मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
पोलिसांचेच मोबाइलचोरणारा अटकेत
तरुणीस फोनवरून अश्लीलमेसेज पाठविणाऱ्यास अटक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
‘बॅरिअॅट्रिक’ला विम्याचे कवच
पुणे ः सातत्याने बैठे काम, व्यायामाचा अभाव, फास्ट-फूडचे सेवन आणि मधुमेहाच्या आजारामुळे सध्या पुण्यासारख्या शहरात लठ्ठपणाचा आजार वाढत आहे. दिवसेंदिवस हा आजार गंभीर झाला आहे. त्यामुळे चिंता वाढू लागली आहे. भारताला मधुमेहाची राजधानी संबोधले जात आहे. त्यात मधुमेह आणि लठ्ठपणामुळे आजार बळावण्यास सुरुवात होते. लठ्ठपणा कमी केल्यावर मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी वैद्यकविश्वात बॅरिअॅट्रिक सर्जरीचा नवा पर्याय पुढे आला आहे. जगभर ही उपचारपद्धती मान्य झाली असून त्याचे टेक्निक पुण्यातील बॅरिअॅट्रिक सर्जनने शोधले आहे.
'लॅप्रो ओबेसो सेंटर'चे संचालक आणि बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी हे तंत्र शोधले आहे. उपचार पद्धती विकसित झाली असली, तरी त्यावर येणारा खर्च हा सामान्यांना पेलणे अशक्य आहे. म्हणूनच हृदयविकार, कॅन्सरसारख्या विविध आजारांचे उपचार, ऑपरेशनचा खर्च विमा कंपन्यांकडून दिला जातो. त्यासाठी 'क्लेम'करता येतो. आतापर्यंत बॅरिअॅट्रिक सर्जरीला 'क्लेम' दिला जात नव्हता. मुळात लठ्ठपणा हा आजार समजला जात नव्हता. अखेर बॅरिअॅट्रिक सर्जनच्या प्रयत्नांमुळे हा आजार असल्याचे केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने मान्य केले. एका विमा कंपनीने त्याला विम्याचे कवच देण्यास सुरुवात केली.
जगातील सर्व शास्त्रीय संस्थांनी लठ्ठपणा हा पचनसंस्थेचा अथवा हॉर्मोन्सचा आजार म्हटले आहे. अमेरिकन मेडिकल असोसिएशनने काही वर्षांपूर्वी लठ्ठपणा हा आजार असे जाहीर केले आहे. त्यावरील सर्व उपाय अमेरिकेत विमा कंपन्यांकडून देण्यात येऊ लागले आहेत. लठ्ठपणामुळे होणारे आजार, आजारांवर येणारा खर्च, त्याचा कुटुंबीयांसह देशावर येणारा आर्थिक ताण पेलणे अशक्य झाले आहे. सांधेदुखी, सांधेरोपण, अँजिओप्लास्टी, किडनीचे विकार, मधुमेहामुळे होणारे गुंतागुंतीचे आजार या सर्वांचा १० ते २० वर्षांत होणारा खर्च पाहता जगातील युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या सर्व ठिकाणी लठ्ठपणाच्या आजारासाठी सरकारी; तसेच खासगी विमा कंपन्यांनी विमा देण्याचे मान्य केले आहे.
लठ्ठपणा आणि मधुमेहाचे आजार भारतात वाढू लागल्याने ओबेसिटी सर्जरी सोसायटीने सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांना 'क्लेम' देण्याबाबत विनंती केली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केंद्रीय कर्मचारी आरोग्य योजनेंतर्गत (सीजीएचएस) लठ्ठपणा हा आजार असल्याचे जाहीर केले. 'सीजीएचएस'मध्ये कॉस्मेटिक ऑपरेशनसाठीचे पैसे देता येत नाहीत. त्यावेळी अनेक पेशंटने विमा कंपन्यांशी भांडणे करून 'क्लेम' मिळविले. ओबेसिटी अर्थात लठ्ठपणाच्या सर्जरीला 'कॉस्मेटिक सर्जरी' असे म्हटले जाते. 'स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी'ने बॅरिअॅट्रिक सर्जरीसाठी 'मेडिकल क्लेम' देण्यास सुरुवात केली. अन्य कंपन्यांना 'कॉस्मेटिक ट्रीटमेंट' म्हणून 'मेडिकल क्लेम' देणे अवघड झाले. 'इन्शुरन्स रेग्युलेटर ऑथॉरिटी ऑफ इंडिया'चे (आयआरडीए) सर्व नियम विमा कंपन्यांकडून पाळले जातात. त्यामुळे अन्य विमा कंपन्यांकडून सुद्धा बॅरिअॅट्रिक सर्जरीला खर्च दिला जाऊ शकतो. मधुमेहासह रक्तदाबावर होणारा खर्च कमी होऊन नागरिकांचे आयुर्मान वाढू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
विमा कंपन्यांकडून 'क्लेम'ची सोय त्याप्रमाणे बिनव्याजी हफ्त्याची मुभादेखील आहे. ज्या पेशंटला एकरकमी पैसे भरता येत नाहीत. अशा पेशंटसाठी एक किंवा दोन वर्षात ऑपरेशनसाठी हप्त्याने पैसे भरण्याची सोय केली आहे. हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर उपचारासाठी दाखल होणे, तपासणी, संसर्ग होणे यासाठी पेशंटना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत नाही. दुसरीकडे पेशंटला व्याज भरावे लागत नाही. त्याचे व्याज हे हॉस्पिटल भरते. परिणामी, विमा कंपन्यांना लठ्ठपणाच्या आजारावरील उपचाराचा खर्च देण्यास फायद्याचे ठरत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
आयुष्य वाढविणारे डायलिसिस मशिन
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
दुधाचा दर उरला कागदावरच
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
आरोग्य कर्मचाऱ्यांनाही ‘पीएफ’
राष्ट्रीय स्वास्थ बाल सुरक्षा कार्यक्रमांतील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सहसचिवांनी 'एनआरएचएम'च्या आयुक्तांना आदेश दिले. त्यामुळे पीएफ मिळेल. पण, हा पीएफ खात्यात जमा होण्याची आम्हाला प्रतीक्षा आहे. - डॉ. दिनेश घार्गे, प्रवक्ते, राष्ट्रीय बाल स्वास्थ सुरक्षा कार्यक्रम
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
दस्तनोंदणी रखडली
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
बाल आरोग्यासाठी झटणारी...
इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडिअॅट्रिक्स (आयएपी) या नावाने राष्ट्रीय पातळीवर काम करणारी संघटना म्हणजे देशातील बालरोग तज्ज्ञांची संघटना. भारतीय बालरोग संघटना असे याचे दुसरे नाव. राष्ट्रीय पातळीवर संघटनेची खऱ्या अर्थाने १९६३मध्ये स्थापना झाली. १८ वर्षापर्यंतचे पेशंट हे बालरोग तज्ज्ञ पाहतात. पौंगडावस्था वयातील मुलांच्या विकासाबद्दल पालकांमध्ये जागृती करणे, मुलांच्या शारीरिक, बौद्धिक मानसिक; तसेच सामाजिक आणि आरोग्यासंदर्भात पालकांना मदत करणे हे या संघटनेचे खरे उद्दिष्ट आहे. बालरोग शास्त्रातील ज्ञानाचा प्रसार करणे हे आणखी एक उद्देश मानला जातो. सामाजिक उपक्रम राबविणे, बालरोग तज्ज्ञांना प्रोत्साहन देणे यासारखे उपक्रम शहर शाखेकडून राबविले जातात. राष्ट्रीय पातळीवरील संघटनेच्या स्थापनेनंतर त्याची पाळेमुळे पुण्यापर्यंत पोहोचली. ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ कै. धैर्यशील शिरोळे यांच्या पुढाकाराने पुण्यात १९८१मध्ये संघटनेच्या पुणे शाखेची स्थापना झाली. पुणे शाखेत चारशेहून अधिक सदस्य कार्यरत आहेत. पाचशेहून अधिक बालरोगतज्ज्ञ पुण्यात प्रॅक्टिस करीत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तिसऱ्या मजल्यावर संघटनेचे कार्यालय आहे. संघटनेचे माजी पदाधिकारी ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग हे राष्ट्रीय संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत, तर'आयएपी'च्या पुणे शाखेचे डॉ. जयंत जोशी अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय पातळीवरून बालरोगतज्ज्ञांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी इंडियन पेडिअॅट्रिक्स हे अधिकृत नियतकालिक प्रकाशित होते. बाळांचा जन्म, स्तनपान, लसीकरण, पोषण, अतिसार, न्यूमोनियासारखे आजार, श्वसन संस्थेचे विकार, संसर्गजन्य आजार आणि किशोरवयीन मुलांच्या समस्या यांसारख्या विषयांवर वैद्यकीय निरंतर शिक्षण (सीएमई) कार्यक्रम राबविण्यात येतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
शिवनेरीच्या जोडीला आता ‘शिवशाही’
पंधरा एप्रिलनंतर एसटीची सेवा सुरू होणार
Harsh.Dudhe@timesgroup.com
पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवशाही एसी बस येत्या १५ एप्रिलनंतर राज्यातील रस्त्यांवर धावणार आहेत. स्लीपर आणि सीटर अशा दोन प्रकारांत असणाऱ्या सुमारे ५०० बस १५ मेपर्यंत राज्यभरात धावतील. पहिल्या टप्प्यात लांब पल्ल्यांच्या स्लीपर शिवशाही बस या मुंबई आणि पुण्यातून खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील शहरांसाठी नियंत्रित केल्या जातील. या बसला पुण्यातून राज्यातील इतर शहरांसाठी चांगली 'कनेक्टीव्हीटी' मिळणार असल्याने पुण्यात या बसच्या नियंत्रणाचे एक केंद्र असू शकते, अशी माहिती एसटीच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी 'मटा'ला दिली.
राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी खासगी आराम बससेवेशी स्पर्धा करण्यासाठी शिवशाही सेवा लवकरच सुरू करण्यात येईल, असे जाहीर केल्यानंतर एसटीने काही दिवसांपूर्वीच निविदा काढल्या असून त्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले आहे. त्या कंपनीमार्फत बस खरेदी करण्याची आणि त्यानंतर एसटीला भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे १५ एप्रिलनंतर यापैकी काही बस प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. त्यानंतर १५ मेपर्यंत संपूर्ण ५०० बस एसटीकडे आल्यानंतर संपूर्ण राज्यभरात या बस धावतील.
मुंबईच्या तुलनेत पुण्याहून मराठवाडा आणि विदर्भातील विविध शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. तसेच या शहरांना जाणाऱ्या सध्याच्या एसटी बसची संख्या पुरेशी असून त्यांना प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे. त्यामुळे या शहरांना जाण्यासाठी शिवशाही स्लीपर बसची संख्या पुरेशा प्रमाणात राहणार असून त्याच्या नियंत्रणासाठी पुण्याला केंद्र असू शकते. एकूण ५०० बसपैकी २०० बस स्लीपर तर ३०० बस सीटर राहतील. स्लीपर बसची ३० तर सीटरची ४५ प्रवासी आसनक्षमता आहे. या बसचे भाडे एसटीच्या निमआराम बसच्या भाड्यापेक्षा अधिक तर शिवनेरीपेक्षा कमी असेल. त्यामुळे हे भाडे ठरविण्यासाठी येत्या काही दिवसांत एसटीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक मुंबईत होईल. दरम्यान, शिवशाही बस आल्यामुळे राज्यातील शिवनेरीच्या बसच्या फेऱ्या बंद अथवा त्या बसच्या वेळापत्रकात बदल होणार नसून त्यांची सेवा सुरूच असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
असे असू शकतात मार्ग
पुण्याहून नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, जळगाव, नांदेड, परभणी, धुळे आदी प्रमुख शहरांसाठी स्लीपर शिवशाही बस धावण्याची शक्यता आहे. पुणे-औरंगाबाद, पुणे-नाशिक, पुणे-कोल्हापूर, पुणे-सांगली, पुणे-सोलापूर या कमी अंतराच्या मार्गांवर वातानुकूलित सीटर बस धावू शकते. मुंबईहून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी प्रमुख शहरांसाठी आणि खेड, दापोली, नांदेड, परभणी, जालना, बीड, यवतमाळ, अकोला, औरंगाबाद, जळगाव या शहरांसाठी स्लीपर बस धावण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आंतरराज्य सेवा
स्लीपर प्रकारात शिवशाही बस आल्यानंतर पुण्याहून बंगळूर, हैदराबादसाठी बस सुरू होईल. सुरतसाठी बस सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. मुंबईहून पणजी आणि गुजरातमध्येदेखील काही शहरांसाठी ही बस धावू शकते. तसेच कोल्हापूरहून बेंगळूरूसाठी स्लीपर बस सुरू करण्याचा एसटीचा विचार आहे.
विदर्भ व मराठवाड्यात ७० टक्के शिवशाही
पुणे आणि मुंबई परिसरात प्रवाशांसाठी सध्या एसटीची शिवनेरी ही वातानुकूलित बससेवा कार्यरत आहे. मात्र, मराठवाड्यात औरंगाबाद सोडल्यास ही सेवा उपलब्ध नाही. विदर्भात ही सेवा अस्तित्वातच नाही. त्यामुळे या दोन प्रदेशांतील जवळच्या शहरांना जोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवशाही सीटर बस धावतील. एकूण बससंख्येच्या ६० ते ७० टक्के या बस असतील. कोकणातदेखील या बसची संख्या अधिक राहणार आहे. मुंबईत या बस कमी राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
‘शर्तभंग’ नियमित होणार
कुळाची जमीन खरेदी करताना झालेला 'शर्तभंग' बाजारमूल्याच्या पन्नास टक्के नजराणा भरून नियमित करण्याचा अध्यादेश विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर काढण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, सीलिंगची जमीन विनापरवाना खरेदी केल्यानंतर ती थेट सरकारजमा करण्याच्या कायद्यातील तरतुदीवरही फेरविचार करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याचे सातबारा उताऱ्यावर कूळ लागल्यानंतर त्याची विक्री विनापरवाना केल्यास शर्तभंग होतो. अशा शर्तभंगाच्या प्रकरणांमध्ये संबंधित जमीन कुळाला परत दिली जाते किंवा ती सरकारजमा करण्यात येते. राज्यात कूळ जमीन खरेदीचे अनेक व्यवहार झाले आहेत. या व्यवहारांमध्ये सरकारची परवानगी घेतली गेली नसल्याने तो शर्तभंग ठरतो. अशा शर्तभंगाची हजारो प्रकरणे कूळ कायदा शाखा आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निर्णयाच्या प्रतीक्षेत अडकल्या आहेत. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी शेतजमिनीची खरेदी-विक्री; तसेच हस्तांतरणाचे व्यवहार सुलभ व्हावेत, यासाठी महाराष्ट्र कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम (कलम- ८४ क) या अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यांतर्गत कुळाच्या जमीन खरेदीत शर्तभंग झाला असल्यास बाजार मूल्याच्या पन्नास टक्के रक्कम भरून शर्तभंग नियमित केला जाणार आहे. शेतजमिनीची खरेदी-विक्री अथवा हस्तांतरण, शर्तभंग किंवा विनापरवानगी व्यवहारांमध्ये संबंधित जमीन सरकारजमा केली जाते. या अडकून पडलेल्या जमिनीचा योग्य वापर व सरकारला उत्पन्नाचा स्रोत म्हणून हा कायद्यातील तरतुदीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील अध्यादेश विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जारी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्या कलम ८४ (क)मध्ये पोटकलम ५नंतर आणखी एक पोटकलम समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यानुसार हस्तांतरित जमिनीचे क्षेत्र कमाल जमीन धारणेपेक्षा अधिक होत नसेल आणि संबंधित जमीन केवळ शेतीच्या प्रयोजनासाठी वापरण्यात येणार असेल, तर हा व्यवहार कायदेशीर मानला जाणार आहे. तसेच, जमीन हस्तांतरित करण्यात आलेली व्यक्ती शेतकरी असेल आणि त्याने कूळ वगळून बाजारमूल्याच्या ५० टक्के इतका दंड भरल्यास या जमिनीचे हस्तांतरण बेकायदा ठरविले जाणार नाही. हस्तांतरीत जमिनीचा शेतीव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापर होत असेल, तर बाजार मूल्याच्या ७५ टक्के इतका दंड भरून हा व्यवहार नियमित करता येणार आहे. या धर्तीवर सीलिंगमधील जमीन खरेदीचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
बेकायदा पंधरा इमारतींना ‘पीएमआरडीए’ची नोटीस
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
पंधरा रस्ते राष्ट्रीय महामार्गाच्या प्रतीक्षेत
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
सिनेटमध्ये आमदारांचा नाराजीनामा
म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती होऊनही बैठकीचे निमंत्रण न दिल्याच्या कारणावरून विधानसभा व विधान परिषद आमदारांनी शुक्रवारी सिनेट बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली. आमदारांनी या विषयी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला असताना, राज्य सरकारने विद्यापीठाला उशिरा माहिती दिल्याने हे घडल्याचे समोर आल्याने या लोकप्रतिनिधींना माघार घ्यावी लागली. १९९४च्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांना नामनिर्देशित सदस्य म्हणून सिनेटमध्ये सहभाग घेता येतो. त्यानुसार विधानसभेचे आमदार अॅड. राहुल कुल, गौतम चाबुकस्वार आणि विधान परिषदेचे आमदार अॅड. रामहरी रुपनवर यांची पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली आहे. सिनेट बैठकीच्या प्रथेनुसार, या बैठकीपूर्वी सर्व सिनेट सदस्यांना विद्यापीठामार्फत बैठकीचे निमंत्रण आणि बैठकीसाठी आवश्यक कागदपत्रे दिली जातात. त्यानुसार शुक्रवारच्या बैठकीसाठी या तिघांनाही निमंत्रण आणि कागदपत्रे मिळणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने या आमदारांनी विद्यापीठ प्रशासनालाच धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, 'राज्य सरकारकडून या नियुक्त्यांविषयी विद्यापीठाला ९ मार्च रोजी माहिती मिळाले. त्यामुळे लोकप्रतिनिधींना निमंत्रण पोहोचण्यात विलंब झाला. लोकप्रतिनिधींच्या मदतीनेच विद्यापीठाचे प्रश्न विधीमंडळात मार्गी लागतील.' ग्राम विकासासाठी दत्तक गावे योजना राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातील पाच गावे दत्तक घेतली आहेत. त्यामध्ये कोंडीवडे (वडगाव मावळ), कोळीवडे(वेल्हे), नगर जिल्ह्यातील कोंकणगाव (संगमनेर) आणि नाशिक जिल्ह्यातील मोहाडी(दिंडोरी) आणि कातुर्ली (त्र्यंबकेश्वर) या गावांमध्ये पुढील पाच वर्षांसाठी एनएसएसच्या माध्यमातून विकासकामे केली जातील, असे कुलगुरू यांनी सांगितले.
ई- कंटेन्ट स्टुडिओमध्ये न्यूज चॅनेल
विद्यापीठाच्या आवारामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला ई- कंटेन्ट स्टुडिओची उभारणी करण्यात आली आहे. त्याच्या साह्याने विद्यापीठाच्या प्रयोगशाळा आणि क्लास रुम्ससाठी व्हर्च्युअल क्लासरुम्स संकल्पनेंतर्गत 'ई लेक्चर' तयार केले जात आहे. आगामी काळात शॉर्ट फिल्म आणि न्यूज चॅनेल चालविण्याचे विचाराधीन असल्याचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी वार्षिक अहवाल सादर करताना सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
फॅमिली कोर्टात आता ‘चाइल्ड केअर’ अद्ययावत
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
टोलचा ‘झोल’ सुरूच
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
नोकरीच्या अामिषाने लाखोंचा गंडा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
प्लम्बिंग कौशल्यासाठी कार्यक्रमाची घोषणा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
‘नेव्हल कमांड’ला मद्यपीचा जस्ट डायल
म. टा. प्रतिनिधी, पुणे 'जस्ट डायल'वरून कोणाचा नंबर दिला जाईल आणि त्याचा वापर कशासाठी होईल, याचा कुठलाही नेम राहिलेला नाही. अशीच आश्चर्यकारक घटना नुकतीच पुण्यात घडली. मुंबईतील 'वेस्टर्न नेव्हल कमांड'चा संवेदनशील संपर्क क्रमांक मद्यपीच्या हाती लागला आणि त्याने सागरी मार्गे 'इस्लामिक स्टेट'कडून (आयएस) हल्ला होण्याची शक्यता फोनवरून वर्तवल्याने एकच धावपळ उडाली होती. पठाणकोट हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क असतानाच हल्ल्याची माहिती देणारा फोन 'नेव्हल कमांड'मध्ये खणखणल्याने खळबळ माजली. या घटनेची माहिती 'नेव्हल कमांड'ने दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिली होती. 'नेव्हल कमांड'ला आलेला फोन पुण्यातून आल्याचे उघडकीस आल्यानंतर 'त्या' संशयिताला शोधण्याची जबाबदारी ही पुणे 'एटीएस'कडे देण्यात आली होती. पुणे 'एटीएस'ने हल्ल्याची माहिती देणाऱ्याचा शोध 'त्या' मोबाइल नंबरच्या आधारे घेतला. संबंधिताला शोधल्यानंतर तो मद्यपी तरुण असल्याचे आढळले. मूळचा पंढरपूर येथील हा तरुण पुण्यात सुरक्षारक्षकाची नोकरी करतो. 'नेव्हल कमांड'ला फोन केल्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने फोन केल्याची कबुली दिली. त्याच्या मोबाइलवर एकदा क्रॉस कनेक्शन झाले होते. या वेळी त्याला काही माहिती समजली होती. ती माहिती 'नेव्हल कमांड'ला सांगितल्याचा दावा त्याने केला होता. नेव्हल कमांडचा संवेदनशील क्रमांक त्याला कसा मिळाला, याचा त्याच्याकडे कसून तपास करण्यात आला. त्यावेळी त्याच्या मोबाइलमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा होती आणि त्यात 'जस्ट डायल'ला फोन केल्याचे रेकाॅर्ड असल्याचे चौकशीदरम्यान सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
निवडणुकीपासून मतदार अनभिज्ञच
म. टा. प्रतिनिधी, पुणे शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार असलेल्या अनेकांना माहिती नसलेला निवडणुकीचा कार्यक्रम तंतोतंत पाळण्यासाठी सध्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह प्रशासकांचीही धावपळ सुरू झाली आहे. मुळातच या कार्यक्रमाविषयी अनभिज्ञ असणारे मतदार प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ दिला नसल्याची ओरड करीत आहेत. शिक्षण प्रसारक नियामक मंडळावरील बारा सभासदांच्या नेमणुकीसाठी ३० मार्च रोजी प्रत्यक्ष मतदान घेतले जाणार आहे. या प्रक्रियेविषयीची सविस्तर कार्यक्रम पत्रिका २९ फेब्रुवारीला सर्व सभासदांकडे पाठविण्यात येणार होती. निवडणुकीसाठीचे अर्ज सादर करण्यासाठी ४ मार्चपासून सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी १६ मार्चपर्यंत अखेरची मुदत होती. २१ मार्चला पुणे, मुंबई आणि सोलापूर शहरांबाहेरील सभासदांकडे पोस्टाने मतपत्रिका पाठविल्या जाणार आहेत. पुणे, मुंबई आणि सोलापूरमध्ये ३० मार्चला प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. ३१ मार्चला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या प्रक्रियेचा आढावा घेता, सध्या पन्नासहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज भरल्याची माहिती समोर आली आहे. मतदानाच्या या टप्प्यांचा विचार करता पुढील पंधरा दिवसांमध्ये या उमेदवारांपैकी प्रत्येकाची माहिती जाणून घेणे, त्या विषयीचे अनुकूल वा प्रतिकूल मत बनविणे, त्यानुसार मतदानासाठी हजर होणे या टप्प्यांमधून मतदारांना जावे लागणार आहे. तसेच, संस्थेच्या कार्याचा विस्तार लक्षात घेता, पुणे, मुंबई आणि सोलापूर वगळता राज्याच्या आणि देशाच्या इतर भागांमध्येही संस्थेचे सभासद विखुरलेले आहेत. या प्रत्येक सभासदापर्यंत पोस्टाने मतपत्रिका पोहोचण्यासाठी आणि सभासदाने पोस्टाने पाठविलेली मतपत्रिका परत मिळण्यासाठी केवळ नऊ दिवसांचा कालावधी विचारात घेतला गेला आहे. सध्या सभासदांपैकी अनेकांना मुळातच या प्रक्रियेचीही माहिती मिळालेली नाही. अशा परिस्थितीत या तीन शहरांबाहेरील आणि राज्याबाहेरील मतदारांना या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांना प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठीच अत्यल्प कालावधी विचारात घेतला गेला, असा आरोपही याच निमित्ताने करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
भामाआसखेडबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा
म. टा. प्रतिनिधी, पुणे भामा-आसखेड योजनेला शिवसेनेकडून सातत्याने विरोध केला जात असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीच चर्चा करण्याचे संकेत महापौरांनी दिले आहेत. तसेच, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधून समन्वयातून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा-आसखेड धरणातून अडीच टीएमसी पाणी घेण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू असतानाच, स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे या प्रकल्पाचे काम ठप्प झाले आहे. शिवसेनेचे खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात आला. त्यावेळी, शिवसेनेचा विरोध कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ग्रामीण भागांतील नेत्यांनी पुन्हा हस्तक्षेप करून प्रकल्पाचे काम बंद पाडले. राज्य सरकारच्या स्तरावरून शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरीही, शिवसेनेकडून विरोध कायम असल्याने आता थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनाच भामा-आसखेड योजनेच्या कामात अडथळा आणू नये, असे गाऱ्हाणे घालण्यात येणार असल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली. भामा-आसखेड प्रकल्पाचे काम बंद असल्याने त्याचा खर्च वाढत आहे. शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या भागातदेखील पाण्याची मोठी समस्या असून, वेळोवेळी सभागृहात त्यांनी त्याकडे लक्ष वेधले आहे. या योजनेमुळे पाणीपुरवठ्याची समस्या कायमची दूर होण्याची शक्यता असून, त्याचा लाभ स्थानिक नागरिकांना होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुखांचे याकडे लक्ष वेधण्यात येणार असल्याचा दावा महापौरांनी केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट