ ............. १५,००० .............. ९,५०० ते ११,०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ पार्किंग शुल्क रद्द

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोहगाव विमानतळावर प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा आणण्यासाठी गेलेल्या वाहनांसाठी सात मिनिटांची अट स्थगित करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत विमानतळावर पार्किंगसाठी बंदी घालण्यात आली असून, प्रवाशांच्या वाहनांना सात मिनिटांपेक्षा अधिक कालावधी लागल्यास आकारण्यात आलेला ८५ रुपयांचा दंडही मागे घेण्यात आला आहे.
लोहगाव विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी सोमवारी हा आदेश जारी केला. विमानतळ प्राधिकरणातर्फे विमानतळावरील पार्किंगसाठी नवी नियमावली आणि नवीन निविदा (टेंडर) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आज, मंगळवारपासून (१८ ऑक्टोबर) नवी प्रक्रिया लागू होईपर्यंत ८५ रुपयांचे पार्किंग शुल्क स्थगित करण्यात आले आहे. या काळात नागरिकांच्या वाहनांना विमानतळावर सात मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागला तरीही शुल्क आकारण्यात येणार नाही, असे यात म्हटले आहे.
विमानतळाबाहेरील रस्ता अरूंद आहे. नागरी उड्डाणांसाठी असलेल्या मर्यादित वेळेत या ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी असते. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. परिणामी विमानतळाच्या प्रवेशद्वारातून आत आलेल्या वाहनांना सात मिनिटात बाहेर पडणे शक्य होत नव्हते. अनेकदा सात मिनिटांपेक्षा कमी कालावधी लागूनही चालकाकडून सक्तीने हे शुल्क वसूल केले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली होती. कॅब घेऊन गेलेल्या नागरिकांकडूनही ही वसूली केली जात होती. त्याबाबतच्या तक्रारी थेट नागरी वाहतूक मंत्रालयापर्यंत गेल्या होत्या. ‘मटा’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून सक्तीच्या वसुलीला वाचा फोडली होती.
केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी पुणे भेटीच्या वेळी याबाबत चर्चा करून योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पुणे विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांनीही प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर नव्याने आदेश जारी करण्यात आले आहेत. 'या आदेशामुळे नागरिकांची होणारी लूट थांबणार आहे. लवकरच नवी पार्किंग नियमावली आणि शुल्करचना जाहीर केली जाईल,’ असे शिरोळे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावी परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा देणाऱ्या नियमित, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्राप्त झालेले खासगी विद्यार्थ्यांना ज्युनियर कॉलेजांमार्फत शुल्कासह २४ ऑक्टोबरपर्यंत तर, विलंब शुल्कासह २९ ऑक्टोबरपर्यत अर्ज भरता येईल, अशी माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सोमवारी सांगितले
मंडळाने बारावीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या परीक्षेला बसणारे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत विषयांची परीक्षा देणाऱ्या सर्वांनाच ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहे. या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची जबाबदारी उच्च माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेजांकडे आहे. अर्ज www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
अर्ज नियमितपणे विहीत शुल्कासह १७ ऑक्टोबरऐवजी आता २४ ऑक्टोबरपर्यंत भरायचे आहेत. तसेच, विलंब शुल्कासह २४ ऑक्टोबरऐवजी २९ ऑक्टोबरपर्यंत भरता येईल. अर्ज भरल्यानंतर मिळणारे चलन उच्च माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेजांना बँकेत येत्या १८ ते २९ ऑक्टोबरदरम्यान भरता येतील. विलंब शुल्कासह चलन २५ ते २९ ऑक्टोबरपर्यंत भरायचे आहे. राज्यातील उच्च माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेजांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे चलन आणि नावाच्या याद्या संबंधित विभागीय मंडळाच्या कार्यलयात येत्या ४ नोव्हेंबरपर्यत जमा करायच्या आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा न्यायालयाची सुरक्षा ‘रामभरोसे’

0
0

दिवसाढवळ्या आरोपी पळून गेल्यामुळे व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी फरारी झाल्यामुळे येथील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोर्टरूममधून फाइल चोरीला जाणे, नळ चोरीला जाणे, दुचाकी चोरीला जाण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर कोर्टाची सुरक्षाव्यवस्था भक्कम करण्यासाठी उपाययोजना राबविण्याची मागणी वकील आणि पक्षकारांकडून करण्यात येत आहे.
कोर्टाची सुरक्षा भक्कम करण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. आरोपींच्या सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा जिल्हा न्यायालयात राबविण्यात यावी. हायकोर्टाप्रमाणे सुरक्षेच्या उपाययोजना जिल्हा न्यायालयातही राबविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. करण्यात याव्यात, अशी मागणी वकिलांकडून करण्यात येत आहे.
कोर्टातील सुरक्षाव्यवस्था अपुरी असल्याचा फटका पक्षकारांनाही बसत आहे. काही वर्षांपूर्वी कोर्टाच्या आवारात खून झाल्यामुळे तेथे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. मात्र, हा बंदोबस्तही सध्या अपुरा पडत आहे. काही दिवसांपूर्वी कोर्टाच्या आवारातून एका वकिलाच्या कारमधून रोख रक्कम चोरीला गेली होती. महिला वकिलांच्या कक्षातून महिलेची पर्स चोरीला गेली होती. कोर्टरूममधून फाइल चोरीला गेल्याचाही प्रकार घडला होता. दिवाणी इमारतीतील एका कोर्टाचा हॉल आग लागून भस्मसात झाला होता. या घटनेत शेकडो फाइल जळून खाक झाल्या होत्या. पुणे जिल्हा न्यायालयातील प्रकरणांची संख्या लाखांच्या घरात आहे. कोर्टाच्या आवारात दररोज हजारो पक्षकार, वकील, न्यायालयीन कर्मचाऱ्यांची वर्दळ असते. त्यातच जिल्हा न्यायालयावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असे अलर्टही अनेकदा देण्यात आले आहेत.
पुणे बार असोसिएशनतर्फे कोर्टाच्या आवारात आणि परिसरात सीसीटीव्ही लावण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. कोर्टात जेलमधून आरोपी आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांची व्यवस्था करावी लागते. आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केल्यास पोलिसांवरील ताण कमी होईल, असे मत पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. मिलिंद पवार यांनी नोंदवले.
..
प्रमुख मागण्या याप्रमाणे...
- कोर्टात बसविण्यात आलेले स्कॅनर मशिन दुरुस्त करावेत.
- पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी.
- कोर्टासाठी १२६ पोलिसांची विविध पदे मंजूर आहेत. त्यांची भरती करावी.
- कोर्टाच्या आवारात आणि परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. त्याची कंट्रोल रूमही कोर्टात असावी..
....
पोलिसांच्या देखत आरोपीचे पलायन
पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून केल्याप्रकरणी सोमवारी कोर्टात हजर केलेल्या आरोपीने पलायन केल्याची घटना घडली. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कोर्टातून आरोपी फरारी झाल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरातील सर्व गेटवर बंदोबस्त वाढवून कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी फरारीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
सागर गणेश लबडे (२६, रा. रामोशी आळी, चैतन्य चौक, हडपसर) असे पळून गेलेल्याचे नाव आहे. संदीप बाळू नवसकर (१९, तुकाईनगर, वडगाव बुद्रुक) याचा खून केल्याचा गुन्हा त्याच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संतोष सुनील गायकवाड उर्फ लख्या (२५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द), अजय उर्फ छोट्या सुरेश जाधव (३०, साईनगर, हिंगणेखुर्द), नितीन दत्तात्रय रणझुंजार (वय २६, रा. नाईक चाळ, धायरी गाव) आणि महेश दिनकर कुलकर्णी (वय २२, रा. लातूर) यांच्यावर ६ एप्रिल २०१५ रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हा खटला सध्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्या कोर्टात सुरू आहे.
सोमवारी या खटल्यानिमित्त लबडे याला कोर्टात हजर करण्यात येणार होते. आरोपींना कोर्टात हजर करताना त्यांच्या बेड्या काढण्यात येतात. दुपारी तीनच्या सुमारास आरोपींच्या बेड्या काढून त्यांना पोलिस कोर्टात सोडत होते. त्यावेळी पोलिसांची नजर चुकवून सागरने पलायन केले. खटल्याच्या सुनावणीसाठी आरोपीचे नाव पुकारताना आरोपी कोर्टात हजरच नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांची धांदल उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चीनसह लष्करी सराव पुण्यात

0
0

‘हँड इन हँड’ मोहिमेच्या पुढील टप्प्याचे नोव्हेंबरमध्ये आयोजन

Prasad.Panse@timesgroup.com
.........
Tweet : @prasadpanseMT

पुणे : भारत आणि चीन लष्करादरम्यान सहावा संयुक्त लष्करी सराव नोव्हेंबर महिन्यात पुण्यात पार पडणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात हा सराव आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पाकिस्तानसोबतचे संबंध ताणले असतानाच पाकिस्तानशी खास मैत्री असलेल्या चीनसोबत होणाऱ्या या संयुक्त लष्करी सरावाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
लष्करातील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘मटा’ ला ही माहिती दिली. हा सराव म्हणजे केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाचाच एक भाग आहे. भारत आणि चीनच्या लष्करादरम्यान गेल्या काही वर्षांपासून ‘हँड इन हँड’ या नावाने संयुक्त लष्करी सराव पार पडत आहे. दोन्ही लष्करांदरम्यान परस्पर सामंजस्य वाढविण्याबरोबरच दहशतवाद आणि घुसखोरीशी लढण्यासाठी संयुक्त व्यूहरचना ठरविण्यावर यात भर देण्यात येणार आहे. या सरावाचाच हा सहावा टप्पा असेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. दोन वर्षांपूर्वी (नोव्हेंबर २०१४) असाच १२ दिवसांचा सराव पुण्यात पार पडला होता. या संयुक्त सरावात दोन्ही लष्कराच्या अधिकारी, जवानांनी दहशतवाद आणि घुसखोरीचा सामना करीत असताना आलेल्या अनुभव आणि आपापल्या सर्वोत्तम कार्यपद्धतींचे आदानप्रदान केले होते. या सरावाला भारतीय लष्कर आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे वरिष्ठ अधिकारी निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
‘हँड इन हँड’ हा सराव २००७ मध्ये चीन, २००८ मध्ये बेळगाव, २०१३ मध्ये चीन, २०१४ मध्ये पुण्यात, तर २०१५ मध्ये चीन येथे पार पडला होता. या सरावातील सहावा टप्पा आता नोव्हेंबरमध्ये पुण्यात पार पडणार आहे.
..
पुण्याचे महत्त्व अधोरेखित
या सरावामुळे पुण्याचे लष्करी सरावासाठीचे केंद्र म्हणून असलेले महत्त्व आणखी अधोरेखित होणार आहे. चीनबरोबरच श्रीलंकेसोबतचा ‘मित्र शक्ती’ हा संयुक्त लष्करी सरावही पुण्यात पार पडला होता. त्याचबरोबर मार्च २०१६ मध्ये अमेरिका, चीन, रशिया, जपानसह १८ देशांचा सहभाग असलेला ‘एक्सरसाइज फोर्स १८’ हा भारतीय लष्कराच्या इतिहासातील सर्वांत मोठा संयुक्त लष्करी सरावही पुण्यातच पार पडला होता. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय यासह अनेक महत्त्वाच्या लष्करी संस्था, मोठा लष्करी भूभाग आणि आघाडीच्या संरक्षण संशोधन संस्था यामुळे लष्करीदृष्ट्या पुणे हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे: घरकाम करणाऱ्या महिलेचा भर रस्त्यात खून

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पहाटेच्या सुमारास कामासाठी निघालेल्या महिलेचा अज्ञात हल्लेखोरानं खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कोथरूड येथे घडली आली आहे. शुभांगी खटावकर (३१) असं मृत महिलेचं नाव असून हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

शुभांगी खटावकर या घरकाम करायच्या. नेहमीप्रमाणे पहाटे साडेपाचच्या सुमारास त्या स्वत:च्या दुचाकीवरून कामाला जाण्यासाठी निघाल्या. कर्वेनगरहून निघून त्या राहुलनगर येथे पोहोचल्या असता अज्ञात हल्लेखोरानं त्यांना अडवलं व त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरानं डोक्यावर घाव घातल्यानं शुभांगी यांचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभांगी यांना पाहून भेदरलेल्या हल्लेखोरानं त्यांचीच दुचाकी घेऊन तिथून पळ काढला.

पहाऱ्यावर असलेल्या पोलिसांना शुभांगी यांचे पती त्यांच्या मृतदेहाजवळ रडताना आढळले. अलंकार पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट कार्ड वापरून बॅंकेला ९४ लाखांचा गंडा

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

बनावट कार्ड वापरून बॅंकेची तब्बल ९४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या एकाला सायबर गुप्तहेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ७५ बनावट क्रेडिट कार्डही जप्त केले असून त्याच्या अन्य एका मित्रालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले.

कमल किशोर अर्फ हसन हनिफ शेख (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो हडपसर येथील मोहम्मदवाडी येथे राहत होता. कमल किशोर हा कंपनीच्या सेल्स सर्विस विभागात कार्यरत असून तो बॅंक खातेदारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचं काम करत असायचा. नाना पेठ येथील बॅंकेच्या सर्व खातेदारांची ओळखपत्र, रहिवासी पुरावा आणि अन्य कागदपत्रांची पडताळणी करण्याचं काम त्याच्याकडं होतं. तो त्या कागदपत्रांचा आधार घेत बनावट क्रेडिट्स कार्ड तयार करायचा. त्यानंतर बॅंक खातेदारांची कागदपत्रे बॅंकेत जमा करायचा, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.

यादवेंद्र प्रताप शिवकुमार सिंह (४०) या बेरोजगार मित्राच्या साह्याने कमल किशोरने बनावट कार्डांचा वापर केला. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ या भीतीने सिंह हा एटीएममधून पैसे कधीच काढत नसायचा. सिंह व किशोर या दोघांनीही येरवडा आणि वडगावशेरी येथील चार दुकानात जाऊन कार्ड स्वाइप करुन सामान खरेदी केले तसेच रोख रक्कम सुद्धा काढली. जेव्हा क्रेडिट कार्ड्सची रक्कम भरण्याचा खातेदारांना बॅंकेतून कॉल आला तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. बॅंकेने अधिक तपास केल्यानंतर बॅंकेतील खातेदारांच्या कागदपत्रात फेरफार केल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी कमल किशोरला अटक केली, असे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे ट्रॅकवर आढळले दोन दिवसांचं अर्भक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

लोणावळा रेल्वे स्थानकाजवळच्या ट्रॅकवर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेले दोन दिवसांचे अर्भक आढळून आलं आहे. रुळाजवळून जाणाऱ्या दोघा तरुणांनी वेळीच ती पिशवी ट्रॅकवरून उचलल्यामुळं त्या बाळाचा जीव वाचला. हे अर्भक इथं कोणी व कधी ठेवलं याची माहिती मिळू शकली नाही.

सुहास साबळे व तेजस राईलकर हे दोघे आज सकाळी जिमला जात होते. लोणावळा स्थानकाजवळ ज्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक चेंज होतो, तिथं त्यांना एक निळ्या रंगाची पिशवी दिसली. या पिशवीला गाठ मारून ती रेल्वे ट्रॅकवर ठेवण्यात आली होती. संशय आल्यामुळं सुहास व तेजसनं ती पिशवी उचलली. त्याचवेळी या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने एक मालगाडी भरधाव वेगात निघून गेली. या दोघांनी ही पिशवी गेस्ट हाऊस जवळ आणून त्यात पाहिले असता त्यांना त्यात कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेले अर्भक आढळून आले.

दोघांनीही या घटनेची माहिती तात्काळ रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर तब्बल दीड तासांनी पोलीस या ठिकाणी आले. सुहास व तेजसनं हे अर्भक पोलिसांच्या स्वाधीन केलं. उघड्यावर ठेवल्यामुळं हे बाळ गारठून गेलं होतं. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळ मोहिमेचा सांगावा पुण्यातून

0
0

मंगळ मोहिमेचा सांगावा पुण्यातून

मयुरेश प्रभुणे, पुणे

खोडद येथील महाकाय मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीकडे (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपकडे - जीएमआरटी) युरोपच्या मंगळ मोहिमेने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचे (इसा) यान आज, बुधवारी (ता. १९) मंगळावर उतरणार असून, यानाकडून पाठवलेले पहिले सिग्नल पकडण्याचे काम ‘जीएमआरटी’ करणार आहे.

युरोपची मंगळ मोहीम यशस्वी झाल्याची सुवार्ता भारतीय वेधशाळेकडून मिळावी, यासाठी संपूर्ण जगाचे लक्ष ‘जीएमआरटी’कडे असणार आहे. ‘आमची वेधशाळा महत्त्वाच्या मंगळ मोहिमेत योगदान देत असल्याचा अभिमान वाटतो,’ अशी प्रतिक्रिया नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्सचे (एनसीआरए) अधिष्ठाता प्रा. यशवंत गुप्ता यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली.

‘इसा’चे एग्झोमार्स ट्रेस गॅस ऑर्बायटर हे मंगळाच्या कक्षेत फिरणारे यान आणि शिआपॅरेली या मंगळावर उतरणाऱ्या कुपीचे प्रक्षेपण १४ मार्च रोजी करण्यात आले होते. सात महिन्यांच्या प्रवासानंतर १६ ऑक्टोबर रोजी युरोपचे यान मंगळाच्या कक्षेत शिरतानाच यानापासून कुपी विलग झाली. मंगळ मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्याचा सिग्नल पुण्याजवळील ‘जीएमआरटी’ने पकडला तेव्हा युरोपात जल्लोष करण्यात आला. बुधवारी युरोपची अवकाशकुपी मंगळावर उतरणार असून, ती सुस्थितीत असल्याचा संदेश पृथ्वीकडे पाठवेल. तो संदेश पकडण्याची जबाबदारीही ‘जीएमआरटी’वर सोपवण्यात आली आहे.

प्रा. गुप्ता म्हणाले, ‘युरोपच्या यानाकडून येणारे सिग्नल अतिशय क्षीण असल्यामुळे त्यांना संवेदनशील रेडिओ टेलिस्कोपची मदत हवी होती. त्याचप्रमाणे त्यांचे यान मंगळावर पोहोचेल तेव्हा त्या रेडिओ टेलिस्कोपच्या आकाशात मंगळ असणे आवश्यक होते. ‘जीएमआरटी’ला अद्ययावत केले असल्यामुळे (अपग्रेडेड - यूजीएमआरटी) यानाकडून ४०१ मेगाहर्ट्झवर प्रक्षेपित केले जाणारे क्षीण सिग्नल पकडण्याची क्षमता आमच्या वेधशाळेकडे आहे; तसेच त्या वेळी मंगळ आपल्या आकाशात असल्यामुळे यानाची स्थिती कळवण्याची महत्त्वाची जबाबदारी जीएमआरटीकडे देण्यात आली आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेमुळे रखडणार विकासकामे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी अनेक रखडलेले प्रकल्प, विविध योजना मार्गी लागण्यासाठी राजकीय पक्षांकडून आटापिटा सुरू असताना, नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सर्वच विकासकामे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही आचारसंहिता डिसेंबरपर्यंत कायम राहण्याचे संकेत मिळत असून, त्यानंतर जानेवारीमध्ये पुन्हा महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने पुढील पाच महिन्यात शहरात विकासकामे करणार कशी, अशी विचारणा केली जात आहे.
दोन वर्षांपूर्वी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे महापालिकेने नियोजित केलेली त्या आर्थिक वर्षातील बरीच कामे पूर्णत्त्वास जाऊ शकली नाहीत. प्रत्यक्ष निवडणुकांपूर्वी ४५ दिवस आधीपासून आचारसंहिता लागू होत असल्याने सुमारे तीन महिन्यांहून अधिक काळ नियमित देखभाल-दुरुस्ती आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच कामे रखडली होती. येणाऱ्या महापालिका निवडणुकांपूर्वी सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या भागांतील/प्रभागातील कामे पूर्ण करून पुन्हा नागरिकांसमोर मते मागण्यासाठी जायचे आहे. परंतु, आचारसंहितेच्या फटक्यामुळे त्यांनी ठरवलेली कामे वेळेत पूर्ण होतील का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका ग्रामीण भागात आहेत. तरीही, त्याची आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्याला लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, पुणे शहरात नव्याने कोणत्याही टेंडरला मान्यता मिळणे दुरापास्त होणार आहे. तसेच, विविध योजनांच्या उद्घाटन/भूमिपूजनाची कामेही प्रलंबित राहणार आहेत. ग्रामीण भागांत होणाऱ्या निवडणुकांचा प्रभाव कोणत्याही स्वरूपात शहरात पडण्याची शक्यता नाही. तेथे होणाऱ्या निवडणुकीची आचारसंहिता महापालिका हद्दीत लागू केल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोणत्या ना कोणत्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शहराची सर्व यंत्रणा संथ होत असल्याचा अनुभव आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतीच कामे पुढे सरकत नाहीत. परिणामी, त्यासाठी बजेटमध्ये केलेली तरतूद ‘लॅप्स’ होण्याची भीती असते. त्यामुळे, महापालिकेशी कोणताही संबंध नसलेल्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर करताना, त्याचा विचार केला जावा अशी अपेक्षा केली जात आहे.
आचारसंहिता शिथिल होणार का?
नगर परिषदा किंवा नगर पंचायतीच्या निवडणुकांची आचारसंहिता प्रथमच शहराला लागू झाली आहे. ही आचारसंहिता लागली नसती, तरी विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसांत लागणे अपेक्षित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांतर्फे विधान परिषदेवर निवडून देण्यात येणाऱ्या प्रतिनिधीची निवड करण्यासाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा शहरातील मतदारांशी कोणताही थेट संबंध नाही. त्यामुळे विधान परिषदेची आचारसंहिता शहरासाठी शिथिल केली जावी, अशी मागणी महापौर प्रशांत जगताप यांनी यापूर्वीच केली होती. ही आचारसंहिता सुमारे महिना ते दीड महिन्यांच्या कालावधीसाठी असल्याने महापालिकेत कामे करायची कशी, याचे उत्तर अनेकांना अजून मिळालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमध्ये थेट इन्कमिंग नाही

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
संबंधित मतदारसंघाच्या आमदारांची संमती घेतल्याशिवाय भारतीय जनता पक्षात कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये, असा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांतील वादांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या इन्कमिंगला काहीसा ब्रेक लागणार आहे. शहरातील आमदारांच्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
कुख्यात गुंड बाबा बोडके याचा फोटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झळकल्यानंतर पक्षाला सर्व स्तरांतून टीकेला सामोरे जावे लागले. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पुण्यातील काही जणांचे पक्षप्रवेश झाले होते. त्यातील दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्यावरूनही टीका झाली. हे प्रवेश करताना पालकमंत्री गिरीश बापट आणि स्थानिक आमदारांना विश्वासात घेण्यात आले नव्हते.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर महापालिका निवडणुकांतही याचीच पुनरावृत्ती होईल, अशी हवा भाजपच्या गोटात आहे. त्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांतून आयारामांची मोठी रांग लागल्याचे पक्षाकडून सागण्यात येते. काही काळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे बिबवेवाडी येथील नगरसेवक पिंटू धावडे, शाम शिंदे तसेच पप्पू घोलप यांचा पक्ष प्रवेश केला. पक्ष वाढवण्यासाठी हे प्रवेश करणे गरजेचे असल्याचे वातावरण त्यावेळी तयार करण्यात आले. मात्र, त्यावरूनही मोठी टीका झाली. पालकमंत्री आणि स्थानिक आमदारांना अंधारात ठेवून परस्पर प्रवेश झाल्याने हा गोंधळ झाला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना टीका सहन करावी लागली, असे चित्र यातून निर्माण झाले. त्यानंतर बापट यांनी नुकतीच सर्व आमदारांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यात कोणाचाही पक्ष प्रवेश करताना स्थानिक आमदारांना विश्वासात घेतल्याशिवाय करण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचल्या. मुख्यमंत्री कार्यालयातूनही तसेच आदेश असल्याचेही त्यांनी उपस्थितांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

थेट मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रवेश नको
स्थानिक कार्यकर्त्यांचे प्रवेश थेट मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात येऊ नयेत, अशी सूचना काही आमदारांनी केली आहे. या कार्यकर्त्यांना थेट मुख्यमंत्र्यांसमोर नेताना संपूर्ण विचार करण्यात यावा. तिकिटे देताना अडचण निर्माण झाल्यास एक यंत्रणा तयार करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे शक्यतो नवीन लोकांचा प्रवेश प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या हस्ते करावा असेही सुचविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश

0
0


म. टा. प्रति​निधी, पुणे
फ्लॅट खरेदी केल्यानंतर त्यासोबत पार्किंगसाठी जागा मिळावी म्हणून एक लाख रुपये देऊनही तक्रारदाराला सेवा देताना त्रुटी ठेवल्याप्रकरणी संबंधित कंपनीला ग्राहक मंचाने फटकारले आहे. तसेच,, तक्रारदाराला पार्किंग उपलब्ध करून द्यावे, असा आदेश दिला आहे.
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष एम. के. वालचाळे, सदस्य शुभांगी दुनाखे, सदस्य एस. के. पाचरणे यांनी हा निकाल दिला.
या प्रकरणी डॉ. महादेव देवबा रुपटक्के (रा. पार्श्वनाथ प्रतिष्ठान, चिखली प्राधिकरण) यांनी मंचाकडे दावा दाखल केला होता. त्यांनी सिंफनी रिअलटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर संजीव जैन, पवना गुप्ता ( दोघे रा. नवी दिल्ली), उमा पिंटो (निवेदिता गार्डन, एनआयबीएम रोड, पुणे), साइट ऑफिस, चिखली यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता.
तक्रारदार यांनी पार्श्वनाथ प्रतिष्ठाण या इमारतीतील एफ ७ हा फ्लॅट कव्हर्ड पार्किंगसह खरेदी केला होता. त्यासाठी त्यांनी संबंधितांना एक लाख रुपये दिले होते. त्यांना कव्हर्ड पार्किंग क्रमांक ७३ देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने मंचाकडे अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर तक्रारीबाबत समझोता झाल्यामुळे कव्हर्ड पार्किंगची चूक दुरुस्त करून दिल्यामुळे तक्रारअर्ज मागे घेण्यात आला होता. पार्श्वनाथ प्रतिष्ठान येथील इमारत क्रमांक डी मधील कव्हर्ड पार्किंग ८३ देण्याचे विरुद्ध पक्षाने कबूल केले होते. तक्रारदाराने त्या​ठिकाणी वाहन पार्किंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बाळासाहेब घाडगे यांनी संबंधित पार्किंग त्यांचे असल्याचा वाद उपस्थित केला. तक्रारदाराने माहिती अधिकारात अर्ज देऊन माहिती घेतली असता, डी इमारतीत ८३ क्रमांकाचे पार्किंग नसल्याचे त्यांना समजले. तसेच तक्रारदार राहत असलेल्या इमारतीतील पार्किंग क्रमांक ८३ विरुद्ध पक्षाने सीमा तिवारी यांना बेकायदा विकले. तक्रारदाराकडून पैसे घेऊनही कव्हर्ड पार्किंग उपलब्ध करून देण्यात आले नाही. अशा प्रकारे फसवणूक झाल्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. तक्रारदाराला विरुद्ध पक्षाकडून सेवा देताना त्रुटी ठेवण्यात आल्या. या प्रकरणी तक्रारदाराने मंचाकडे दावा दाखल केला होता.
तक्रारदाराकडून पैसे घेऊनही त्याला पार्किंग उपलब्ध करून न देणे हे कृत्य बेजाबदारपणाचे आणि सेवेतील त्रुटी ठरते. तक्रारदाराबरोबर समझोता करूनही विरुद्ध बाजूचे पक्षकार तसेच वागले नाहीत यामुळे तक्रारदाराला त्रास सहन करावा लागला. तक्रारदाराला पार्श्वनाथ प्रतिष्ठाण या इमारतीतील एफ बिल्डिंगमध्ये एक कव्हर्ड पार्किंग उपलब्ध करून देण्यात यावे. तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाईची रक्कम म्हणून २५ हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये देण्यात यावेत, असा आदेश ग्राहक मंचाने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागपूर मेट्रोला पुण्याचे काम देण्यास विरोध

0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या मेट्रोचे काम नागपूर मेट्रोला देत, पुण्याला डावलण्याचा, पुण्याचा आवाज दाबण्याचा सर्वतोपरी प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी केला. तसेच, पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रोला देण्यास विरोध असल्याचे त्यांनी जाहीर केले.
केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (पीआयबी) पुण्याच्या मेट्रोला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रोमार्फत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे जाहीर केले होते. पुणे महापालिकेत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध केला आहे. महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी त्याबाबतची भूमिका स्पष्ट करताना शहराच्या मेट्रोसाठी स्वतंत्र कंपनी असताना, नागपूर मेट्रोला काम कशासाठी, अशी विचारणा केली. ‘नागपूर मेट्रो कॉर्पोरेशन कंपनीत महापालिकेचे आयुक्त वगळता पुण्याचा इतर कोणीही प्रतिनिधी नसेल. त्यामुळे, तिथे पुण्याला पूर्णतः डावलण्यात येईल’, अशी भीती महापौर जगताप यांनी व्यक्त केली. पुण्याच्या मेट्रोपूर्वी नागपूर मेट्रोला मान्यता देऊन केंद्र व राज्य सरकारने पुण्यावर दुजाभाव केला होता. आता, पुण्याच्या मेट्रोचे काम पुन्हा नागपूर मेट्रोकडे देत, पुण्यावर अन्याय करण्याची परंपरा भाजप सरकारने सुरूच ठेवली असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. पुण्याच्या मेट्रोसाठीचा सर्व निधी नागपूर मेट्रोला द्यावा लागेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.
पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘पुणे महानगर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ अशी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा आदेश राज्य सरकारनेच काढला आहे. तरीही, या कंपनीऐवजी सर्व काम नागपूर मेट्रोला देण्याचा घाट घालण्यात येत आहे. राज्याच्या सर्व शहरांतील मेट्रो प्रकल्पांसाठी एकच कंपनी स्थापन करण्याच्या उद्देश असला, तरी हे काम पूर्ण होण्यास बराच अवधी लागला असणार असल्याचे नागपूर मेट्रोला काम दिले जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आगामी नाट्य संमेलन उस्मानाबादला होणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
आगामी नाट्य संमेलन कुठे होणार याबाबतच्या चर्चेला लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. नाट्य संमेलनासाठी बहुप्रतीक्षा करणाऱ्या उस्मानाबादला आगामी संमेलन घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राजकीय संन्यासात असेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नकार दिल्याने जळगावच्या पर्यायावर फुली मारण्यात आली आहे. चांगला पाऊस तसेच खडसे यांचा नकार उस्मानाबादच्या पथ्यावर पडला आहे.
आगामी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी पाच निमंत्रणे आलेली आहेत. त्यापैकी महाबळेश्वर व नागपूर महानगर शाखा यापूर्वीच पिछाडीवर पडल्या आहेत. जळगाव-मुक्ताईनगर येथे एकत्रितपणे संमेलन घ्यावे, अशी मागणी होत होती. त्याबरोबरच उस्मानाबादचे ही नाव स्पर्धेत होते. एकनाथ खडसे यांच्या पुढाकारातून जळगाव येथे नाट्य संमेलन होण्याची शक्यता होती ; पण खडसे सध्या राजकीय संन्यासात असून विविध चौकशांच्या फेऱ्यात ते अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी स्वत:च संमेलनाच्या आयोजनास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. यंदा संमेलन नको, पुढच्या वर्षी पाहू, अशी सूचना खडसे यांनी केल्याचे नाट्य परिषदेतील विश्वसनीय सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले.
आगामी साहित्य संमेलन डोंबिवली येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाट्य संमेलन कुठे होणार याबाबत नाट्यवर्तुळात उत्सुकता आहे. उस्मानाबादमध्ये साहित्य किंवा नाट्य संमेलन व्हावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न होत आहेत. दुष्काळामुळे उस्मानाबादच्या नावावर फुली मारण्यात येत होती; पण यंदा चांगला पाऊस झाल्याने दुष्काळाचा प्रश्न निकाली निघाला आहे.


नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये स्थळाबाबत चर्चा झाली. जळगाव व उस्मानाबाद या दोन ठिकाणांचे नाव आघाडीवर होते; पण काही कारणामुळे जळगावला नाट्य संमेलन आयोजित करता येणार नसल्याने उस्मानाबादची निवड होऊ शकते. उस्मानाबादची निवड करायची झाल्यास संमेलनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा आढावा घ्यावा लागेल. या आठवड्यात स्थळ निश्चित होईल.
- दीपक करंजीकर, प्रमुख कार्यवाह, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भर रस्त्यात महिलेचा खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूड परिसरात सिटी प्राइड रस्त्यावरील ‘केतन हाइट्स’ येथे महिलेवर शस्त्रांनी वार करून तिचा खून करण्यात आला. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. खून केल्यानंतर ही व्यक्ती महिलेची दुचाकी व मोबाइल घेऊन पळून गेली. भर रस्त्यात हा प्रकार घडताना ‘मॉर्निंग वॉक’ करीत असलेल्या काही नागरिकांनी पाहिला. पण, कुणीही त्या वेळी पुढे झाले नाही.

शुभांगी प्रकाश खटावकर (वय ३१, रा. श्रमिक वसाहत, गल्ली नं ५, कर्वेनगर) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती प्रकाश मधुकर खटावकर (वय ३५) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी विश्वास बापू कळेकर (वय ४०, रा. श्रमिक वसाहत, कर्वेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी खून केल्यानंतर महिलेची दुचाकी आणि मोबाइल घेऊन घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांची दोन तपास पथके त्याला शोधण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि मयत शुभांगी हे दोघे पती-पत्नी असून मूळचे कोल्हापूरचे आहेत. अडीच वर्षांपूर्वी कामानिमित्त खटावकर दाम्पत्य पुण्यात आले. त्यांना तेरा वर्षांचा मुलगा आहे. तक्रारदार खासगी बँकेत सेल्समन म्हणून काम करतात. तर, शुभांगी धुणी-भांडीची कामे करीत होत्या. आरोपी विश्वास कळेकर हा कोल्हापूरचा असून ड्रायव्हरचे काम करतो. प्रकाश आणि आरोपी हे एका परिसरात राहतात. एकाच गावचे असल्यामुळे त्यांची ओळख झाली. याच ओळखीतून आरोपी शुभांगी यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. तसेच, तो शुभांगी यांचा पाठलाग करीत होता. त्याबाबत प्रकाश यांनी आरोपीला समजही दिली होती. तसेच, पोलिस चौकीत नेऊन त्याला एकदा समज देण्यात आली होती. याचा राग आरोपीच्या डोक्यात होता.

शुभांगी या नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास दुचाकीवरून कामाच्या ठिकाणी निघाल्या होत्या. राहुलनगरमधील केतन हाइट्‌स इमारतीजवळ आरोपीने शुभांगी यांना सकाळी अडविले. त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी नकार दिल्यामुळे आरोपीचा राग अनावर झाला. त्याने रागात धारदार हत्याराने शुभांगी यांच्या डोक्यात आणि मानेवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शुभांगी यांचा जागीच मृत्यू झाला. ‘मॉर्निंग वॉक’साठी आलेल्या एका महिलेने हा प्रकार पाहिला. घटनेची माहिती अलंकार चौकीतील पोलिसांना दिली. शुभांगी यांचा खून केल्यानंतर आरोपी त्यांची दुचाकी आणि मोबाइल घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. जी. मिसाळ आणि तपास पथक घटनास्थळी दाखल झाले. त्याला पकडण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. हा खून कोणत्या कारणावरून झाला याचा तपास सुरू आहे. जवळपासच्या रस्त्यावर असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेजही तपासण्यात येत आहे. या प्रकरणी निरीक्षक मिसाळ हे अधिक तपास करत आहेत.

आरोपीवर कोल्हापूर येथे गुन्हा

आरोपी विश्वास बापू कळेकर याच्यावर कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो निर्दोष सुटला होता. तेव्हापासून तो शुभांगी याच्या जवळच राहत होता. दोघेही एकाच गावचे असल्यामुळे चांगले परिचयाचे होते. शुभांगी या त्याला जेवण पुरवित होत्या. मात्र, त्यांच्या खुनामागील कारण स्पष्ट झालेले नाही. त्याला अटक केल्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा होईल, अशी माहिती उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आचारसंहिता शिथिल करा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

विकासकामांना फटका बसणार असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने महापालिका क्षेत्रासाठीची आचारसंहिता शिथिल करावी, या मागणीसह पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख राजकीय पक्षांनी कोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहितेबाबत महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

नगर परिषद आणि नगरपंचायती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसची धांदल उडाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे मोठी अडचण निर्माण झाल्याचा कांगावा करीत नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. ज्या जिल्ह्यांमध्ये चार किंवा चारपेक्षा जास्त नगरपरिषदांच्या निवडणुका असतील, अशा संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहणार आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी जाहीर केल्यामुळे नगरसेवकांची अक्षरशः कोंडी झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे.

या नैराश्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही उमटले. स्थायी समितीच्या सदस्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. आचारसंहितेमुळे धोरणात्मक निर्णय घेता आले नाहीत. त्यासंदर्भात नगरसवेकांनी पालिका प्रशासनावरच प्रश्नांची सरबत्ती केली.

‘स्थायी’च्या बैठकीत तर निवडणूक विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत माने यांनाच सदस्यांनी फैलावर घेतले. नारायण बरिवाडे म्हणाले, ‘संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू करून निवडणूक आयोगाने महापालिकांवर अन्याय केला आहे. आम्ही नगरपरिषदेचे मतदार नाही. त्यामुळे आमचा आणि नगरपरिषदांचा काही संबंध नसतानाही विकासकामे अडकली आहेत. यानंतर विधानपरिषद व महापालिकांच्या आचारसंहिता लागणार मग आम्ही कामे कधी करायची?’

यासंदर्भात सर्व नगरसेवक मिळून निवडणूक विभागाला पत्र देणार आहोत. ते पुढे राज्य निवडणूक आयोगाला पाठवणार आहोत. तसेच, आचारसंहितेच्या काही अटी केवळ महापालिकांसाठी शिथिल करता येतील का, यासंदर्भांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहोत, असेही बहिरवाडे यांनी सांगितले.

दरम्यान, डॉ. माने यांनी नगरसेवकांच्या मागणीनुसार पालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना आवश्यक कामे आणि आचारसंहितेचा भंग होणार नाही अशा कामांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक नगरसेवक प्रस्ताव हाती घेऊन प्रत्येक विभागात धावपळ करीत असल्याचे दिसून आले.

पदाधिकाऱ्यांची वाहने जमा

राज्य निवडणूक आयोगाचे आचारसंहितेचे आदेश प्राप्त होताच सोमवारी (१७ ऑक्टोबर) रात्री उशिरापर्यंत पदाधिकाऱ्यांची वाहने प्रशासनाने जमा केली आहेत. त्यामुळे महापौर शकुंतला धराडे यादेखील दुचाकीवरून महापालिकेत आल्या. अन्य पदाधिकारीही आपापल्या वाहनानेच पालिकेत आले. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सहा क्षेत्रीय कार्यालयांचे अध्यक्ष, विशेष समित्यांचे सभापती, उपसभापती, शिक्षण मंडळ तसेच पर्यावरण विभागाच्या जैव विविधा आणि व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशा एकूण १९ गाड्या महापालिकडे जमा करण्यात आल्या आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील पक्षश्रेष्ठींचे फोटोही काढण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​देव तारी त्याला कोण मारी…

0
0

म. टा. प्रतिनिधी लोणावळा

‘देव तारी याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास आला. अज्ञात व्यक्तीने रेल्वे ट्रॅकवर पिशवीत घालून ठेवलेले अर्भक एका तरुणाला सापडले. ट्रॅकवरून मालगाडी जाण्यापूर्वी काही मिनिटेच आधी या तरुणाने अर्भकाला उचलले आणि हॉस्पिटल गाठले. वेळीच उपचार मिळाल्यामुळे दोन दिवसांच्या या अर्भकाचे प्राण वाचले.

लोणावळा रेल्वे स्थानकाजवळील भांगरवाडी-नांगरगाव रेल्वेगेटजवळ ही घटना घडली. सुहास बाळू साबळे (वय २१, रा. केवरे वसाहत, लोणावळा) असे अर्भकाला वाचवणाऱ्या युवकाचे नाव आहे. सुहास हा लोणावळ्यातील भांगरवाडी येथील जिममध्ये सकाळी गेला होता. जिमवरून घरी जात असताना लोणावळा रेल्वे स्थानकाच्या ‘केबिन ए’समोरील रेल्वे ट्रॅकवर असलेल्या एका निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत हालचाल दिसली. तो पिशवीच्या दिशेने गेला असता त्याला प्रथम त्या पिशवीतून मांजरासारखा आवाजाचा भास झाला. पिशवीची गाठ सोडली असता लहान बाळाचा आवाज आला. पिशवीत सुहासला दोन दिवसांचे अर्भक आढळले. ते पाहून त्याला धक्का बसला. त्याने तात्काळ बाळाला रेल्वे गेटजवळील केबिनकडे नेले. घटनेबाबत रेल्वे पोलिसांना व त्याच्या मित्रांना कळविले.

पोलिस त्या ठिकाणी पाऊण तास होऊनही आले नाहीत. अखेर ५० ते ५५ मिनिटांनी एक पोलिस कर्मचारी तेथे आला. तोपर्यंत ते बाळ थंडीने गारठले होते. बाळाला श्वास घेणे कठीण जात असल्याने सुहास आणि त्याचे मित्र अरविंद फाटक, तेजस राईलकर व दर्शना नायडू या महिलेने त्या बाळाला लोणावळ्यातील लहान मुलांच्या ‘पारख हॉस्पिटल’मध्ये नेले. मात्र, त्या ठिकाणी डॉक्टरची तब्येत बरी नसल्याचे सांगितल्याने सुहास आणि त्याच्या मित्रांनी त्या बाळाला सकाळी साडेआठच्या दरम्यान लोणावळ्याजवळील ओळकाईवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सीमा शिंदे यांच्या नर्सिंग होम येथे नेले. डॉ. शिंदे यांनी तात्काळ त्या बाळावर उपचार सुरू केले. बेशुद्ध असलेले बाळ १५ मिनिटांनी शुद्धीवर आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. सुहास आणि डॉ. सीमा शिंदे यांचे सर्वांनी आभार मानले.

डॉ. सीमा शिंदे म्हणाल्या, ‘सुहासच्या प्रसंगावधानामुळे बाळाचे प्राण वाचले. सुहासला बाळ दिसण्यास पाच ते सहा मिनिटे उशीर झाला असता तर या बाळाला मालगाडीखाली प्राण गमवावे लागले असते. तसेच, अजून अर्धा तास उपचारासाठी उशीर झाला असता तर बाळाला जीव गमवावा लागला असता. बाळाला पुन्हा जन्मच मिळाल्यासारखा आहे.’

पोलिसांची दिरंगाई

सुहासच्या प्रसंगावधानामुळे बाळावर तातडीने उपचार झाले खरे; पण या घटनेमध्ये पोलिसांकडून दिरंगाई पाहायला मिळाली. वारंवार रेल्वे पोलिसांना फोन करूनही पोलिस दाखल होत नसल्याने बाळावर उपचार सुरू झाल्यानंतर अखेर तेजस व अरविंद हे युवक त्यांच्या कारमधून पोलिसांना आणण्यासाठी लोणावळा रेल्वे स्थानकावर गेले. तीन तासांनी सकाळी सव्वा दहा वाजता पोलिस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. बाळाला सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात रवाना केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिरंगाईमुळे रखडल्या शाखा

0
0

Prasad.Panse@timesgroup.com

@prasadpanseMT

पुणे : केंद्र सरकार व राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुख्यालयाने मान्यता देऊनही केवळ राज्य सरकारकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे राज्यातील तीन जिल्ह्यांमधील एनसीसी शाखा रखडल्या आहेत. परिणामी, ठाणे-कल्याणमधील छात्रांना नौदल, सिंधुदुर्गमधील छात्रांना लष्कर तर कोल्हापुरातील हवाई दलाच्या छात्रांना हवाई दलाच्या एनसीसी शाखेपासून वंचित राहावे लागत आहे. राज्य सरकार कधी जागे होणार आणि या शाखा सुरू होणार, असा सवाल आता छात्रांकडून उपस्थित केला जात आहे.

कोल्हापूरमध्ये एनसीसीची हवाई दल शाखा सुरू करण्यास, सिंधुदुर्गमध्ये लष्कराची (आर्मी) एनसीसी बटालियन सुरू करण्यास तसेच ठाणे-कल्याण येथे नौदल शाखा सुरू करण्यास एनसीसी मुख्यालय व केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वीच मान्यता दिली आहे. मात्र, त्यासाठी राज्य शासनाची मान्यताही आवश्यक असते. त्यासाठी अनेक दिवसांपासून राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर कार्यवाही झालेली नाही. केवळ राज्य सरकारच्या मान्यतेअभावीच या शाखा रखडल्या आहेत. राज्य सरकारनेच त्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे एनसीसीमधील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.

सैनिकी परंपरा असलेल्या कोल्हापूरमध्ये एका शाळेचा (प्रायव्हेट हायस्कूल) अपवाद वगळता राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) हवाई दलाची शाखाच नाही. ही शाखा सुरू व्हावी, यासाठी हवाई दल माजी सैनिक संघटनेचे व दादुमामा ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर देसाई पाच वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत.

कोल्हापूर येथे एनसीसीचे ग्रुप हेडक्वार्टर असून, त्या अंतर्गत कोल्हापूरसह सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे पाच जिल्हे येतात. या मुख्यालयातर्फे एनसीसीच्या लष्कर आणि नौदलाच्या शाखांअंतर्गत काही तुकड्या चालविण्यात येत असल्या, तरी अजूनही हवाई दलाची तुकडी सुरू करण्यात आलेली नाही.

कोल्हापूर परिसरातून अनेक अधिकारी, जवानात लष्करात दाखल झाले आहेत. त्यात एनसीसीचा मोठा वाटा आहे. मात्र, येथे एनसीसीची हवाई दल शाखा नसल्याने या छात्रांना हवाई दलाविषयी, त्यातील संधींविषयी माहितीच मिळत नाही. सध्या हवाई दलाला मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. कोल्हापूर येथे एनसीसीची हवाई दल शाखा सुरू झाल्यास या विद्यार्थ्यांना हवाई दलाची माहिती मिळून त्यांचे हवाई दलाकडील आकर्षण वाढेल, यासाठी मी एनसीसी मुख्यालयाकडे पाठपुरावा केला. त्यांनी मान्यता दिल्यानंतर आता राज्य सरकारच्या मान्यतेअभावी हा प्रस्ताव अडून राहिला आहे,’ असे देसाई यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images