Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डेंगळे पुलाशेजारी होणार पर्यायी पूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
डेंगळे पुलाला पर्यायी पूल उभाण्यास अखेर महापालिकेला मुहूर्त मिळाला असून पुढील आठवड्यापासून या कामाला सुरुवात होणार आहे. डेंगळे पूल वापरण्यास धोकादायक झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून हा पूल जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलामुळे होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी पूल बांधण्याचा विचार सुरू होता. सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा पर्यायी पूल उभारण्यास मान्यता देण्यात आली.

शिवाजीनगरकडून रेल्वे स्टेशन, हडपसर, कँटोन्मेंट या भागात ये जा करण्यासाठी डेंगळे पुलाचा वापर केला जातो. या पुलाजवळच जुना बाजार असल्याने तेथे सतत वाहतुकीची कोंडी होते. गेल्या ४३ वर्षांपासून म्हणजे १९७१पासून हा पूल वापरात आहे. हा पूल वापरण्यास धोकादायक झाल्याने येथे पर्यायी पूल उभारावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील स्थानिक नगरसेवक अजय तायडे करत होते. दोन वर्षांपूर्वी पालिकेच्या स्थायी समितीने त्यासाठी प्रशासनाकडून अभिप्राय मागविला होता.

डेंगळे पुलाला पर्यायी पूल उभारण्यासाठी माजी स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी २०१६-१७च्या बजेटमध्ये १२ कोटी रुपयांची तरतूद केली होती. या पुलासाठी संपूर्ण खर्च १९ कोटी ८१ लाख एवढा येणार असून पुढील एक ते दीड वर्षांत हे काम पूर्ण होणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी सांगितले.

छत्रपती शाहू सेतू

डेंगळे पुलाशेजारी‌ उभारण्यात येणाऱ्या नवीन पुलाला ‘छत्रपती शाहू सेतू’ असे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या पुलाला छत्रपती शाहू सेतू असे नाव देण्याचा प्रस्ताव नाव समितीमध्ये मान्य करून सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्यालाही पालिकेच्या मुख्य सभेने मंजुरी दिल्याचे नगरसेवक तायडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिंपरीत खंडेनवमी उत्साहात

$
0
0

कंपन्यांमध्ये कामगारांकडून पारंपरिक पद्धतीने यंत्रपूजन

म. टा. प्रतिनिधी पिंपरी
पिंपरी, चिंचवड, भोसरी, तसेच चाकण, तळेगाव, रांजणगाव या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या व लघुउद्योगांमध्ये कामगारांनी सोमवारी पारंपरिक पद्धतीने यंत्रपूजन करून खंडेनवमी उत्साहात साजरी केली. खंडेनवमीनिमित्त कंपन्यांतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले.

उद्योगनगरीतील टाटा मोटर्स प्रा. लि. कंपनीत खंडेनवमीनिमित्त कंपनीच्या पुणे, पिंपरी-चिंचवड, चिखली येथील कारखान्यात यंत्रपूजन करण्यात आले. यंत्रांवर आकर्षक पुष्परचना करण्यात आली होती. काळभोरनगर येथील प्रमियम ट्रान्समिशन कंपनीत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते सत्यानारायण पूजा करण्यात आली; तसेच युनिअन आणि व्यवस्थापन प्रतिनिधींच्या हस्ते कंपनीतील मशीनची नारळ वाढवून आणि पुष्पहार घालून पूजा करण्यात आली. या वेळी व्यवस्थापनातर्फे व्यवस्थापकीय संचालक शंतनू मेडी, महाव्यवस्थापक संजय महाडिक, मुनष्यबळ विकास व्यवस्थापक मीरज बरेटिया, जयंत हार्षे, तसेच युनियनचे सहसरचिटणीस व्ही. व्ही. कदम, उपाध्यक्ष श्याम सुळके, युनिअन प्रतिनिधी एल. एस. मारू, नितीन आकोटकर, अजय गायकवाड, किरण पेडणेकर, श्रीकांत गोडसे, तुषार गायकवाड आदी उपस्थित होते.

थिसेनक्रुप इंडस्ट्रीजच्यावतीने यंत्रपूजन आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम झाला. या वेळी महापूजेला कार्यकारी संचालक मलाईदास, शिवसुब्रमण्यम, ललिता, एन. दमानिया, अर्नवाझ दमानिया, सुहास तलाठी, लीना नागेशकर, एन. डी. कामदीन, डी. पद्मनाभन, गिरिष केतकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल गोडसे, कार्याध्यक्ष जयवंत डावरे, खजिनदार अनिल काटे आदींसह कामगार उपस्थित होते.

उद्योगनगरीतील इतर विविध कंपन्यांमध्येही खंडेनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. कामगार व त्यांच्या परिवाराला मिठाई वाटप करण्यात आले. कामगारांनी गुलालाची उधळण करीत खंडेनवमी साजरी केली. कंपनी मालक, कामगार यांना सुख-शांती, चांगले आरोग्य लाभावे, तसेच औद्योगिक मंदी हटू दे, असे साकडे घालण्यात आले.

उद्योगनगरीमध्ये खंडेनवमीच्या दिवशी यंत्रसामग्रीचे पूजन केले जाते. शहरात सुमारे साडेसहा हजार लहान-मोठे उद्योग आहेत. औद्योगिक क्षेत्राचा विस्तार वाढत असला, तरी या उत्सवाच्या परंपरेत कोणताही खंड पडलेला नाही. काही कारखान्यांमध्ये यंत्रपूजेबरोबरच सांस्कृतिक उपक्रमही राबविले जातात.

औद्योगिक परिसरात सोमवारी सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. केएसबी चौक, लांडेवाडी चौक, इंद्रायणीनगर, नेहरूनगर, खंडोबामाळ, थरमॅक्स चौक, यमुनानगर, चिखली, तळवडे या ठिकाणी झेंडूची फुले, पूजेचे साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली होती. कंपन्यांचे प्रवेशद्वार झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. यंत्रांची स्वच्छता करण्यात कामगार मग्न होते. विविध कंपन्यांच्या कामगारांची ने-आण करण्यासाठी असलेल्या बसगाड्या सजलेल्या दिसत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहायक फौजदाराची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पोलिस मुख्यालयात नियुक्तीस असणारे सहायक फौजदार नंदकुमार विठ्ठल देशमुख (वय ५२, रा. नखाते वस्ती, वाकड) यांनी नैराश्यातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. देशमुख यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख पुणे शहर पोलिस दलाच्या शिवाजीनगर येथील मुख्यालयात नियुक्तीस होते. काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली होते. यातूनच त्यांनी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सध्या त्यांची रात्रपाळीची ड्यूटी सुरू होती.

नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. वाकड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन देशमुख यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. देशमुख यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून यामध्ये, ‘मी कुटुंबासाठी काहीच करू शकलो नाही. त्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे,’ अशा आशयाचा उल्लेख त्यामध्ये आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​​जिल्ह्यात २८४ अनधिकृत बांधकामे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) केलेल्या पाहणीमध्ये आतापर्यंत २८४ अनधिकृत बांधकामे आढळली असून, हवेली तालुक्यात सर्वाधिक अनधिकृत बांधकामे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये नऱ्हे, आंबेगाव, किरकटवाडी, कोल्हेवाडी, मांजरी, म्हाळुंगे या परिसराचा समावेश आहे.
‘पीएमआरडीए’ने संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार आहे’, असे ‘पीएमआरडीए’चे उपजिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी तहसीलदार अर्चना यादव-पोळ आणि विकास भालेराव उपस्थित होते.
‘पीएमआरडीए’कडून जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामाची माहिती वेगवेगळ्या माध्यमांतून घेण्यात आली आहे. त्यामध्ये नागरिकांकडून आलेल्या तक्रारी, प्राधिकरणाच्या अॅपद्वारे आलेली माहिती; तसेच ‘पीएमआरडीए’च्या पथकांकडून करण्यात येणाऱ्या पाहणीद्वारे अनधिकृत बांधकामांबाबत माहिती मिळवण्यात आली आहे. त्यामध्ये हवेली तालुक्यात सर्वाधिक अनधिकृत बांधकामे असल्याचे आढळून आले आहे. २८४ पैकी हवेलीत २४७, शिरुरमध्ये दोन, मुळशीत २६ आणि खेडमध्ये दोन अनधिकृत बांधकामे झाली आहेत’, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात काही ठराविक परिसरात अनधिकृत बांधकामे झालेले दिसून आले आहे. त्यामध्ये नऱ्हे, आंबेगाव बुद्रुक, किरकटवाडी, कोल्हेवाडी, मांजरी, म्हाळुंगे, उंड्री, देहूगाव, हडपसर, कोंढवे-धावडे, हिंजवडी, फुरसुंगी, भुकुम, वाघोली, केशवनगर, पिसोळी, उत्तमनगर (शिवणे), लोणीकंद, सणसवाडी, रांजणगाव, वढू, जांभुळवाडी, मांगडेवाडी, धायरी, आर्वी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, भेकराईनगर, उरुळीकांचन, लोहगाव, धनकवडी आणि कोंढापुरी (शिरुर) यांचा समावेश आहे. संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाने करावी मदत
जिल्ह्यातील अन​धिकृत बांधकामांच्या प्रकरणांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने संकलित केली आहे. त्यांनी नऊ हजार ३१ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, पुढील कारवाई करण्यावरून जिल्हाधिकारी कार्यालय आणि ‘पीएमआरडीए’ने यांच्यात तू-तू-मैं-मैं सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण म्हणाले, ‘ही माहिती २०१३ पर्यंतची आहे. या प्रकरणांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागवण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने ही माहिती देताना केवळ संबंधित व्यक्तीचे नाव, सर्व्हे क्रमांक आदी माहिती असलेल्या एक्सेल फाइल दिलेल्या आहेत. त्या ठिकाणांचे संपूर्ण पत्ते नाहीत. हवेली, मावळ आणि मुळशी या तालुक्यांमधील ही माहिती असून, ‘पीएमआरडीए’ने नोटिसा पाठवल्यास त्या मिळतीलच याची खात्री नाही. अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणांची माहिती संबंधित भागातील तलाठ्यांकडे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ‘पीएमआरडीए’ यांनी संयुक्तपणे कारवाई करावी, असे ‘पीएमआरडीए’चे म्हणणे आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पोलिस अधीक्षकांची ‘उन की बात’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी ‘उन की बात’ हा उपक्रम सुरू केला आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांशी वायरलेस सेटवरून थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांची लगेचच सोडवणूक करण्यात येत आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दरबार, वृंद परिषद, समाधान हेल्पलाइन असे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. अधीक्षकांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या समस्या सांगताना अनेकदा कर्मचारी संकोचतात. समाधान हेल्पलाइनचा वापर करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न होतो. मात्र, अनेकदा या समस्या अधीक्षकांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागतो. या सगळ्या योजनांचा विचार केल्यानंतर ‘उन की बात’ हा प्रकल्प राबवण्यात येत आहे, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.
‘उन की बात’ या कार्यक्रमात वायरलेस सेटचा वापर करून कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात येत आहे. पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना ठराविक दिवशी एकत्र करून वायरलेस सेटसमोर उपस्थित ठेवण्यात येते. त्यावेळी दुसऱ्या बाजूने ते सांगतील ते ऐकण्यास मी असतो. जिल्ह्यातील १५ पोलिस ठाण्यांमध्ये रविवारी हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये २२ तक्रारी करण्यात आल्या असून त्या तक्रारी २१ ऑक्टोबरपर्यंत सोडवण्यात येतील आणि २१ तारखेच्या कार्यक्रमात तक्रारींवर काय तोडगा काढला, याची माहिची कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. जिल्ह्यातील उर्वरित पोलिस ठाण्यांशी दसऱ्याच्या दिवशी संवाद साधण्यात येणार आहे.
अनेकदा कर्मचाऱ्यांना अधीक्षकांना थेट तक्रार सांगण्यास संकोच वाटतो. मी वायरसेल सेटवर उपलब्ध असलो, तरी त्यांच्यासमोर नसतो. चेहरा एकमेकांना दिसत नसल्याने कर्मचाऱ्यांशी भीती कमी झालेली असते. कर्मचारी तक्रार सांगताना एकटा नसतो, त्याच्यासोबत इतर २०-२५ जण असतात, त्यामुळे त्यांचे धारिष्ट्य वाढते. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी अगदी जुजबी असून त्या तत्काळ सोडवण्यास आम्ही प्राधान्य दिले आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​उड्डाणपुलाचे शनिवारी उद्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
इंजिनीअरिंग कॉलेज चौकातील (सीओईपी) वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरणाऱ्या संगमवाडी ते सुभाषचंद्र बोस चौक (संचेती हॉस्पिटल) दरम्यानच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन येत्या शनिवारी (दि. १५) होणार आहे. तीन टप्प्यातील या पुलाच्या अखेरच्या कामास गती देण्यासाठी यापूर्वी उद्घाटन करण्यात आलेला पूल तात्पुरत्या स्वरूपात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी खुला करण्याचा विचार सुरू आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी सकाळी नऊ वाजता या पुलाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली. याच दिवशी बापूराव कर्णे गुरुजी यांच्या प्रभागातील हॉस्पिटलचे आणि महापौरांच्या प्रभागातील ई-लर्निंग स्कूलचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते होणार आहे.
सीओईपीच्या चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बहुमजली उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आले होते. या पुलाला सीओईपीने सुरुवातीला विरोध केल्याने त्याचे काम रखडले. सीओईपीने सुचविलेल्या बदलांनुसार सुधारित आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात या पुलाचे काम सुरू झाले. या ठिकाणी तीन पुलांचे काम केले जाणार असून, त्यातील सर्वांत लहान पुलाचे उद्घाटन ऑक्टोबर २०१४ मध्येच झाले होते. त्यानंतर, आरटीओ कार्यालयाकडून बोस चौकाकडे जाणारा रेल्वे मार्गावरील विस्तारित पूल ऑक्टोबर २०१५ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आता संगमवाडीकडून जंगली महाराज रस्त्याकडे जाणाऱ्या पुलाचे उद्घाटन केले जाणार आहे. या पुलामुळे संगमवाडीकडून येणाऱ्या वाहनांना इंजिनीअरिंग कॉलेजच्या चौकात थांबण्याची गरज उरणार नाही.
या पुलाच्या उद्घाटनानंतर आरटीओकडून मुंबईकडे जाणाऱ्या पुलाचे उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी, सर्वप्रथम खुल्या करण्यात आलेल्या लहान पुलावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात वळवली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्करप्रमुखांनी दिली सदर्न कमांडला भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उरी हल्ला, सर्जिकल स्ट्राइक आणि पाकिस्तानबरोबर ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख दलबीर सिंह सुहाग यांनी रविवारी पुण्यातील लष्कराच्या दक्षिण विभागाच्या मुख्यालयाला (सदर्न कमांड) भेट दिली.
या दौऱ्यात सुहाग यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला, तसेच लष्करी तुकड्यांच्या सज्जतेचा आढावा घेतला. शिवाय त्यांनी मुख्यालयाला भेट देऊन सर्व आस्थापनांच्या सद्यःस्थितीची व सुसज्जतेची माहिती घेतली. त्यानंतर सुहाग यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या. या दौऱ्याबाबत लष्करातर्फे पूर्णतः गोपनीयता बाळगण्यात आली. माध्यमांना अधिकृत माहितीही देण्यात आली नाही. मात्र, लष्कराच्या दिल्ली येथील मुख्यालयातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी दौऱ्याच्या माहितीला दुजोरा दिला. उरी येथील लष्करी तळावर झालेल्या दहतशवादी हल्ल्यानंतर भारताने २८ सप्टेंबरच्या रात्री सर्जिकल स्ट्राइक करून पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख दलबीर सिंह सुहाग यांनी भारत पाकिस्तान सीमेवर जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी लष्कराच्या आणखी काही मुख्यालयांना, तसेच आस्थापनांना भेट देऊन तेथील सुसज्जतेचा आढावा घेतला. पाच ऑक्टोबर रोजी त्यांनी जयपूर येथे दक्षिण पश्चिम मुख्यालयालाही भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर रविवारी त्यांनी पुण्यात भेट दिली.
..
सदर्न कमांडचे महत्त्व
लष्कराचा दक्षिण विभाग हा देशातील सर्वांत मोठा लष्करी विभाग आहे. या क्षेत्राचे मुख्यालय पुण्यात आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, गुजरात व दक्षिणेकडील राज्यांसह देशाचा ४० टक्के भूभाग या क्षेत्राअंतर्गत येतो. त्याचबरोबर पुण्यात अनेक महत्त्वाच्या लष्करी संस्था, आस्थापना आहेत. सरकारतर्फे शस्त्रपुरवठादारांनाही सुसज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार कोटी घेऊन ज्येष्ठांची फसवणूक

$
0
0

शांती फाउंडेशनच्या विश्वस्तांविरोधात गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उतारवयात चांगली व्यवस्था व्हावी, यासाठी चार कोटी रुपये खर्च करूनही वृद्धाश्रमात गैरसोयीला सामोरे जावे लागलेल्या २० ते २५ ज्येष्ठ नागरिकांनी राजगड पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावला. ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार ‘शांती चॅरिटेबल फाउंडेशन’च्या विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रस्टतर्फे हवेली येथील गाउडदरा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी शांतीनिकेत वृद्धाश्रम चालवण्यात येते. या वृद्धाश्रमात राहण्यासाठी गेलेले वसंत पुरुषोत्तम सातपुते (वय ९०, रा. तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सातपुते यांच्यासह विद्याधर लक्ष्मण भारद्वाज (वय ९५), श्यामला रत्नाकर वैद्य, शिवाजी शंकर कुदळे, सुलोचना शिवाजी कुदळे, जनार्दन लक्ष्मण सुर्वे अशा २० ते २५ ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी या आश्रमाचे चेअरमन अजय गोविंद भुते (रा. सहकारनगर), हिंमाशू जळूकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भुते यांचे सदाशिव पेठेत ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी २०११ ते २०१६ या काळात प्रत्येकी २१ ते २५ लाख इतकी रक्कम चेकद्वारे दिली होती. गाउडदरा येथील वृद्धाश्रमात २०११पासून ज्येष्ठ नागरिक कायमस्वरूपी वास्तव्यासाठी गेले होते. ट्रस्ट आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात झालेल्या करारानुसार राहण्यासाठी ५०० चौरस फुटाचे फर्निचरसह घर, दोन वेळचा चहा, नाश्ता, जेवण, वर्तमानपत्र, लायब्ररी, मनोरंजन, इव्हेंट क्लब, सुरक्षारक्षक, जलतरण पूल, तज्ज्ञ डॉक्टर, बससेवा, पिण्यासाठी शुद्ध पाणी, दरमहा देवदर्शन, सहल, मासिक ५०० रुपये पेन्शन, २४ तास मदतीसाठी आया, नर्स तसेच गडी देण्याचे ठरले होते.
ट्रस्टकडून यातील अनेक सुविधा पुरवण्यात येत नाहीत. गेल्या वर्षांपासून त्यांनी वृद्धाश्रमाचे वीजबिलही भरलेले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना १५ दिवस अंधारात रहावे लागले. ज्येष्ठ नागरिकांकडून पुन्हा एक लाख रुपये घेतल्यानंतर वीज कनेक्श​न पूर्ववत झाले आहे. यंदा पुन्हा वीज कनेक्शनपोटी ४६ हजार रुपये घेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या आश्रमात राहण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून तब्बल चार कोटी रुपये घेण्यात आले आहेत.
...
‘तक्रार कराल तर याद राखा’
ज्येष्ठ नागरिकांनी फसवणुकीबाबत ट्रस्टकडे तक्रार केली असता, त्यांना जळूकर यांनी धमकावले. पोलिसांत तक्रार केल्यास तुम्हास जेवण देणार नाही तसेच, वृद्धाश्रमाला कुलूप लावू, अशा धमक्या देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
.................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येत्या गुरुवारी पाणी बंद

$
0
0

शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा शक्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पर्वतीसह वडगाव, लष्कर, एसएनडीटी, नवीन होळकर जलकेंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या विविध पंपिंग स्टेशनमध्ये स्थापत्य/विद्युतविषयक अत्यावश्यक कामे करायची असल्याने येत्या गुरुवारी (१३ ऑक्टोबर) संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार आहे. शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे :
पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती गाव, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, सहकार नगर, सातारा रोड परिसर, बिबवेवाडी परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मिठा नगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे क्र (४२, ४६) कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, पर्वती व पद्मावती टँकर भरणा केंद्र.
वडगाव जलकेंद्रः हिंगणे, आनंदनगर, वडगाव धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ.
चतुःशृंगी/एसएनडीटी/वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःशृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरुगणेश नगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलर नगर, अतुल नगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड परिसर.
लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी.
नवीन होळकर : विद्या नगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी परिसर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनखरेदीला उधाण

$
0
0

दुचाकींसह कारच्या बुकिंगमध्ये मोठी वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. त्याचबरोबर ग्राहकांनीही खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करायला सुरूवात केली आहे. दसऱ्यानिमित्त वाहनखरेदीला पसंती मिळाल्याने टू व्हिलरसह कारचे बुकिंग मोठ्या प्रमाणावर झाले आहे. दर उतरल्याने सोनेखरेदीसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीलाही प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे.
दसऱ्यानिमित्त बाजारपेठांना पुन्हा झळाळी प्राप्त झाली आहे. शहरातील बाजारपेठा ग्राहकांनी गजबजून गेल्या आहेत. ऑनलाइन शॉपिंगच्या वेबसाइट्सवर मेगा सेल सुरू असले, तरी यंदा ग्राहकांनी प्रत्यक्ष बाजारपेठेत येऊन खरेदी करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.गेले काही महिने वाहनउद्योग क्षेत्रात मंदीचे चित्र होते. आता मात्र, हळूहळू ग्राहक वाहनखरेदीला पसंती देताना दिसत आहेत. दसऱ्यानिमित्त वाहन उत्पादक कंपन्यांनी खास सवलती देऊ केल्या असल्याने दुचाकींसह चारचाकी वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाल्याचे समजते. सुलभ कर्ज योजना, सवलती, कमीत कमी डाऊन पेमेंट, नोंदणी आणि विम्यावरील सवलत आणि दसऱ्याला गाडी ताब्यात मिळण्याची खात्री यामुळे ग्राहकांचा वाहनखरेदीकडे कल वाढला आहे, असे वितरकांकडून सांगण्यात आले.
मागील दोन वर्षात ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सनी मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्या होत्या. यंदा मात्र, या सवलतींचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे ग्राहक वर्ग पुन्हा बाजारपेठांकडे वळल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदाच्या दसऱ्याला इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मोठी मागणी आहे. मोबाइलच्या खरेदीसाठी ऑनलाइन शॉपिंगलाच प्राधान्य दिले जात आहे. मात्र, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनसारख्या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक विविध दालनांमध्ये गर्दी करत आहेत.
ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेत काही कंपन्या आणि दालनांतर्फे इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर खास सवलत, कमीत कमी डाऊन पेमेंटसह ईएमआय सुविधा, मेन्टेनन्ससाठी खास ऑफर अशा सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळेही ग्राहक या वस्तूंकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. आगामी लग्नसराई आणि त्यातच सोने-चांदीच्या दरात झालेली घसरण यामुळे सराफा बाजारालाही झळाळी प्राप्त झाली आहे. काही दिवसांपूर्वी ३१-३२ हजार रुपये प्रती दहा ग्रॅमच्या आसपास असलेले सोने आता प्रती दहा ग्रॅमसाठी ३० हजार रुपयांपेक्षाही कमी झाले आहे. त्यामुळे ग्राहकांनी दसऱ्यानिमित्त सोनेखरेदीला पसंती दिली आहे. वेढणी आणि कॉईन्सबरोबरच पारंपरिक दागिन्यांनाही मागणी आहे. आगामी लग्नसराईसाठी ग्राहकांनी सोन्याच्या दागिन्यांची नोंदणी करण्यालाही प्राधान्य दिले आहे. देवपूजेसाठी चांदीच्या उपकरणांनाही मागणी असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
सणासुदीच्या दिवसांमुळे कापड बाजारपेठेतही चांगली गर्दी होताना दिसत आहे. रेडिमेड कपड्यांना सर्वाधिक मागणी असली, तरी कापड खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. खादीच्या दालनांमध्ये सध्या २० टक्क्यांपर्यंत सवलत असल्याने तिथेही ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेत दुकानदारांनी खरेदीवर खास सवलत, एकावर एक किंवा एकावर दोन कपडे मोफत, कापड खरेदी केल्यास शिलाईवर सवलत किंवा मोफत अशा सवलती देऊ केल्या आहेत. दसऱ्यानंतर दिवाळीमुळेही कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत आणखी गर्दी होईल, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
----------
गृहखरेदीलाही वाढती मागणी
दसरा दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर गृहखरेदीलाही चालना मिळाल्याचे चित्र आहे. सणासुदीनिमित्त बांधकाम व्यावसायिकांनी खास सवलती आणि कर्जयोजना उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे १ व २ बीएचके फ्लॅट सोबतच ३ आणि ४ बीएचके फ्लॅटला ही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. घरांच्या किमती स्थिर राहतील, कमी होणार नाहीत, हे ग्राहकांना समजले आहे. त्यामुळे ग्राहक खरेदीला पसंती देत आहेत. गेल्या तीन वर्षातील सर्वांत उत्तम फेस्टिव्ह सीझन ठरेल, असे क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाकी वर्दीलाच आता हेल्मेटसक्ती

$
0
0

हेल्मेट नसलेल्यांना पोलिस आयुक्तालयात नो-एंट्री ; दंडात्मक कारवाईचा बडगा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हेल्मेट न वापरणाऱ्यांवर येत्या काळात दंडात्मक कारवाईची आणि त्यांचे प्रबोधन करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांपासून हेल्मेट सक्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली आली आहे. पोलिस आयुक्त कार्यालयात सोमवारी हेल्मेट न घातलेल्या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. तसेच, त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची आकारणीही करण्यात आली.
वाहतूक पोलिस विभागातर्फे नुकताच ‘वाहतूक जनजागृती दिना’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पुणेकरांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची शपथ देण्यात आली. आता वाहतूक पोलिसांकडून येत्या काळात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई व त्यांचे प्रबोधन करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याअंतर्गत नागरिकांना हेल्मेट वापरण्यासंबंधीही सूचना केल्या जाणार आहे, असे पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले. ही मोहीम सुरू करण्यापूर्वी पोलिस कर्मचाऱ्यांपासूनच कारवाईची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पोलिस आयुक्त कार्यालयात पोलिस कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना हेल्मेटशिवाय प्रवेश न देण्यास आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. दिवसभरात ३६ पोलिस कर्मचाऱ्यांवर हेल्मेट न घातल्यामुळे कारवाई करण्यात आली, तर नऊ जणांवर सीट बेल्ट न लावल्यामुळे कारवाई करण्यात आली.
काही महिन्यांपूर्वी हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर वादंग निर्माण झाले होते. विविध संघटनांनी, लोकप्रतिनिधींनी त्याविरोधात आंदोलने केली. त्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठकही झाली. या बैठकीत अनेकांनी पोलिस कर्मचारी देखील हेल्मेट वापरत नाहीत, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभमुहूर्तासाठी ग्राहक सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा खरेदीसाठी शुभ मानला जात असल्याने मंगळवारी सकाळपासून नागरिकांनी खरेदीचे नियोजन केले आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन, सोने खरेदीसह अगदी घर बुकिंगसाठी अनेकांनी मुहूर्त निश्चित केला आहे. घरातील देवीची पूजा झाल्यावर देवदर्शन, खरेदी आणि संध्याकाळी सोनेवाटप केले जाईल.
दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक नागरिक नवीन उपक्रमांचा श्रीगणेशा करतात. यंदाही चांगल्या कामांचा प्रारंभ करायचा असेल, तर मंगळवारी दुपारी २.२३ ते ३.१० या दरम्यान विजय मुहूर्त आहे, अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली. दसऱ्याच्या तयारीसाठी मध्यवर्ती पुण्यातील महात्मा फुले मंडई, मार्केट यार्ड, गुलटेकडी या भागातील बाजारपेठा सोमवारी सकाळपासूनच फुलांनी बहरल्या होत्या. उपनगरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा ठिकठिकाणी पथारीवाले झेंडूच्या फुलांच्या माळा घेऊन बसले होते. संध्याकाळनंतर बाजारपेठांमधील गर्दी वाढली. देवपूजा आणि वाहनांच्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात फुलांची खरेदी झाली. दसऱ्याला आपट्यांच्या पानाला महत्त्व असल्याने नागरिकांनी आपट्याच्या पानांच्या गड्ड्या घेतल्या. रात्री उशिरापर्यंत शहरातील मोठे मॉल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपड्यांची दुकाने, सराफी दुकाने फुले आणि रोषणाईने सजविण्यासाठी कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती. शारदीय नवरात्रौत्सवाचा समारोप दसऱ्याला होत असल्याने देवीची मंदिरे रोषणाईने सजविण्यात आली होती. मंदिरांमध्ये मंगळवारी दिवसभर धार्मिक कार्यक्रम, भजन, किर्तन अशा विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या व्यवस्थापनासाठी सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षकांचा बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.
....
आपटा नव्हे कांचन...
दसऱ्याला आपट्याची पाने लुटण्याची प्रथा आहे. या दिवशी आप्तेष्टांना आपट्याची पाने आवर्जून वाटली जातात. पण गेल्या काही वर्षांपासून आपट्याच्या पानांशी साधर्म्य असलेल्या कांचन झाडांची पाने ओरबाडली जात आहेत. बाजारपेठांमध्ये पाने विक्रीस आणणारे लोक शहर परिसरातील कांचनच्या झाडांची पाने तोडत आहेत. निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीकोनातून नागरिकांनी आपटा आणि कांचनच्या पानांचा काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन वनस्पती अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर यांनी केले आहे.
...
खंडेनवमी साजरी
विविध शस्त्रे, मशीन आणि यंत्रांची पूजा करून नागरिकांनी सोमवारी खंडेनवमी पारंपरिक पद्धतीने साजरी केली. नवरात्रामध्ये खंडेनवमीला विशेष महत्त्व असते. या दिवशी शेतकरी त्याच्या शेतात दररोज वापरण्यात येणारी हत्यारे, शस्त्रे तर उद्योग क्षेत्रात काम करणारी मंडळी त्यांच्या यंत्रांची पूजा करतात. या वर्षी खंडेनवमी आणि दसरा स्वतंत्र असल्याने नागरिकांनी सोमवारी सकाळीच कार्यालयात गेल्यावर शस्त्रांची पूजा केली. शहरातील प्रमुख देवीच्या मंदिरात तसेच संग्रहालयांमध्ये शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात आले. यानंतर उपस्थितांना मिठाई वाटप करण्यात आले.
.........
परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरू
दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी मंगळवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार आहे. नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक देऊन लगेच वाहनाचा ताबा मिळावा यासाठी अधिकारी आणि कर्मचारी दिवसभर काम करणार आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसा सोलर सेल; रात्री प्रकाश झोत

$
0
0

नॅनो मटेरिअल निर्मितीत अभिषेक स्वर्णकार यांचे योगदान

Yogesh.Borate@timesgroup.com
Tweet : @yogeshborateMT

पुणे : दिवसा सोलर सेल म्हणून आणि रात्री एखाद्या ‘एलईडी’सारखा प्रकाशाचा स्रोत म्हणून काम करू शकणाऱ्या नॅनो-मटेरिअलचा शोध लावण्यात भारत आणि अमेरिकेतील संशोधकांच्या एकत्रित गटाला यश आले आहे. याच संशोधनाच्या आधारे कमी किमतीत सोलर सेल तयार करणे शक्य होण्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.
पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये (आयसर) पीएचडी करणाऱ्या अभिषेक स्वर्णकार या संशोधकाने मोलाची कामगिरी बजावली आहे. ‘सायन्स’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेने या संशोधनाची दखल घेऊन त्याला नुकतीच प्रसिद्धी दिली आहे. या गटाने मटेरिअल तयार करण्यासाठीच्या कृतीचे आणि तंत्रज्ञानाचे अमेरिकन पेटंटही घेतले आहे. स्वर्णकार यांनी सोमवारी ‘मटा’ला या संशोधनाविषयीची सविस्तर माहिती दिली. स्वर्णकार म्हणाले, ‘सोलर सेलची निर्मिती आणि वापर ही खूप खर्चिक बाब आहे. खर्च कमी करण्यासाठी आम्ही एका नव्या मटेरिअलच्या आधारे सोलर सेल तयार करण्याचा प्रयत्न केला. सोलर सेलसाठी सिलिकॉनऐवजी इतर पर्यायांचा शोध घेतला. त्यासाठी त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात मिथाइल अमोनियम लेड आयोडाइड या संयुगाची निर्मिती केली. या संयुगाच्या आधारे तयार होणाऱ्या सोलर सेलची उपयुक्तता अधिक असली, तरी त्यामधील मिथाइल अमोनियम हा कार्बनिक घटक (ऑरगॅनिक पार्ट) अस्थिर होता. त्यामुळे या घटकासाठी पर्याय म्हणून आम्ही सिझिअमचा वापर केला. त्या आधारे तयार झालेले नॅनो मटेरिअल सूर्यप्रकाशात सोलर सेल म्हणून, तर त्याला विद्युत प्रवाह जोडल्यानंतर एखाद्या एलईडीसारखा प्रकाशाचा स्रोत म्हणून काम करते.’
सिझिअमचा वापर करून तयार झालेला सोलर सेल सध्याच्या नेहमीच्या वापरातील सोलर सेलच्या कितीतरी पट अधिक प्रभावीपणे वीजेची निर्मिती करत आहे. तसेच, त्यासाठी येणारा खर्चही तुलनेने कमी आहे. त्यामुळेच या संशोधनाची उपयुक्तता विचारात घेऊन ‘सायन्स’ने या संशोधनाला प्रसिद्धी दिली. ‘सायन्स’ने घेतलेली ही दखल या संशोधनाचे महत्त्व आणि वेगळेपण अधोरेखित करत असल्याचेही स्वर्णकार यांनी नमूद केले.

करार तरुणांसाठी प्रोत्साहक
या संशोधनासाठी स्वर्णकार यांना केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे स्थापन झालेल्या इंडो-यूएस सायन्स अँड टेक्नोलॉजी फोरमची मोठी मदत मिळाली. त्या विषयी स्वर्णकार म्हणाले, ‘ऊर्जाविषयक संशोधनांसाठी भारत आणि अमेरिकेमध्ये करार झाला आहे. त्या आधारे केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे इंडो-यूएस सायन्स अँड टेक्नोलॉजी फोरम स्थापन करण्यात आले आहे. या फोरमचा एकत्रित संशोधन प्रकल्प म्हणून आम्ही हे संशोधन केले. त्यासाठी अमेरिकेतील कोलोरॅडो येथे असलेल्या 'नॅशनल रिन्युएबल एनर्जी लॅब'मध्ये ऑक्टोबर २०१५ ते एप्रिल २०१६ दरम्यान काम करण्याची संधी मला मिळाली.’ देशातील होतकरू संशोधकांसाठी या बाबी प्रोत्साहक ठरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात साकारणार सयाजीराव प्रकल्प

$
0
0

मंत्रिमंडळाने दिली मंजुरी; बाबा भांड प्रकल्प प्रमुखपदी

म.टा. प्रतिनिधी, पुणे

स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील क्रांतिकारक, समाजसुधारक, विचारवंत, कलाकार यांच्यामागे खंबीरपणे उभे राहून शिक्षण, उद्योग, कला, साहित्य संस्कृतीच्या वाढीसाठी बडोद्याचे संस्थानिक सयाजीराजे गायकवाड यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांचे महाराष्ट्राला आणि देशाला उपयुक्त ठरलेले कार्य समाजापुढे यावे, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारकडून ‘समग्र महाराजा सयाजीराव प्रकाशन प्रकल्प’ साकारला जाणार असून, साहित्य संस्कृती मंडळातर्फे त्याची निर्मिती केली जाणार आहे. नुकत्याच औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
सयाजीराजे केवळ संस्थानिक नसून, विचारवंत होते. बडोदा राज्याची धुरा सांभाळून संपूर्ण देशातील समस्यांचे निराकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी अनेक योजना आखल्या. शिवाय अनेक विचारवंतांना वेळोवेळी मदत केली. साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी त्यांनी विपुल लेखन केले. बडोदा संस्थान चालवण्यासाठी सयाजीराजेंनी ७५ हजारांहून अधिक कायदे लिहिले. त्यांचे हे कार्य विस्तृत रुपाने समोर यावे, यासाठी राज्य सरकार साहित्य संस्कृती मंडळामार्फत समग्र सयाजीराव प्रकाशन प्रकल्प तयार करत असून त्या अंतर्गत सयाजीराजेंचे साहित्य प्रकाशित होणार आहे.
साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्यासह अन्य काही जणांचा संपादक मंडळात समावेश केला जाणार आहे. बाबासाहेब आंबेडकर साहित्य समिती, शाहू महाराज साहित्य समिती, अशा राज्य सरकारच्या अनेक समित्यांच्या पार्श्वभूमीवर सयाजीराजे यांच्या साहित्यावर अभ्यास करणारी समिती नेमण्यात येणार आहे.
१९ व्या शतकाचा शेवट आणि विसाव्या शतकाची सुरुवात ही सयाजीराजेंच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची साक्ष आहे. तत्कालीन परिस्थीतीचा अभ्यास करून सयाजीराजेंनी राबवलेले विविध उपक्रम देशभरात आणि आशिया खंडात देखील पहिल्यांदाच राबवण्यात आलेले आहेत. अशा प्रकल्पांची देखील विस्तृत माहिती आणि साहित्य अभ्यासपू्र्ण पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या प्रकल्पामध्ये केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सयाजीराजांवरील पहिले पन्नास खंड प्रकाशित करण्याचा साहित्य संस्कृती मंडळाचा प्रयत्न राहणार आहे.
--------------------------
औरंगाबाद येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सयाजीराजांवरील आधारीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून, त्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना सयाजीराजांची खरी ओळख होणार आहे. त्यांचे साहित्य, त्यांनी तयार केलेल्या कायद्यांचे राज्यघटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कौतुक केले होते. सयाजीराजेंनी साहित्य, संस्कृती आणि कलेच्या वृद्धीसाठी कायम प्रय़त्न केले, त्यासाठी त्यांनी अनेक कलाकारांना सर्वतोपरी मदत देऊ केली. हा संपूर्ण इतिहास या प्रकल्पामार्फत मांडण्यात येणार आहे.
बाबा भांड, अध्य़क्ष, साहित्य संस्कृती मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांवर नागपूरवारीची वेळ

$
0
0

अध्यक्षपदाचा अर्ज नागपूर कार्यालयाकडे पोहोचण्याची अट कारणीभूत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचे नियोजन गडबडल्याने अनेक इच्छुकांची संधी हुकण्याची भीती निर्माण झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत असताना त्याच वेळेत अर्ज साहित्य महामंडळाच्या नागपूर कार्यालयाकडे पोहोचले पाहिजेत, असा पवित्रा घेण्यात आल्याने नागपूर वगळता अन्यत्र अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारीच संपली. त्यामुळे आता अर्ज दाखल करायचा झाला, तर इच्छुकांना नागपूरवारी करावी लागणार आहे.
दरम्यान, महामंडळाने केलेली सक्ती हा कायदेशीर हक्क नाकारण्याचा प्रकार असल्याची टीका महामंडळाची घटक संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने केली आहे. ‘अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्रे संबंधित संस्थांमार्फत महामंडळाच्या विदर्भ साहित्य संघ या नागपूर येथील कार्यालयाकडे १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोहचतील,’ अशा पद्धतीने पाठवावीत. तसेच उमेदवारी अर्ज पोस्टाद्वारे किंवा प्रतिनिधीमार्फत दाखल करावेत. ई-मेल अथवा व्हॉटसअॅप अशा माध्यमातून पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत,’ अशी सूचना महामंडळाचे कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके यांनी पत्राद्वारे केली आहे. विशेष म्हणजे महामंडळाच्या कार्यालयात किंवा घटक संस्थेच्या कार्यालयात अर्ज दाखल करण्याची वेळ १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच आहे, पण त्याच वेळेत तो अर्ज साहित्य महामंडळाच्या नागपूर येथील कार्यालयात पोहोचणे आवश्यक असल्याने साहित्य परिषदेला अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया थांबवावी लागली आहे. त्यामुळे मंगळवार व बुधवार अशी दोन दिवस मुदत असूनही अनेक इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार नाही.
‘१२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर अर्ज स्वीकारणार नाही, अशी सूचना करण्यात आल्याने आम्हाला प्राप्त झालेले अर्ज त्याच वेळेत महामंडळाकडे दाखल करावे लागणार आहेत. प्राप्त झालेले अर्ज सुटीमुळे पोस्टाद्वारे पाठवता येणार नाही. परिषदेकडे दाखल झालेले अर्ज महामंडळाकडे सुपूर्द करण्यासाठी एक प्रतिनिधी पाठवावा लागेल. पुणे ते नागपूर अंतर विचारात घेता मंगळवारी पुण्यातून प्रतिनिधी प्राप्त अर्ज घेऊन जाईल. त्यामुळे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया थांबवली आहे,’ असे परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.
-----------------
’ठोकळेबाज मानसिकतेतून बाहेर यावे’
‘साहित्य महामंडळाच्या नियमात घोळ आहे. तंत्रज्ञानाच्या काळात निवडणुका ऑनलाइन होत असताना ई-मेलने अर्ज स्वीकारणार नाही, ही महामंडळाची भूमिका आश्चर्यजनक आहे. आपल्या कारभारात बदल होत नसल्याने आपण कायम टीकेचे लक्ष होत आहोत. हे बदलण्यासाठी महामंडळाने ठोकळेबाज मानसिकतेतून बाहेर यावे,’ अशा शब्दांत परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी महामंडळाच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. ‘ई-मेलने पाठवलेला अर्ज न स्वीकारायला साहित्य परिषद महामंडळाची घटक संस्था नाही का,’ असा सवाल त्यांनी केला.
------------------------------
चार अर्ज दाखल
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी तीन अर्ज दाखल झाले. डॉ. जयप्रकाश घुमटकर, डॉ. अक्षयकुमार काळे आणि श्रीनिवास वारूंजीकर यांच्या अर्जाचा त्यामध्ये समावेश आहे. याआधी प्रवीण दवणे यांच्या नावाचा अर्ज परिषदेत दाखल झाल्याने अर्जांची संख्या चार झाली आहे. घटक संस्थेला कोणतेही तीन अर्ज महामंडळाकडे पाठवता येतात. त्यामुळे चार पैकी कोणाचा पत्ता कट होणार, हे मंगळवारी उघड होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजीव तांबे यांना सद्भाव पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ मराठी बालसाहित्यकार राजीव तांबे यांना संध्या साहित्य वेदिके संस्थेतर्फे देण्यात येणारा सद्भाव पुरस्कार जाहीर झाला आहे. सात हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नोव्हेंबर महिन्यात अक्कलकोट येथे आयोजित तीन दिवसांच्या ‘बाल काव्योत्सव’ कार्यक्रमामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
‘संध्या साहित्य वेदिके’ ही संस्था कर्नाटकमध्ये गेल्या २२ वर्षांपासून बालसाहित्य प्रसाराच्या क्षेत्रात काम करत आहे. संस्थेतर्फे दरवर्षी कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बाल काव्योत्सव साजरा केला जातो. यंदा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे ‘आदर्श कन्नड बळग’ या संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या निमित्ताने कन्नड आणि मराठी बालसाहित्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा एकत्रित संवाद आयोजित करण्यात आला आहे. याच निमित्ताने मराठी बालसाहित्याच्या क्षेत्रात सक्रिय आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकाला सद्भाव पुरस्कार देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. त्यानुसार तांबे यांना हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रवी हिरेमठ यांनी तांबे यांनी प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारात झेंडूला भाव

$
0
0

फुलांच्या खरेदीसाठी शहरात विविध ठिकाणी गर्दी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दसरा सणानिमित्तम देवीच्या पूजेसाठी तसेच हारांसाठी फुलांची आवश्यकता असल्याने मार्केट यार्डासह शहरातील विविध भाग फुलांनी बहरला आहे.
शहराच्या विविध भागात फुलांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असून, एक किलो झेंडूला ३० ते ५० रुपये असा दर मिळाला आहे.
साडेतीन मुहूर्तीपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. दसऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांची खरेदी केली जाते. मार्केट यार्डात गेल्या वर्षीच्या तुलनेत सोमवारी झेंडूसह शेवंतीच्या फुलांची दुप्पट आवक झाली. गेल्या वर्षी ३ लाख ८२ हजार किलो फुलांची आवक झाली होती. सोमवारी दुपारपर्यंत ६ लाख २५ हजार किलो फुलांची आवक झाली होती.
राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याने फुलांचे उत्पादन वाढले आहे. गणेशोत्सवात फुलांचे उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक झाल्याने ती टाकून देण्याची वेळ आली होती. नवरात्रात पाचव्या माळेपर्यंत झेंडूला प्रतिकिलो २ ते १० रुपये दर मिळाला होता. सहाव्या माळेपासून झेंडूच्या फुलांचे दर वाढू लागले. सोमवारी दसऱ्याच्या तयारीसाठी ग्राहकांनी फुलांच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. शहराच्या विविध भागात शेतकरी स्वतः फुलांची विक्री करीत होते.
गेल्या वर्षी झेंडूला प्रतिकिलो सुमारे १५० ते २०० रुपयापर्यंत भाव मिळाला होता. मार्केट यार्डात फुलांच्या घाऊक बाजारात सोमवारी एका किलोसाठी ३० ते ५० रुपये दर मिळाला. गेल्या वर्षी उत्पादन कमी असल्याने दर वाढले होते. यंदा आवक वाढल्याने दर खाली आले. रस्त्यावर आणि किरकोळ बाजारात ५० ते ७० रुपये दराने विक्री केली जात होती. काही ठिकाणी १०० रुपयांत अडीच किलो अशी विक्री केली जात होती.
‘दसऱ्यासाठी रविवारी ग्राहकांपेक्षा व्यापाऱ्यांनी मोठी खरेदी केली. सोमवारी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे मागणीही वाढली होती. झेंडूला १० ते ५० रुपयांपर्यंत दर मिळाला. अॅस्टरच्या फुलांना शेकडा १६ ते २० रुपये, शेवंतीला १००ते १८० रुपये दर मिळाला. बिजलीला ८० ते १२० रुपयापर्यंत दर मिळाला. पावसामुळे फुले भिजल्याने प्रत खराब झाली. चांगल्या फुलांना जादा दर मिळाला,’ अशी माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉटर मीटरच्या जाहिराती बंद

$
0
0

अल्प प्रतिसाद मिळाल्याने पालिकेचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे
लाखो रुपयांच्या जाहिराती करुनही मोफत वॉटर मीटर बसविण्यासाठी अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत असल्याने वॉटर मीटरच्या जाहिराती बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. नागरिकांनी मोफत पाण्याचे मीटर बसवून घ्यावे, यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागात फ्लेक्स उभारून जाहिराती केल्या होत्या. तसेच पालिकेने राबविलेल्या टेंडर प्रक्रियेला देखील तीन वेळा मुदतवाढ देऊन अवघ्या दोन कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतल्याचे समोर आले आहे.
शहरात समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी महापालिकेने २४ बाय ७ योजना तयार केली आहे. या योजनेच्या अंतर्गत शहरात सुमारे सव्वातीन लाख मीटर बसविले जाणार असून यासाठी ६०० कोटी रुपये खर्च येणार आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला समान पाणी मिळावे, यासाठी महापालिकेच्या वतीने ही योजना राबविली जाणार आहे. पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. शहरात पाण्याचे मीटर बसविण्यासाठी काही महिन्यांपासून पालिकेने टेंडर प्रक्रिया राबविली आहे. मात्र, याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने तीन वेळा प्रशासनाने या टेंडरला मुदतवाढ दिली. त्यानंतरही केवळ दोनच कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतल्याने पुन्हा स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव ठेवून त्यावर निर्णय घ्यावा लागणार आहे.
शहरातील अधिकाधिक नागरिकांनी मीटर बसवावेत, यासाठी प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून जागोजागी जाहिराती केल्या होत्या. पालिकेकडे नोंदणी करा आणि मोफत मीटर बसवून घ्या, अशा आशयाच्या या जाहिराती होत्या. पालिकेकडे नागरिकांनी मीटरसाठी नोंदणी केल्यानंतर २ ऑक्टोबरपासून घरोघरी जाऊन मीटर बसविण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. टेंडर प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तसेच सप्टेंबर अखेरपर्यंत अवघे २८ नागरिकांनी यासाठी प्रतिसाद दिल्याने प्रशासनाच्या उत्साहावर पाणी पडले आहे. त्यातच पालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या तोंडावर मीटर बसविण्यास विरोध केला आहे. शहरात चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने पहिल्यांदा पाण्याच्या टाक्या बांधून पाइपलाइन पूर्ण करावी, त्यानंतरच मीटर बसवावे, अशी मागणी महापौर प्रशांत जगताप यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
....
स्थायी समिती घेणार पुढील निर्णय
वॉटर मीटरच्या टेंडरला तीन वेळा मुदतवाढ देऊनही कंपन्यांचे याकडे होणारे दुर्लक्ष तसेच मीटर बसविण्यासाठी नागरिकांकडून मिळणारा अत्यंत कमी प्रतिसाद यामुळे मीटरच्या जाहिराती बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाने वारंवार प्रयत्न करूनही नागरिक मीटर बसविण्यावाठी इच्छुक नसल्याने या जाहिराती बंद करण्यात आल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मीटरच्या टेंडरला मिळत असलेल्या प्रतिसादाची माहिती स्थायी समि‌ती समोर ठेवून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीची मेहनत दामदुप्पट

$
0
0

चार सदस्यीय प्रभागरचनेमुळे इच्छुक उमेदवारांना द्यावा लागणार अधिक वेळ

Suneet.bhave
@timesgroup.com
Tweet : @suneetMT

पुणे : गेल्या आठवड्यात महापालिकेच्या आगामी निवडणुकीची प्रा-रूप प्रभागरचना प्रसिद्ध झाली आणि अनेक विद्यमानांसह माजी आणि संभाव्य उमेदवारांची तयारी सुरू झाली. आगामी निवडणुकीसाठी बहुसदस्यीय रचना (चार सदस्यांचा प्रभाग) असणार हे यापूर्वीच स्पष्ट झाले असल्याने आपल्याला गत निवडणुकीपेक्षा अधिक मेहनत करावी लागणार, हे सर्वांनीच जाणले होते. दोन सदस्यीय प्रभागात नगरसेवक म्हणून काम करण्याचा, तर २०१२मध्ये झालेली निवडणूक लढविण्याचा अनुभव अनेकांच्या गाठिशी होताच. त्यामुळे, आता प्रभागाच्या हद्दी त्याच्या दुप्पट झाल्याने आणि लोकसंख्येतही भरघोस वाढ झाल्याने त्यादृष्टीने आखणी काम करण्यास सुरुवात झाली आहे. बहुसदस्यीय रचनेत आपल्याला अनुकूल असलेल्या भागांत आघाडी घेण्यासह प्रतिकूल असणाऱ्या भागांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराची मते फोडण्यासाठी काय करायचे, यावरही आता खल सुरू झाला आहे.

महापालिकेची दहा वर्षांपूर्वीची २००७मधील निवडणूक एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीने झाली होती. १५-२० हजारांचा मतदारसंघ आणि उमेदवारांची संख्या जास्त असल्यास अगदी तीन हजार मतेही विजयाचे दान पदरात टाकण्यासाठी उपयोगी पडत. ही मते कुठून मिळवायची, याचे आडाखेही निश्चित होते. २०१२मध्ये हे चित्र बदलले. शहराच्या नगरसेवकांमध्येही वाढ झाली. त्यामुळे, दोन सदस्यीय प्रभागांद्वारे ही निवडणूक लढवली गेली. प्रभागात एखादा उमेदवार ‘स्ट्राँग’ असला, तर तो दुसऱ्या उमेदवारालाही बरोबर घेऊन जायचा. त्यामुळे, गेल्या निवडणुकीत एकाच पक्षाच्या बाजूने मतदान झाल्याने संपूर्ण पॅनेल विजयी झाल्याचे चित्र दिसून आले. तर, काही ठिकाणी मतदारांनी चोखंदळपणा दाखवत, नेहमीच्या उमेदवाराला विजयी करतानाच, एखाद्या नवख्या; पण धडाडीच्या उमेदवाराला संधी दिली. यामध्ये, काही ठिकाणी अनेक प्रस्थापितांनाही धक्का बसला. शहराच्या दोन माजी महापौरांनाही पराभव पत्करावा लागला.

नव्या रचनेत आता दोन सदस्य आणखी वाढले आहेत. नुसते सदस्यच वाढले नाहीत, तर प्रभागाचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचाही विस्तार झाला आहे. त्यामुळे, आता निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांना (मनात नसले तरी) पक्षातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकत्र पॅनेल करूनच लढावे लागणार आहे. त्यातही, एकाच भागांतील दोन उमेदवार असले, तर प्रभागाच्या उर्वरित भागांत फटका बसण्याची शक्यता असल्याने नव्या रचनेत सर्व भागांचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे, चार वेगवेगळ्या भागांतील आजी-माजी नगरसेवक, इच्छुक कार्यकर्ते येऊन पक्षाचे पॅनेल तयार करू शकतात. एखाद्या प्रभागात पक्षाचे संपूर्ण पॅनेल विजयी झाले, तर नगरसेवकांची संख्या एकदम वाढू शकणार आहे. त्यामुळे, शहरातील एकूण प्रभागांपेकी अनुकूल असणाऱ्या प्रभागांमध्ये चारही जागा प्राप्त करण्यावर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी, संबंधित पॅनेलमधील अनुभवी उमेदवाराला इतर उमेदवारांची ओळख हक्काच्या मतदाराला करून द्यावी लागणार आहे. एका प्रभागात काम करताना, एकाच पक्षाच्या दोन नगरसेवकांमध्ये अनेक वाद-भांडणे उद्भवल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत समोर आले आहे. आता, आगामी निवडणुकीसाठी मात्र आपल्याच पक्षाच्या उमेदवारांशी जुळवून घेऊन त्यांना मदत करून आणि प्रसंगी त्यांच्याकडून मदत घेण्याची वेळही नव्या प्रभागरचनेमुळे अनेक माननीयांवर आली आहे.

स्थानिक प्रश्नांची गुंतागुंत

स्थानिक नगरसेवकाने त्याच्या भागातील नागरिकांच्या मूलभूत समस्या, प्रश्न सोडविणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने, नव्या प्रभागरचनेत उमेदवारांना तब्बल ८० हजार किंवा त्याहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचायचे आहे. त्यापैकी, मतदारांची संख्या ५० ते ६० हजारांच्या दरम्यान असेल. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्त्व करणारा उमेदवार नगरसेवक समजण्याऐवजी कदाचित आगामी विधानसभेच्या दृष्टीने तयारी म्हणून आत्तापासूनच स्वतःला ‘मिनी आमदार’ म्हणून संबोधून घेऊ लागला, तर स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करणे अशक्य होणार आहे. तसेच, दोनच्या ऐवजी चार सदस्य एका प्रभागात असल्याने कोणाचे काम कोणी करायचे आणि नागरिकांनी कोणत्या नगरसेवकाकडे दाद मागायची, हे प्रश्नही उपस्थित होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा समाजाचा शिरूर येथे मोर्चा

$
0
0

तहसीलदारांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

म. टा. वृत्तसेवा, शिरूर
शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील मुख्याध्यापक संदीप आढाव, माजी सरपंच धनश्री चव्हाण आणि इतरांवर दाखल झालेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी शिरूर तालुक्यातील मराठा समाजाने मूक मोर्चा काढला होता.

बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थिनी होत्या. त्या पाठोपाठ महिला आणि त्यानंतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्वांत शेवटी राजकीय पदाधिकारी होते. पुणे-नगर रोडवरून हा मोर्चा निघाला. शिरूर तहसील कार्यलयासमोर मोर्चाची समाप्ती झाली. या वेळी ऐश्वर्या रणदिवे, आदिती आढाव, ऋतुजा खोले, प्रेरणा बारवकर, कुमारी खोडदे या पाच मुलीच्या हस्ते तहसीलदार राजेंद्र पोळ यांना निवदेन देण्यात आले.

निवेदनाचे वाचन ऋतुजा खोले हिने केले, तर ऐश्वर्या रणदिवे व कुमारी खोडदे यांनी मनोगत व्यक्त केले. शिरसगाव काटा येथील शाळेचे मुख्याध्यापक संदीप आढाव, माजी सरपंच धनश्री चव्हाण आणि इतरांवर दाखल झालेल्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा. मराठा समाजास आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कार्यवाही करावी, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी करावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काम सुरू करावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.

शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार यांच्यासह विविध संघटना, संस्थांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images