Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

... तर शिक्षक- मुख्याध्यापकांना अटक

0
0
शाळांमधून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना दडपल्यास आणि दोषींवर योग्य कारवाई न केल्यास शिक्षक-मुख्याध्यापकांना आता अटक केली जाण्याची शक्यता आहे. पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी ही माहिती दिली.

जेनेरिक औषधनिधीवर नगरसेवकांचा डल्ला

0
0
गरीब आणि गरजू नागरिकांना महागडी औषधे स्वस्त दरात उपलब्ध व्हावीत यासाठी महापालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी नगरसेवक आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी वळविण्यात आला आहे.

कैद्यांची माहिती आता एका क्लिकवर

0
0
राज्यातील कारागृहांमध्ये असणाऱ्या सर्व कैद्यांच्या अचूक वैयक्तिक माहितीचा डेटा लवकरच कम्प्युटरच्या माध्यमातून एका क्लिकवर पाहता येणार आहे. यासाठी सर्व कैद्यांचे ‘युवर आय डी’ तयार करण्याचे काम सुरू आहे.

अनुदान दुप्पट करा

0
0
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निधीसाठी राज्य सरकारकडे दरवर्षी मागणी करण्याऐवजी कायमस्वरूपी अध्यादेश काढून संमेलनासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात यावी, अशा मागण्या साहित्य महामंडळाने सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे नुकत्याच केल्या.

स्थलांतरी पक्ष्यांनी गावाला दिला रोजगार

0
0
धरणामध्ये जमिनी गेल्याने मासेमारीतून मिळणाऱ्या पैशातून घर चालवायचे किंवा उरलेल्या जमिनीच्या तुकड्यांमध्ये शेती करण्याची वेळ कुंभारगावातील ग्रामस्थांवर आली होती. अभिमानाने सांगावे असे गावात काहीच नसल्याने तेथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचीही शक्यता नव्हती.

‘कॅशलेस मेडिक्लेम’ला स्थगितीचा पुन्हा इशारा

0
0
चार सरकारी विमा कंपन्यांच्या ‘प्रेफर्ड प्रोव्हायडर नेटवर्क’ (पीपीएन) योजनेला शहरातील हॉस्पिटलने प्रचंड विरोध केल्यानंतर काही महिने गप्प बसलेल्या विमा कंपन्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे.

आता भाजपचे मिशन महापालिका

0
0
भारतीय जनता पक्षातर्फे येत्या तीन महिन्यांमध्ये राज्यात दहा लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट निर्धारीत करण्यात आले आहे. केंद्र, राज्यात सत्ता मिळविल्यानंतर आता पक्षातर्फे मिशन महापालिका हाती घेण्यात आले आहे, असे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सरचिटणीस रवी भुसारी यांनी गुरुवारी पिंपरी-चिंचवडमध्ये स्पष्ट केले.

पुतळ्यांना २४ तास सुरक्षा द्या

0
0
‘महापालिका हद्दीतील पुतळ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे. शहरातील महत्वाच्या पुतळ्यांना संरक्षण न दिल्यास अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे महत्वाच्या पुतळ्यांच्या संरक्षणासाठी चोवीस तास सुरक्षारक्षक नेमावेत,’ असे पत्र पोलिसांनी महापालिका प्रशासनाला दिले आहे.

करमणूक कर चुकवल्याने केबलचालकांना नोटीस

0
0
करमणूक कर भरण्यासाठी दिलेले चेक न वटल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहर व परिसरातील ३५ केबलचालकांना नोटीस पाठविण्यात आली आहे. वारंवार आवाहन करूनही नियमित कर न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

पुण्याच्या पाण्याचा पुन्हा ‘कालवा’

0
0
शहरासाठीच्या धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी होणारी कालवा समितीची बैठक नोव्हेंबर महिना संपत असतानाही अद्याप न झाल्याने सर्वसाधारण सभेत गुरुवारी नाराजी व्यक्त करण्यात आली.

बीएसएनलचे कामकाज ठप्प

0
0
वेतनवाढ आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) ग्रुप सी आणि डीमधील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काम बंद आंदोलन केल्याने ‘बीएसएनएल’च्या पुण्यातील सर्व कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले.

आयुक्तांचे आश्वासन आले कामी

0
0
उरळी देवाची आणि फुरसुंगी येथे १२ इंची पाइपलाइन आणि ५ एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प येत्या १ डिसेंबरपर्यंत कार्यान्वित करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ग्रामस्थांना दिले.

संमेलनाची नांदी... बोधचिन्हातून

0
0
बेळगाव येथे होणाऱ्या ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे बोधचिन्ह तयार झाले आहे. बेळगावची वैशिष्ट्ये उलगडणाऱ्या या बोधचिन्हातून संमेलनाची खऱ्या अर्थाने नांदी झाली असून, संमेलनाची तयारी विविध समित्यांच्या माध्यमातून वेग घेत आहे.

तंत्रशिक्षणातही आता ‘केवायसी’

0
0
तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘केवायसी’ (नो युवर कॉलेज) हा लवकरच परवलीचा शब्द बनणार आहे.

पुण्यात नीचांकी तापमानाची नोंद

0
0
शहरात थंडीने आपले बस्तान बसवले असून, गुरुवारी यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली. गुरुवारी शहरात ११.७ अंश सेल्सियस इतके किमान तापमान नोंदले गेले. पुढील काही दिवस थंडीचा मुक्काम कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

‘बंगल्यांचा’ नव्हे तर ‘ओसाड वॉर्ड’

0
0
घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वादात दुरुस्तीविना कोसळायला आलेली जुनी घरे, संरक्षण भिंत नसल्याने धोकादायक बनलेला कॅनॉल आणि खड्ड्यात गेलेले रस्ते या नागरी समस्यांच्या जंजाळात वॉर्ड क्रमांक पाच अडकला आहे.

विद्यार्थी परिषद आहे कुठे?

0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यार्थी परिषदच अद्याप अस्तित्त्वात नसल्याने, अध्यक्ष आणि सचिवांची नेमणूक करणे अवघड झाले आहे. परिषदच नसल्याने विद्यापीठाचे विद्यार्थी किमान आणखी महिनाभर तरी कोणत्याही अध्यक्ष वा सचिवाशिवायच राहणार आहेत.

साहित्य संमेलनावर नेमाडेंची टीका

0
0
‘साहित्य संमेलन हे रिकाम्या लोकांचे उद्योग आहेत. या संमेलनांवर चर्चा करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे,’ अशा कठोर शब्दांत ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी शुक्रवारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावर टीका केली.

मतदाराच्या हजेरीच्या सक्तीमुळे बोर्डाच्या कार्यालयात गोंधळ

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या मतदारयादीत नावे समाविष्ट करण्यावरून शुक्रवारी बोर्डाच्या कार्यालयात गोंधळ उडाला. अर्ज केलेल्या प्रत्येक मतदाराने हजर राहण्याच्या सक्तीमुळे पहिल्या दिवशी एक हजार २७३ मतदारांपैकी अवघे ४५० मतदार उपस्थित राहिले.

हे तर ब्राह्मणी शहाण्यांचे उंटावरून शेळ्या हाकणे!

0
0
साहित्य संमेलन हे रिकाम्या लोकांचे उद्योग असून, तेथे फक्त चर्चा होते, त्यावर पुढे काहीच होत नाही. शहाणपणाला मर्यादा असते; पण मूर्खपणाची काही हद्द नसते. इतकेच या संमेलनाबाबत म्हणता येईल. साहित्य संमेलन म्हणजे ब्राह्मणी शहाण्यांचे उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम आहे...
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images