म. टा. प्रतिनिधी, पुणे
आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांच्यासह अन्य दोघांवर कारवाई करण्याबाबतचा निर्णय शिस्तपालन समितीकडे सोपवला आहे; मात्र भूषण आणि यादव यांची पक्षातून गच्छंती अटळ असून, शिस्तपालन समिती हा निर्णय घेईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी पक्षात राहूनच गुडगाव येथे मंगळवारी कार्यकर्त्यांचा समांतर मेळावा आयोजित केला होता. त्या पार्श्वभूमीवर, त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय आता शिस्तपालन समितीकडे सोपवला आहे. यांच्यावर कारवाई करताना पक्षाने योग्य पद्धत अवलंबली नाही, असे दिसू नये, यासाठीच पक्षाने रीतसर हे प्रकरण शिस्तपालन समितीकडे सोपवल्याची चर्चा सुरू आहे.
गुडगाव येथील मेळाव्यात यादव-भूषण यांनी 'स्वराज संवाद' उपक्रम देशभर राबवण्याचा निर्णय घेतला होता. पक्षातील कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र हेल्पलानही सुरू करण्याची घोषणा केली होती. प्रा. आनंदकुमार यांची या उपक्रमाच्या संयोजकपदी निवड करण्यात आली होती. बुधवारी आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी चर्चा होती.
'घोटाळ्यामुळे कचरावेचक लाभांपासून दूर ?
'जनगणना यादीमध्ये जाती-जमातींबरोबरच कामधंदा, शिक्षण, अपंगत्व, धर्म, घराचा प्रकार, नोकरी, उत्पन्नाचा प्रकार, मालमत्ता, जमीन अशी सविस्तर माहिती गोळा करण्यात आली आहे. जनपडताळीनंतर तयार होणाऱ्या अंतिम यादीला अधिकृत पुरावा मानून दारिद्र्य रेषेखालील वेगवेगळ्या वर्गवारीतील व्यक्तींना अन्न सुरक्षा योजना, पेन्शन योजनेसह इतर सर्व योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. पण, यादीतील असंख्य घोटाळ्यांमुळे पुन्हा एकदा कचरावेचक सरकारी योजनांच्या लाभापासून दूरच राहणार आहे,' असे शैलजा अराळकर यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट