Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हरीण, वाघाची कातडी बाळगणारे दोघे अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तुळशीबाग परिसरात हरीण, वाघाच्या कातडीची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून प्रत्येकी एक लाख रुपये किमतीचे हरिणाचे आणि वाघाचे, तर ५० हजार रुपये किमतीचे रानडुकराचे दात जप्त करण्यात आले आहेत. कोर्टाने त्यांना १८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
महेंद्र उरछाप पवार (वय २०), मंगल दिवार भोसले (वय ३५ दोघेही रा. अस्वलदरा जि. नाशिक, सध्या रा. बाबू गेनू चौक, शुक्रवार पेठ) अशी अटक केलल्यांची नावे आहेत. या प्रकरणी वनरक्षक सागर विलास होले (वय २६) यांनी तक्रार केली आहे. तुळशीबागेतील श्री राज लॉज समोर दोन व्यक्ती वन्य प्राण्यांचे कातडे घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली. सापळा रचून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून जप्त केलेल्या कातड्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत दोन लाख रुपये आहे. आरोपींनी हा मुद्देमाल कोठून आणला, कोणाला विक्री करणार होते, आदींचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी कोर्टाला केली.
..
बलात्कारप्रकरणी कोठडी
शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कोर्टाने त्यांना १९ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
सनी उर्फ नाना दिलीप पवार (वय ३३ रा. हडपसर), जयवंत दिलीप पवार (वय ३६ रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी २८ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. प्रकरणातील आणखी दोन आरोपी सध्या फरारी आहेत. हडपसर भाजी मंडई ते मुंढवा रेल्वेलाइन परिसरात मे २०१६ मध्ये ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला आरोपींनी शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर मुंढवा ब्रिजखाली टेम्पो थांबूवन बलात्कार केला. इतर आरोपींनी महिलेची व्हिडिओ क्लीप तयार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी महिलेने तक्रार दिल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वॉकिंग प्लाझा’ रद्द

$
0
0

ब्रेमेन चौक ते परिहार चौक रस्ता पुन्हा दुहेरी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

औंध येथे प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आलेला ‘वॉकिंग प्लाझा’ आणि ‘सायकल ट्रॅक’ला औंध संघर्ष समितीचा तसेच स्थानिकांचा वाढता विरोध पाहून तो रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. या निर्णयामुळे ब्रेमेन चौक ते परिहार चौक हा रस्ता पुन्हा दुहेरी झाला.
ब्रेमेन चौक ते परिहार चौक हा रस्ता एकेरी करून त्या ठिकाणी ‘वॉकिंग प्लाझा’ आणि ‘सायकल ट्रॅक’ सुरू करण्याचा प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात आला होता. याला स्था​निकांचा विरोध होता. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केलेल्या विनंतीमुळे औंधकरांनी गेल्या सोमवारी त्यांचे नियोजित रास्ता रोको आंदोलन स्थगित केले होते.
त्यानंतर आयुक्तांनी शनिवारी सायंकाळी औंध येथील रहिवाशांशी थेट संवाद साधला. ब्रेमेन चौक ते परिहार चौक हा रस्ता एकेरी केल्यामुळे औंधकरांना अनेक त्रासांना सामोरे जावा लागत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या. या तक्रारींचा पाढा ऐकल्यानंतर आयुक्त कुमार यांनी नागरिकांच्या हिताचा निर्णय घेऊन हा प्रकल्प स्थगित केल्याचे जाहीर केले. माजी महापौर दत्ता गायकवाड, नगरसेवक सनी​ निम्हण, अॅड. मधुकर मुसळे, नाना वाळके, साधना सावंत, धोत्रे मॅडम, बाळासाहेब रानवडे, नीलेश जुनवणे, केसुजी परिहार, देऊजी परिहार, रमेश ठोसर, संजय कांबळे, तसेच औंध संघर्ष समितीचे रवी ओसवाल, ढगलाराम चौधरी, सुखाराम चौधरी, नितीन खोंड, संजय पांचोली, प्रवीण परमार, दर्शन ओसवाल आदी या वेळी उपस्थित होते.
औंध परिसरात राहणारे कॅप्टन महाबळेश्वर देशपांडे यांनी विद्यापीठ चौक ते औंध या दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीबद्दल आपली भूमिका मांडली. चाटर्ड अकाउंटंट प्रदीप साठे यांनी ब्रेमेन चौक ते परिहार चौक हा रस्ता वॉकिंग प्लाझासाठी योग्य नसल्याचे सांगितले. आर्किटेक्ट ​प्रीती काळे यांनी रस्ता एकेरी केल्यामुळे औंधमध्ये वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. डॉ. गीता तेजवानी यांनी स्थानिक २२ डॉक्टरांच्यावतीने आपली भूमिका मांडली. पेशंटला हॉस्पिटलमध्ये येण्यास त्रास होत आहे. पार्किंग नसल्याने अनेक अडचणी उभ्या राहिल्याच्या त्या म्हणाल्या. ओसवाल यांनी वॉकिंग प्लाझामुळे येणाऱ्या अडचणींवर प्रेझेंटशन तयार केले होते. ते या वेळी दाखवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पणत्यांचा ‘क्रिएटिव्ह’ ट्रेंड

$
0
0

शेकडो महिलांना ऐन दिवाळीत रोजगाराची संधी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मातीच्या पारंपरिक पणत्यांना आधुनिक टच देऊन तयार केलेल्या डेकोरेटिव्ह पणत्यांची यंदाही दिवाळीत चलती असणार आहे. या नव्या ट्रेंडमुळे गृहिणींच्या सुप्तगुणांना वाव मिळाला असून, बचत गटांच्या बरोबरीने सध्या महिलावर्ग पणत्यांच्या ऑर्डर पूर्ण करण्यात व्यग्र आहे. लहान-मोठ्या प्रदर्शनांपासून, कॉर्पोरेट कंपन्यांबरोबरच शॉपिंग मॉलपर्यंत या पणत्या आता पोहोचल्या आहेत.
दिवाळीमध्ये पणती हा अविभाज्य घटक असल्याने नवरात्र संपल्यानंतर शेकडो प्रकारच्या पणत्या कुंभारवाडा आणि बाजारपेठांमध्ये दाखल होतात. मात्र, गेल्या चार वर्षांपासून पारंपरिक पणत्यांऐवजी क्रिएटिव्ह पणत्यांची मागणी वाढली आहे. विविध आकारातील पणत्या घरी आणून, महिलावर्ग त्याला वेगवेगळे रंग, कुंदनच्या टिकल्या, मोती, घुंगरू, आरसे आदी कलाकुसरीच्या वस्तूंनी सजवतात. पणत्यांना मिळालेल्या या आधुनिक टचमुळे ग्राहकांना भुरळ घालण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. दरवर्षी या पणत्यांची मागणी वाढत असल्याने बचत गटांबरोबरच अनेक महिलांना दिवाळीत हक्काचा रोजगार मिळाला आहे. विशेष म्हणजे दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनांबरोबरच कॉर्पोरेट कंपन्यांच्याही गिफ्ट ऑर्डरही महिलांना मिळायला सुरुवात झाली आहे.
‘काही वर्षांपूर्वीपर्यंत पणत्यांमध्ये ठरावीक आकारच असायचे. पण, हल्ली कुंभारांकडून नवनवीन प्रयोग करण्यात येत आहेत. त्यामुळे आम्हाला सजावटीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. पणती, हंडी, लामण दिवा, ताम्हन, फुले, पानांच्या आकारातील पणत्या घरी आणून आम्ही त्यावर नक्षीकाम करतो, कुंदन आणि रंगकामामुळे पणत्यांचे रूपच बदलते. त्यामुळे त्या चटकन ग्राहकांच्या मनात घर करतात. अनेक घरांमध्ये हॉलमध्ये, खिडक्यांमध्ये सजावटीसाठी पणत्या लावण्याची फॅशन वाढत आहे. त्यातही क्रिएटिव्ह पणत्या उठून दिसतात. दिवाळी भेटी म्हणून देण्यासाठी आम्हाला ऑर्डर मिळू लागल्या आहेत,’ अशी माहिती विक्रेत्या दीपाली पाटील यांनी दिली.
यंदाही आरसे, कुंदन, मोती, चमकी आणि खड्यांचा वापर केलेल्या क्रिएटिव्ह पणत्या बाजारात दाखल झाल्या आहेत. खास लक्ष्मीपूजनासाठी मोठ्या आकारातील पणत्यांना पसंती मिळत आहे. साधारणतः दहा रुपयांपासून ते दीड हजार रुपयांपर्यंत या पणत्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काही वर्षांपूर्वी कुंभारवाड्यात एकाच साच्यातून तयार होणाऱ्या पारंपरिक पणत्या आम्ही बनवत होतो. मात्र अलीकडे वेगवेगळ्या आकारातील साचे वापरून पणत्यांचे नवे प्रकार विक्रीसाठी तयार करण्यात येत आहेत, असे पणती विक्रेते दिलीप कुंभार यांनी सांगितले.
...
शॉपिंग पोर्टलवरही विक्री
क्रिएटिव्ह पणत्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरही त्या उपलब्ध झाल्या आहेत. डेकोरेटिव्ह पणत्यांचे आकर्षक सेट पॅकिंगमध्ये घरपोच देण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय महिलांनी सोशल नेटवर्किंग साइट आणि व्हॉट्‍सअॅपसह विविध मोबाइल अॅप्लिकेशन्सवरूनही पणत्यांचे मार्केटिंग सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीआधीच फुटले हास्यबॉम्ब

$
0
0

कणेकरी, मिरासदारी किश्श्यांनी बहरली रविवार सकाळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘फारच कमी लेखकांना त्यांच्या नावाच्या शैलीची ओळख मिळाली आहे; त्यात मी एक आहे. हल्ली लोकं मला पत्र पाठवून विचारतात, की तुम्हाला कोणाची बायको जास्त आवडते... एका चित्रपटासाठी दत्ताच्या वेशात स्थिर चित्रीकरण करायचे होते; पण अॅक्शन म्हटले की कुत्रा पळून जाई. अखेर एका कर्मचाऱ्याने कुत्र्याचे आवडते खाद्य आणले खरे.. पण, दत्ताच्या वेशभूषेत असलेल्या शाकाहारी कलाकाराची मात्र, पंचाईत झाली... पण या प्रयोगामुळे कुत्रे नादाला लागले आणि चित्रीकरण पूर्ण झाले...’ अशा एकापेक्षा एक किश्श्यांनी कणेकरी शैलीच्या आणि आणि मिरासदारीतील फटाक्यांच्या आतषबाजीने टिळक स्मारक मंदिरात रविवारी सकाळी हास्यबॉम्ब फुटले.
निमित्त होते...‘अक्षरधारा’च्या ५७० व्या दीपावली शब्दोत्सवाच्या उद्घाटनाचे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या उद्घाटन झाले. प्रदीप लोखंडे, डॉ. कल्याणी मांडके, डॉ. सदानंद बोरसे आणि रसिका राठिवडेकर या वेळी उपस्थित होते. यानिमित्त रसिकांनी प्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांची ‘कणेकरी’ आणि दमांची ‘न ऐकलेली मिरासदारी'’अनुभवली. अनुक्रमे मिलिंद अधिकारी आणि प्रा. मिलिंद जोशी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ‘हिंदी चित्रपटात गाजर का हलवा या पदार्थाइतके कशाचेही मार्केटिंग झाले नसेल... चित्रपटात थालिपीठ, दडपे पोहे, शिरा हे पदार्थ का बनवत नाहीत,’ या कणेकर यांच्या प्रश्नाने हास्याची कारंजी उडाली. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, आशा भोसले, दादा कोंडके अशा कलाकारांचे अफलातून किस्से सांगून कणेकरांनी मैफलीत जान ओतली.
‘संतपट असले की घरच्या परवानगीने आणि पैशाने आम्ही ते पाहात असू; पण इतर चित्रपट असले की पैसे चोरून पाहावे लागत. पूर्वी लेखकाला निर्माता म्हणायचा, त्या प्रमाणे चित्रपटाच्या कथा वळवाव्या लागत. एका चित्रपटाचे अर्धे चित्रीकरण पूर्ण झाले होते; पण नायिका चित्रीकरण सोडून निघून गेली. त्यामुळे आता काय असा प्रश्न पडला. निर्मात्याने लेखकाला मार्ग काढायला सांगितला. त्यातून एक महाराज शाप देतो असा प्रसंग घुसडवला. त्याप्रमाणे नायिका प्राणी होईल, असा शाप महाराज देतो. त्यानंतर तिला पुन्हा स्त्री करा अशी मागणी केली जाते. त्यावर ती स्त्री होईल पण ती, दुसरी स्त्री असेल अशा पद्धतीने दुसऱ्या नायिकेचे चित्रपटात पदार्पण दाखवले गेले,’ या प्रा. मिरासदार यांच्या सांगितलेल्या आठवणीनंतर सभागृहातील उपस्थितांचे हसूनहसून पोट दुखणेच बाकी राहिले होते.
सूत्रसंचालन सिद्धार्थ बेंद्रे यांनी केले.
-------------------
लेखक लिहून मोकळा होतो; पण ते वाचकांपर्यंत पोहोचवणे जास्त महत्त्वाचे आहे. लेखकानेच लिहायचे आणि त्यानेच वाचायचे, हे काही खरे नाही. मराठी लेखकांनी पोट कसे भरायचे, हा परिसंवादाचा विषय होऊ शकतो.
- शिरीष कणेकर, प्रसिद्ध लेखक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगराध्यक्षाचा तळेगावात खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

तळेगाव-दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन बाळासाहेब शेळके (३८) यांचा पूर्ववैमनस्यातून रविवारी खून करण्यात आला. सकाळी अकराच्या सुमारास खांडगे पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आलेला आणि फरार सराईत गुन्हेगार श्याम रामचंद्र दाभाडे, बंटी दाभाडे याच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बंटीसह त्याच्या चार सहकाऱ्यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. सचिन शेळके यांचे भाऊ संदीप शेळके यांनी फिर्याद दिली आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक राम शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्यावरून एप्रिल २०१३ मध्ये शेळके यांच्यावर कुख्यात श्याम दाभाडे याने साथीदारांसह खूनी हल्ला केला होता. त्याच पूर्ववैमनस्यातून शेळके यांचा खून करण्यात आल्याचा अंदाज आहे. रविवारी सकाळी शेळके पेट्रोल पंपासमोरून त्यांच्या कारमधून कार्यालयाकडे जात होते. या वेळी त्यांना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अडविले. या वेळी शेळके यांच्या कंबरेला त्यांचे पिस्तूल होते. हल्लेखोरांनी शेळके यांचे पिस्तूल हिसकावून घेऊन कोयत्याने वार करून आणि गोळीबार करून शेळके यांचा खून केला. या वेळी शेळके यांच्या अंगावरील कपडे हल्लेखोरांनी काढल्याचेही स्पष्ट झाले आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेळके यांना नजिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळी चार जिवंत काडतुसे, दोन पुंगळ्या, लोखंडी रॉड, कोयता, लाकडी दांडकी आढळून आली. हल्लेखोरांनी घटनास्थळापासून काही अंतर गेल्यावर वाहने सोडून एका सोसायटीमधून पळ काढळ्याचे सीसीटीव्ही फूटेजवरून उघड झाले आहे. हल्लेखोरांनी शेळके यांचे पिस्तूलही पळवून नेले आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रकार घडल्यामुळे तळेगावमध्ये तणावाचे वातावरण आहे. पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये शेळके यांचे शवविच्छेदन करण्यात आले. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हेशाखेची दोन आणि तळेगाव पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे. शेळके यांचा मृत्यू झाल्याचे समजताच तळेगावात तणावाचे वातावरण होते. आमदार बाळा भेगडे व अन्य पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. यापूर्वीचा त्यांच्यावरील हल्ला हा खंडणीसाठी झाला होता. त्यामुळे रविवारची घटना नेमकी कशासाठी झाली याचा शोध पोलिस घेत आहेत. सचिन शेळके यांच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

मावळात बंद

सचिन शेळके यांनी नगरसेवक, उपनगराध्यक्ष, पक्ष प्रतोद आणि नगराध्यक्षपदही भूषविले होते. भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. आगामी निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. शेळके यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तळेगाव तसेच संपूर्ण मावळात बंद पाळण्यात आला. घटनेचा निषेध करण्यासाठी आमदार बाळा भेगडे यांनी संपूर्ण मावळ बंदचे आवाहन केले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव, अप्पर अधीक्षक शिंदे, उपाधीक्षक विनायक ढाकणे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राम जाधव, तळेगावचे निरीक्षक वसंत बाबर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशातील बदल एका नेतृत्वामुळे नाही: भैयाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देशात परिवर्तन एका नेतृत्वामुळे आलेले नाही. देशातील सामान्य माणसाच्या जबाबदाऱ्या ठरविण्यात आल्याने परिवर्तन झाले आहे,' असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता केले. 'बिनचेहऱ्याची माणसे ही संघाच्या कामाची मोठी शक्ती असून हे कारखाने सुरू राहायला हवेत,' अशी टिप्पणीही त्यांनी केली.

संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व सहकार भारतीचे संस्थापक सदस्य वसंतराव देवधर यांचा सहस्रचंद्रदर्शनानिमित्त जोशी यांच्या हस्ते सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, प्रदेशाध्यक्ष संजय बिर्ला, विजय देवांगण, सतीश मराठे, उदय जोशी, सुनील देवधर यावेळी उपस्थित होते.

'समाजात परिवर्तनाची गती कायमच कमी असते. एका नेतृत्वामुळे परिवर्तन झालेले नाही. तर सामान्य माणसाच्या जबाबदाऱ्या नक्की करण्यात आल्याने परिवर्तन झाले आहे,' असे सूचक वक्तव्य जोशी यांनी केले. 'संघात सुरुवातीला अडचणी सांगितल्या जात नाहीत. भोळीभाबडी माणसे संघात येतात, काम करतात आणि देव होतात. विचारांची ठेवण संघाकडून प्राप्त होते. समाज जीवनात कोणती पथ्ये पाळायला हवीत, हे संस्कार संघाकडून केले जातात,' याकडे जोशी यांनी लक्ष वेधले.

'संघ विचारांच्या सहकारी बँकांचे काम सर्वांना परिचित आहे ; पण त्यामागील शक्ती वसंतराव आहेत. कामाचा संस्कार त्यांनी अंगी भिनवला आहे. जे प्राप्त करायचे आहे ते केवळ समाजासाठी, हा विचार त्यामागे आहे. समाज जीवनात काम करताना मन शुद्ध ठेवणे सोपे नाही. व्यक्तिगत जीवनात शुद्धता, विचारांची स्पष्टता व समर्पण असा मिलाफ वसंतरावांच्या व्यक्तिमत्वात आहे. परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये वसंतरावांनी एक व्यवस्था म्हणून सहकार भारती उभी केली आहे,' असे गौरोद्वगार जोशी यांनी काढले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कास’वर पर्यटकांचे अमाप ‘पीक’

$
0
0

लाखभर पर्यटकांमुळे तिजोरीत ८० लाखांचे उपद्रव शुल्क

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जागतिक वारसास्थळाचा मान मिळालेल्या कास पठाराला गेल्या दोन महिन्यांत एक लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. जैववैविध्याने समृद्ध या पठारावरील रंगबेरंगी फुलांचे ताटवे पाहण्यासाठी यंदा ऑनलाइन बुकिंगला प्राधान्य देण्यात आल्याचेही दिसून आले आहे. या माध्यमातून संयुक्त वन व्यवस्थापन समितीला ८० लाख रुपयांच्या उपद्रव शुल्काची प्राप्ती झाली आहे.
राज्यातील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठाराला ‘युनेस्को’ने जागतिक वारश्यात समाविष्ट केल्यापासून त्याविषयीचे कुतूहल वाढले आहे. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येतही दर वर्षी वाढ होत आहे. पर्यटकांच्या अनियंत्रित आणि वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी वन विभागाने यंदा प्रवेशशुल्कात वाढ करून मर्यादित प्रवेशाचे बंधन घातले होते. एवढेच नव्हे तर, ऑनलाइन बुकिंगशिवाय ऐनवेळी प्रवेश मिळणार नाही, असेही जाहीर केले होते. दररोज केवळ तीन हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पठारावरील फुलांचे ताटवे बहरल्यानंतर संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वन विभागाने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक पर्यटकाकडून सुट्टीच्या दिवशी शंभर रुपये पर्यावरण शुल्क आणि कॅमेरा असल्यास अतिरिक्त शंभर रुपये उपद्रव शुल्क आकारण्यात येत आहे. उत्साही गावकरी, स्वयंसेवक आणि वन कर्मचाऱ्यांमुळे यंदा नियोजनबद्ध पर्यटन साकारण्यास संयुक्त वन व्यवस्थापन समितीला यश आले आहे.
‘ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे यंदा फुलांचा हंगाम उशिरा सुरू झाला. त्यामुळे आम्ही २६ ऑगस्टपासून नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला. बहुतांश पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंग केल्यामुळे नियोजन सोपे झाले. गेल्या दोन महिन्यात पर्यटकांकडून ८० लाख रुपयांचे प्रवेश शुल्क संयुक्त व्यवस्थापन समितीकडे जमा झाले आहे. यंदा आतापर्यंत एक लाखाहून अधिक पर्यटकांनी पठाराला भेट दिली आहे,’ अशी माहिती सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक अ. मो. अंजनकर यांनी दिली. पठाराचे शुल्क दरवर्षी वाढविण्याचा आमचा उद्देश नसून, नियोजनबद्ध पर्यटनावर भर देण्यात येणार आहे. पर्यटकांकडून जमा झालेल्या निधीचा वापर पठाराला लागून असलेल्या गावांमधील पर्यावरणपूरक कामांसाठी करण्यात येणार आहे. याशिवाय पुढील वर्षांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी पठारावर काही ठिकाणी पर्यटकांना बसण्यासाठी पॅगोडा आणि प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही अंजनकर यांनी सांगितले.
.....
येत्या रविवारी हंगाम संपणार
पाऊस भरपूर आणि नियोजित काळात झाल्याने या वर्षी फुलांचा बहर चांगला होता. या वर्षी कार्वी देखील मोठ्या प्रमाणात फुलली. यंदा ऑगस्ट अखेरीस हंगाम सुरू झाला. आता फुलांचा बहार ओसरायला सुरुवात झाली असून, येत्या २३ ऑक्टोबरला हंगाम संपल्याचे जाहीर करून प्रवेशशुल्क आकारणी थांबविणार आहोत, असेही अंजनकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर बेमुदत उपोषण करू

$
0
0

मुख्य आरोपीला तातडीने अटक करण्याची सचिन शेळके कुटुंबीयांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘सचिन शेळके खून प्रकरणातील मुख्य आरोपी श्याम दाभाडेला उद्यापर्यंत अटक केली नाही तर बेमुदत उपोषण करू,’ असा इशारा सचिन शेळके यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी घटनास्थळाला भेट दिली. या वेळी अधीक्षक डॉ. जय जाधव, अप्पर अधीक्षक राजकुमार शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राम जाधव, तळेगावचे वरिष्ठ निरीक्षक वसंत बाबर उपस्थित होते.

तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन बाळासाहेब शेळके (३८) यांचा रविवारी सकाळी अकराच्या सुमारास गोळीबार करून आणि धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. कुख्यात गुन्हेगार श्याम दाभाडे व त्याचा भाऊ बंटी दाभाडेसह दहा ते पंधरा जणांनी हा गुन्हा केल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. अत्यंत क्रूरपणे शेळके यांचा खून करण्यात आला. भर दिवसा झालेल्या या घटनेने मावळात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या काही तासात बंटी दाभाडेसह तिघांना अटक केली. या तिघांना वडगाव मावळ कोर्टाने २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु श्याम दाभाडेसह अन्य साथीदार पसार झाले आहेत. हे आरोपी पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपले गेले आहेत. मंगळवारपर्यंत श्याम दाभाडे याला अटक झाली नाही, तर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेळके कुटुंबीयांनी दिला आहे. शेळके यांचा खून करण्यासाठी त्यांच्याच पिस्तुलाचा वापर हल्लेखोरांनी केल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपींनी पळून जाताना शेळके यांचे पिस्तुलदेखील नेले आहे. यापूर्वी २०१३मध्ये शेळके यांच्यावर हल्ला झाला होता. दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी तळेगावला भेट दिली.

मावळातील गुन्ह्यांमध्ये अचानक वाढ का?

गेल्या वर्षभरात या भागात वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे व्यक्तींचे खून झाले आहेत. देहूरोड, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा या पोलिस ठाण्यांच्या अखत्यारीत मावळ परिसरात अचानक गुन्हेगारी वाढले, असे चित्र रेखाटले जात आहे. बड्या राजकीय नेत्यांच्या खुनाचे कट पोलिसांकडून उघड केले जात आहेत; पण दुसरीकडे दिवसाढवळ्या माजी नगराध्यक्षाचा खून नगरपरिषदेपासून हाकेच्या अंतरावर होणे हा विरोधाभास मावळकरांच्या मनात अनेक प्रश्नचिन्हे उभी करत आहे. या पट्ट्यातील अवैध धंदे आणि त्याला राजकीय पाठबळाने पोलिसांचे संरक्षण अशी काहीशी स्थिती आहे. मुंबईत चालणाऱ्या डान्सबारचे लोण सर्वप्रथम याच मावळात आले. काही वर्षांपूर्वी एका बड्या नेत्याकडून येथे डान्सबार चालवला जात होता. कालांतराने हा बार बंद झा; पण सध्या अन्य अनेक प्रकारचे धंदे या भागात सुरू आहेत. त्याकडे हेतूपुरस्सरर होणारे दुर्लक्षच गुन्हेगारीला पोषक वातावरण तयार करत असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनधिकृत फटाकेविक्रेत्यांवर बोर्ड करणार कडक कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खडकी

खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत दिवाळीच्या काळात अनधिकृत फटाकेविक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तशी माहिती बोर्ड प्रशासनाने दिली असून, याबाबत सूचना देणारे फलक बोर्डाने बाजारपेठेत लावले आहेत.

खडकी कँटोन्मेंट बोर्डाने त्यांच्या हद्दीतील नागरिकांसाठी फटाकेविक्रीच्या अधिकृत स्टॉलचे लिलाव केले आहेत. हे स्टॉल दर वर्षी बोर्डातर्फे वितरित करण्यात येतात आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून बोर्डाला चांगले उत्पन्नही मिळते; मात्र दिवाळीच्या दिवसांमध्ये काही विक्रेते बाजारपेठेत अनधिकृरीत्या स्टॉल लावून फटाकेविक्री करत असल्याचे चित्र बघायला मिळते. या प्रकाराबाबत अधिकृत फटाका स्टॉलधारकांनी अनेक वर्षांपासून अनेक वेळा बोर्डाकडे तक्रारी केल्या होत्या. बाजारपेठेत अनधिकृरीत्या विक्री होत असलेल्या फटाक्यांमुळे अधिकृत स्टॉलच्या व्यवसायावर परिणाम होतो. तसेच बाजारपेठेत फटाकेविक्री केल्यास अपघात घडण्याची शक्यताही या विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. फटाकेविक्रेत्यांनी केलेल्या तक्रारीमुळे गेल्या वर्षी खडकी बाजारपेठेत फटाकेविक्री करणाऱ्या अनेक दुकानदारांविरुद्ध बोर्डाने कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते.

यंदा मात्र सुरुवातीपासूनच फटाक्यांची अशी अनधिकृत विक्री होणार नाही याकडे बोर्डाने लक्ष दिले असून, सुरुवातीलाच तशा सूचना बाजारपेठेत लावल्या आहेत. गेल्या वर्षी फक्त गुन्हे दाखल केले होते. यंदा कोणी अनधिकृत फटाकेविक्री करताना आढळल्यास फटाके जप्त करण्यात येणार असून, त्याच्यावर गुन्हेही नोंदवण्यात येणार आहेत.

.............

‘कडक अंमलबजावणी हवी’

दिवाळीच्या मुख्य दिवशी बोर्डाला सुट्टी असल्यामुळे कोणीही अधिकारी आणि कर्मचारी कामावर नसतात. याचा फायदा हे विक्रेते घेतात आणि त्या वेळेत फटाके विक्री करतात, असा आरोप अधिकत फटाका स्टॉलधारकांनी केला आहे. बोर्डाने यंदा सुरुवातीपासूनच यावर नियंत्रण ठेवण्याचे धोरण राबवले आहे, ही चांगली गोष्ट आहे; मात्र त्याची कडक आमंलबजावणी होणे गरजेचे असल्याची अपेक्षा फटाका स्टॉलधारकांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘देशातील परिवर्तन एका नेतृत्वामुळे नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘देशात परिवर्तन एका नेतृत्वामुळे आलेले नाही. देशातील सामान्य माणसाच्या जबाबदाऱ्या ठरविण्यात आल्याने परिवर्तन झाले आहे’, असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख टाळत केले. बिनचेहऱ्याची माणसे ही संघाच्या कामाची मोठी शक्ती असून हे कारखाने सुरू राहायला हवेत’, अशी टिप्पणी त्यांनी केली.
संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व ‘सहकार भारती’चे संस्थापक सदस्य वसंतराव देवधर यांचा सहस्रचंद्रदर्शनानिमित्त जोशी यांच्या हस्ते सत्कार झाला. त्या वेळी ते बोलत होते. ‘सहकार भारती’चे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, प्रदेशाध्यक्ष संजय बिर्ला, विजय देवांगण, सतीश मराठे, उदय जोशी, सुनील देवधर या वेळी उपस्थित होते.
‘समाजात परिवर्तनाची गती कायमच कमी असते. एका नेतृत्वामुळे परिवर्तन झालेले नाही. तर सामान्य माणसाच्या जबाबदाऱ्या नक्की करण्यात आल्याने परिवर्तन झाले आहे’, असे सूचक वक्तव्य जोशी यांनी केले. ‘संघात सुरुवातीला अडचणी सांगितल्या जात नाहीत. भोळीभाबडी माणसे संघात येतात, काम करतात आणि देव होतात. विचारांची ठेवण संघाकडून प्राप्त होते. समाजजीवनात कोणती पथ्ये पाळायला हवीत, हे संस्कार संघाकडून केले जातात’, याकडे जोशी यांनी लक्ष वेधले.
‘संघ विचारांच्या सहकारी बँकांचे काम सर्वांना परिचित आहे; पण त्यामागील शक्ती वसंतराव आहेत. कामाचा संस्कार त्यांनी अंगी भिनवला आहे. जे प्राप्त करायचे आहे ते केवळ समाजासाठी हा विचार त्यामागे आहे. समाज जीवनात काम करताना मन शुद्ध ठेवणे सोपे नाही. व्यक्तिगत जीवनात शुद्धता, विचारांची स्पष्टता व समर्पण असा मिलाफ वसंतरावांच्या व्यक्तिमत्वात आहे. परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये वसंतरावांनी एक व्यवस्था म्हणून सहकार भारती उभी केली आहे’, असे गौरवोद्‍गार जोशी यांनी काढले.
‘माझा मोठा सन्मान केला आहे; पण मी केलेले काम फार मोठे नाही. शारीरिक क्षमता व बुद्धी तल्लख असेपर्यंत काम करत राहीन. मी कधीही कौतुकासाठी काम केले नाही’, अशी भावना देवधर यांनी व्यक्त केली. सुहास शामगावकर यांनी गीत सादर केले. मेधा चिवटे यांनी मानपत्र वाचन केले. भालचंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. आनंद देवधर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​उजनीत वाळूचा लिलाव?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
उजनी धरणातील वाळूचा प्रथमच जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यास राज्य पर्यावरण समितीने हिरवा कंदिल दाखविला आहे. या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण समितीची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात उजनीतील वाळूचा लिलाव होणार आहे.
उजनी धरणाच्या काठालगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा आहे. या गावांमधून हजारो ब्रास वाळूची दर वर्षी चोरी होते. ही वाळूचोरी रोखण्यासाठी महसूल विभागाकडून प्रयत्न केले जातात. परंतु या वाळूमाफियांना अटकाव घालण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. गत वर्षी उजनी धरणाचा पाणीसाठा खालावला होता. त्याचा फायदा घेऊन वाळूमाफियांकडून वाळूची चोरी केली जात होती. धरणाच्या काठालगत पाण्यात बोटी उतरवून वाळू उपसा केला जात होता. प्रशासनाने वाळूचोरी करणाऱ्यांच्या बोटी जप्त केल्या आणि त्या जिलेटिनच्या साह्याने उडवून दिल्या.
या कारवाईनंतरही उजनीतील वाळूची चोरी होतच आहे. त्यामुळे राज्याचा महसूल वाढविण्यासाठी उजनीतील वाळूची पहिल्यांदाच विक्री करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासना घेतला आहे. धरणाच्या भिंतीपासून पन्नास किलोमीटर अंतरानंतरच्या गावांमध्ये असलेल्या वाळूसाठ्यांची माहिती घेण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे वाळूच्या लिलावातून किमान ७० कोटी रुपये उत्पन्न मिळू शकेल असा अंदाज आहे. त्यासंबंधी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी राज्याच्या पर्यावरण समितीसमोर सादरीकरण केले. त्यानंतर या समितीने उजनीतून वाळू उपसा करण्यास हिरवा कंदिल दाखविला आहे.
नदी वा धरणातील वाळूचा उपसा करण्यापूर्वी केंद्रीय पर्यावरण समितीची अंतिम परवानगी घ्यावी लागते. उजनी धरणातून प्रथमच वाळू उपसा करण्याचा प्रस्ताव असल्याने केंद्रीय पर्यावरण समितीसमोर सादरीकरण होणार आहे. या समितीने त्यास मंजुरी दिल्यास उजनीतील वाळूचा प्रत्यक्ष लिलाव पुकारण्यात येणार आहे. केंद्रीय समितीने वाळू उपशाला मान्यता दिल्यास उजनीतील वाळूचोरी थांबेल आणि राज्य सरकारच्या तिजोरीत मोठी भर पडेल, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी काळे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​उद्योजकांनी सांगितले‘ब्रँड बिल्डिंग’चे गुपित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ मॅनॅजमेंट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ब्रँड पॉडकास्ट एव्हरी ब्रँड हॅझ अ स्टोरी’ हा कार्यक्रम द ग्रँड हयात हॉटेल येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमामध्ये औद्योगिक क्षेत्रातील नामवंत उद्योजक आणि चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्रसिद्ध उद्योजक सौरभ गाडगीळ, प्रसाद आजगावकर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ब्रँड अॅम्बॅसिडरवर कंपनी ब्रँड अवलंबून नसतात. कंपनीला त्यांच्या ग्राहकांच्या मनात ब्रँडबाबत विश्वास निर्माण करावा लागतो. ब्रँड अॅम्बॅसिडरच्या एखाद्या चुकीमुळे कंपन्यांच्या उत्पादनावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, असे आजगावकर यांनी सांगितले.
गाडगीळ यांनी त्यांच्या कंपनीच्या यशाचा प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. प्रत्येक ब्रँडला ग्राहकांच्या मनात घर करायला वेळ लागतो आणि त्यासाठी खूप मेहनत करावी लागते, असे गाडगीळ यांनी सांगितले. अंकुश मल्होत्रा त्यांच्या कंपनीच्या ब्रँडचा प्रवास सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुकुल वारशने, सुहासिनी किर्लोस्कर यांनी विविध ब्रँडबद्दल माहिती दिली.
शेवटचे सत्रात अमित गाजवानी यांनी ब्रँड बिल्डिंग आणि त्यामागील कंपनीची डावपेचाची माहिती दिली. कंपनीची डावपेच या बदल माहित देऊन चकित केले. ‘ब्रँड पॉडकास्ट एव्हरी ब्रँड हझ अ स्टोरी’ कार्यक्रमाचा पहिला दिवस ‘मिटसॉम’च्या संचालिका डॉ. सायली गणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे समर्थन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​शासकीय खंड खासगी वितरकांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्य शासनाच्या विविध संस्थांतर्फे प्रसिद्ध करण्यात येणारे खंड लोकांपर्यंत पोहोचतात का, लोकांना या खंडांचा उपयोग होतो का, अशी शंका नेहमीच व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर शासकीय धोरणात बदल करण्यात आला असून खासगी वितरकांकडेही हे खंड मिळू लागले आहेत. धोरण बदलामुळे या खंडांना चांगली मागणी आहे.
‘साहित्य संस्कृती मंडळ किंवा समित्यांमार्फत काढल्या जाणाऱ्या ग्रंथांचा दर्जा चांगला असतो; पण केवळ शहराच्या कोपऱ्यात असणाऱ्या सरकारी दुकानांत हे ग्रंथ असतात. ही पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचत नाहीत. ठराविक दुकानांपेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे’, अशी टीका ख्यातनाम लेखक रंगनाथ पठारे यांनी मध्यंतरी केली होती. या पार्श्वभूमीवर आढावा घेतला असता सरकारी मुद्रणालयांबरोबरच खासगी वितरकांकडेही खंड उपलब्ध होत असल्याचे ‘मटा’ला सांगण्यात आले.
राज्य सरकारने मराठी भाषा विभाग हे स्वतंत्र खाते निर्माण केले असून, या खात्याचे साहित्य व संस्कृती मंडळासह मराठी विश्वकोश मंडळ, मराठी भाषा संचालनालय आणि मराठी राज्य विकास संस्था असे चार विभाग आहेत. राज्य साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ, नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी, बालभारती, राज्य मराठी विकास संस्था यांनी प्रसिद्ध केलेल्या खंडांना चांगली मागणी आहे. विश्वकोशाच्या २० व्या खंडाचे काम सुरू असून त्यापूर्वीचे खंड महत्त्व टिकवून आहेत. आज ऑनलाइन व्यवहार वाढला असताना मुद्रणालयात जाऊन खंड विकत घेणे जिकीरीचे ठरते. या पार्श्वभूमीवर खासगी वितरकांकडे खंडांची विक्री होत नसल्याने विविध शहरात हे खंड उपलब्ध होऊ लागले आहेत.
‘फोटो झिंकोमध्ये खंड विक्रीतून रोज सुमारे १५ हजार रुपयांची उलाढाल होते. ४५ रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत सर्व खंड या ठिकाणी विक्रीस आहेत. याशिवाय विविध ठिकाणी अधिकृत विक्रेते नेमण्यात आले आहेत. त्यामुळे शासकीय संस्थांतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेले खंड खासगी वितरकांकडे उपलब्ध होत आहेत’, अशी माहिती फोटो झिंकोचे पर्यवेक्षक अजित डोंगरे यांनी ‘मटा’ला दिली. जानेवारीत पिंपरी येथे झालेल्या साहित्य संमेलनात शासनाच्या सर्व दालनांतून साधारण तीन लाखांची विक्री नोंदवली गेली होती.

शासनाच्या विविध संस्थांतर्फे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या खंडांना चांगली मागणी आहे. साहित्य संमेलनाव्यतिरिक्त इतर पुस्तक प्रदर्शनांत या खंडांची नेहमी विक्री होते. खासगी वितरक नेमण्यात आल्यामुळे हा ग्रंथ व्यवहार वाढला आहे. आमच्या पुस्तक प्रदर्शनात सर्व खंड उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- रमेश राठिवडेकर, अक्षरधारा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​जेव्हा आमीर गप्पा मारतो...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध कलागुण...त्यांना दाद देत स्वतः सादर केलेल गाणं...विद्यार्थ्यांनी वैयक्तिक, चित्रपट, सामाजिक आदी कामांबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांवर थेट मुलांमध्ये जाऊन उत्तरे देत प्रसिद्ध अभिनेता आमीर खान याने विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधून मुलांची मने जिंकली.
भारतीय जैन संघटनेतर्फे (बीजेएस) बीजेएसच्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील आदिवासी भागातील आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले. ‘बीजेएस’चे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, शांतीलाल बोरा, विठ्ठल मणियार, अभय मुनोत, डॉ. किंजल गोयल, बाबासाहेब सांगळे आदी उपस्थित होते.
नमस्कार...अशी सुरुवात करीत आमीरने विद्यार्थ्यांशी संवादाला सुरूवात केली. आमीर म्हणाला, ‘लहान मुलांमधील निरागसपणा, एखाद्या गोष्टीबद्दल खूप जाणून घेण्याचा स्वभाव आवडतो. त्यामुळे मला लहान मुलांशी गप्पा मारायला अवडतात. लहान मुलांमध्ये एक वेगळेपणाची गोष्ट असते. काहीतरी वेगळे करण्याची मुलांना सवय असते. तारे जमीन पर हा चित्रपट करताना लहान मुलांविषयी मला खूप गोष्टी समजल्या. ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमामुळे मला ज्या समाजाकडून, देशाकडून खूप मिळाले, त्या समाजास पुन्हा काहीतरी दिले पाहिजे, या भावनेतून सामाजिक कार्य सुरू केले. तर चित्रपट क्षेत्रात राहून लोकांच्या जीवनात बदल करू शकतो का या हेतूने सत्यमेव जयते हा शो सुरू केला. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाल्याने पाणी फाउंडेशनची स्थापना करून महाराष्ट्रात पाणी क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला’.

आग्रहाखातर ‘डायलॉगबाजी’
विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर आमीरने ‘सक्सेस के पीछे मत भागो. काबील बनो काबील. कामयाबी साली झक मारके पीछे भाग आयेगी! हा ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील डायलॉग सादर केला. तर, काही विद्यार्थ्यांनी त्याच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आमीरने विद्यार्थ्यांबरोबर फोटो काढून स्वतःदेखील सेल्फी काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरांतही मजूर अड्डे

$
0
0

पुणे : इमारतींचे बांधकाम किंवा बांधकाम साहित्याचे ‘लोडिंग-अनलोडिंग’ करण्यासाठी...सोसायटीच्या साफसफाईचे अथवा बगीच्यामध्ये माळी काम करण्यासाठी...घरातील किंवा बंगल्यातील अवजड कामे करायची झाल्यास आपल्याला साहजिकच कामगार किंवा मजुरांची आठवण येते. अशा वेळी नकळत आपली पावले चौकांतील वर्दळीच्या ठिकाणी वळतात. त्यामुळेच नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन शहरात वनाझ कॉर्नर, वारजे नाका, हडपसर (गाडीतळ), वाकड फाटा, धायरी फाटा येथे गेल्या काही वर्षांत नवीन मजूर अड्डे तयार झाले आहेत.
शहरात बुधवार चौक, येरवडा, दांडेकर पूल, पुणे रेल्वे स्टेशन येथे जुने प्रसिद्ध मजूर अड्डे आहेत. मात्र, पुणे शहराच्या विस्तारीकरणानंतर हे मजूर अड्डे विविध प्रकारच्या कामांसाठी अपुरे पडू लागले. तसेच, नव्याने विकसित झालेल्या उपनगरांपासून हे अड्डे नागरिकांसाठी अंतराने दूर पडू लागले. तेव्हापासूनच शहराच्या विविध भागांत मजूर अड्डे तयार होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर कोथरूड, सिंहगड रस्ता, कात्रज, वाकड, हजपसर, वारजे-माळवाडी आदी परिसरात नव्याने हे अड्डे तयार होण्यास सुरुवात झाली आणि सध्या दररोज सकाळी सहा ते दहा या वेळेत हे अड्डे मजुरांच्या गर्दीने फुलतात.
कोथरूड परिसरात वनाझ कॉर्नरला किनारा हॉटेलच्या शेजारी तर वारजे माळवाडी परिसरात वारजे नाका (पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाखाली) दररोज सकाळी विविध प्रकारची कामे करणाऱ्या मजुरांची गर्दी असते. अशा प्रकारची गर्दी धायरी फाटा, कात्रज, हडपसरमधील गाडीतळ, वाकड चौकात महामार्गाच्या शेजारी असलेल्या मजूर अड्ड्यांवर पाहायला मिळते. या मजूर अड्ड्यांवर इमारतींचे बांधकाम करण्यासाठी अथवा बांधकाम साहित्याचे ने-आण करण्यासाठी, सोसायटीची व घरांची विविध प्रकारची अवजड कामे, प्लम्बिंगची कामे, मालाची ने-आण करणे, बगीच्यामध्ये माळी काम, पायाभूत सुविधांची कामे, दुकान किंवा हॉटेलमध्ये काम करण्यासाठी सहजपणे मजूर अथवा कामगार मि‍ळतात. त्यामुळे नागरिकांना विविध प्रकारची कामे करण्यासाठी या मजूर अड्ड्यांचा फायदा होत आहे.
या मजूर अड्ड्यांवर मजुरांना कामानुसार पैसे मिळतात. साधारण पाचशे रुपये दिवसभरातील कामाची रोजंदारी मिळते. बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीला आठशे रुपये रोजंदारी मिळते. या सर्व अड्ड्यांवर मराठवाडा आणि विदर्भातून आलेल्या मजुरांची संख्या अधिक आहे. तसेच, गेल्या काही वर्षांपासून बिहार आणि उत्तर प्रदेशातून येणाऱ्या मजुरांची संख्या कमालीची वाढली आहे. हे मजूर कमी पैशांत काम करत असल्याने राज्यातील मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे. परभणीहून आलेले बालाजी मेकलवाल म्हणाले, ‘नव्याने तयार झालेल्या मजूर अड्ड्यांवर बांधकामापासून ते घरकामापर्यंत रोजंदारी मिळते. मात्र, मजुरांची संख्या वाढल्याने काम मिळवण्यासाठी स्पर्धा वाढली आहे’.

घोटावडे फाट्यावर मोठा मजूर अड्डा
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या परिसरात बांधकाम व पायाभूत सुविधांची विकास कामे झपाट्याने होत आहेत. तसेच, पिरंगुट व हिंजवडी परिसरात लहान-मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्यांचे जाळे विस्तारत आहे. या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात मजूर अथवा कामगारांची गरज भासते. शेतातील विविध कामांसाठीदेखील मजूर लागतात. ही गरज लक्षात घेऊन गेल्या तीन वर्षांपासून पिरंगुटमध्ये असणाऱ्या घोटावडे फाट्यावर मोठा मजूर अड्डा तयार झाला आहे. दररोज सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत मजुरांची गर्दी पाहायला मिळते. या नव्याने तयार झालेल्या मजूर अड्ड्यांमुळे बेरोजगारांना रोजगार मिळत असल्याचे कामगार सूर्यकांत मालपोटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​असामान्य दाम्पत्याची कहाणी उलगडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
चारशे रुपयांत घर चालवावे लागेल, दररोज ४० किमी चालावे लागेल, पाच रूपयांच्या खर्चात लग्न आणि भीक मागायची तयारी, एका ध्येयवेड्या माणसाने लग्नाआधी घातलेल्या या अटी. त्या मान्य करून छत गळणाऱ्या आणि दरवाजा नसणाऱ्या झोपडीत आलेली नवी नवरी. दर महिन्याला नवऱ्याची कटिंग करून तेही पैसे वाचवून काटकसर करणाऱ्या एका असामान्य स्त्रीचे अनोखे रूप प्रेक्षकांसमोर उलगडले. मेळघाटात आपल्या पतीबरोबर काम करणाऱ्या डॉ. स्मिता कोल्हे यांची ही कहाणी त्यांच्याच तोंडून ऐकताना उपस्थित थक्क झाले.
धोर्डे-पाटील संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात सिताबाई गायकवाड यांना आदर्श माता पुरस्कार व अॅड. हर्षद निंबाळकर यांना जीवनगौरव पुरस्काराने युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आबासाहेब शिंदे, भरत शेट्टी, प्रमोद त्रिपाठी, अंजली सिंगडे-राव यांनादेखील पुरस्कार देण्यात आले. अॅड. विलास धोर्डे, राजेंद्र धोर्डे, रघुनाथ येमुल या वेळी उपस्थित होते.
डॉ. स्मिता कोल्हे यांनी उपस्थितांशी संवाद साधून मेळघाटातील सोनेरी दिवसांना उजाळा दिला. ‘प्रत्येक बाईने नवऱ्याची कटिंग करावी, त्यात खूप मजा येते. जरा जरी वळला तर कान कापून टाकीन, अशी प्रेमळ धमकीसुद्धा देता येते. ती मजाच वेगळी असते,’ असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. ‘रवींद्र कोल्हे यांनी लग्नासाठी अटी ठेवल्या त्या वेळी मी बक्कळ पैसे कमवत होते. गाडी होती, घरात हाताखाली काम करायला माणसे होती. पण एकदा विचार आला की आपण काहीही न घेता आलो आहोत. काही न घेताच जाणार मग सगळ्या अटी मान्य करून मेळघाटातील आदिवासींच्या विश्वात गेले आणि तिथलीच झाले.’ सुरूवातीला नर्सबाई म्हणून बोलावणारे आदिवासी एका घटनेमुळे डॉक्टरबाई
म्हणायला लागले, असेही त्या म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​गडसंवर्धन मोहीम नेणार दिल्ली दरबारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रातील सर्व संस्थांना एका छताखाली आणण्याचा प्रयत्न करणार असून, दिल्ली दरबारी किल्ले संवर्धनाची मोहिम हाती घेणार असल्याचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता, संभाजीराजे बोलत होते. केंद्र सरकारतर्फे गड संवर्धन मोहिमेसाठी संभाजीराजेंना ब्रँड अॅम्बेसेडर करण्यात आले आहे. ‘राजस्थानातील किल्ल्यांना फारसा इतिहास नाही तरी, तेथील सरकारने केलेल्या व्यवस्थांमुळे ते किल्ले पाहण्यासाठी हजारो नागरिक येतात. मात्र महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्याला एक जाज्वल्य इतिहास असूनसुद्धा त्यांचे संवर्धन केले जात नाहीत. या उदासीनतेमुळेच पर्यटक किल्ल्यांकडे फिरकत नाहीत. त्यामुळेच गडांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व संघटना, संस्थांना एकत्र करून एक राज्यव्यापी कार्यक्रम आखण्यात येणार आहे, त्याद्वारे किल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली जाईल. केंद्र सरकारकडून यासाठी अर्थिक मदत करण्यात येणार आहे’, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
येणारी शिवजयंती दिल्लीत मोठ्या थाटामाटात साजरी व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असून या कार्यक्रमाला पंतप्रधानांसह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती असावी, असे प्रयत्न करण्यात येणार आहेत. शिवाय महाराष्ट्रातून यूपीएससीसाठी दिल्लीत शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षि शाहू महाराज यांच्या नावे वसतिगृह तयार व्हावे, असा मानस असल्याचे संभाजीराजे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गुंड बोडके सीएला भेटतोच कसा ?’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘कुख्यात गुंड बाबा बोडके मुख्यमंत्र्यांना भेटलाच कसा,’ असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोमवारी उपस्थित केला. ‘बोडके याला ओळखत नसल्याचे लंगडे समर्थन मुख्यमंत्री करत असून निवडणूक ‌जिंकण्यासाठी साम, दंड, भेद या रणनीतीचा वापर भाजप करत आहे,’ असा आरोप पवार यांनी केला.
वानवडी भागात पुणे महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन सोमवारी अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन झाले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर कडक शब्दात टीकास्त्र सोडले. खुनासह वेगवेगळे गुन्हे दाखल झालेल्या गुंड बोडकेचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबरचा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवरून पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. ‘ज्या व्यक्तीवर कलम ३०२ आणि मोक्का कायद्यातंर्गत कारवाई झाली आहे, असा माणूस थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचूच कसा शकतो. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी ‘वर्षा’वर गेलेल्या पाहुण्यांची सर्व नोंद होत असते. कोण कोण भेटायला येणार आहे, त्यांची नावे काय आहेत, हे सगळे आधीच सांगावे लागते, मग असे असताना मुख्यमंत्र्यांना माहितीच नव्हते, असे म्हणणे कितपत योग्य आहे,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘मी सुद्धा राज्याचा उपमुख्यमंत्री होतो. ‘वर्षा’वर कोणालाही मुख्यमंत्र्यांना भेटायला जायचे असेल, तर आधी वेळ घ्यावी लागते. कोणत्या गाडीतून आपण येत आहोत, त्याचा क्रमांकही द्यावा लागतो. तिथे पोहोचल्यावर आत जाण्याअगोदर दोनदा तुमच्या गाडीची तपासणी होते. एवढ्या सगळ्या प्रक्रिया केल्यावरच तुम्ही चार पायऱ्या चढून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील दालनापर्यंत पोहोचता. त्यामुळे बोडके कोण आहे, हे मुख्यमंत्र्यांना माहितीच नव्हते, असे भाजप नेत्यांचे म्हणणे कितपत योग्य आहे,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांची परंपरा आज भाजपमध्ये राहिलेली नाही,’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

‘जिल्हाधिकारी म्हणजे काय सालगडी आहे ?’
येत्या ३१ ऑक्टोबरला राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील वाचाळ मंत्र्यांना आवर घालावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ‘काही मंत्री म्हणतात की बारा तासांत जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली पाहिजे, जिल्हाधिकारी म्हणजे काय सालगडी आहेत का?’ अशा शब्दात पवार यांनी राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बिबवेवाडीत पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीने लिहलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली असून त्यात पत्नीच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश मारुती हादगे (वय ३७, रा. बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्यानुसार पत्नी ललिता सोनवणे (२७) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश यांचे पहिले लग्न झाले असून, त्यांना एक मुलगी आहे. मात्र, त्यांचा घटस्फोट झालेला आहे. त्यानंतर २००४ मध्ये ललिता सोबत दुसरा विवाह झाला होता. मात्र, आरोपी ललिता या सतत विनाकारण त्यांच्याशी भांडण करत होत्या. तसेच, सतत माहिरी निघून जात होत्या. पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलीचा सांभाळ करू दिला नाही. या त्रासातून महेश यांनी १० ऑक्टोंबर रोजी राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

महेश यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात पत्नीने मुलीला माझ्यापासून तोडले. तसेच, ती सतत भांडणे करून माहेरी निघून जाते, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक बी. डी. कोपनर हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लढणार कोण? श्री. की सौ.?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रभागरचनेपाठोपाठ लागू झालेल्या आरक्षणाने शहरातील बहुसंख्य प्रभागांमधील राजकीय समीकरणे उलटीपालटी करून टाकली आहेत. काही प्रभागांतील जातीचे आरक्षण महिलेच्या वाट्याला गेल्याने अनेक विद्यमानांची पंचाईत झाली आहे; तर काही ठिकाणी सोयीस्कर अशी दोन आरक्षणे लागू झाल्याने पती किंवा पत्नी या दोघांपैकी कोणी निवडणूक लढवायची, असा ‘कौटुंबिक’ प्रश्न उभा राहिला आहे.

प्रभागरचनेमुळे काही जणांना प्रभाग अनुकूल झाले, तर काही जणांच्या प्रभागांची मोडतोड झाल्याची चर्चा शहरभरात आहे. आरक्षणामुळेही अनेक विद्यमान नगरसेवकांना फटका बसला आहे. आरक्षणाच्या निकषांनुसार प्रत्येक प्रभागात दोन जागा महिलांच्या वाट्याला आल्या आहेत. त्यामुळे महिला आरक्षणाचा कोटा पूर्ण झाला असला, तरीही महिलांच्या जागा अन्य आरक्षणांच्या कोणत्या गटात आल्या, यावर अनेक इच्छुकांची गणिते विस्कटली आहेत. एससी गटातील काही विद्यमान नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या जागांवर महिलांचे आरक्षण लागू झाले आहे. त्यामुळे तेथे त्यांना पत्नी किंवा कुटुंबातील अन्य सदस्यासाठी उमेदवारी मागावी लागणार आहे. माजी सभागृह नेते सुभाष जगताप, भाजपचे सुनील कांबळे, धनंजय जाधव यांच्या प्रभागात अशा प्रकारचे आरक्षण लागू झाले आहे. यांपैकी अनेकजण राखीव जागेवर पत्नी आणि खुल्या गटात स्वतः इच्छुक झाले आहेत.

दुसरीकडे आपल्याला सोयीस्कर अशीच; परंतु दोन आरक्षणे लागू झाली आहेत. निवडणूक लढविण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध झाल्याने काही जणांनी प्रारंभी आनंद व्यक्त केला. मात्र, आता नेमकी निवडणूक लढवायची कोणी, हा पेच अनेकांपुढे उभा राहिला आहे. विशेषतः मावळत्या सभागृहात अनेक महिला सदस्यांनी प्रभागांचे प्रातिनिधित्व केले होते. त्यांच्या प्रभागात सोयीस्कर दोन आरक्षणे लागू झाल्याने त्यांचे पतीही इच्छुकांच्या स्पर्धेत दाखल झाले आहेत. मनीषा आणि प्रवीण चोरबेले, वंदना आणि श्रीनाथ भिमाले, अश्विनी आणि नितीन कदम, दत्तात्रय आणि संगीता गायकवाड; तसेच बाबू आणि वनिता
वागस्कर अशा काही सदस्यांपुढे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

आम्ही दोघेही इच्छुक...!

आपल्या प्रभागात सोयीस्कर अशी दोन आरक्षणे पडल्याने निवडणूक कोणी लढवायची, असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यावर काही जणांनी नामी उपाय शोधला आहे. ‘या प्रभागातून आम्ही दोघेही इच्छुक,’ असा प्रचार यापैकी काही जणांनी सुरू केला आहे. निवडणुकीच्या काळात इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली असून, दिवसागणिक त्यात भरच पडत आहे. त्यांची समजूत घालताना पक्षाच्या वरिष्ठांना आधीच घाम फुटला आहे. अशा काळात एकाच घरात दोन तिकिटे कशी द्यायची, हा नवाच प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे या इच्छुक दाम्पत्यांपैकी किती कुटुंबांमध्ये ‘डबल’ उमेदवारी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images