मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
‘स्मार्ट सिटी’साठी स्वतंत्र कंपनी स्थापन
डॉक्टर ढकलताहेत स्ट्रेचर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
‘शिप्र’ निवडणुकीत ‘सीएमओ’चे लक्ष
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
महोत्सवाचा खर्च अकरा लाखांवर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
पुण्याचे आयुक्त होणार पोलिस महासंचालक
म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्याचे पोलिस आयुक्त के. के. पाठक यांची पदोन्नती झाली असून, ते आता पोलिस महासंचालक झाले आहेत. पाठक महिनाअखेरीस निवृत्त होत असल्याने, राज्य सरकारने पुणे पोलिस आयुक्तांचे पद प्रथमच पोलिस महासंचालक दर्जाचे केले आहे. त्यामुळे पाठक पुणे आयुक्तपदी असतानाच पोलिस महासंचालक म्हणून निवृत्त होतील.
मुंबईपाठोपाठ पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यावर देण्यात आली आहे. राज्य सरकारने मंगळवारी पाठक यांची पदोन्नती केल्याचे आदेश काढले आहेत. पाठक १९८२ च्या 'आयपीएस' बॅचचे अधिकारी असून, ते मार्चअखेरीस निवृत्त होत आहेत. गेल्या महिनाअखेरीस पोलिस महासंचालक विजय कांबळे यांच्या निवृत्तीनंतर पाठक यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यांच्या निवृत्तीला एकच महिना असल्याने त्यांना मार्चमध्ये पदोन्नती देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
राज्य सरकारने २२ मार्च रोजी त्यांना पदोन्नती देत त्यांची नियुक्ती पुण्याच्या आयुक्तपदीच कायम ठेवली. त्यासाठी पुण्याच्या आयुक्तपदाची दर्जोन्नती करत हे पद अप्पर पोलिस महासंचालकाचे पोलिस महासंचालक करण्यात आले. पुण्याच्या आयुक्तपदी असताना आणि तेही पोलिस महासंचालक म्हणून निवृत्त होणारे पाठक त्यामुळे पुणे आयुक्तालयाच्या इतिहासात पहिले अधिकारी ठरले आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
आई-बापांनाच जेव्हा मूल नकोसे होते...
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
प्रकल्पांचे खासगीकरण हे तर ‘कंपनीराज’
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
प्रवाशांना अडवून लुटणाऱ्या दोघांना अटक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
‘ब्राह्मण युवकांनी उद्योगधंद्यांकडे वळावे’
'चौकटीतून बाहेर पडा'
ब्राह्मण समाजातील युवकांनी आता एका आखलेल्या चौकटीतून बाहेर निघण्याची वेळ आली आहे. त्यांनी आता नोकरीसोबतच व्यवसाय आणि उद्योगधंदे करण्याची आवश्यकता आहे. चांगल्या युवकांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे. त्यांनी एका चांगला समाज घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे गिरीश बापट यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
गुड फ्रायडेनिमित्त येशू ख्रिस्ताची उपासना
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
पेन्शन योजना निवृत्त?
(क्रमशः) ........
योजनेचे फायदे १८ ते ६० वयोगाटातील सर्वांसाठी खुली योजना पेन्शन फंड निवडण्याची व बदलण्याची मुभा दर वर्षी कमाल ५० हजारांपर्यंत करवजावट फक्त ५०० रुपयांपासून गुंतवणूक शक्य वार्षिक सहा हजार किमान गुंतवणूक आवश्यक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
‘पुण्याची शांतता बिघडवू नका’
फर्ग्युसन कॉलेजमधील वादाला राजकीय रंग मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुण्यातील बहुतांश विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत, राजकीय नेत्यांनी स्टंटबाजी करून पुण्याची शांतता बिघडवू नये, अशी मागणी एकमुखाने केली. पुणे विद्यार्थी चळवळ या व्यासपीठाच्या माध्यमातून या संघटनांनी येत्या सोमवारी (२८ मार्च) शनिवारवाड्यावर प्रतिज्ञा वाचन आणि सामुहिक राष्ट्रगीत गायन आयोजित केले आहे.
फर्ग्युसन कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमावरून नुकताच मोठा गोंधळ झाला. या कार्यक्रमाला आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थ्यांनी केलेला विरोध आणि त्यातून झालेल्या घोषणाबाजीतून कॉलेज प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल करण्याचाही प्रकार झाला. या तक्रारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कॉलेजमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आव्हाड यांना विरोध करण्याच्या प्रयत्नात कॉलेजमध्ये मारामारीही झाली. या सर्व प्रकारामुळे शहरातील शैक्षणिक वातावरण बिघडत चालल्याची भूमिका पुणे विद्यार्थी चळवळीने मांडली आहे. शहरातील विविध पक्षांच्या, तसेच कोणतेही पक्षीय पाठबळ नसणाऱ्या विद्यार्थी संघटनांनी या निमित्ताने एकत्र येत, शहरातील कॉलेज कँपसमधून राजकारण दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे.
फर्ग्युसनमध्ये घडलेल्या प्रकरणाचा फायदा घेत उजव्या व डाव्या विचारसरणीचे पक्ष शैक्षणिक संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळत आहेत. त्यामुळे शहरातील शैक्षणिक वातावरण बिघडत असल्याने, कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने शहरातील कोणत्याही कॉलेजमध्ये जाऊ नये, अशी मागणी चळवळीने केली आहे. पोलिसांनी कोणत्याही राजकीय पक्ष किंवा शैक्षणिक संस्थेला पाठीशी न घालता वेळप्रसंगी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही या माध्यमातून करण्यात आली आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
अभाविपने आपल्या कार्यक्रमासाठी जेएनयूमधील आलोक सिंह याला बोलविण्याच्या पार्श्वभूमीवर रानडे इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी थेट कन्हैय्या कुमारला पुण्यात चर्चेसाठी बोलविण्याचा पवित्रा घेतला आहे. या सर्व प्रकारामध्ये विद्यार्थी संघटनांच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा वा नेत्याचा कोणताही विचार केला जात नसल्याचे सध्या शहरात अनुभवायला मिळत आहे. येऊ घातलेल्या नव्या विद्यापीठ कायद्याच्या आणि त्यानुसार अपेक्षित असलेल्या विद्यार्थी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आपले प्रयत्न सुरू करण्याआधीच हे सर्व घडत आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये या विषयी मोठी अस्वस्थता अनुभवायला मिळत आहे. पुणे विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून एकत्र येणाऱ्यांमध्ये सध्या विद्यार्थी नसलेल्यांची, कॉलेज कँपसचा केवळ प्रवेश प्रक्रियांपुरता संबंध असलेल्यांची संख्याही मोठी दिसून येत आहे. त्यामुळे चळवळीतील कार्यकर्त्यांमध्येही तितकीच अस्वस्थता असल्याचेही या निमित्तानेच स्पष्ट होत आहे.
दरम्यान, आंबेडकरवादी विद्यार्थ्यांनी कोणत्याही देशविरोधी घोषणा दिल्या नसल्याचा अहवाल पोलिसांनी सादर केला आहे. आता फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
‘फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा नाहीत’
फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या २९ घोषणांची पूर्ण माहिती पुणे पोलिसांनी घेतली असून, त्यात कोणतीही देशविरोधी घोषणा दिली नसल्याचा अहवाल पोलिस महासंचालक कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. पोलिसांच्या चौकशीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात देशविरोधी घोषणा दिली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत. तर केवळ मनुवाद आणि साम्राज्यवादाविरोधात घोषणा दिल्या गेल्या आहेत, अशी माहिती उपायुक्त तुषार दोशी यांनी माध्यमांना दिली. फर्ग्युसन महाविद्यालयात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष (अभाविप) अलोक सिंह हा 'जेएनयू'बद्दल माहिती देण्यासाठी आला होता. या वेळी आंबेडकरवादी विद्यार्थ्यांनी त्याच्या उपस्थित सुरू असलेल्या चर्चेला आक्षेप घेतला होता.
या बैठकीदरम्यान झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये दोन्ही बाजुंनी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या गेल्या. पोलिसांनी मिळवलेल्या वेगवेगळ्या फुटेजमध्ये दोन्ही बाजुंनी तब्बल २९ घोषणा दिल्या गेल्याचे स्पष्ट झाले. 'अभाविप'ने १५, तर आंबेडकरवादी विद्यार्थ्यांनी १४ घोषणा दिल्या होत्या. या घोषणांमध्ये कोणतीही देशविरोधी घोषणा दिली गेली नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघडकीस आले आहे.
दरम्यान, महाविद्यालयाच्या आवारात देशविरोधी घोषणा दिल्या गेल्याचे पत्र फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पोलिसांना दिल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. आरोप-प्रत्यारोपानंतर घटनानंतर प्राचार्यांनी पोलिसांना दिलेले पत्र मागे घेतले. असे असले तरी पोलिसांनी आपली प्राथमिक चौकशी पूर्ण करून महाविद्यालयाच्या आवारात कुठलिही देशविरोधी घोषणा दिली गेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
मुलांमधील लैंगिक अत्याचारांत वाढ
सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे अश्लील साइट्स पाहून लैंगिक अत्याचार करण्याचे प्रमाण किशोरवयीन मुलांमध्ये वाढत असल्याचे निरीक्षण पुण्यातील एका अभ्यासातून पुढे आले आहे. मुलांमध्ये लहान वयातच शारीरिक आकर्षण वाढत असल्याची समस्या गंभीर रूप धारण करीत असल्याकडे या अभ्यासाने लक्ष वेधले आहे.
मुलांच्या समस्यांपूर्तीसाठी कार्यरत असलेल्या ज्ञानदेवी चाइल्ड लाइन संस्थेने गेल्या वर्षभरात आपल्याकडे आलेल्या मुलांबाबतच्या तक्रारींचा तौलनिक अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. हेल्पलाइनमुळे वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतील मुलांशी सातत्याने संवाद होत असतो. संस्थेची बालसेनाही विविध शाळांमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्याकडून शाळेतील घडामोडीबद्दल माहिती मिळत असते. 'अश्लील साइट पाहणे आणि लहान वयातील शारीरिक आकर्षण यांबाबतच्या तक्रारींचे फोन गेल्या काही वर्षांत वाढले आहेत,' असे संस्थेच्या प्रमुख अनुराधा सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, 'शाळेतील अल्लड वयात प्रेमप्रकरणे होतात, ती तत्कालीक असतात, असा काही वर्षांपूर्वीपर्यंत समज होता. मात्र, आता हे प्रकरण विचित्र दिशेला जात असल्याचे तक्रारींवरून लक्षात येऊ लागले आहे. याला इंटरनेट जबाबदार असून मुलांच्या मानसिक जडणघडणीवर त्याचे दुष्परिणाम जाणवत आहेत. मुले यू ट्यूबवर कोणताही व्हिडिओ बघत असतात, त्यावेळी स्क्रिनवर पॉर्न साइटच्या जाहिराती येतात. त्यातून मुलांचे कुतुहल वाढते आणि पालकांच्या नकळत ती अश्लील व्हिडिओ बघतात. कुतुहल तिथे थांबत नाही, ही मुले आपल्या वयापेक्षा लहान मुलांशी चाळे करीत असल्याच्या तक्रारी आहेत. यात मुली आणि मुले दोघांचाही समावेश आहे. वसतिगृहांसह काही घरांमध्येही असे प्रकार होत असल्याचे आमच्याकडील माहितीवरून दिसते.'
'मुलांना खेळांचे पर्याय द्या'
कामामध्ये व्यग्र असलेले पालकांना अलीकडे मुलांशी खेळायला वेळ नसतो. त्यामुळे घरात कंटाळलेले मूल न कळत कम्प्युटर, स्मार्ट फोनकडे आकर्षित होते. पालकांनी आणि शाळांनी मुलांना शारीरिक व्यायाम होणाऱ्या खेळांचे पर्याय उपलब्ध केले पाहिजे. भरपूर खेळल्यानंतर मुले आनंदी असतात आणि दमल्यामुळे ती वेळेत झोपतात. त्यांचे कुतूहल वाढविणारे इतर खेळांचे पर्याय मिळाल्यास मुले कम्प्युटरपासून नक्कीच दूर जातील, असे ज्ञानदेवी चाइल्ड लाइनच्या प्रमुख अनुराधा सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
आयुक्तांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण यांना बदनामीकारक पत्र पाठविणाऱ्या महापालिका आयुक्तांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनेच थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आयुक्तांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे. तसेच, विधिमंडळामध्ये सरकारला जाब विचारण्यात येईल, असा पवित्रा घेण्यात आला आहे.
शहरातील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागावे, यासाठी खासदार चव्हाण या आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत होत्या. परंतु, आयुक्तांनी त्यांनाच दोषी ठरवून तुम्ही अत्यंत गर्विष्ठ आणि उद्धट राजकारणी असल्याचे पत्र पाठविले. महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांनी त्याची दखल घेतली असून आयुक्तांनी तातडीने दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेसनेही आयुक्तांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. शहर काँग्रेसचे सरचिटणीस रमेश अय्यर यांनी आयुक्तांची तक्रार थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच केली आहे. शहराच्या हिताचे विषय घेत, पुणेकरांच्या हक्कासाठी लढणाऱ्या चव्हाण यांच्याबाबत आयुक्तांनी वापरलेले शब्द गैरलागू आहेत. खासदाराला अपशब्द वापरणाऱ्या आयुक्तांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत रस घेणाऱ्या आयुक्तांना महापालिकेच्या विकास कामांमध्ये कोणतेही स्वारस्य नाही. शहराचा विकास हा त्यांच्यासाठी क्षुल्लक बाब झाली असून, खासदारांना आक्षेपार्ह पत्र पाठविणाऱ्या आयुक्तांवर त्वरेने कारवाई करावी, असे पत्र काँग्रेसच्या नेहरू स्टेडियम ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष सचिन आडेकर यांनीही मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गेल्या महिन्यात केंद्र सरकारच्या परवानगीविना लंडनचा दौरा केला होता. त्याविषयी, सरकारकडे यापूर्वीच खुलासा विचारण्यात आला आहे. येत्या आठवड्यात हा मुद्दा चर्चेला आल्यास, आयुक्तांच्या पत्राबाबतही विचारणा केली जाईल, अशी माहिती काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी दिली.
राष्ट्रवादीत शांतता?
खासदारांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली असताना, राष्ट्रवादीत मात्र अद्याप शांतताच आहे. महापालिकेतील नेते आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांच्याव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने चव्हाण यांच्या बाजूने भूमिका मांडलेली नाही. शहराध्यक्षा म्हणूनच अनेकांचा चव्हाण यांना विरोध असल्याने त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आयुक्तांविरोधात राष्ट्रवादीचे आमदार चकार शब्द काढायला तयार नाहीत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
रिलायन्स, एअरटेलला काम थांबवण्याचे आदेश
शहरातील रस्त्यांवर केबल टाकण्यासाठी सुरू केलेली खोदाई थांबविण्याचे आदेश रिलायन्स, एअरटेल कंपनीला महापालिका प्रशासनाने दिले आहेत. नव्याने केलेल्या रस्त्यांची खोदाई होवून, फूटपाथ खोदले जाऊ नये तसेच बेकायदा खोदाईला आळा बसावा, यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात मोबाइल कंपन्यांकडून रस्ते खोदाई सुरू असल्याची तक्रार पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली होती. मनमानी पद्धतीने मोबाइल कंपन्या ही रस्ते खोदाई करत असल्याने चांगल्या रस्त्यांची दुरवस्था होत असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर महापौर प्रशांत जगताप यांनी रस्ते खोदाई करणाऱ्या केबल कंपन्यांची कामे थांबविण्याचे आदेश दिले होते. महिना, दोन महिन्यापूर्वी पालिकेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते आणि फूटपाथ केबल टाकण्यासाठी सर्रास खोदले जात असल्याचा आरोप सभासदांनी केला होता. यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांची नुकसान होत असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली होती.
मोबाइल कंपन्यांना रस्ते खोदाईसाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतरच परवानगी दिल्याने सर्व कंपन्यांची कामे थांबविता येणार नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र बेकायदा पद्धतीने होत असलेली रस्ते खोदाईची कामे शहानिशा करून थांबविली जातील, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. मोबाइल कंपन्यांकडून शहरात होत असलेल्या रस्ते खोदाईची माहिती घेऊन ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. रिलायन्स, तसेच भारती एअरटेल कंपन्यांची कामे थांबविण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. प्रशासनाने खोदाईची कामे थांबविण्याचे आदेश दिल्यानंतरही शुक्रवारी अप्पर इंदिरानगर, तसेच इतर काही भागातील केबल टाकण्यासाठी मोबाइल कंपन्यांची कामे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
मोबाइल टॉवरच्या जागांची यादीच नाही
मोबाइल टॉवर उभारण्यासाठी शहरातील महापालिकेच्या ३९४ जागा भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेत मान्य करून घेताना प्रशासनाने या जागा नक्की कोणत्या आहेत, याची कोणतीही माहिती सभागृहात दिली नाही. स्थायी समिती तसेच मुख्य सभेत हा विषय मान्य करून घेताना प्रशासनाने लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून हा कारभार केला आहे. लपून छपून मान्य करण्यात आलेल्या या जागा वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार असल्याची शक्यता असल्याची भीती नगरसेवक संजय बालगुडे यांनी व्यक्त केली. या विरोधात मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या मालकीच्या जागा भाडेतत्त्वावर देताना प्रशासनाकडून संपूर्ण माहिती स्पष्ट शब्दात देणे गरजेचे आहे. जागा वाटप नियमावलीनुसार मोबाइल कंपनीला शहरात टॉवर उभारण्यासाठीचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात मुख्य सभेने मंजूर केला. शहरातील विविध भागात असलेल्या ३९४ जागा भाडेतत्त्वावर दिल्या जाणार आहेत. मात्र या जागा नक्की कोणत्या असतील याची कोणतीही यादी प्रशासनाने स्थायी समिती तसेच मुख्य सभेसमोर दिलेली नाही. अत्यंत गोपनीय पद्धतीने हा प्रस्ताव तातडीने मंजूर करून घेण्यात आल्याने यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे. ज्या कंपनीला पालिका प्रशासनाने ३० वर्षांच्या मुदतीने मोबाइल टॉवर उभारण्याची मान्यता दिलेली आहे. त्या 'इंडस टॉवर्स लिमिटेड' या कंपनीने पालिकेचा मिळकतकर थकविला असल्याचा अभिप्राय दिला होता. तसेच बांधकाम विभागानेही या कंपनीने अनधिकृत मोबाइल टॉवर उभारले असल्याचे कळविले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करत या कंपनीचे हित जोपासण्यासाठी प्रशासनाने हा उद्योग केला असल्याचा आरोप बालगुडे यांनी केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
मिळकतकर वसुलीसाठी पालिकेची कारवाई
मिळकतकराची थकबाकी भरण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ११ ऑफिस आणि दोन दुकानांवर कारवाई करत, पालिकेने या सर्व मिळकती 'सील' केल्या आहेत. थकबाकीदार मिळकतकरधारकांनी कारवाई टाळण्यासाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिळकतकर विभागाने केले आहे.
मिळकतकर थकबाकीदारांसाठी पालिकेने अभय योजना लागू केली. त्याशिवाय, मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकतीसमोर बँड वाजवून वसुली करण्यासाठी स्वतंत्र पथके निर्माण करण्यात आली आहेत. त्या अंतर्गत, शहराच्या विविध भागांत लाखो रुपयांची थकबाकी असणाऱ्यांच्या मिळकतीसमोर बँड वाजविण्यात आला. तरीही, मिळकतकर भरण्यास नकार देण्यात आल्याने येरवडा, कोथरूड आणि हडपसर भागातील ऑफिस आणि दुकाने सील केली गेली.
येरवड्यातील प्रेमा राठी यांच्याकडे २४ लाख रुपयांची थकबाकी असल्याने तीन मजली इमारतीतील ९ ऑफिस सील करण्यात आली. अशीच कारवाई २६ लाख रुपये थकविणाऱ्या कोथरूड येथील जयंतीलाल शहा यांच्यावर करण्यात आली. त्यांची मयूर कॉलनीतील दोन ऑफिस सील करण्यात आली. तर, १४ लाखांची थकबाकी भरण्यास नकार दिल्याने हडपसर परिसरातील हांडेवाडी रोड येथील शरद मोटे यांच्या तीन दुकानांना सील ठोकण्यात आले.
मिळकतकर थकबाकीच्या दंडावर ५० टक्के सवलत मिळविण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत असून, या कालावधीत कर भरून जप्ती टाळावी, असे आवाहन मिळकतकर विभागप्रमुख सुहास मापारी यांनी केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
बनावट कुलमुखत्यारपत्र; गुन्हे नोंदवण्याचे आदेश
बनावट कुलमुखत्यार पत्राद्वारे औंधमधील अनुपमा सहकारी गृहरचना संस्थेच्या जमिनीचा परस्पर विक्री व्यवहार केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
औंधमधील अनुपमा गृहरचना संस्थेचे विकसन १९७८मध्ये झाले. त्यानंतर १९९३मध्ये या सोसायटीच्या नावाने कन्व्हेअन्स डिड झाले. या सोसायटीच्या नावे मालकीहक्क झाल्यानंतर चार जणांनी बनावट कागदपत्रांद्वारे जी अँड एस असोसिएटसला सोसायटीच्या जागेचे कुलमुखत्यारपत्र दिले. त्या कुलमुखत्यारपत्राधारे दस्त नोंदणीही करून घेण्यात आली.
दस्त नोंदणीमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असताना त्याची नोंद करण्यात आली आहे. या दस्त नोंदणीत संस्थेची जागा लिहून देणाऱ्यांचा पूर्ण पत्ता नाही. पॅनकार्ड जोडलेले नाही. जमिनीचे खोटे नकाशेही दस्तासोबत देण्यात आले. तसेच कुलमुखत्यारपत्रात अनेक ठिकाणी खाडाखोड केली आहे. याशिवाय, दस्तासाठी बनावट मृत्यूपत्र जोडल्याचे उघडकीस आले आहे. खरेदी खताला जोडलेल्या मूळ दस्तातील नावे आणि कुलमुखत्यार पत्रामधील नावे वेगळी आहेत. हा प्रकार जिल्हाधिकारी सौरव राव यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
पुण्याचा पारा ३९ अंशांवर
म. टा. प्रतिनिधी, पुणे शहर आणि परिसरात सलग दुसऱ्या दिवशी उकाड्याची तीव्रता कायम होती. कमाल तापमान ३९ अंशांवर स्थिरावले असताना, किमान तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने पुणेकर घामाघूम झाले आहेत. पुढील दोन दिवसांत उष्मा कायम राहणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, शहरासह राज्याच्या वेगवेगळ्या भागांत उन्हाचा चटका कायम आहे. राज्यातील सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद जळगाव येथे झाली, तर सोलापूर, मालेगाव, परभणी, नांदेडसह विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये पारा आताच ४० अंशांच्या पुढे पोहोचला आहे. नगरमध्ये उच्चांक नगर : नगरमध्ये गुरुवारी ४४.४ अंश सेल्सिअस एवढे विक्रमी कमाल तापमान नोंदले गेले. शुक्रवारी त्यामध्ये घट होऊन पारा ३९ अंशावर स्थिरावला आहे. मात्र, येत्या एक दोन दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट