सध्या तूरडाळीचा एक किलोचा भाव १३५ ते १५५ रुपये झाला आहे. त्या तुलनेत हरभरा, मटकी, मसूर या डाळींचे भाव कमी आहेत. मात्र, त्यातही दुपटीने वाढ झाली आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये घाऊक बाजारात तुरडाळीचा भाव ६० ते ७० रुपये किलो, हरभरा डाळ ३० ते ३५ रुपये आणि उडीद डाळीचा भाव ८० रुपये किलो होता. हे भाव या वर्षी एप्रिल व मे महिन्यापर्यंत कायम होते. त्यानंतर सर्व डाळींच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे.बहुराष्ट्रीय कंपन्या डाळीच्या व्यापारात उतरल्या असून, त्यांच्यावर साठवणुकीची मर्यादा नाही. त्यामुळे साठेबाजीचा प्रकार वाढला आहे; तसेच अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने पिकांवरही त्याचा परिणाम झाला असून डाळींचे उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटले आहे. केंद्र सरकारने पाच हजार क्विंटल तुरडाळीची आयात केली; पण ती पुरेशी ठरली नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट