'दहावी-बारावीच्या परीक्षेतील पेपरफुटी किंवा कॉपीची प्रकरणे हा सामाजिक कलंक आहे. सध्या परीक्षेच्या आधी शिक्षण मंडळाचे अधिकार कायम राहावेत,' अशी भूमिका असल्याचे स्पष्ट करून शिक्षणमंत्री विनोद तावडे अर्धा एक तास मोबाइलवरून पेपर फुटल्याच्या काही घटना समोर येत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी पुढील वर्षांपासून दहावी, बारावीच्या परीक्षा स्वतंत्र वर्गात (आयसोलेटेड क्लास) घेण्याचा विचार सुरू आहे,' अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
'पूर्वी बोर्डाच्या परीक्षेआधी एक किंवा दोन दिवस पेपर फुटण्याच्या घटना समोर येत. सध्या परीक्षेआधी अर्धा एक तास दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडे असलेल्या मोबाइलच्या माध्यमातून पेपरफुटीच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पुढील वर्षापासून दहावी, बारावीच्या परीक्षा पूर्णतः स्वतंत्र ठिकाणी घेण्याबाबत विचार सुरू आहे. या परिसरात कोणालाही मोबाइलचा किंवा अन्य तंत्रज्ञानाचा वापर करता येणार नाही,' असे तावडे म्हणाले. त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना शाळेशेजारी लग्न किंवा अन्य समारंभांना परवानगी देऊ नये, अशा सूचनाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण मंडळाचे अधिकार कायम राहावेत, अशी भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
'प्रत्येक शाळेला किंवा शिक्षकांना गाडी देणे शक्य होणार नाही. त्यामुळे सध्याच्या व्यवस्थेत एकही उत्तरपत्रिका गहाळ होणार नाही, हे पाहणे संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
डिप्लोमा अभ्यासक्रम बंद करण्याविषयी तावडे यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यानंतर वादंग निर्माण झाले होते. डिप्लोमा बंद करण्याबाबत अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. त्याबाबत विचारले असता, तावडे म्हणाले,'माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. डिप्लोमा अभ्यासक्रमात काही बदल करणे आवश्यक आहे का, याचा आढावा घेण्याबरोबरच डिप्लोमानंतर एमबीएला प्रवेश देता येईल का, याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करू, असे विधान मी केले होते. डिप्लोमा बंद करण्याचा सरकारचा विचार नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्व काही फुकट नको...
घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून करण्यात यावे, अशी मागणी साहित्य महामंडळातर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्याची मागणीही महामंडळाने केली आहे. त्यावर तावडे यांनी आपली भूमिका मांडली. 'राज्य सरकारही साहित्य संमेलनाला मदत करत आहे. मात्र, सर्व काही फुकट हवे, अशी भूमिका साहित्यिकांनी घेऊ नये.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट